प्रजेच्या दुःखाशी नाते
प्रजेच्या दुःखाशी नाते
🌸☘🍀🍁🌿🌸
१९१६ ची ही गोष्ट आहे. बनारसची.पं मदनमोहन मालवीय यांनी म गांधींना निमंत्रण दिले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमासाठी.
गांधीजीनी निमंत्रण स्वीकारले. काठेवाडी फेटा,अंगावर उपरणे,लांब अंगरखा अशा पोषाखात गांधीजी गेले.
कार्यक्रमाला मोठे मोठे लोक आले होते. राजे - रजवाडे उपस्थित होते. राजा - महाराजांचा डामडौल होता,उंची वस्त्रे, मौल्यवान अलंकार यासह राजे नटून थटून आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अॅनी बेझंट या होत्या.
गांधींजीना बोलण्याची विनंती करण्यात आली. गांधीनी भाषण सुरू केले. भाषण हिंदीतून होते.
भारतातील सर्वसामान्यांची, संस्थानिकांचे प्रजेचे दुःख मांडताना महात्मा म्हणाले - *"संस्थानातील प्रजा दुःखीकष्टी आहे.प्रजा अशिक्षीत आहे अज्ञानी आहे. द्रारिद्रयात आहे. त्यावेळी हे संस्थानिक अलंकाराने मढवलेले.मला हे पाहवत नाही.त्यांना असे वागायचा काय अधिकार? संस्थानची संपत्ती ही प्रजेची ठेव आहे. प्रजेच्या विकासासाठी ही वापरायला हवी.*
भाषण सुरु होते. व्यासपीठांवर राजे-रजवाडयांच्यात चुळबुळ सुरू होती. अध्यक्ष बेझंट "आता पुरे " असे गांधींना सांगीतले.
गांधींच्या भाषणाचा फार मोठा परिणाम झाला. जनतेच्या हिताचा विचार करणारा, त्यांच्या दुःखाशी तादात्म पावणारी वृत्ती... भारतीय जनतेला हे सारे अपूर्व होते.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,
🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०,
🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
🌸☘🍀🍁🌿🌸
१९१६ ची ही गोष्ट आहे. बनारसची.पं मदनमोहन मालवीय यांनी म गांधींना निमंत्रण दिले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमासाठी.
गांधीजीनी निमंत्रण स्वीकारले. काठेवाडी फेटा,अंगावर उपरणे,लांब अंगरखा अशा पोषाखात गांधीजी गेले.
कार्यक्रमाला मोठे मोठे लोक आले होते. राजे - रजवाडे उपस्थित होते. राजा - महाराजांचा डामडौल होता,उंची वस्त्रे, मौल्यवान अलंकार यासह राजे नटून थटून आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अॅनी बेझंट या होत्या.
गांधींजीना बोलण्याची विनंती करण्यात आली. गांधीनी भाषण सुरू केले. भाषण हिंदीतून होते.
भारतातील सर्वसामान्यांची, संस्थानिकांचे प्रजेचे दुःख मांडताना महात्मा म्हणाले - *"संस्थानातील प्रजा दुःखीकष्टी आहे.प्रजा अशिक्षीत आहे अज्ञानी आहे. द्रारिद्रयात आहे. त्यावेळी हे संस्थानिक अलंकाराने मढवलेले.मला हे पाहवत नाही.त्यांना असे वागायचा काय अधिकार? संस्थानची संपत्ती ही प्रजेची ठेव आहे. प्रजेच्या विकासासाठी ही वापरायला हवी.*
भाषण सुरु होते. व्यासपीठांवर राजे-रजवाडयांच्यात चुळबुळ सुरू होती. अध्यक्ष बेझंट "आता पुरे " असे गांधींना सांगीतले.
गांधींच्या भाषणाचा फार मोठा परिणाम झाला. जनतेच्या हिताचा विचार करणारा, त्यांच्या दुःखाशी तादात्म पावणारी वृत्ती... भारतीय जनतेला हे सारे अपूर्व होते.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,
🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०,
🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment