म.गांधी आणि महाराष्ट्र

म गांधी आणि महाराष्ट्र
🍀🍁☘🌿🌸
महात्मा गांधीचे आणि महाराष्ट्राचे एक विशेष नाते आहे.

महाराष्ट्र म्हणजे गांधीजींची कर्मभूमीचं !
सुमारे २४ वर्ष, म्हणजे जवळ - जवळ २ तपे गांधीजी सेवाग्राम वर्धा आश्रमात कार्यरत राहिले.

इथूनच त्यांनी अनेकदा राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले,मार्गदर्शन केले. वर्धा शिक्षण पद्धती त्यांनी महाराष्ट्राचे मातीतूनच सर्वांना दिली.

गांधींनी बॅरीस्टर म्हणून मुंबईला  काम केले. गांधी ज्यांना राजकीय गुरू मानीत ते नामदार गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्रातील पुण्यातूनच .

पुण्यातील येरवडा तुरूंगात गांधींनी तुरुंगवास सोसला आहे. त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे स्मारक ' आगाखान पॅलेस ' पुणे येथे आहे.

गांधीचे आध्यात्मिक क्षेत्रातील वारसदार त्यांचे शिष्य विनोबा भावे महाराष्ट्रातून होते.

गांधीजींच्या अनेक चळवळीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते.
*चले जाव ' चळवळीचे नियोजन वर्धा येथे झाले व चले जाव हा ऐतिहासिक ठराव मांडण्यास मुंबई हे ठिकाण निवडण्यात आले."*

म गांधी म्हणत , ' *मराठी मातीत कार्यकर्त्यांचे मोहोळ रुजले आहे*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510