संयम आणि प्रेम

संयम आणि प्रेम
🍁☘🍀🍀🌸

....आपला भाऊ बॅरिस्टर होऊन आला याचा गांधींच्या बंधूना अभिमान होता.
आणि मोठी आशाही !
त्यांचे भरवश्यावर त्यांनी स्वप्नांचे इमले रचले होते.
पैश्यांचे, किर्तीचे आणि सामाजिक स्थानाचे ! गांधीसाठी त्यांचे मन दयाळू होते. पण हा बॅरिस्टर खूप पैसे कमविणार हेच त्यांनी ठरवून टाकले होते. घरच्या खर्चाचे आराखडे बदलले होते.

ज्ञाती बांधवात गांधी बॅरिस्टर झाले याचा परिणाम झालाच होता. त्यांचेत दोन गट पडले, गांधींना जातीत घ्यायचे का नाही यावरून.
एका गटाने गांधींना लगेच जातीत घेतले. पण एक गट जातीत न घेण्याबद्दल दृढ होता.
जातीत घेणाऱ्या पक्षाचे समाधानासाठी  वडील बंधूनी गांधींना गोदावरी स्नान व ज्ञातीभोजन घातले.

ज्या गटाने गांधींना वाळीत टाकले. गांधींनी त्यांना त्यांचे मार्गे जाऊ दिले.त्यात प्रवेश करण्याचा गांधींनी कधी प्रयत्नही केला नाही. जे गांधीकडे रागाने, तिरस्काराने पाहत ,गांधी त्यांच्यांशी प्रेमाने वागत, नम्रपणे वागत.

ज्ञातींचा उपसर्ग आपल्या पाहूण्याना होऊ नये म्हणून गांधीनी अनेक काळजी घेतली. ते सासू - सारखे, बहिणी, जवळचे पाहुणे याकडे पाणीही पित नसत.

पाहुणे गुप्तपणे त्यांना काही देऊ इच्छित. पण जी गोष्ट उघडपणे करता येत नाही. ती लपून छपून करणे गांधींच्या मनालाच मान्य नसे.

गांधींच्या या सत्यवादी वर्तनाचा असा परिणाम झाला की ज्ञातींनी त्यांना कधी त्रास दिला नाही. बहिष्कृतला आदर व उदारता अनुभवयास मिळाली. काही ठिकाणी मदतही झाली.

ज्ञातींच्या दृष्टीने गांधींनी काय करावे अशी अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. उलट ते गांधींबद्दल उदारता बाळगू लागले.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510