चंपारण्याची यशस्वीता
चंपारण्य ६
*चंपारण्य आंदोलनाची यशस्वीता आणि गांधींजींच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे दर्शन*
🌸🌿☘🍀🍁🌸
आताचे नेते एखादा प्रश्न कळालां की त्याच्यावर हल्ला चढवायचा ,एखादा मोर्चा काढायचा ,वर्तमानपत्रात बातम्या दायच्या ,लोकांना खूश करायचं आणि निघून जायचं . मी प्रश्न पाहिला, प्रश्न मांडला आणि मी प्रश्न सोडला ( चारचौघात, वृत्तपत्रात ) म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि परत जावे .
...आणि परत त्या प्रश्नांचे आसपास ही नाही अशी काही तरी ( अ )नीती आपले पुढारी वापरतात
.... चंपरण्यामध्ये गांधीजींनी जी सर्वसमावेशक व प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणारे आंदोलन चालवलं त्याला इतिहासात तोड नाही. जगापासून दूर,अज्ञानी चंपरण्यामधील शेतकऱ्यावर जुलूम होत होता ,अन्याय होत होता शेतकऱ्यांनी स्वतःहून गांधींची भेट घेतली व त्यांना या अन्यायाविरुद्ध नेतृत्व स्वीकारण्यास सांगितले गांधीजींनी निव्वळ त्याचा स्टंट न करता त्यांचा प्रश्न समजून घेतला . प्रत्यक्ष खात्री . केली. मग त्यासंबंधी सरकारवर पत्रव्यवहार केला .गावोगावी घरोघरी जाऊन प्रश्नांचे सर्वेक्षण केले.कागदोपत्री नोंद केली. अहवाल लिहले.
... त्या प्रश्नाचा आवाका त्यांना समजला , आकलन झाले.
मग त्याचे उत्तर सरकारने शोधावे असे म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत त्यांनी पाहिलं शेतकऱ्याच्या दैन्याला सीमा नाही . सर्वत्र अज्ञान व दारिद्र्य भरून राहिलेली आणि मग गांधीजीनी तीन क्षेत्रांमध्ये भरभरून काम केलं .एक शिक्षण , दोन स्वच्छता व तिसरे ग्राम सुधारणा - आरोग्य सुधारणा, औषध पाण्याची उपलब्धता. गांधींच्या कामाला सर्व प्रांतातून मदत आली,महाराष्ट्र व इतर प्रातांतून स्वयंसेवक आले. गांधीजीनी स्वयंसेवकांना समजून सांगितले 'शेतकऱ्याच्याजवळ जा त्यांच्यात मिसळा. त्यांचे प्रश्न जाणा. '
'त्यांच्यासाठी शाळा काढा त्यांना शिकवा . '
या कामी शिक्षक टीम मध्ये महादेव देसाई नरहरी परीख,बाबासाहेब सोमण, गंगाधरराव देशपांडे, अवंतिकाबाई गोखले, आनंदीबाई वैशंपायन, कस्तुरबाई, दुर्गा देसाई इ.असे सर्व प्रकारचे स्वयंसेवक होते
स्वतः कस्तुरबा यांनी गांधीजींना प्रश्न विचारला यांना काय शिकवायचे ? त्यांना भाषा नीट येत नाही. तेव्हा गांधी म्हणाले पुस्तके बाजूला ठेवा. मुलांची स्वच्छता बघा त्यांना तोंड कसे धुवायचे? दात कसे घासायचे ? शरीर कसे स्वच्छ ठेवायचे , हे शिकवा. स्त्रियांना स्वतःची व घराची स्वच्छता कशी ठेवायची हे शिकवा .अर्थात गांधींचे या प्रश्नाकडे कसे बारीक लक्ष होतं,त्यांची निरीक्षण शक्ती,सामान्याप्रती आस्था, हे जाणवते
... आणि वरवर मलम न लावता त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे, प्रश्नाच्या मुळापर्यंत कसं पोहोचायचं याचे वस्तूपाठ मिळतात. या सर्वांच नियोजन कसं करायचं हे आजच्या स्वयंसेवकांनी शिकण्यासारखे आहे
गांधीनी गोखल्यांच्या समाजाकडून डॉक्टर देवं यांची मागणी केली. डॉक्टर देव आणि गांधी यांची मैत्री होतीस. त्यांचे मदतीने आरोग्यसेवा उपलब्ध झाली.
