गांधीजी आणि तुकाराम Gandhi & Tukaram

*गांधीजी आणि संत तुकाराम*

1930 ला येरवडा कारागृहात असताना गांधीजींनी  तुकाराम महाराजांच्या 16 अभंगांच इंग्रजीत भाषांतर केलं होतं..त्यामध्ये " जे का रंजले गांजले " यांसारख्या अभंगाचा समावेश होता.संत तुकाराम महाराजांच्या अभगांचं त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे ,असे ते वारंवार नमूद करत असत.
डॉ.इंदूभूषण भिंगारे व कृष्णरावदेशमुख यांनी संततुकारामांची राष्ट्रगाथा’ हे पुस्तक 1945 साली प्रकाशित केल होत.  त्या पुस्तकाची प्रस्तावना महात्मा गांधीजींनी लिहिली होती ..त्यामध्ये ते लिहितात कि, *"तुकाराम मुझे बहुत प्रिय है."*
 एवढंच नव्हे तर नंदलाल बोस या शांतिनिकेतन मधल्या प्रसिद्ध चित्रकाराकडून त्यानी तुकारामांचं चित्र काढून घेऊन ते त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी पाठवलं होत...

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा  विषयच एवढा अफाट आणि खोल आहे की जीवनाच कोणतेही क्षेत्र त्यापासून वंचित राहत नाही..अगदी सामान्य व्यक्तीपासून ते अतिसामान्य व्यक्तीच्या मुखामध्ये संत  तुकारामांचे अभंग सहज खेळतात..बाकी मग संत तुकाराम महाराज म्हणतातच,
 मना वाटे तैसी बोलिलो वचने..।नाही मनी लाज धरिली आशँका ।
नाही भ्यालो लोकां चतुरांसी ।।आपला आपण करावा वेव्हार ।
 जिंकोनी अंतर मन ग्वाही।।

जगाच्या कलाण्या - संतांच्या विभूती ॥
तुकाराम काय किंवा गांधीजी जनहितार्थ देह कष्टविणाऱ्या थोर विभूती होत. त्यांनी देह कष्टविले म्हणूनी सर्वसामान्य सुखी झाले.
पिडीत, वंचीत यांना जीवनात योग्य मार्ग मिळाला
(तुकाराम बीज निमित्त )

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510