रायचंदभाई

रायचंदभाई
🌿☘🌸🍀🍁
( प्रभाव आणि जीवन मार्गावर विचारांचे महत्व )

रायचंद भाई वय २५ वर्ष. चारित्र्यवान, ज्ञानी. पहिल्याच भेटीत त्यांचा गांधींवर  परिणाम पडला.

डॉ मेहतांनी  गांधींना त्यांची परीक्षा घ्य्यायला सांगितले. गांधींनी काही १ाब्द (प्रयत्नपूर्वक, आपले सर्व भाषाज्ञान खर्ची घालून) सांगीतले. गांधींनी ज्या क्रमाने शब्द सांगीतले ,त्याच क्रमाने  रायचंद्र भाईंनी पून्हा शब्द सांगीतले.या त्यांचे क्षमतेचा गांधींना हेवा वाटला.

भाईंचे शास्त्रज्ञान,शुद्ध चारित्र्य आणि आत्मदर्शन करण्यांची त्यांची तीव्र उत्कंठा गांधींना भावे.

भाईंचा हजारोंचा रुपयांचा मोठा व्यापार. पक्के व्यापारी
 हिऱ्या- मोत्यांची पारख. व्यापारातील ज्ञान तल्लख. इतरजण त्यांचा सल्ला घेत.

पण त्यांचा मुख्य पुरुषार्थ आत्मदर्शन,देवाची शिकवण हाच होता.
त्यांचे पेढीवर एखादे धार्मिक पुस्तक असायचे.

वेळ मिळेल तेंव्हा ते धार्मिक वाचन,चर्चा करीत. टिपणं काढीत.

या टिपणावरून त्यांनी अनेक लेख लिहले.पुढे प्रसिद्ध केले.

गांधी त्यावेळी बॅरिस्टर असून बेरोजगार होते. ते कित्येक वेळा भाईंबरोबर धार्मिक चर्चा करीत.

गांधी म्हणतात मी भाईनंतर अनेक धर्माचार्यांशी माझी भेट झाली.अनेक व विविध धर्मातील धर्माचार्याबरोबर चर्चा झाली. मात्र रायचंदभाईं यांची छाप मजवर होती, तशी कुणाची नव्हती.

भाईंच्या वचनात प्रेम होते,ते ह्रदयाला भिडत.
गांधींच्या आध्यात्मिक अडचणीवेळी ते त्यांच्याकडे जात.चर्चा करीत.सल्ला घेत.

रायचंद भाईंचा गांधींना आदर होता. पण गांधींनी त्यांना धर्मगुरू मानले नाही.

गांधी म्हणतात - *हिंदू धर्माने गुरुपदाला जे महत्व दिले आहे, ते मला सर्वस्वी मान्य आहे.गुरुशिवाय ज्ञान अशक्य आहे. हे वाक्य बहुतांशी खरे आहे. अक्षर ओळख करून देणारा शिक्षक अर्धकच्चा असला तरी काम चालू शकेल.पंरतु आत्मदर्शन करुन देतो म्हणणारा अपूर्ण असून चालणार नाही. गुरुची पदवी संपूर्ण ज्ञानी माणसासच देता येईल. गुरूच्या शोधामध्येच त्याचे फळही राहिलेले आहे. कारण की शिष्याला स्वतःच्या लायकीनुरूप गुरू भेटतो. तशी योग्यता प्राप्त करण्यासाठीच सर्व शक्तीनिशी झटण्याचा प्रत्येक साधकाला अधिकार आहे.साधक याचा अर्थच तो. त्या प्रयत्नाचे फळ ईश्वराधीन आहे.*

 रायचंदभाईंचे प्रेम गांधींना वारंवार मिळत गेले.

... गांधींवर त्यांचा परिणाम राहिला. असे जीवनावर परिणाम करणारे ३ पुरुष गांधी सांगतात.
रायचंदभाईची प्रत्यक्ष अनुभूती , टॉलस्टॉयचे The Kingdom of God Is Within You
रस्किनचे सर्वोदय Unto This Last. या पुस्तकांनी व रायचंदभाईची प्रत्यक्ष अनुभती यांनी गांधी भारावून गेले.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510