आश्नमाची स्थापना
आश्रमाची स्थापना
🌸🌿🍁🍀☘🌸
म गांधींच्या आयुष्यात साबरमती, वर्धा वा आफ्रिकेतील टॉलस्टॉय फार्मचे आपले महत्व आहे.
भारतात आल्यानंतर आपला आश्रम स्थापन्याचा त्यांचा मनोदय होता. त्यांचे या इच्छेस अनेकांनी दुजोरा दिला. स्वामी श्रद्धानंदजींनी मागणी केली गांधींनी हरद्वारमध्ये आश्रम स्थापन करावा. गुजरातचे स्नेही म्हणत आपण गुजरात मध्ये यावे,राजकोटला रहावे. तर कलक्त्त्याच्या अनेकांना वाटे गांधींनी वैदयनाथधाममध्ये यावे.
अहमदाबाद गांधींचे दृष्टीने ठीक होते. अनेक मित्रांनी तशी गळ घातलेली. त्यांनी आश्रमाचा खर्च उचलण्याचे ठरविले होते.
अहमदाबाद अजुन दोन दृष्टीने योग्य होते ,एकतर अहमदाबाद हातमागांचे मोठे केंद्र होते त्यामुळे चरखा ,सूतकताई साठी ते पूरक होते. व गुजराथमधील परिचीत स्नेही व्यापारी यांचेकडून आर्थिक मदतीची अधिक शक्यता होती..
सर्व बाजूंचा विचार होऊन अहमदाबाद पक्के झाले.
आश्रमाचे नावासंबंधी चर्चा झाली. सेवाश्रम, तपोवन इ नावाचा उहापोह होऊन शेवटी *सत्याग्रहाश्रम* असे नाव ठरले.
सत्याचा शोध घेणे ,त्यासाठी कार्य करणे हे यातून ध्वनीत होत होते. आणि द आफ्रिकेतील कार्याला उजाळा व त्याची भारतीय पुनरावृत्ती भारतात अनुभवयास मिळणार होती.
गांधींचे इतर नियोजन तयार होतेच. नियमावली होती. इतर अनेकांकडून सूचना मागतल्या गेल्या.
*२९ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रमाची स्थापना झाली. भारतातील पुढील अनेक आंदोलनाची,विचारमंथनाची,भारतमातेच्या सेवेची ती नांदी होती.*
🌸🌿🍁🍀☘🌸
म गांधींच्या आयुष्यात साबरमती, वर्धा वा आफ्रिकेतील टॉलस्टॉय फार्मचे आपले महत्व आहे.
भारतात आल्यानंतर आपला आश्रम स्थापन्याचा त्यांचा मनोदय होता. त्यांचे या इच्छेस अनेकांनी दुजोरा दिला. स्वामी श्रद्धानंदजींनी मागणी केली गांधींनी हरद्वारमध्ये आश्रम स्थापन करावा. गुजरातचे स्नेही म्हणत आपण गुजरात मध्ये यावे,राजकोटला रहावे. तर कलक्त्त्याच्या अनेकांना वाटे गांधींनी वैदयनाथधाममध्ये यावे.
अहमदाबाद गांधींचे दृष्टीने ठीक होते. अनेक मित्रांनी तशी गळ घातलेली. त्यांनी आश्रमाचा खर्च उचलण्याचे ठरविले होते.
अहमदाबाद अजुन दोन दृष्टीने योग्य होते ,एकतर अहमदाबाद हातमागांचे मोठे केंद्र होते त्यामुळे चरखा ,सूतकताई साठी ते पूरक होते. व गुजराथमधील परिचीत स्नेही व्यापारी यांचेकडून आर्थिक मदतीची अधिक शक्यता होती..
सर्व बाजूंचा विचार होऊन अहमदाबाद पक्के झाले.
आश्रमाचे नावासंबंधी चर्चा झाली. सेवाश्रम, तपोवन इ नावाचा उहापोह होऊन शेवटी *सत्याग्रहाश्रम* असे नाव ठरले.
सत्याचा शोध घेणे ,त्यासाठी कार्य करणे हे यातून ध्वनीत होत होते. आणि द आफ्रिकेतील कार्याला उजाळा व त्याची भारतीय पुनरावृत्ती भारतात अनुभवयास मिळणार होती.
गांधींचे इतर नियोजन तयार होतेच. नियमावली होती. इतर अनेकांकडून सूचना मागतल्या गेल्या.
*२९ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रमाची स्थापना झाली. भारतातील पुढील अनेक आंदोलनाची,विचारमंथनाची,भारतमातेच्या सेवेची ती नांदी होती.*
Comments
Post a Comment