शाळाशाळांमधून एक स्त्री व पुरुष अशी व्यवस्था करून औषध पाणी व साफसफाई यांची व्यवस्था करण्यात आली .स्त्रियांच्या सहकार्याने अशिक्षित स्त्री वर्गात शिरकाव झाला. त्यांच्यापर्यंत शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. आरोग्य सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. लोकांच्या अंगणातील कचराही स्वयंसेवकांनी काढला. रस्ते साफ झाले. लोकांच्याबरोबर स्वयंसेवकांचे वागणं प्रेमपूर्वक होते. हळूहळू लोकांचा कामात सहभाग वाढला काही रस्तेही अंग मेहनतीने दुरुस्त झाले. काही ठिकाणी विरोध झाला पण बाकी सर्व सर्वांसाठी, कल्याणकारी होते .
हे सर्व होताना मळेवाल्यांचा क्रोध वाढत होता त्यांनी चौकशी बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि सरकारचे पत्र आले होते ' *आता तुम्ही थांबा आणि परत फिरा*' गांधी म्हणाले *'लोकांचे दुःख निवारण होईपर्यंत बिहार सोडून देण्याचा माझा इरादा नाही'*
गांधी म्हणतात माझी चौकशी थांबवण्याचा सरकारकडे एकच रास्त विलाज होता -तो म्हणजे लोकांच्या तक्रारीला दाद देणे , किंवा त्यांच्या अन्यायाबद्दल स्वतःची चौकशी कमिटी नेमणे नेमणे.
गव्हर्नर गेट यांनी गांधींना बोलावलं. त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि मग स्वतःची एक कमिटी नेमली. त्यात गांधींना सभासद नेमलं. सभासद म्हणून काम करायला गांधी तयार झाले. पण त्यांनी एक १ार्थ होती.
*'मी सभासद म्हणून काम करणेस तयार आहे पण सोबंत्याबरोबर सल्लामसलत करायला मला मोकळीक हवी आणि शेतकऱ्यांचा योग्य प्रश्नी कैवार घेण्याचा माझा अधिकार नष्ट न व्हावा व चौकशीने माझे समाधान झाले नाही तर शेतकऱ्यांचा मार्ग सुखकर होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवण्यासाठी माझे स्वातंत्र्य मी गमावणार नाही"*
गांधींनी एवढ्या ठामपणे सरकारला ठणकावले. गांधीजींची सर्वसामान्य प्रतीचे समर्पण, स्वतःचे तत्वास ठाम राहण्याची वृत्ती,स्वतःला झोकून काम करण्याची पद्धती स्वतः तोशिस लावून जनहितार्थ घेण्याची पद्धती याची एक अमिट भावना जनतेच्या व सरकारच्या मनात रुजली.
कमिटीने पुन्हा चौकशी केली .शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी योग्य ठरल्या त्यामुळे मळेवाल्यांनी गैरवाजवी प्रकारे पैसे घेतले आहेत. त्यापैकी काही भाग परत करावा. तीनकठियांचा कायदा रद्द करावा अशी कमिटीने शिफारस केली .
गांधींचे आंदोलन व सरकारचा योग्य प्रतीसाद,सर गेट यांनी दृढपणे चालविलेले सरकारी काम याचा फायदा होऊन शेवटी तो अन्यायकारी कायदा रद्द झाला. मळेवाल्यांच्या सत्तेचा अस्त झाला. जी सामान्य जनता अन्यायाने पिचलेली होती, अन्यायाने दबलेली होती त्यांना उसंत मिळाली. या संघर्षात त्यांना स्वतःच्या शक्तीची प्रचीती आली.
एकूणच गांधीजीनी सर्व बाजूंनी विचार करून सर्वसमावेशक चळवळ चालवली आणि मूळ प्रश्न सुटला आणि दबलेली जनता निर्भय झाली पुन्हा असे प्रश्न आलेतर त्याच्या विरुद्ध लढण्यास सक्षम झाली.
गांधींचा हा लढा भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे गांधींच्या सर्वमान्य नेतृत्वाचा पाया यामुळे घातला गेला .लोकांना गांधी आपले वाटले. आपला प्रश्न सोडवणारे तारणहार वाटले .
या लढ्यामध्ये गांधींना वज्रकिशोरबाबू व राजेंद्रबाबू असे उत्तम दर्जाचे सहकारी लाभले. गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे अजोड व अतूट नाते निर्माण झाले. *गांधींची निर्भयवृत्ति, सत्य वृत्ती ,कोणत्याही परिस्थितीमध्ये झोकून देण्याची वृत्ती, आपल्या कामाप्रती निष्ठा उत्तम नियोजन यामुळे जनता सहकारी स्वयंसेवक सर्व प्रभावित झाले*
*गांधीजीनी आफ्रिकेत जे केले त्याची एक चुणूक सर्वांना पाहायला मिळाली चंपारण्य सारखा आडवळणी भागांमध्ये गांधीजीचे.कर्तृत्व गाजले. त्याची इतिहासाने नोंद घेतली आहे.*
म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪
*चंपारण्य आंदोलनाची यशस्वीता आणि गांधींजींच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे दर्शन*
🌸🌿☘🍀🍁🌸
आताचे नेते एखादा प्रश्न कळालां की त्याच्यावर हल्ला चढवायचा ,एखादा मोर्चा काढायचा ,वर्तमानपत्रात बातम्या दायच्या ,लोकांना खूश करायचं आणि निघून जायचं . मी प्रश्न पाहिला, प्रश्न मांडला आणि मी प्रश्न सोडला ( चारचौघात, वृत्तपत्रात ) म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि परत जावे .
