संत काशिबा गुरव महाराज
🕉🕉🕉🕉
युनोस्को प्रणित गांधीभवन,पुणे येथे झालेल्या
*माझे सांस्कृतिक संचित माझा शाश्वत विकास*
या जागतिक परिषेदेत सादर झालेल्या शोधनिबंधावर आधारित लेखमाला *भाग २७***
*संत काशिबा गुरव महाराज*
अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर संत म्हणून काशिबा महाराज यांच्याकडे पाहिले जाते.
इस 1250 ते 1295 असा त्यांचा कालखंड ! त्यांची समाधी अरणगाव येथे आहे.
काशिबा महाराज यांचे कार्य -कर्तृत्व मोठे आहे आणि गुरव समाजाने यासंदर्भात अधिकचा अभ्यास करायला हवा. कारण संत सावतामाळी यांचे अभंग संत काशिबा महाराज यांनी लिहिलेले, हीच ठळक ओळख होऊन राहिली आहे.
त्यांच्या इतर कार्यावरही प्रकाश टाकायला हवा. संत सावता महाराजांचे अभंग त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने ,आंतरिक आत्मीयतेने शब्दबद्ध झाले.
काशिबा महाराज यांचे मूळ गाव अरण जिल्हा सोलापूर. त्यांच्या जन्मतारखे विषयी व इतर प्रापंचिक माहिती आज निश्चितपणे उपलब्ध नाही.
संत जनाबाईंच्या रचनेत अनेक संतांच्या अभंग रचना कोणी केल्या याबाबत उल्लेख करताना आलेला एक उल्लेख आहे.
*सावता माळ्याचा काशिबा गुरव कुरम्याचा वासुदेव काईत होता*
संत सावता या संतांचा सहवास व त्यांचे अभंग लेखणीने प्रत्यक्ष उतरण्याचे परमभाग्य काशिबा महाराज यांना मिळाले. यासाठीच ते वंदनीय ठरतात, संतश्रेष्ठ असतात.
संत सावता यांचे एकनिष्ठ भक्त म्हणून काशिबा महाराजांचा नेहमीच आदराने उल्लेख होतो. संत काशिबा महाराजांनी, सावता माळी यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग घटना यांचे महत्त्वाचे साक्षीदार बनून प्रारंभापासून समाधी पर्यंत सर्व रचना लिहून ठेवल्या आहेत.
सावतामाळी परमतत्व रुपात विलीन होतानाची नोंद काशिबा महाराजांनी समाधीच्या अभंगात लिहून ठेवल्याचा उल्लेख अनंत दिक्षीत यांच्या *संत सावतामाळी महाराज* या ग्रंथात सापडतो .
*उठानि प्रातःकाली करूनिया स्नान*
*घालुनी आसन ,यथाविधी*
*नवज्वरे देह झाला संतप्त*
*परी मनी आर्त, विठोबाचे*
*प्राणायाम करूनि कुंभग साधिला*
*वायु निरोधला मुळ तत्वी*
*शके बाराशे सतरा शालिवाहन शक मन्मथ नामक सवंत्सर*
या रचनेचा आधार पाहता काशिबा महाराजांनी स्वतंत्र लेखन केले असावे. मात्र या बाबतीत अधिक संशोधन गरजेचे आहे. त्याद्वारे काशीबा महाराजांचे मौलिक कार्यकर्तुत्व आणि जीवन चरित्र यावर उजेड पडेल.
🔷🔷🔶🔶🔶🔹🔹
@ यमाई औंध,राजेंद्र गुरव ९५६११५४१४०
युनोस्को प्रणित गांधीभवन,पुणे येथे झालेल्या
*माझे सांस्कृतिक संचित माझा शाश्वत विकास*
या जागतिक परिषेदेत सादर झालेल्या शोधनिबंधावर आधारित लेखमाला *भाग २७***
*संत काशिबा गुरव महाराज*
अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर संत म्हणून काशिबा महाराज यांच्याकडे पाहिले जाते.
इस 1250 ते 1295 असा त्यांचा कालखंड ! त्यांची समाधी अरणगाव येथे आहे.
काशिबा महाराज यांचे कार्य -कर्तृत्व मोठे आहे आणि गुरव समाजाने यासंदर्भात अधिकचा अभ्यास करायला हवा. कारण संत सावतामाळी यांचे अभंग संत काशिबा महाराज यांनी लिहिलेले, हीच ठळक ओळख होऊन राहिली आहे.
त्यांच्या इतर कार्यावरही प्रकाश टाकायला हवा. संत सावता महाराजांचे अभंग त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने ,आंतरिक आत्मीयतेने शब्दबद्ध झाले.
काशिबा महाराज यांचे मूळ गाव अरण जिल्हा सोलापूर. त्यांच्या जन्मतारखे विषयी व इतर प्रापंचिक माहिती आज निश्चितपणे उपलब्ध नाही.
संत जनाबाईंच्या रचनेत अनेक संतांच्या अभंग रचना कोणी केल्या याबाबत उल्लेख करताना आलेला एक उल्लेख आहे.
*सावता माळ्याचा काशिबा गुरव कुरम्याचा वासुदेव काईत होता*
संत सावता या संतांचा सहवास व त्यांचे अभंग लेखणीने प्रत्यक्ष उतरण्याचे परमभाग्य काशिबा महाराज यांना मिळाले. यासाठीच ते वंदनीय ठरतात, संतश्रेष्ठ असतात.
संत सावता यांचे एकनिष्ठ भक्त म्हणून काशिबा महाराजांचा नेहमीच आदराने उल्लेख होतो. संत काशिबा महाराजांनी, सावता माळी यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग घटना यांचे महत्त्वाचे साक्षीदार बनून प्रारंभापासून समाधी पर्यंत सर्व रचना लिहून ठेवल्या आहेत.
सावतामाळी परमतत्व रुपात विलीन होतानाची नोंद काशिबा महाराजांनी समाधीच्या अभंगात लिहून ठेवल्याचा उल्लेख अनंत दिक्षीत यांच्या *संत सावतामाळी महाराज* या ग्रंथात सापडतो .
*उठानि प्रातःकाली करूनिया स्नान*
*घालुनी आसन ,यथाविधी*
*नवज्वरे देह झाला संतप्त*
*परी मनी आर्त, विठोबाचे*
*प्राणायाम करूनि कुंभग साधिला*
*वायु निरोधला मुळ तत्वी*
*शके बाराशे सतरा शालिवाहन शक मन्मथ नामक सवंत्सर*
या रचनेचा आधार पाहता काशिबा महाराजांनी स्वतंत्र लेखन केले असावे. मात्र या बाबतीत अधिक संशोधन गरजेचे आहे. त्याद्वारे काशीबा महाराजांचे मौलिक कार्यकर्तुत्व आणि जीवन चरित्र यावर उजेड पडेल.
🔷🔷🔶🔶🔶🔹🔹
@ यमाई औंध,राजेंद्र गुरव ९५६११५४१४०
Comments
Post a Comment