उपोषण आणि गांधीमार्ग

उपोषण - गांधींमार्ग
🌸🌿☘🍀🍁🌸

 सत्याग्रह, सविनय कायदेभंग याचबरोबर गांधीजींनी प्रसंगी उपोषणाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे.
गांधीजींचे उपोषण हे सत्याग्रहाचे अत्यंत प्रभावी साधन आहे.

वैयक्तिक पातळीवर उपोषणाने अनेक फायदे होतात असे त्यांचे प्रांजळ मत होते.त्याने शरीर शुद्धी होते, आत्मसिद्धी वाढते ,इच्छाशक्ती प्राप्त होते ,मनशक्ती प्रबळ होते असे ते म्हणत
आणि सत्याग्रहासारख्या एकूण लढ्याला आवश्यक ज्या बाबी आहेत त्या उपोषणामुळे सत्याग्रहींच्या अंगी भिनू शकतात. शिस्त,त्यागवृत्ती ,विनम्रता व निर्धार इच्छाशक्ती प्राप्त होतील असे त्यांचे म्हणणे होते.
 गांधीजीनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी उद्दिष्ट साधण्यासाठी उपोषणाचा परिणामकारक वापर केलेला दिसून येतो 1924 आली हिंदू-मुस्लीम त्याकरता त्यांनी एकवीस दिवस उपोषण केले  1932 आली जातीय निवाडा च्या विरोधात त्यांनी उपोषण केले. 1933 आली त्यांनी आत्मशुद्धी साठी उपोषण केले तसेच 1947 व जानेवारी 48 या दोन्ही वेळा सांप्रदायिक सद्भभाव रहावा, लोकांची एकी राहावी ,धार्मिक मतभेद दूर व्हावे यासाठी त्यांनी उपोषणे केली.
.... आणि ही सर्व उपोषणे  परिणामकारक ठरली.
त्यांनी केलेल्या उपोषणामुळे हरिजनांना मंदिराची द्वारे तर खुली झालीच परंतु त्याचबरोबर कर्मठ हिंदुत्ववाद्यांना  हरिजनांबाबत असलेल्या भूमिकेत बदल करावा लागला.
 गिरणी मजुरांचा प्रश्न सोडवताना आहमदाबाद मध्ये त्यांनी केलेल्या उपोषणामुळे मजूर लोकांनी आपला संप चालू ठेवला आणि मालकी आपल्या मागण्या वाटाघाटी तयार झाली
भारतवर्षाने ते पाहिलेले पहिले उपोषण होते.

एखादा प्रश्न सोडविण्यासाठी उपोषणाने स्वतःला क्लेश देणे. प्रसंगी प्राणांतिक उपोषण करणे , महात्माजींनी वेळोवेळी अशा प्रसंगातून स्वतःचे आत्मबळ आणि जनतेप्रती,कामाप्रतीची आपली निष्ठा व्यक्त केलेली आहे.
🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510