खरी उपासना

खरी उपासना
🌸🌿🍀🍁☘

गांधी म्हणतात -
असली उपासना,असली प्रार्थना हा काही वाणीचा विकास नव्हें. प्रार्थना _ उपासनेचा उगम कंठ नव्हे, तर ह्रदय आहे. म्हणून जर आपण आपले ह्रदय शुद्ध राखले, तेथे असलेल्या तारा व्यवस्थित ठेवल्या तर त्यांतून जो सूर निघेल तो गगनाला भेदून जाईल. त्यासाठी जिभेची आवश्यकता नाही. ती स्वभावतःच अद्भूत वस्तू आहे. विकाररूपी मळाच्या क्षालनासाठी अंतःकरणापासून केलेली उपासना ही एक महौषधी आहे, याबद्दल मला शंकाच वाटत नाही.पंरतु तो प्रसाद मिळवायचा तर आपल्याकडे संपूर्ण नम्रता पाहिजे.

गांधी एका ठिकाणी म्हणतात - धर्मशास्त्र आणि जगातील धर्म यांची साधारण माहिती तर मला झाली . पण मनुष्यमात्रास या पेक्षा वेगळं ज्ञान हवं.केवळ धार्मिक ज्ञान त्याचे जीवनासाठी, मनुष्याच्या बचावासाठी अपुरे आहे.

संकटसमयी जी गोष्ट मनुष्यास साहय करते. तिचे त्याला त्यावेळी भान नसते, ज्ञान नसते. संकटावेळी तो कुणाचा धावा ही करतो.
नास्तिक मनुष्य संकटातून बचावला तर तो म्हणतो, की मी यदृच्छेने बचावून गेलो. अशा वेळी आस्तिक म्हणतो ,की मला ईश्वराने बचावले. दैवी शक्ती माझे सोबत होत्या. धर्माच्या परिशीलनाने तो परिणाम घडून गेल्यानंतर अनुमान काढतो, की ईश्वर आपल्या ह्रदयात प्रगट होतो.

उपासना स्वातंत्र्य हा आपले घटनेने मूलभूत अधिकार आहे.पण उपासनेतून उन्माद नको, नम्रता हवी. उपासना जीवन उन्नतीस पूरक व्हावी.

 गांधींजींचे मताने आपण जेंव्हा असे म्हणतो ईश्वराने मला वाचवले. याचा अर्थ आज मला पुष्कळ समजू लागलेला आहे.पण पुरे रहस्य कळलेलें नाही.
' कठिण प्रसंगी आपण धावा करतो. आणि या प्रसंगी कोठून तरी मदत येऊन पोहचते असे मला अनुभव आले आहेत.

स्तुती,उपासना,प्रार्थना वगैरे गोष्टी झूट नाहीत ,तर आपण खातो,पितो ,उठतो बसतो हे जितके खरे आहे.त्याहूनही या गोष्टी जास्त प्रमाणसिद्ध आहेत.
(संकलीत )
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510