Afazal Khan in 1659- yamaidevi Pujari

👁️🌴👁️
*वाचावे आनंदे* भाग ३६

*सन १६५९_ श्री यमाई मंदिराचा गुरव पुजाऱ्यांकडून बचाव*


श्री यमाई देवी मूळपीठ औंध हे अनेक लोकांचे आराध्य .अनेकांची कुलस्वामिनी !. शैव परंपरेतील अनेक मंदिर गुरव समाजाकडे असून परकीय आक्रमणात मध्ये  गुरव समाजाने अनेक मंदिरांचे रक्षण केले आहे. यवन आक्रमणापासून मंदिर वाचवली  आहेत..
श्री यमाई देवी औंध संदर्भाने चालुक्य काळापासून ज्या अनेक  ऐतिहासिक घटना झाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची घटना _

*सन १६५९.*. शिवरायांना ' जिंदा या ;मुर्दा पकडण्याची ' प्रतिज्ञा घेऊन विजापूरहून बलाढय अफजलखान बाहेर पडला. सपाट भागावर युद्ध झालेस ते आपले पथ्यावर पडेल , म्हणून राजेंना डोंगरी भागापून मैदानावर येण्यास भाग पडावे म्हणूनी खानाने अनेक  डाव टाकले . त्यातील एक डाव ', पूज्य देवस्थानावर आक्रमण व त्याची बातमी शिवरायांपर्यंत पोहचविणे !
मंदिरावर आक्रमण याची आर्थिक कारणही होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. मंदिरामध्ये अनेकवेळा संपत्ती साठवली जायची.... आणि सैन्य चालवण्यासाठी आर्थिक बळ हवे.

 तुळजाभवानीवर खानाने चाल केली. यानंतर खान औंधाला येणार ही कुणकुण श्री यमाईचे  तत्कालिन गुरव- पुजाऱ्यांना लागली, त्यांनी एक युक्ती केली . श्री यमाई मंदिरासमोर मशिदसदृश भिंत उभी केली . पांढरा रंग, दुरुन यवनांना फसविणारे रुप दिले. पुजारी फकीर बनून नमाज पडू लागले . पुजाऱ्यांची हि युक्ती सिद्धीस गेली खान फसला. मंदिरास कोणताही उपसर्ग झाला नाही .
 श्री यमाई.मूळपीठ ,गाव मारुती इ मंदिरे व  गुरव पुजाऱ्यांचा बचाव झाला.       ... 
           
*खान औंधला का आला असेल?*                        ....         
 खानाचे शिवरायांची कुलस्वामीनी म्हणून तुळजाभवानीवर डोळा होता. औंधची यमाई भवानी " या नावानेही प्रसिद्ध आहे.( १ औध संग्रहालयाचे नाव " भवानी वस्तू संग्रहालय " असे देवी नावावरून आहे. २ " *औंधात ' भवानी ' अनं मुलखात नायटा*- हि प्रसिद्ध लोक म्हण .
३ *मन्मथ शिवलिंग  लिखीत मराठी साहित्यातील सर्वांत जुन्या लावणीचे नाव" ; मूळपीठ भवानीची लावणी '  असे आहे*.
b पूर्वी मंदिर परिसरात संपत्ती साठविली जायची  c विजापूर- सातारा रस्त्यापासून औंध जवळ आहे .                       ...   

*गुरव - पुजाऱ्यांचे कामगीरीचे महत्व*             ....         
.राजा संकटात अन प्रजा भयभीत. इतर मंदिरे भ्रष्ट झालेच्या बातम्या. बलाढय खानाची जरब , ह्या गोष्टी असताना गुरव पुजारी घाबरले नाहित वा यमाईमंदिर सोडून पळून गेले नाहित असे दिसून येते .त्यांनी आमला ( आमले ), सातभाई , फकीर, पछाडा (पछाडे ),सुखधरणे अशी आडनावे धारण करण्याची युक्ती केली. मंदिरालगत मशिद सदृश भिंत, चबुतरे उभारले. सैन्य मंदिर परिसरात आलेवर त्यांनी दरडावून पुजाऱ्यांना नावे विचारली , तेंव्हा  आम्ही आपले जातभाई आहोत असे म्हणून  त्यांनी प्रसंगावधान राखले. त्यामुळे मंदिर वैभवाचे रक्षण झाले .
.                        .
*ऐतिहासिक पान*
 
 स्वतःचा जीव संकटात टाकून वंदनीय देवतेचे रक्षण करण्याची वृत्ती चिंतनीय आहे.
खान विजापूर ते औंध मार्गाक्रमण करताना एवढया कमी वेळेत दगडी मंदिरांचे केलेले रुपांतर  वा मशिदी सदृश व्यवस्था गुरव पुजाऱ्यांचे त्यांचे उत्तम नियोजनाचे , परस्पर  सहकार्यवृत्तीचे स्थापत्यशास्त्राचे ज्ञान, प्रचंड कष्टवृत्ती व त्यांच्यातील एकात्मभावनेचे गौरवशाली सुवर्ण पान आहे .
जय जगदंब !
🔷🔷🔶🔶🔶🔹

🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
@
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510