चंपारण्य - ५

चंपारण्य - ५
🌸🌿☘🍀🍁🌸

गांधीजींच्या चौकशीस परवागणी मिळाली.
कोठे तरी योग्य थांबा मिळावा की काम सुरू करता येईल. घर भाड्याने ही घेता येईल !
व्रजकिशोरबाबूंनी मोठया कसबीने घर मिळवून दिले.
मोतीहारी गावातील ते  घर,भोवती कुंपण इ. कामास अगदी योग्य घर.

गांधींजींनी चौकशी सुरु केली. शेतकरी आपली दुःखे, होणारा अन्याय याची माहिती देऊ लागला.
शेतकऱ्यांचे जथेच्या जथे येवू लागले. सांगणारा एक आणि सोबतीही अनेक.
प्रत्येकाचे प्रश्न ऐकणे. त्याची नोंद घेणे. अहवाल तयार करणे. मोठे जिकीरीचे काम .

गांधी त्यांचे साथीदारासह आपले कामाला जुंपले होते.
जमीनदाराचा साहजिकच राग वाढत चालला होता.

सरकारचे गुप्तहेर पसरलेलेच. तेही परिस्थितीचा अंदाज घेण्यात व्यग्र !
गुप्त पोलीसांची लोकांना भीती होती.पण गांधींजीचे सर्वांना दिलासा देणारे वागणे. अधिकारी ते सहकारी यांचे गांधी बरोबर आदराने वागणे इ. पाहून लोक निर्भयपणे आपल्या जबान्या नोंदवू लागले.

 कव्हरेज मिळविण्याचा पेपरवाले प्रयत्न करीत होते.
गांधी मात्र त्यांना आसपास फिरु देत नव्हते. उगाच मीडायात प्रपोगोंडा नको. त्यामुळे जमिनदार अधिक चिडतील. आणि काही दंगाधोपा झाला तर शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न लांब राहील असे गांधींना वाटे.

गांधींजींच्या या नियोजनामुळे प्रत्यक्ष सत्याग्रहाचे वेळी वर्तमानपत्र वा लोकमानसांत जी प्रचंड चर्चा झाली होती तसे पडसाद उमटले नाहीत.

या प्रश्नात यत्किंचीतही राजकारण नको अशी गांधींची भूमिका होती.

मध्येच जमिनदारांचा दबाब वाढला.त्यांचे हस्तकाकडून
 गांधीजीना दबाब आला. आपण आपले काम उरकावे आणि निरोप घ्यावा .त्यांची घालमेल व  त्यातला अर्थ गांधींना कळत होता.
 गांधींनी आपलं काम चालू ठेवलं .गांधीजींच्या लक्षात  आलं या प्रश्नiचे  समूळ नष्ट करण्यासाठी विविध मार्गाने यत्न हवेत.
 ह्या प्रश्नाचे मूळ शेतकऱ्यांचे अज्ञान आहे त्यांनी यासाठी गांधींचे स्वतःचे नियोजन होते त्यांनी या लोकांना शिक्षण देण्याचा निश्चय केला अर्थात यासाठी साक्षरता वर्ग चालवणे गरजेचे होते गांधीजीनी आपल्याच साह्यकर्तांची टीम उभारली.  सुशिक्षित व होतकरू मंडळींची एक टीम तयार केली व शेतकऱ्यांची शिक्षण चालू झाले गांधीजीनी
महिला शिक्षकांना बजावले.अक्षरी शिक्षण देण्यापेक्षा तुम्ही मुलाचे संगोपन स्वच्छता योग्य आहार याचेही शिक्षण शेतकऱ्यांना द्या !

 अज्ञानाबरोबर अत्यंत गलिच्छ वातावरण हे चंपारण्यामध्ये मोठा प्रश्न होता .आणि शेतकरी स्वतः  स्वतः च्या घराच्या भोवताली सुद्धा स्वच्छता करण्यास तयार होत नव्हता.
गांधींची एक टीम स्वच्छता अभियानास जुंपली.
डॉ देव इतर टिमने घरोघरी,शाळेत औषधपाण्याची सोय केली ,गरजेपूरते व उपलब्ध औषधांचे नियोजन झाले.
 एकूणच गांधी व त्यांचे सहकारी  स्वतः  शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार करून गांधींनी आपले काम ग्रामसुधारणा,शिक्षण,औषध पाणी इ प्रकारे चालू ठेवले. हे सारे अभूतपूर्व होते.

मध्येच बिहार सरकार सरकार कडून पत्र आले. त्याचा भावार्थ असा होता *आपली चौकशी बरीच लांबली आहे तुम्ही आता आपला पसारा आवरावा आणि माघार घ्यावी पत्राची भाषा आदाराची होती पण भावार्थ स्पष्ट होते *
गांधी उत्तरले -- *प्रश्न एवढा मोठा आहे की तपासणी लागणारच मी लोकांच्या दुकानचे दुःखाचे निवारण होईपर्यंत बिहार सोडून जाण्याचे कोणतेच नियोजन केले नाही !*

गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510