सत्य आणि तथ्य

*सत्य आणि तथ्य*

एक एक विचारांची पारख करून त्या विचारांची अंमलबजावणी गांधीजी आपल्या जीवनात करीत होते. जे उत्तम वाटले ते अंगी बाणवित होते.

बॅरिस्टरीचा व्यवसाय सुरू होता. पंरतु खोटारडा अशील आला की गांधी त्याचा खटला नाकारीत. गांधीजींची सत्यनिष्ठा सर्वांना कळली होती. त्यामुळे खोटा खटला घेऊन जायला कोण धजावत नसे.
एकदा पारशी व्यापारी रुस्तुमजी शेठ म्हणून त्यांची केस गांधीकडे आली. शेठने जकात अधिकाऱ्याबरोबर संधान साधले होते. तो भारतातून माल मागवी, पंरतु जादा मालाची जकात चुकवी.
खोटेचं आकडे दाखवी. एकदा दुसऱ्याचं अधिकाऱ्याला शंका आली.त्याने तपासणी केली. शेठची फसवेगिरी सापडली.
शेठ गांधीच्या पायावर - अब्रु वाचविण्याची विनंती !

गांधी - " तुमची चूक कबूल करा.. "
केली ना तुमच्याजवळ " - शेठ
' तुम्ही सरकारला फसवले आहे. तिथं कबूल व्हा ! '- गांधी

रुस्तुम शेठजींचे वकील वेगळेच सल्ले देत होते.
शेठने गांधीच्या सूचनेप्रमाणे वागणे ठरविले.
गांधीजी जकात अधिकारी व सरकारी वकिलास भेटले. 'तुमच्या नियमाप्रमाणे शेठ दंड भरण्यास तयार आहेत ' - गांधी. अधिकाऱ्यांच्या शंकेला जागा उरली नाही. सारे सत्य आपल्या समोर आहे अशी त्यांना खात्री वाटली.  चुकलेल्या जकातीच्या दुप्पट रक्कम भरुन तडजोडीने प्रश्न मिटला.

*१ोठजींनी सर्व घटना लिहून कारून आपल्या बैठकीच्या जागी लावून ठेवली. आपल्या सत्याचा वारसा वारसदारांसाठी राखून ठेवला. इतर व्यापाऱ्यांनाही तो आदर्शच होता.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸(65)
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510