गांधी: नेतृत्वाची परिणामकारिता
*म गांधी :नेतृत्वाची परिणामकारिता*
🌸🍃🌺🍂☘🍃🌸
१९२० साली गांधींजींनी असहकार चळवळीचा कार्यक्रम दिला. कॉंग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांनी विरोध करूनही हा कार्यक्रम बहूमताने मंजूर झाला.
गांधींजीनी या चळवळीचे काटेकोरपणे व सूक्ष्म नियोजन केले होते. या नियोजनामुळे आंदोलनाचे वा लढयाचे स्वरुप बदलले.
जनअसहकार कार्यक्रमामुळे काँग्रेसच्या एकूण धोरणावरही परिणाम झाला.
कांग्रेसच्या घटनेतही बदल झाला .' ब्रिटिश साम्राजा अंतर्गत स्वयंशासन ' असे काँग्रेसचे उद्दिष्ट कमी होऊन *स्वराज्य प्राप्ती* असे उद्दिष्ट ठरले.आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे ग्रामसमिती, जिल्हा ,प्रiतिक समिती व अखिल भारतीय काँग्रेस महासमिती अशी संघटनेची उतरंड ठरली.
*गांधींनी देश व्यापी दौरा काढला.देशभर स्वयंसेवकांची नोंदणी सुरू झाली, त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम ठरला. तब्बल ५० लाख स्वयंसेवक नोंदणी झाली.*
यावरुन गांधींची चळवळ किती फोफावली हे कळून येते. स्वराज्य फंड गोळा करण्याचा संकल्प पुरा झाला. *एका वर्षाच्या आत १कोटीपेक्षा जादा रक्कम जमा झाली. वर्षांत २० लाखावर चरखे वाटले गेले. विदेशी मदय,विदेशी मालावर ठिकठिकाणी निरोधने सुरू झाली. विदेशी मालाच्या होळ्या झाल्या,परकीय गंगाजळी थांबल्या. सरकारचे उत्पन्न घटले. सामाजिक ऐक्य वाढले,लोक एकत्र दिसू लागले.*
*जन आंदोलनाचे असे अपूर्व दृश्य भारत वर्ष प्रथमच अनुभवत होता.संपूर्ण देशात एक चैतन्य निर्माण झाले होते.*
महात्मा गांधी दीडशेवी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
🌸🍃🌺🍂☘🍃🌸
१९२० साली गांधींजींनी असहकार चळवळीचा कार्यक्रम दिला. कॉंग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांनी विरोध करूनही हा कार्यक्रम बहूमताने मंजूर झाला.
गांधींजीनी या चळवळीचे काटेकोरपणे व सूक्ष्म नियोजन केले होते. या नियोजनामुळे आंदोलनाचे वा लढयाचे स्वरुप बदलले.
जनअसहकार कार्यक्रमामुळे काँग्रेसच्या एकूण धोरणावरही परिणाम झाला.
कांग्रेसच्या घटनेतही बदल झाला .' ब्रिटिश साम्राजा अंतर्गत स्वयंशासन ' असे काँग्रेसचे उद्दिष्ट कमी होऊन *स्वराज्य प्राप्ती* असे उद्दिष्ट ठरले.आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे ग्रामसमिती, जिल्हा ,प्रiतिक समिती व अखिल भारतीय काँग्रेस महासमिती अशी संघटनेची उतरंड ठरली.
*गांधींनी देश व्यापी दौरा काढला.देशभर स्वयंसेवकांची नोंदणी सुरू झाली, त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम ठरला. तब्बल ५० लाख स्वयंसेवक नोंदणी झाली.*
यावरुन गांधींची चळवळ किती फोफावली हे कळून येते. स्वराज्य फंड गोळा करण्याचा संकल्प पुरा झाला. *एका वर्षाच्या आत १कोटीपेक्षा जादा रक्कम जमा झाली. वर्षांत २० लाखावर चरखे वाटले गेले. विदेशी मदय,विदेशी मालावर ठिकठिकाणी निरोधने सुरू झाली. विदेशी मालाच्या होळ्या झाल्या,परकीय गंगाजळी थांबल्या. सरकारचे उत्पन्न घटले. सामाजिक ऐक्य वाढले,लोक एकत्र दिसू लागले.*
*जन आंदोलनाचे असे अपूर्व दृश्य भारत वर्ष प्रथमच अनुभवत होता.संपूर्ण देशात एक चैतन्य निर्माण झाले होते.*
महात्मा गांधी दीडशेवी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment