माता आणि मातृभूमीकडे
माता आणि मातृभूमीकडे
🌸🍀🌿☘🍁🀊
१० जून १८९१ रोजी गांधी बॅरिस्टर झाले. ११ तारखेस फी भरून गांधींनी हायकोर्टात आपले नाव नोंदवले. १२ जूनला गांधी ..हिंदूस्थानला परत येण्यासाठी निघाले.
पदवी घेतली खरे. अभ्यास केला.पुस्तके वाचली. पण वकिली करता येईल का ? ही भीती गांधींजींच्या मनात होती.
गांधी मुंबईला पोहोचले.वडील भाऊ बंदरावर आला होता. ते खंबीरपणे गांधीच्या मागे होते. जातपंचायतने गांधींना जातीबाहेर काढले तरी. गांधीजींचा सारा खर्च भावानेच उचलला होता. तर गांधींनी पैसा अत्यंत काटकसरीनी वापरला होता.
गांधीच्या प्रवासात एडनपासून समुद्राला तुफान होते. मुंबईतही समुद्र खवळलेला होता.
हे वादळ बाहय स्वरूपाचे होते. गांधींना आंतरिक वादळाची चाहूल लागली. ज्ञातीचे विचार येत होते. तो प्रश्न मोठा होता.
.... आणि महत्वाची आईला भेटण्याची उत्कंठा लागली होती. आईला दिलेले वचन गांधीनी तंतोतंत पाळले होते. विषम परिस्थितीतही त्यांचा निश्चय ढळला नव्हता. किंवा दूरवर कोण आहे बघायला म्हणून मदय,मांसाच्या आगारात ते वाहून गेले नव्हते.
वडिल स्वर्गीय..आईच मायेचा आसरा... माझे यश पाहून तिला किती आनंद होईल ?
इतक्या दिवसानं ती मला कशी प्रेमाने जवळ घेईल ?.. गांधींच्या मनात काहूर माजले होते. आईच्या विचारांचे !
दोन भावांची गळाभेट झाली.. डॉ मेहता व त्यांचे भाऊ यांनी त्यांचेकडे राहण्याचा आग्रह केला.
इंग्लडमध्ये त्यांच्यांशी जडलेला स्नेह हिंदूस्थानात कायम राहिला, दृढ झाला.
गांधी घरी पोहचले. ओढीने ,आतुरतेने .. आईला आठवत. घरात ते आईचा शोध घेऊ लागले.
पण आई कोठे होती?
... गांधींना ती बातमी घरच्यांनी सांगीतली... आई देवाघरी गेल्याची !
आई गेल्याची बातमी गांधींना इंग्लंडला कळू दिली नव्हती. गांधींना धक्का नको आणि शिक्षणात अडथळा नको म्हणून.
गांधी घरी पोहचेपर्यंत बातमी लागू न देण्याचे भावानेच ठरविले होते.
गांधी म्हणतात - ' वडिलांच्या मृत्यूने मला जो धक्का बसला होता. त्याच्यापेक्षा जास्त आघात मला आईची बातमी ऐकून झाला.
गांधींच्या मनातील पुष्कळ आकांक्षा खुंटल्या. गांधी म्हणतात 'तरीही मी ही मृत्यूची बातमी ऐकून मी ओक्साबोक्शी रडलो नाही. मी माझे अश्रुही बहुतांशी आवरू शकलो. '
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.b logspot.in🌺🌸 T🕉🍁🇮🇳
🌸🍀🌿☘🍁🀊
१० जून १८९१ रोजी गांधी बॅरिस्टर झाले. ११ तारखेस फी भरून गांधींनी हायकोर्टात आपले नाव नोंदवले. १२ जूनला गांधी ..हिंदूस्थानला परत येण्यासाठी निघाले.
पदवी घेतली खरे. अभ्यास केला.पुस्तके वाचली. पण वकिली करता येईल का ? ही भीती गांधींजींच्या मनात होती.
गांधी मुंबईला पोहोचले.वडील भाऊ बंदरावर आला होता. ते खंबीरपणे गांधीच्या मागे होते. जातपंचायतने गांधींना जातीबाहेर काढले तरी. गांधीजींचा सारा खर्च भावानेच उचलला होता. तर गांधींनी पैसा अत्यंत काटकसरीनी वापरला होता.
गांधीच्या प्रवासात एडनपासून समुद्राला तुफान होते. मुंबईतही समुद्र खवळलेला होता.
हे वादळ बाहय स्वरूपाचे होते. गांधींना आंतरिक वादळाची चाहूल लागली. ज्ञातीचे विचार येत होते. तो प्रश्न मोठा होता.
.... आणि महत्वाची आईला भेटण्याची उत्कंठा लागली होती. आईला दिलेले वचन गांधीनी तंतोतंत पाळले होते. विषम परिस्थितीतही त्यांचा निश्चय ढळला नव्हता. किंवा दूरवर कोण आहे बघायला म्हणून मदय,मांसाच्या आगारात ते वाहून गेले नव्हते.
वडिल स्वर्गीय..आईच मायेचा आसरा... माझे यश पाहून तिला किती आनंद होईल ?
इतक्या दिवसानं ती मला कशी प्रेमाने जवळ घेईल ?.. गांधींच्या मनात काहूर माजले होते. आईच्या विचारांचे !
दोन भावांची गळाभेट झाली.. डॉ मेहता व त्यांचे भाऊ यांनी त्यांचेकडे राहण्याचा आग्रह केला.
इंग्लडमध्ये त्यांच्यांशी जडलेला स्नेह हिंदूस्थानात कायम राहिला, दृढ झाला.
गांधी घरी पोहचले. ओढीने ,आतुरतेने .. आईला आठवत. घरात ते आईचा शोध घेऊ लागले.
पण आई कोठे होती?
... गांधींना ती बातमी घरच्यांनी सांगीतली... आई देवाघरी गेल्याची !
आई गेल्याची बातमी गांधींना इंग्लंडला कळू दिली नव्हती. गांधींना धक्का नको आणि शिक्षणात अडथळा नको म्हणून.
गांधी घरी पोहचेपर्यंत बातमी लागू न देण्याचे भावानेच ठरविले होते.
गांधी म्हणतात - ' वडिलांच्या मृत्यूने मला जो धक्का बसला होता. त्याच्यापेक्षा जास्त आघात मला आईची बातमी ऐकून झाला.
गांधींच्या मनातील पुष्कळ आकांक्षा खुंटल्या. गांधी म्हणतात 'तरीही मी ही मृत्यूची बातमी ऐकून मी ओक्साबोक्शी रडलो नाही. मी माझे अश्रुही बहुतांशी आवरू शकलो. '
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.b logspot.in🌺🌸 T🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment