गांधी : आधु.भारताचा सर्वमान्य नेता.
*महात्मा गांधी :आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 2*
🌸🍃🌺🍂☘🍃🍀🌸
गांधीजी देशाचे नेते झाले.त्यासाठी त्यांची मोठी तपश्चर्या. त्यांना सांभाळलेला प्रचंड व्याप आहे. करावा लागलेला त्याग आहे.
1915 मध्ये ते आफ्रिकेहुन भारतात आले आणि 1920 मध्ये भारताचे सर्वोच्च नेते झाले.
*जनतेला ,जनतेसाठी लढणारा - जनतेतून आलेला नेता मिळाला.* आफ्रिकेतील 21 वर्षे यशस्वी लढा त्याची पुण्याई होतीच.
चंपारण्य ,खेडा इत्यादी ठिकाणी गांधीजींनी दिला प्रखर व सर्वंकष लढा. यशस्वीतेसाठी वापरलेली विविध मार्ग .यांचा एक परिणाम जनमाणसावर होता. *"लोकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, गांधी त्यासाठी लढत होते .गांधीजींच्या मार्गाने जाऊन लोक ही उन्नत होत होते."*
गांधीजींचा प्रवास हा सामान्याकडून असामान्यत्वाकडे चालला होता. गांधीजी पायी प्रवास करीत दळणवळणाची साधनं नव्हती, संपर्काची साधने नव्हती. प्रत्यक्ष भेटीगाठी हाच संवादाचा एक मार्ग होता.भारतासारख्या अवाढव्य देशात वेगळी भाषा, वेगळ्या परंपरा, चालीरीती ,लोकभावना या सर्वांचा आदर करीत, गांधीजी प्रत्येक भारतीया पर्यंत पोचले .प्रत्येक भारतीय गांधींचा झाला.
महात्मा गांधी यांचे भारतीय सामान्य माणसाचं आकलन अचूक होतं. जनतेची नाडी त्यांनी अचूक पकडली होती. *सत्य साधेपणा साधनशुचिता आणि सद्चरित्र या मूल्यांच्या अखंड अविष्कारामुळे गांधी हर भारतीयांच्या मनात रुजून बसला* गांधीजीनी काँग्रेस स्वरूप बदललं, लोकांचे संघर्षाचे स्वरूप बदलले, त्यांच्या विषयाचे आयाम वाढले.
भारतीयांनी पिढ्यानपिढ्या राजेशाहीच अनुभवलेली राजा बोले
दळ हाले. ' अशी अवस्था. सत्तेपुढे मान टाकून ,तुकवून जगणे हेच भारतीयांना माहीत होतं. गांधीजी मात्र संस्थानिकांकडे निर्भयपणे बोलतात. मस्तवाल सत्तेला जाब विचारतात. त्याना घाबरत नाहीत. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलतात.
लोकांना त्यांच्या हक्काबद्दल, अधिकाराबद्दल जागं करतात.त्यांना स्वच्छतेचे धडे देतात, त्यांना शिक्षण देतात. त्यांची आपल्या हक्काबद्दल जागृत होते.आपल्या हक्कासाठी लढा गांधी शिकवतो आणि स्वतःही त्या लढ्यात सामील होतो. जनतेच्या न्याय हक्कासाठी, स्वतःचा प्राणही पणाला लावतो. जनतेलाही हे सारे अभूतपूर्व होतं
*गांधींच्या कृतिशील वागण्याने, अभिनव प्रयोगाने, सारा भारत जणू अभिमंत्रित झाला होता*
महात्मा गांधी आधुनिक काळातील पहिले अखिल भारतीय नेते असावेत. ज्यांच्या, आत्ताचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश म्यानमार असा सारा असा सारा भाग त्यांच्या नेतृत्व आणि प्रभावाने व्यापला होता.
महात्मा गांधी दीडशेवी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
🌸🍃🌺🍂☘🍃🍀🌸
गांधीजी देशाचे नेते झाले.त्यासाठी त्यांची मोठी तपश्चर्या. त्यांना सांभाळलेला प्रचंड व्याप आहे. करावा लागलेला त्याग आहे.
1915 मध्ये ते आफ्रिकेहुन भारतात आले आणि 1920 मध्ये भारताचे सर्वोच्च नेते झाले.
*जनतेला ,जनतेसाठी लढणारा - जनतेतून आलेला नेता मिळाला.* आफ्रिकेतील 21 वर्षे यशस्वी लढा त्याची पुण्याई होतीच.
चंपारण्य ,खेडा इत्यादी ठिकाणी गांधीजींनी दिला प्रखर व सर्वंकष लढा. यशस्वीतेसाठी वापरलेली विविध मार्ग .यांचा एक परिणाम जनमाणसावर होता. *"लोकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, गांधी त्यासाठी लढत होते .गांधीजींच्या मार्गाने जाऊन लोक ही उन्नत होत होते."*
गांधीजींचा प्रवास हा सामान्याकडून असामान्यत्वाकडे चालला होता. गांधीजी पायी प्रवास करीत दळणवळणाची साधनं नव्हती, संपर्काची साधने नव्हती. प्रत्यक्ष भेटीगाठी हाच संवादाचा एक मार्ग होता.भारतासारख्या अवाढव्य देशात वेगळी भाषा, वेगळ्या परंपरा, चालीरीती ,लोकभावना या सर्वांचा आदर करीत, गांधीजी प्रत्येक भारतीया पर्यंत पोचले .प्रत्येक भारतीय गांधींचा झाला.
महात्मा गांधी यांचे भारतीय सामान्य माणसाचं आकलन अचूक होतं. जनतेची नाडी त्यांनी अचूक पकडली होती. *सत्य साधेपणा साधनशुचिता आणि सद्चरित्र या मूल्यांच्या अखंड अविष्कारामुळे गांधी हर भारतीयांच्या मनात रुजून बसला* गांधीजीनी काँग्रेस स्वरूप बदललं, लोकांचे संघर्षाचे स्वरूप बदलले, त्यांच्या विषयाचे आयाम वाढले.
भारतीयांनी पिढ्यानपिढ्या राजेशाहीच अनुभवलेली राजा बोले
दळ हाले. ' अशी अवस्था. सत्तेपुढे मान टाकून ,तुकवून जगणे हेच भारतीयांना माहीत होतं. गांधीजी मात्र संस्थानिकांकडे निर्भयपणे बोलतात. मस्तवाल सत्तेला जाब विचारतात. त्याना घाबरत नाहीत. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलतात.
लोकांना त्यांच्या हक्काबद्दल, अधिकाराबद्दल जागं करतात.त्यांना स्वच्छतेचे धडे देतात, त्यांना शिक्षण देतात. त्यांची आपल्या हक्काबद्दल जागृत होते.आपल्या हक्कासाठी लढा गांधी शिकवतो आणि स्वतःही त्या लढ्यात सामील होतो. जनतेच्या न्याय हक्कासाठी, स्वतःचा प्राणही पणाला लावतो. जनतेलाही हे सारे अभूतपूर्व होतं
*गांधींच्या कृतिशील वागण्याने, अभिनव प्रयोगाने, सारा भारत जणू अभिमंत्रित झाला होता*
महात्मा गांधी आधुनिक काळातील पहिले अखिल भारतीय नेते असावेत. ज्यांच्या, आत्ताचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश म्यानमार असा सारा असा सारा भाग त्यांच्या नेतृत्व आणि प्रभावाने व्यापला होता.
महात्मा गांधी दीडशेवी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment