नव्या प्रवासाची सुरुवात
नव्या प्रवासाची सुरुवात☘🌸🌿🍁🍀 आफ्रिकेतील सत्याग्रह संपला.गांधी गोखल्यांच्या सूचनेनुसार,इच्छेनुसार स्वदेशी जाताना गांधी प्रथमतः इंग्लंडला जायला निघाले. महायुद्धाचे वातावरण होते. इंग्लडच्या खाडीपर्यंत पोहोचेपर्यंत युद्धाला तोंड फुटले... इकडे गोखले पॅरिसमध्ये अडकले. या वेळेत गांधीजींनी स्नेही सोराबजी यांचेमार्फत डॉ जीवराज मेहता ,इतर हिंदी लोकांची एक सभा बोलावली. गांधीजींनी सभेस संबोधीत केले. *युद्ध परिस्थितीत गांधी एक निरीक्षण नोंदवितात.युद्धाला लोक घाबरत नव्हते.प्रत्येकजण आपआपल्या शक्तीनुरूप लढाईत भाग घेण्यास गुंतले होते. *स्त्रीयांचा ' लाइसियम ' नावाचा क्लब होता.त्यांच्या सभासदांनी युद्धखात्याला लागणाऱ्या कपड्यापैकी शक्य ती जबाबदारी घेतली होती. सरोजिनी नायडू या क्लबच्या सभासद होत्पा. गांधीची त्यांची येथेच ओळख.गांधीनी येथे कपडे शिवले आणि जखमी लोकांची शुश्रुषा शिक्षणही घेतले.* **भाग ९१* म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०, 8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