सरकारची सजगता

सरकारची सजगता
 🌸🌿☘🍀🍂🍃🌺

विरमगाव प्रकरणी सत्याग्रहाचा श्री गणेशा यशस्वी झाला.
विरमगावाच्या प्रकरणात गांधींनी लक्ष घातले व सरकारशी संवाद चालू केला. त्यावेळी मुंबईचे सेक्रेटरीने गांधींशी संपर्क केला. गांधींचे बगसरामध्ये जे भाषण केले ,त्याची प्रत सरकारकडे आहे असे सांगीतले .आणि त्या भाषणात सत्याग्रहाचा जो उल्लेख झाला त्या संबंधी त्यांनी नापसंती नमूद केली.
सेक्रेटरी - " आपला सत्याग्रहाचा उल्लेख म्हणजे सरकारला धमकी rनव्हे काय ? .. "
गांधी - ही धमकी नव्हे, हे लोकांचे प्रबोधन आहे. लोकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी योग्य मार्ग दाखवणे हा उद्देश आहे आणि माझ्यासारख्याचे कर्तव्य आहे. ज्या राष्ट्राला उदयाला  स्वातंत्र्य हवे आहे. त्या राष्ट्रापाशी स्वतःच्या संरक्षणाचा अंतिम इलाज असणे आवश्यक आहे. सामान्यपणे असले इलाज हिंसक असतात.
सत्याग्रह हे शुद्ध अहिंसक शस्त्र आहे. त्याचा उपयोग व त्याची मर्यादा दाखवून देणे मी स्वतःचा धर्म समजतो.
इंग्रज सरकार सर्वशक्तिमान आहे. याबद्दल मला शंका नाही.पण सत्याग्रह हे सर्वश्रेष्ठ शस्त्र आहे. या विषयीही मला शंका नाही."

सेक्रेटरीने '' आम्ही अनुभवतोयचं " असे म्हणत मान डोलावत त्यास संमती दिली.

गांधींच्या आफ्रिकेतील लढ्याचा परिणाम भारतात जाणवू लागला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची धास्ती होतीच, कारण सरकारने त्यांची धास्ती घेतली होती. गांधींच्या प्रत्येक हालचालीवर, वक्तत्यावर सरकारचे बारीक लक्ष होते.

राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510