...आणि परत त्या प्रश्नांचे आसपास ही नाही अशी काही तरी ( अ )नीती आपले पुढारी वापरतात
.... चंपरण्यामध्ये गांधीजींनी जी सर्वसमावेशक व प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणारे आंदोलन चालवलं त्याला इतिहासात तोड नाही. जगापासून दूर,अज्ञानी चंपरण्यामधील शेतकऱ्यावर जुलूम होत होता ,अन्याय होत होता शेतकऱ्यांनी स्वतःहून गांधींची भेट घेतली व त्यांना या अन्यायाविरुद्ध नेतृत्व स्वीकारण्यास सांगितले गांधीजींनी निव्वळ त्याचा स्टंट न करता त्यांचा प्रश्न समजून घेतला . प्रत्यक्ष खात्री . केली. मग त्यासंबंधी सरकारवर पत्रव्यवहार केला .गावोगावी घरोघरी जाऊन प्रश्नांचे सर्वेक्षण केले.कागदोपत्री नोंद केली. अहवाल लिहले.
... त्या प्रश्नाचा आवाका त्यांना समजला , आकलन झाले.
मग त्याचे उत्तर सरकारने शोधावे असे म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत त्यांनी पाहिलं शेतकऱ्याच्या दैन्याला सीमा नाही . सर्वत्र अज्ञान व दारिद्र्य भरून राहिलेली आणि मग गांधीजीनी तीन क्षेत्रांमध्ये भरभरून काम केलं .एक शिक्षण , दोन स्वच्छता व तिसरे ग्राम सुधारणा - आरोग्य सुधारणा, औषध पाण्याची उपलब्धता. गांधींच्या कामाला सर्व प्रांतातून मदत आली,महाराष्ट्र व इतर प्रातांतून स्वयंसेवक आले. गांधीजीनी स्वयंसेवकांना समजून सांगितले 'शेतकऱ्याच्याजवळ जा त्यांच्यात मिसळा. त्यांचे प्रश्न जाणा. '
'त्यांच्यासाठी शाळा काढा त्यांना शिकवा . '
या कामी शिक्षक टीम मध्ये महादेव देसाई नरहरी परीख,बाबासाहेब सोमण, गंगाधरराव देशपांडे, अवंतिकाबाई गोखले, आनंदीबाई वैशंपायन, कस्तुरबाई, दुर्गा देसाई इ.असे सर्व प्रकारचे स्वयंसेवक होते
स्वतः कस्तुरबा यांनी गांधीजींना प्रश्न विचारला यांना काय शिकवायचे ? त्यांना भाषा नीट येत नाही. तेव्हा गांधी म्हणाले पुस्तके बाजूला ठेवा. मुलांची स्वच्छता बघा त्यांना तोंड कसे धुवायचे? दात कसे घासायचे ? शरीर कसे स्वच्छ ठेवायचे , हे शिकवा. स्त्रियांना स्वतःची व घराची स्वच्छता कशी ठेवायची हे शिकवा .अर्थात गांधींचे या प्रश्नाकडे कसे बारीक लक्ष होतं,त्यांची निरीक्षण शक्ती,सामान्याप्रती आस्था, हे जाणवते
... आणि वरवर मलम न लावता त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे, प्रश्नाच्या मुळापर्यंत कसं पोहोचायचं याचे वस्तूपाठ मिळतात. या सर्वांच नियोजन कसं करायचं हे आजच्या स्वयंसेवकांनी शिकण्यासारखे आहे
गांधीनी गोखल्यांच्या समाजाकडून डॉक्टर देवं यांची मागणी केली. डॉक्टर देव आणि गांधी यांची मैत्री होतीस. त्यांचे मदतीने आरोग्यसेवा उपलब्ध झाली.
शाळाशाळांमधून एक स्त्री व पुरुष अशी व्यवस्था करून औषध पाणी व साफसफाई यांची व्यवस्था करण्यात आली .स्त्रियांच्या सहकार्याने अशिक्षित स्त्री वर्गात शिरकाव झाला. त्यांच्यापर्यंत शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. आरोग्य सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. लोकांच्या अंगणातील कचराही स्वयंसेवकांनी काढला. रस्ते साफ झाले. लोकांच्याबरोबर स्वयंसेवकांचे वागणं प्रेमपूर्वक होते. हळूहळू लोकांचा कामात सहभाग वाढला काही रस्तेही अंग मेहनतीने दुरुस्त झाले. काही ठिकाणी विरोध झाला पण बाकी सर्व सर्वांसाठी, कल्याणकारी होते .
हे सर्व होताना मळेवाल्यांचा क्रोध वाढत होता त्यांनी चौकशी बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि सरकारचे पत्र आले होते ' *आता तुम्ही थांबा आणि परत फिरा*' गांधी म्हणाले *'लोकांचे दुःख निवारण होईपर्यंत बिहार सोडून देण्याचा माझा इरादा नाही'*
गांधी म्हणतात माझी चौकशी थांबवण्याचा सरकारकडे एकच रास्त विलाज होता -तो म्हणजे लोकांच्या तक्रारीला दाद देणे , किंवा त्यांच्या अन्यायाबद्दल स्वतःची चौकशी कमिटी नेमणे नेमणे.
गव्हर्नर गेट यांनी गांधींना बोलावलं. त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि मग स्वतःची एक कमिटी नेमली. त्यात गांधींना सभासद नेमलं. सभासद म्हणून काम करायला गांधी तयार झाले. पण त्यांनी एक १ार्थ होती.
*'मी सभासद म्हणून काम करणेस तयार आहे पण सोबंत्याबरोबर सल्लामसलत करायला मला मोकळीक हवी आणि शेतकऱ्यांचा योग्य प्रश्नी कैवार घेण्याचा माझा अधिकार नष्ट न व्हावा व चौकशीने माझे समाधान झाले नाही तर शेतकऱ्यांचा मार्ग सुखकर होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवण्यासाठी माझे स्वातंत्र्य मी गमावणार नाही"*
गांधींनी एवढ्या ठामपणे सरकारला ठणकावले. गांधीजींची सर्वसामान्य प्रतीचे समर्पण, स्वतःचे तत्वास ठाम राहण्याची वृत्ती,स्वतःला झोकून काम करण्याची पद्धती स्वतः तोशिस लावून जनहितार्थ घेण्याची पद्धती याची एक अमिट भावना जनतेच्या व सरकारच्या मनात रुजली.
कमिटीने पुन्हा चौकशी केली .शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी योग्य ठरल्या त्यामुळे मळेवाल्यांनी गैरवाजवी प्रकारे पैसे घेतले आहेत. त्यापैकी काही भाग परत करावा. तीनकठियांचा कायदा रद्द करावा अशी कमिटीने शिफारस केली .
गांधींचे आंदोलन व सरकारचा योग्य प्रतीसाद,सर गेट यांनी दृढपणे चालविलेले सरकारी काम याचा फायदा होऊन शेवटी तो अन्यायकारी कायदा रद्द झाला. मळेवाल्यांच्या सत्तेचा अस्त झाला. जी सामान्य जनता अन्यायाने पिचलेली होती, अन्यायाने दबलेली होती त्यांना उसंत मिळाली. या संघर्षात त्यांना स्वतःच्या शक्तीची प्रचीती आली.
एकूणच गांधीजीनी सर्व बाजूंनी विचार करून सर्वसमावेशक चळवळ चालवली आणि मूळ प्रश्न सुटला आणि दबलेली जनता निर्भय झाली पुन्हा असे प्रश्न आलेतर त्याच्या विरुद्ध लढण्यास सक्षम झाली.
गांधींचा हा लढा भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे गांधींच्या सर्वमान्य नेतृत्वाचा पाया यामुळे घातला गेला .लोकांना गांधी आपले वाटले. आपला प्रश्न सोडवणारे तारणहार वाटले .
या लढ्यामध्ये गांधींना वज्रकिशोरबाबू व राजेंद्रबाबू असे उत्तम दर्जाचे सहकारी लाभले. गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे अजोड व अतूट नाते निर्माण झाले. *गांधींची निर्भयवृत्ति, सत्य वृत्ती ,कोणत्याही परिस्थितीमध्ये झोकून देण्याची वृत्ती, आपल्या कामाप्रती निष्ठा उत्तम नियोजन यामुळे जनता सहकारी स्वयंसेवक सर्व प्रभावित झाले*
*गांधीजीनी आफ्रिकेत जे केले त्याची एक चुणूक सर्वांना पाहायला मिळाली चंपारण्य सारखा आडवळणी भागांमध्ये गांधीजीचे.कर्तृत्व गाजले. त्याची इतिहासाने नोंद घेतली आहे.*
म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment