सर्व मनुष्य एक आम्ही
सर्व मनुष्य एक आम्ही
🌸☘🍀🍁🌿🌹🌸
मनुष्यमात्रातील भेदाची भावना ही अनेक समस्यांचे मूळ आहे. संत परंपरेने आणि गांधी - आंबेडकर सारख्या थोर पुरुषांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
गुजरातमध्ये आश्रम स्थापताना गांधी म्हणाले " एखादा लायक अंत्यज बंधू भेटला आणि जर त्याने आश्रमात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली तर मी त्यास आश्रमात नक्की घेईन.
काही दिवसांनी भाई अमृतलाल ठक्कर यांचा निरोप - "एक गरीब व प्रामाणिक अत्यंज कुटुंब आश्नमात येऊ इच्छिते. तुम्ही प्रवेश दयाल ? "
"ते कुटूूंब आश्नमाचे सर्व नियम पाळेल का ? "एवढी विचारणा करुन गांधींनी त्यांना आश्रमात सामील करून घेतले.
गांधींना अभिप्रेत अंतज्य एवढया लवकर येतील अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. ही प्रक्रिया त्वरीत घडल्याने , गांधींच्या मित्र - अनुयायांत एकच खळबळ उडाली. आश्रमासाठीची विहीर शेजारील बंगल्याचा भाग होती. .. आता त्याचे पाणी विटाळनार होते. त्या पाण्याचे शिंतोडे मोटवाल्याच्या अंगावर उडले तर त्याचेसाठी हे पाप होते.
त्याची शिवागीळ सुरु, त्या कुंटूंबाला ते त्रास देऊ लागले.
'शिव्या सहन करा, प्रत्युत्तर नको , पाणी भरणे दृढतापूर्वक चालू ठेवा ' - गांधींची सूचना.
आश्रमवाल्यांचे शिव्या सहन करणे पाहून मोटवाल्यांचे तोंड थांबले...
_... आणि थोडया दिवसाने पैश्याची मदत थांबली. आसपासचे लोक आश्रमावर बहिष्काराची भाषा बोलू लागले. मदतीचा हात आखडता झाला.
स्नेही मगललाल - "' येत्या महिन्याचा आश्रमखर्च चालविण्यास शिल्लक नाही .. "
गांधी -" तर मग आपण अंत्यजवाडयात राहण्यास जाऊ. "
पुढे एका स्नेहयाने १३हजारांची मदत दिली. आश्रम चालू राहीला.
द आफ्रिकेत अत्यंज गांधीकडे येत, रहात, खात -पित , इतर अनेकांना न रुचणारे...
पण म गांधी विचलीत झाले नाहीत.
परंपरा मोडायण्यासाठीचे असीम धैर्य, त्यासाठी पडेल ती किंमत दयायची मनाची तयारी. सर्वसामान्यांप्रती अपार करुणा.
मानवतेच्या कलाण्यासाठी अखंड लढणारा योद्धा महात्मा !
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪
🌸☘🍀🍁🌿🌹🌸
मनुष्यमात्रातील भेदाची भावना ही अनेक समस्यांचे मूळ आहे. संत परंपरेने आणि गांधी - आंबेडकर सारख्या थोर पुरुषांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
गुजरातमध्ये आश्रम स्थापताना गांधी म्हणाले " एखादा लायक अंत्यज बंधू भेटला आणि जर त्याने आश्रमात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली तर मी त्यास आश्रमात नक्की घेईन.
काही दिवसांनी भाई अमृतलाल ठक्कर यांचा निरोप - "एक गरीब व प्रामाणिक अत्यंज कुटुंब आश्नमात येऊ इच्छिते. तुम्ही प्रवेश दयाल ? "
"ते कुटूूंब आश्नमाचे सर्व नियम पाळेल का ? "एवढी विचारणा करुन गांधींनी त्यांना आश्रमात सामील करून घेतले.
गांधींना अभिप्रेत अंतज्य एवढया लवकर येतील अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. ही प्रक्रिया त्वरीत घडल्याने , गांधींच्या मित्र - अनुयायांत एकच खळबळ उडाली. आश्रमासाठीची विहीर शेजारील बंगल्याचा भाग होती. .. आता त्याचे पाणी विटाळनार होते. त्या पाण्याचे शिंतोडे मोटवाल्याच्या अंगावर उडले तर त्याचेसाठी हे पाप होते.
त्याची शिवागीळ सुरु, त्या कुंटूंबाला ते त्रास देऊ लागले.
'शिव्या सहन करा, प्रत्युत्तर नको , पाणी भरणे दृढतापूर्वक चालू ठेवा ' - गांधींची सूचना.
आश्रमवाल्यांचे शिव्या सहन करणे पाहून मोटवाल्यांचे तोंड थांबले...
_... आणि थोडया दिवसाने पैश्याची मदत थांबली. आसपासचे लोक आश्रमावर बहिष्काराची भाषा बोलू लागले. मदतीचा हात आखडता झाला.
स्नेही मगललाल - "' येत्या महिन्याचा आश्रमखर्च चालविण्यास शिल्लक नाही .. "
गांधी -" तर मग आपण अंत्यजवाडयात राहण्यास जाऊ. "
पुढे एका स्नेहयाने १३हजारांची मदत दिली. आश्रम चालू राहीला.
द आफ्रिकेत अत्यंज गांधीकडे येत, रहात, खात -पित , इतर अनेकांना न रुचणारे...
पण म गांधी विचलीत झाले नाहीत.
परंपरा मोडायण्यासाठीचे असीम धैर्य, त्यासाठी पडेल ती किंमत दयायची मनाची तयारी. सर्वसामान्यांप्रती अपार करुणा.
मानवतेच्या कलाण्यासाठी अखंड लढणारा योद्धा महात्मा !
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment