व्रतस्थ गांधी
*व्रतस्थ गांधी*
*स्वेच्छेने घेतलेले व्रत काटेकोरपणे पाळले जाते. त्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. सद्वचनाचा स्पर्श मनाला, बुद्धीला आणि कर्माला झाल्यावाचून संस्कार झाला असे होत नाही, असे महात्मा गांधी म्हणत असत
*गांधीजींनी एखादी गोष्ट ठरविली की ते आटोकाट प्रयत्न करून ते पाळीत व्रताप्रमाणे*
गांधीजींना बॅरिस्टरी करताना त्यांच्या लक्षात आलं ,कायदे धाब्यावर बसवणाऱ्यांचा बचाव करणे करणाऱ्यांची एक जमातीच्या जमात तथाकथित पुढारलेल्या नी उभी केल्यांची गांधींना दिसून आले.
न्यायाची मूलभूत तत्वे धाब्यावर बसवण्याचा उद्योग करून सधन बनलेले कायदातज्ञ त्यांनी पाहिले .
*कायद्याबाबत दिरंगाई करणे म्हणजे व्यवहारात कायदा नाकारणे हे न्यायाचे पहिले तत्व. न्यायाचे दुसरे तत्त्व असे की शंभर गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही पण एकाही निर्दोष माणसाला सजा होता कामा नये.न्यायाचे तिसरे आधारभूत तत्त्व असे की तुमच्याशी लोकांनी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही इतरांशी वागावे* पण आपण न्यायदानाची जी व्यवस्था निर्माण केली आहे ती ही मूलभूत तत्वे धाब्यावर बसवणारी. आरोप सिद्ध होईपर्यंत प्रत्येक माणसाला निर्दोष समजले पाहिजे ,पण आपला निर्दोषपणा सिद्ध करीपर्यंत माणसाला दोषी समजायला माणसे कमी करीत नाहीत.
बॅरिस्टर गांधी हे पारंपरिक बॅरिस्टरपेक्षा वेगळे होते. वाद वाढविण्याऐवजी वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारा वकील म्हणजे आपण बसलेल्या फांदीवर कुऱ्हाड चालवणारा बावळट मनुष्य असे समजले तर त्या काळात कोणाला त्याची आश्चर्य वाटत नसे. गांधीजींची गणना अशा बाववटामध्ये म्हणजे निर्लोभी व्यक्तीमध्ये केली गेली.
कायद्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधून काढणे कोणी गैर मानत नाही. असे आढळून आल्यावर गांधीजी विचार करू लागले की हे कसे थांबवता येईल? त्यांना आपल्या आईची स्वाभाविकच आठवण झाली. स्वेच्छेने घेतलेले व्रत ती किती काटेकोरपणे पाळत असे हे त्यांना आठवले. त्यासाठी हृदयस्थ आत्मारामाचा पहारा तिला पुरेसा वाटत असे. व्रत हे स्वेच्छेने स्वीकारले असल्याने सामान्यता त्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. सत्याग्रहीने अशीच व्रतनिष्ठा अनुसरली पाहिजे.
परंपरागत व्रते बदलत्या काळात गांधीजींना संख्येने आणि अर्थाने कमी पडतात असे जाणवते. अनुभव चिंतन आणि प्रयोग करीत त्यांनी या व्रतात नवी भर घातली आणि सत्याग्रही
व्रत-अनुशासन तयार केले .सत्य ,अहिंसा ब्रह्मचर्य इत्यादी परंपरागत व्रतात अस्तेय, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद,भय ,सर्वधर्म समानत्व, स्वदेशी ,स्पर्श भावना ह्या व्रतांचा त्यांनी समावेश केला आणि ही व्रत एकादशी तयार झाली. विनोबांनी त्या व्रतांची एका श्लोकात गुंफण केली आहे
*अहिंसा'सत्य,अस्तेय ब्रह्मचर्य,असंग्रह*,
*शरीरश्रम,अस्वाद*
*सर्वत्र भयवर्जन*
*सर्व धर्मी समानत्व स्वदेशी, स्पर्शभावना*
*ही एकादश सेवावी नम्रता त्या व्रत निश्चये*
हा श्लोक सकाळ-संध्याकाळच्या आश्रम प्रार्थनेत म्हटला जाऊ लागला.
गांधीजीनी ह्या व्रतांचा खुलासा करण्यासाठी ' *मंगलप्रभात* ' नावाची एक छोटी पुस्तिका लिहिली. त्यामुळे लोक खोल विचार करू लागतील असे त्यांच्या ध्यानी आले .अनेक धर्मग्रंथांची लोक नुसती पोपटपंची करतात. जिभेला सदवचनांचा स्पर्श झाला म्हणजे संस्कार झाला असे लोकांना वाटते. सदवचनांना स्पर्श मनाला, बुद्धीला आणि कर्माला झाल्यावाचून संस्कार झाला असे म्हणता येत नाही. गांधीजींची इच्छा व्रत निष्ठा लोकांनी अंगी बनवावी अशी होती. सुसंस्कृत समाजात
दंडाआधारित कायद्यापेक्षा स्वेच्छेने स्वीकारलेल्या व्रतांची महती अधिक असते. कारण व्रत म्हणजे दंडशासन कमी करून विचार शासनाच्या दिशेने वाटचाल करणे होय.
*यदुनाथ थत्ते*
संकलन राजेंद्र गुरव
95 611 54 140
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
*स्वेच्छेने घेतलेले व्रत काटेकोरपणे पाळले जाते. त्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. सद्वचनाचा स्पर्श मनाला, बुद्धीला आणि कर्माला झाल्यावाचून संस्कार झाला असे होत नाही, असे महात्मा गांधी म्हणत असत
*गांधीजींनी एखादी गोष्ट ठरविली की ते आटोकाट प्रयत्न करून ते पाळीत व्रताप्रमाणे*
गांधीजींना बॅरिस्टरी करताना त्यांच्या लक्षात आलं ,कायदे धाब्यावर बसवणाऱ्यांचा बचाव करणे करणाऱ्यांची एक जमातीच्या जमात तथाकथित पुढारलेल्या नी उभी केल्यांची गांधींना दिसून आले.
न्यायाची मूलभूत तत्वे धाब्यावर बसवण्याचा उद्योग करून सधन बनलेले कायदातज्ञ त्यांनी पाहिले .
*कायद्याबाबत दिरंगाई करणे म्हणजे व्यवहारात कायदा नाकारणे हे न्यायाचे पहिले तत्व. न्यायाचे दुसरे तत्त्व असे की शंभर गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही पण एकाही निर्दोष माणसाला सजा होता कामा नये.न्यायाचे तिसरे आधारभूत तत्त्व असे की तुमच्याशी लोकांनी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही इतरांशी वागावे* पण आपण न्यायदानाची जी व्यवस्था निर्माण केली आहे ती ही मूलभूत तत्वे धाब्यावर बसवणारी. आरोप सिद्ध होईपर्यंत प्रत्येक माणसाला निर्दोष समजले पाहिजे ,पण आपला निर्दोषपणा सिद्ध करीपर्यंत माणसाला दोषी समजायला माणसे कमी करीत नाहीत.
बॅरिस्टर गांधी हे पारंपरिक बॅरिस्टरपेक्षा वेगळे होते. वाद वाढविण्याऐवजी वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारा वकील म्हणजे आपण बसलेल्या फांदीवर कुऱ्हाड चालवणारा बावळट मनुष्य असे समजले तर त्या काळात कोणाला त्याची आश्चर्य वाटत नसे. गांधीजींची गणना अशा बाववटामध्ये म्हणजे निर्लोभी व्यक्तीमध्ये केली गेली.
कायद्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधून काढणे कोणी गैर मानत नाही. असे आढळून आल्यावर गांधीजी विचार करू लागले की हे कसे थांबवता येईल? त्यांना आपल्या आईची स्वाभाविकच आठवण झाली. स्वेच्छेने घेतलेले व्रत ती किती काटेकोरपणे पाळत असे हे त्यांना आठवले. त्यासाठी हृदयस्थ आत्मारामाचा पहारा तिला पुरेसा वाटत असे. व्रत हे स्वेच्छेने स्वीकारले असल्याने सामान्यता त्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. सत्याग्रहीने अशीच व्रतनिष्ठा अनुसरली पाहिजे.
परंपरागत व्रते बदलत्या काळात गांधीजींना संख्येने आणि अर्थाने कमी पडतात असे जाणवते. अनुभव चिंतन आणि प्रयोग करीत त्यांनी या व्रतात नवी भर घातली आणि सत्याग्रही
व्रत-अनुशासन तयार केले .सत्य ,अहिंसा ब्रह्मचर्य इत्यादी परंपरागत व्रतात अस्तेय, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद,भय ,सर्वधर्म समानत्व, स्वदेशी ,स्पर्श भावना ह्या व्रतांचा त्यांनी समावेश केला आणि ही व्रत एकादशी तयार झाली. विनोबांनी त्या व्रतांची एका श्लोकात गुंफण केली आहे
*अहिंसा'सत्य,अस्तेय ब्रह्मचर्य,असंग्रह*,
*शरीरश्रम,अस्वाद*
*सर्वत्र भयवर्जन*
*सर्व धर्मी समानत्व स्वदेशी, स्पर्शभावना*
*ही एकादश सेवावी नम्रता त्या व्रत निश्चये*
हा श्लोक सकाळ-संध्याकाळच्या आश्रम प्रार्थनेत म्हटला जाऊ लागला.
गांधीजीनी ह्या व्रतांचा खुलासा करण्यासाठी ' *मंगलप्रभात* ' नावाची एक छोटी पुस्तिका लिहिली. त्यामुळे लोक खोल विचार करू लागतील असे त्यांच्या ध्यानी आले .अनेक धर्मग्रंथांची लोक नुसती पोपटपंची करतात. जिभेला सदवचनांचा स्पर्श झाला म्हणजे संस्कार झाला असे लोकांना वाटते. सदवचनांना स्पर्श मनाला, बुद्धीला आणि कर्माला झाल्यावाचून संस्कार झाला असे म्हणता येत नाही. गांधीजींची इच्छा व्रत निष्ठा लोकांनी अंगी बनवावी अशी होती. सुसंस्कृत समाजात
दंडाआधारित कायद्यापेक्षा स्वेच्छेने स्वीकारलेल्या व्रतांची महती अधिक असते. कारण व्रत म्हणजे दंडशासन कमी करून विचार शासनाच्या दिशेने वाटचाल करणे होय.
*यदुनाथ थत्ते*
संकलन राजेंद्र गुरव
95 611 54 140
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment