Posts

Showing posts from August, 2019

गांधी: नेते एकत्रीकरण

नेत्यांचे एकत्रीत काम आणि नेतृत्वाचा परिणाम 🌸🍃☘🍂🌺🍃🌸 गांधीप्रणीत असहकार चळवळीला मोतीलाल नेहरू ,चित्तरंजन दास लाला लजपतराय, मोहम्मद अली जिना इत्यादींनी विरोध केला होता. कालांतराने मात्र गांधींचे एकूण  परिणामकारक नियोजनावर विचार होऊन मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय, देशबंधू दास इत्यादी गांधींचे समर्थन करण्यासाठी  पुढे  आले.  नेते आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत होते  स्वतःच्या अपेक्षापेक्षा देशाच्या आकांक्षा त्यांना महत्त्वाचे होत्या.  गांधीजींच्या अभिनव कार्यक्रमाचा प्रभाव तरुण क्रांतिकारकांवरी  पडला होता. महाराष्ट्रातील क्रांतिकारक सेनापती बापट ,बंगालमधील सूर्यसेन, व्ही .व्ही.एस.अय्यर इत्यादी क्रांतिकारी विचारांनी काम करणारी मंडळी गांधीजींच्या पाठीमागे उभी राहिली. ही मंडळी गांधीजींच्या असहकार चळवळीत स्वतःहून सामील झाली. या अभूतपूर्ण प्रयोगाला त्यांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळाला. *मोतीलाल नेहरू, वल्लभभाई पटेल' चितरंजन दास 'सुभाषचन्द्र बोस ,जवाहरलाल नेहरू*  यासारख्या अनेक प्रभावी नेत्यांचे नेतृत्व या चळवळीला लाभले .या सर्वांच्या एकत्रित प्र...

गांधी: नेतृत्वाची परिणामकारिता

*म गांधी :नेतृत्वाची परिणामकारिता* 🌸🍃🌺🍂☘🍃🌸 १९२० साली गांधींजींनी असहकार चळवळीचा कार्यक्रम दिला. कॉंग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांनी विरोध करूनही हा कार्यक्रम बहूमताने मंजूर झाला. गांधींजीनी या चळवळीचे काटेकोरपणे व सूक्ष्म नियोजन केले होते. या नियोजनामुळे आंदोलनाचे वा लढयाचे स्वरुप बदलले. जनअसहकार कार्यक्रमामुळे काँग्रेसच्या एकूण धोरणावरही परिणाम झाला. कांग्रेसच्या घटनेतही बदल झाला .' ब्रिटिश साम्राजा अंतर्गत स्वयंशासन ' असे काँग्रेसचे उद्दिष्ट कमी होऊन *स्वराज्य प्राप्ती* असे उद्दिष्ट ठरले.आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे ग्रामसमिती, जिल्हा ,प्रiतिक समिती व अखिल भारतीय काँग्रेस महासमिती अशी संघटनेची उतरंड ठरली. *गांधींनी देश व्यापी दौरा काढला.देशभर स्वयंसेवकांची नोंदणी सुरू झाली, त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम ठरला. तब्बल ५० लाख स्वयंसेवक नोंदणी झाली.* यावरुन गांधींची चळवळ किती फोफावली हे कळून येते. स्वराज्य फंड गोळा करण्याचा संकल्प पुरा झाला. *एका वर्षाच्या आत १कोटीपेक्षा जादा रक्कम जमा झाली. वर्षांत २० लाखावर चरखे वाटले गेले. विदेशी मदय,विदेशी मालावर ठिकठिकाणी निरोधने...

गांधी: नेत्यांची उंची

*नेत्याची उंची त्याचे नियोजनात दिसते , त्यांच्या कार्यनितीत दिसते...* *तरुणांनों, कार्यकर्त्यांनों गांधींना त्या दृष्टीने अभ्यासा !* 🌸🍃☘🍂🌺🍃🌸 1 ऑगस्ट 1920 गांधीजींनी असहकार आंदोलनाची हाक दिली होती. त्या दिवशीच लोकमान्य टिळक कालवश झाले. आता गांधींजींची जबाबदारी आणखीच वाढली. काळाचा प्रवाहात गांधीजींच्या नेतृत्वाखाली या नव्या भारताच्या जडणघडणीचा उष:काल होत होता. गांधीजीनी असहकाराचा कार्यक्रम तमाम जनतेला दिला होता.  गांधींच्या असहकारकार्यक्रमामध्ये दोन बाजू होत्या. एक बाजू होती विधायक स्वरुपाची तर दुसरी होती सरकारविरुद्ध बंडाची सरकारचे दृष्टीने विघातक, नकारात्मक परिणाम देणारी. गांधींनी जे असहकाराचे नियोजन मांडले होते. *त्यामध्ये स्वदेशी चळवळीला गती देणे. हातमाग ,छोटया उदयोगांना चालना देणे. मद्यपान निषेध करणे. जातिप्रथेचे निर्मूलन करणे. हिंदू-मुस्लीम ऐक्य साधणे. लोकांच्या छोटयामोठया वादांच्या निपटाऱ्यासाठी ग्रामीण,स्थानिक भागात लवाद नेमणे. लो टिळकांच्या स्मृतीप्रित्यर्थ १ कोटी स्वराज्य फंड गोळा करणे. लोकांना चरख्याचे शिक्षण देणे. त्यांनी स्वतः कातलेल्या सुतांचे कपडे वापरण्...

म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता २

*महात्मा गांधी :आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 2* 🌸🍃🌺🍂☘🍃🍀🌸 गांधीजी देशाचे नेते झाले.त्यासाठी त्यांची मोठी तपश्चर्या. त्यांना सांभाळलेला प्रचंड व्याप आहे. करावा लागलेला त्याग आहे.  1915 मध्ये ते आफ्रिकेहुन भारतात आले आणि 1920 मध्ये भारताचे सर्वोच्च नेते झाले.  *जनतेला ,जनतेसाठी लढणारा - जनतेतून आलेला नेता मिळाला.* आफ्रिकेतील 21 वर्षे  यशस्वी लढा त्याची पुण्याई होतीच.  चंपारण्य ,खेडा इत्यादी ठिकाणी गांधीजींनी दिला प्रखर व सर्वंकष लढा. यशस्वीतेसाठी वापरलेली विविध मार्ग .यांचा एक परिणाम जनमाणसावर  होता. *"लोकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, गांधी त्यासाठी लढत होते .गांधीजींच्या मार्गाने जाऊन लोक ही उन्नत होत होते."*  गांधीजींचा प्रवास हा सामान्याकडून असामान्यत्वाकडे चालला होता. गांधीजी पायी प्रवास करीत दळणवळणाची साधनं नव्हती, संपर्काची साधने नव्हती. प्रत्यक्ष भेटीगाठी हाच संवादाचा एक मार्ग होता.भारतासारख्या अवाढव्य देशात वेगळी भाषा, वेगळ्या परंपरा, चालीरीती ,लोकभावना या सर्वांचा आदर करीत, गांधीजी प्रत्येक भारतीया पर्यंत पोचले .प्रत्येक भारतीय गांधीं...

गांधी : आधु.भारताचा सर्वमान्य नेता.

*महात्मा गांधी :आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 2* 🌸🍃🌺🍂☘🍃🍀🌸 गांधीजी देशाचे नेते झाले.त्यासाठी त्यांची मोठी तपश्चर्या. त्यांना सांभाळलेला प्रचंड व्याप आहे. करावा लागलेला त्याग आहे.  1915 मध्ये ते आफ्रिकेहुन भारतात आले आणि 1920 मध्ये भारताचे सर्वोच्च नेते झाले.  *जनतेला ,जनतेसाठी लढणारा - जनतेतून आलेला नेता मिळाला.* आफ्रिकेतील 21 वर्षे  यशस्वी लढा त्याची पुण्याई होतीच.  चंपारण्य ,खेडा इत्यादी ठिकाणी गांधीजींनी दिला प्रखर व सर्वंकष लढा. यशस्वीतेसाठी वापरलेली विविध मार्ग .यांचा एक परिणाम जनमाणसावर  होता. *"लोकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, गांधी त्यासाठी लढत होते .गांधीजींच्या मार्गाने जाऊन लोक ही उन्नत होत होते."*  गांधीजींचा प्रवास हा सामान्याकडून असामान्यत्वाकडे चालला होता. गांधीजी पायी प्रवास करीत दळणवळणाची साधनं नव्हती, संपर्काची साधने नव्हती. प्रत्यक्ष भेटीगाठी हाच संवादाचा एक मार्ग होता.भारतासारख्या अवाढव्य देशात वेगळी भाषा, वेगळ्या परंपरा, चालीरीती ,लोकभावना या सर्वांचा आदर करीत, गांधीजी प्रत्येक भारतीया पर्यंत पोचले .प्रत्येक भारतीय गांधीं...

गांधी जवळूनी गोजिरे

*गांधी जवळूनी गोजिरे*                 -  राजेंद्र गुरव 🌸🍃🌺🍂☘🍃🌸 दुरुनी गांधी साजरे जवळून अधिकच गोजिरे गांधी म्हणजे साधा माणूस अहंपणाचा नाही मागमूस विचारांची आगळीच मूस हरवृत्तीची प्रसवेल कूस प्रफुल्लीत मने ,एक जन सारे जवळूनी अधिकच गोजीरे १ गांधी म्हणजे निर्मळ हास्य मानवी मनाचे सोडवी दास्य गांधी म्हणजे कणखर बाणा तिमीरावरती घन हाणा उष:कालाचे दूत सर्वत्र पसरे गांधी जवळूनी अधिक गोजिरे. गांधी म्हणजे आपला माणूस रक्ताचा ...हाडा मांसाचा मातीच्या  हर कणात रुजून अवचित साचलेला. जग हे कर्तृत्वाने भारणारे गांधी जवळूनी अधिक गोजिरे  गांधी म्हणजे नैतिक शक्ती सत्य निर्भयता विमुक्तभक्ती प्रश्नाची व्यवहारी युक्ती सामान्यांची आंतर्रिक शक्ती विकसीत करी हर मन प्रेमभरे गांधी जवळूनी अधिक गोजिरे गांधींजीमुळे पुनीत परंपरेची पाऊले गांधींच्या बोलण्यात वर्तमानाची चित्रे  गांधींच्या कृतीत भविष्याची स्वप्ने. हर काळ सोबतीमुळे निखरे गांधी जवळूनी अधिकच गोजिरे ॥ गांधी म्हणजे मानवतेचे गाणे सदा सहज मंगल होऊन जाणे सत्...

व्रतस्थ गांधी

*व्रतस्थ गांधी* *स्वेच्छेने घेतलेले व्रत काटेकोरपणे पाळले जाते. त्यातून पळवाटा आणि चोर दरवाजे शोधण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. सद्वचनाचा स्पर्श मनाला, बुद्धीला आणि कर्माला झाल्यावाचून संस्कार झाला असे होत नाही, असे महात्मा गांधी म्हणत असत *गांधीजींनी एखादी गोष्ट ठरविली की ते आटोकाट प्रयत्न करून ते पाळीत व्रताप्रमाणे* गांधीजींना बॅरिस्टरी करताना त्यांच्या लक्षात आलं ,कायदे धाब्यावर बसवणाऱ्यांचा बचाव करणे करणाऱ्यांची एक जमातीच्या जमात तथाकथित पुढारलेल्या नी उभी केल्यांची गांधींना दिसून आले.  न्यायाची मूलभूत तत्वे धाब्यावर बसवण्याचा उद्योग करून सधन बनलेले कायदातज्ञ त्यांनी पाहिले . *कायद्याबाबत दिरंगाई करणे म्हणजे व्यवहारात कायदा नाकारणे हे न्यायाचे पहिले तत्व. न्यायाचे दुसरे तत्त्व असे की शंभर गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही पण एकाही निर्दोष माणसाला सजा होता कामा नये.न्यायाचे तिसरे आधारभूत तत्त्व असे की तुमच्याशी लोकांनी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही इतरांशी वागावे* पण आपण न्यायदानाची जी व्यवस्था निर्माण केली आहे ती ही मूलभूत तत्वे धाब्यावर बसवणारी. आरोप सिद्ध होईपर...

उपोषण आणि गांधीमार्ग

उपोषण - गांधींमार्ग 🌸🌿☘🍀🍁🌸  सत्याग्रह, सविनय कायदेभंग याचबरोबर गांधीजींनी प्रसंगी उपोषणाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. गांधीजींचे उपोषण हे सत्याग्रहाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. वैयक्तिक पातळीवर उपोषणाने अनेक फायदे होतात असे त्यांचे प्रांजळ मत होते.त्याने शरीर शुद्धी होते, आत्मसिद्धी वाढते ,इच्छाशक्ती प्राप्त होते ,मनशक्ती प्रबळ होते असे ते म्हणत आणि सत्याग्रहासारख्या एकूण लढ्याला आवश्यक ज्या बाबी आहेत त्या उपोषणामुळे सत्याग्रहींच्या अंगी भिनू शकतात. शिस्त,त्यागवृत्ती ,विनम्रता व निर्धार इच्छाशक्ती प्राप्त होतील असे त्यांचे म्हणणे होते.  गांधीजीनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी उद्दिष्ट साधण्यासाठी उपोषणाचा परिणामकारक वापर केलेला दिसून येतो 1924 आली हिंदू-मुस्लीम त्याकरता त्यांनी एकवीस दिवस उपोषण केले  1932 आली जातीय निवाडा च्या विरोधात त्यांनी उपोषण केले. 1933 आली त्यांनी आत्मशुद्धी साठी उपोषण केले तसेच 1947 व जानेवारी 48 या दोन्ही वेळा सांप्रदायिक सद्भभाव रहावा, लोकांची एकी राहावी ,धार्मिक मतभेद दूर व्हावे यासाठी त्यांनी उपोषणे केली. .... आणि ही सर्व उपोषणे...

गांधींजींचे बोलणे

गांधींजींचे बोलणे आणि सलगी देणे ! 🌸🍁🌱🍀☘🌿🌸 गांधींच्या वागण्यामध्ये जसा साधेपणा होता,सहजता होती त्याप्रमाणे वक्तृत्वामध्ये एक साधेपणा होता सहजता होती. सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांची निवड होती.तेथे शब्दफुलोरा नव्हता ,नव्हता डामडौलही !  कोणताही अभिनिवेशही नव्हता... होता एक ठामपणा ! त्यामध्ये सत्य होते, कळकळ होती. त्यामुळे त्यांचे वक्तृत्व हा लोकांच्या विश्वासाचा विषय ठरला होता.  गांधीजींचं वक्तृत्व म्हणजे सामान्य लोकांशी साधलेला सुसंवाद होता, मारलेल्या गप्पा होत्या, केलेल्या गुजगोष्टी होत्या आणि या सर्व गोष्टी जणू भारतभूमीच्या चरणी अर्पण केलेल्या होत्या. त्यांच्या भाषणात भारतवर्षातील छोटे-मोठे विषय ,सर्वसामान्यांची दुःख होती.अतिशय ठामपणे अतिव आपुलकीने आणि सुह्रदयाने,ते आपले म्हणणे मांडत . गांधींचे प्रभावी शब्द व त्यामागील त्यांची तळमळ , आपुलकी लोकांची मने हेलावून सोडी. त्यांच्या भाषणाने लोक विलक्षण प्रभावित होत,ते त्यांच्याजवळ मोठे वक्तृत्व होते म्हणून नव्हे !अगदी मृदू, सौम्य आवाजात ते बोलत.त्यात आवेश नसे पण एक साधेपणा होता, सत्य होते. लोकांना ते भावे. ते लोका...

कनवळा

सर्वसामान्यांचा कनवळा 🌸🍁🌱🍀☘🌿🌸 भारतात आल्यानंतर गांधीजींनी देशाचा संपूर्ण दौरा केला. सर्व भारत जाणण्याचा प्रयत्न केला सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर सर्वसामान्यांचा दुःख गांधींना जाणवले. सर्वत्र ,दूरवर अज्ञान ,दुःख दारिद्र्य पसरलेलं ! लोकांना खायला अन्न नाही .अंगावर व्यवस्थित कपडे नाहीत अशी परिस्थिती पाहून गांधीजींचे मन भरून आले .अनेक लोकांना  लज्जारक्षणापुरते ही कपडे नाहीत अशा जनतेचे अवस्था. आणि या जनतेचे आपण एक घटक आहोत.त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आपणांस असे गांधींनी स्वतः मानले. आणि त्यामुळेच गांधीजींनी एक वस्त्र राहण्याचा निश्चय केला. आणि तो आयुष्यभर पाळला. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल अतिव सहानुभूती निर्माण होऊन वैराग्य धारण करणारा हा महात्मा. सर्व वैभव त्यागणाऱ्या गौतम बुद्धांचे स्मरण देणारा !  जनतेच्या दुःखात आपणही दुःख सोसून सामील होण्याचं असं उदाहरण दुरापास्तच. गांधीजीनी गरजेपेक्षा जास्त वस्तूचा कधी हव्यास केला नाही. नको त्याचा संग्रह टाळला, त्याचे प्रदर्शनही !  भारतातील गरिबातील गरीब त्याच्याशी एकरूप होण्यासाठी एक प...

गांधी आणि धर्म

धर्मातीत 🌸🌿☘🍀🍂🍃🌺 महात्मा गांधी म्हणायचे मी धार्मिक आहे आणि  हिंदूधर्मावर माझे जीवापलीकडे प्रेम आहे. हिंदू धर्माबद्दल त्यांना सार्थ अभिमान वाटे. भगवतगीता त्यांनी अभ्यासली होती. अनेक प्रश्नांची उत्तरे भगवतगीतेत मिळतील असे ते म्हणायचे. इतर अनेक धार्मिक पुस्तकांची गर्दी करण्यापेक्षा एखादे भगवतगीतेसारखे पुस्तक ठेवावे असे ते म्हणत. ते स्वतःला कट्टर हिंदू म्हणत ... आणि त्यांच्या कट्टरतेत इतर धर्मियांबद्दल कटूता नव्हती.. त्यांचे जीवनप्रवासात त्यांनी सर्व धर्म जणू अभ्यासलेले. इंग्लडला,लोकशाहीच्या उगमस्थानी गांधींना विविध विचार प्रवाह भेटले. विविध पंथाचे,विविध धर्मांचे लोक भेटले. त्यात दोन थिऑसॉफिस्ट मित्र होते. गांधींजी जवळ त्यांनी गीतेसंबंधी विषय काढला. चर्चेतून गांधींना हे समजले की ते *एडविन आर्नल्डनी गीतेचे केलेले भाषांतर* वाचीत होते. त्यांचेबरोबर गांधीं *गीता* वाचू लागले. त्यातील २रा अध्याय वाचताना त्यातील काही श्लोक गांधींचे मनात रुतून बसले. गांधी म्हणतात गीतेच्या श्लोंकाचें ध्वनी माझ्या कानात घुमत राहिले. गीता हा अमूल्य ग्रंथ आहे. अशी माझी समजूत झाली. हळूहळू समज...

खेडा सत्याग्रह यश आणि निर्भय शेतकरी

खेडा सत्याग्रह  यशस्वीता आणि निर्भय शेतकरी. 🌸🍀☘🍂🍃🌺🌸 खेडा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. तेथील अधिकारी अन्यायकारी शेतसारा वसूली करीत होते. वसूली सक्तीची व शेतकऱ्यांचे वकूबीपेक्षा जास्त होती. गांधींजीनी या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांना एक केले. ...मग संघटित विरोध. या प्रकरणात म गांधी व सरदार पटेल, अन्यायाविरुद्ध मैदानात होते. 'आमचे उत्पन्न कमी आहे. सारावसुली वर्षभर माफ व्हावी " असा अर्ज सरकारकडे पाठविला होता. पण सरकारवर परिणाम शून्य. सारा माफ झाला नाही. मग म गांधीचे पुन्हा पत्र - 'आम्ही सारा भरणार नाही. वसूलीसाठी जो इलाज करायचा आहे तो सरकारने करावा. आम्ही सर्व सोसू. जमिन खालसा झाली तरी बेहतर. जे काही समर्थ आहेत. तेही सारा भरणार नाहीत, त्यामुळे दुबळेही घाबरून सारा भरतील.... इ. " .... एकूणच सत्याग्रहात लोक अधिकाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नव्हते. लाठीहल्ल्यांस भीक घालत नव्हते. तुरूंगाची भीती नष्ट झाली होती.... प्रथमतः नडियादच्या मामलेदाराने निरोप दिला- "जे सुस्थितीत आहेत. त्यांनी महसूल भरावा.तसे केले तर मग गरिबांची वसुली तहकूब ठेवण्यात येई...

खेडा सत्याग्रह आणि लढ्याचे सरदार

*खेडा सत्याग्रह आणि लढयाचे सरदार.* 🌸🍁🌱🍀☘🌿🌸  मजुरांचा संप संपला याचा आनंद व्यक्त करायलाही गांधीजींना वेळ मिळाला नाही .दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे  गांधींच्या सोबतीला एक सरदार आला तो म्हणजे वल्लभभाई पटेल ! मिल मजूरांना  न्याय मिळाला.. आणि  लगेचच खेडा जिल्ह्यातून  गांधींना निरोप आला या आणि आमचा प्रश्न सोडवा. - 'खेडा जिल्हा दुष्काळी परिस्थिती . शेतकऱ्यांची पिके पडली पण शेतसारा माफ होत नव्हता.  याबाबतीतही गांधीजींनी पूर्ण चौकशी करून अहवाल कळवला होता कमिशनला भेटले होते. अमृतलाल ठक्कर, मोहनलाल पंड्या , शंकर लाल परीख,गोकुळदास पारेख, विठ्ठलभाई पटेल या सर्वांची मदत या कामी गांधींना झाली होती.  चौकशीअंती गांधींना गांधींना कळले होते शेतकऱ्यांचे म्हणणे रास्त आहे ....त्यांनी लढ्याचं नियोजन करण्यास सुरुवात केली. वकिलांच्या मीटिंगमध्ये त्यांनी विचारणा केली ' .माझ्यासोबत कोण कोण येणार? ' त्यावेळी पहिली नोंदणी झाली सरदार वल्लभभाई पटेल यांची !  श्रीशंकरलाल बॅंकर अनुसयाताई ,इंदुलाल  याज्ञिक आणि महादेव देसाई इत्यादी सोबत होतेच. वल्लभभाई पटे...

अभिनव प्रयोग

*आणखी एक संघर्ष*  *अहमदाबादमध्ये गांधींचा अभिनव प्रयोग* 🌸🌿☘🍀🌱🍁🌸 *अहमदाबादमध्ये* गिरणीमालक अफाट नफा मिळवीत व त्याचा थोडाही वाटा मजुरांना मिळत नसे.यासंबंधी त्यांनी गांधींकडे तक्रार केली. चर्चेअंती गांधींनी मजूरांना संपाचा सल्ला दिला. मजूर व त्यांचे पुढारी यांज बरोबर अनेक वेळा गांधींनी चर्चा केली.मजूरांबरोबर चर्चा करुन गांधींनी संपकाळात मजूरांनी कसे राहयचे यासंबंधी नियोजन केले. १ काही झाले तरी शांतीभंग नको २ ज्यांना कामावर जायचे आहे,त्यांची अडवणूक नको. ३ मजुरांनी भिक्षान्न खाऊ नये. ४ संप संपेपर्यंत दृढ रहावे,पैसे संपले तर इतर काम करुन मिळवावेत. सर्व पुढाऱ्यांची मान्यता.नंतर मजुरांची सभा.ठराव - आपली मागणी मान्य झालेशिवाय किंवा त्यांचे योग्यतेचा अभ्यास करणेसाठी पंच नेमलेशिवाय कोणीही कामावर जाणार नाही. रोज सभा.शेकडो मजूर.गांधी रोज नियोजनाची आठवण करून देत.रोज मिरवणूक व नंतर सभा. संपाला २१ दिवस झाले.गांधी वेळोवेळी वाटाघाटी करीत. पण मालक पंच नेमण्यास तयार नव्हते. ... दिवसांमागून दिवस जात होते. काही मजूरांचा संयम संपत होता. गिरणीत कामावर जाणाऱ्यांचा द्वेष होऊ लागला.सभेच...

आणखी एक संघर्ष

आणखी एक संघर्ष 🌸🍁🍀☘🌿🌱🌸 चंपारण्यातील कमेटीचकाम आटोपत आलं होत,इतर कामांचा व्याप मात्र बराच वाढला होता.शाळा,गावसफाई,हिंदीप्रचार,गोशाळा !  एवढयात म गांधींना आणखी एक निरोप आला. निरोप खेडा जिल्हातील शेतकऱ्यांचा, शेतीचे नुकसान व सारामाफी याबाबत होता. पत्राने निरोप होता. *आपण हा प्रश्न हाताळावा.लोकांचे नेतृत्व स्वीकारणेबाबत आग्रह ही होता.* *दुसरे एक पत्र होते अहमदाबाद बाबत , मजूरांचे तुंटपुंजे पगार,पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न* या दोन्ही बाबतीत गांधींचा सल्ला ,पीडीतांना हवा होता. त्यांचे नेतृत्व हवे होते. प्रत्यक्ष ठिकाणावर येईन.प्रश्न अभ्यासेन, तपास होऊन मग पुढे काय करायचे ,हे ठरविण्यात येईल.असे गांधींजींनी कळविले. चंपारण्यातील कामाचा व्याप वाढीन होता. मधेच एका कामानिमित्त गांधी अहमदाबादला पोहचले. तिथेही कामाचा पसारा. एकामागे एक कामे. त्याचत अहमदाबादमध्ये खेडाच्या प्रश्नांवरुन कामासंबंधी सल्लामसलती सुरु झाल्या. आणि मजुरासंबंधीही लोक गांधीकडे येऊ लागले. गांधींनी मजूरांचे प्रश्नी लक्ष घातले.काही गिरणी मालक गांधींचे स्नेही होते, काही परिचीत. त्यांचे बरोबरच संघर्ष करायचा म...

चंपारण्याची यशस्वीता

चंपारण्य ६ *चंपारण्य आंदोलनाची यशस्वीता आणि गांधींजींच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे दर्शन* 🌸🌿☘🍀🍁🌸 आताचे नेते एखादा प्रश्न कळालां की त्याच्यावर हल्ला चढवायचा ,एखादा मोर्चा काढायचा ,वर्तमानपत्रात बातम्या दायच्या ,लोकांना खूश करायचं आणि  निघून जायचं . मी प्रश्न पाहिला, प्रश्न मांडला आणि मी प्रश्न सोडला ( चारचौघात, वृत्तपत्रात ) म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि परत जावे . ...आणि परत त्या प्रश्नांचे आसपास ही नाही अशी काही तरी  ( अ )नीती आपले पुढारी वापरतात  .... चंपरण्यामध्ये गांधीजींनी जी सर्वसमावेशक व प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणारे आंदोलन चालवलं त्याला इतिहासात तोड नाही. जगापासून दूर,अज्ञानी  चंपरण्यामधील शेतकऱ्यावर जुलूम  होत होता ,अन्याय होत होता शेतकऱ्यांनी स्वतःहून गांधींची भेट घेतली व त्यांना या अन्यायाविरुद्ध नेतृत्व स्वीकारण्यास सांगितले गांधीजींनी निव्वळ त्याचा स्टंट न करता त्यांचा प्रश्न समजून घेतला . प्रत्यक्ष खात्री . केली. मग त्यासंबंधी सरकारवर पत्रव्यवहार केला .गावोगावी घरोघरी जाऊन प्रश्नांचे सर्वेक्षण केले.कागदोपत्री नोंद केली. अहवाल लिह...

चंपारण्य - ५

चंपारण्य - ५ 🌸🌿☘🍀🍁🌸 गांधीजींच्या चौकशीस परवागणी मिळाली. कोठे तरी योग्य थांबा मिळावा की काम सुरू करता येईल. घर भाड्याने ही घेता येईल ! व्रजकिशोरबाबूंनी मोठया कसबीने घर मिळवून दिले. मोतीहारी गावातील ते  घर,भोवती कुंपण इ. कामास अगदी योग्य घर. गांधींजींनी चौकशी सुरु केली. शेतकरी आपली दुःखे, होणारा अन्याय याची माहिती देऊ लागला. शेतकऱ्यांचे जथेच्या जथे येवू लागले. सांगणारा एक आणि सोबतीही अनेक. प्रत्येकाचे प्रश्न ऐकणे. त्याची नोंद घेणे. अहवाल तयार करणे. मोठे जिकीरीचे काम . गांधी त्यांचे साथीदारासह आपले कामाला जुंपले होते. जमीनदाराचा साहजिकच राग वाढत चालला होता. सरकारचे गुप्तहेर पसरलेलेच. तेही परिस्थितीचा अंदाज घेण्यात व्यग्र ! गुप्त पोलीसांची लोकांना भीती होती.पण गांधींजीचे सर्वांना दिलासा देणारे वागणे. अधिकारी ते सहकारी यांचे गांधी बरोबर आदराने वागणे इ. पाहून लोक निर्भयपणे आपल्या जबान्या नोंदवू लागले.  कव्हरेज मिळविण्याचा पेपरवाले प्रयत्न करीत होते. गांधी मात्र त्यांना आसपास फिरु देत नव्हते. उगाच मीडायात प्रपोगोंडा नको. त्यामुळे जमिनदार अधिक चिडतील. आणि काही...

चंपारण्य- ४

चंपारण्य ४ 🌸🌿🍁☘🌱🌸 चंपारण्यातील कोणीही गांधींना  पूर्ण ओळखीत नव्हते. शेतकरी अशिक्षीत. कायदा म्हणजे काय ? त्याला विरोध कसा करायचा? तुरुंग म्हणजे काय ? काहीही ज्ञात नव्हते दुनियेची त्यांना खबर नव्हती. या प्रदेशात ज्ञानाचे, माहितीचे किरण पोहचलेच नव्हते. गांधींजींच्या व त्यांच्या विविध भागातून आलेल्या सहकारी यांचे प्रयत्नातून  नवी पहाट या भागाने  पाहिली ! गांधींवरचा खटला चालू झाला.सरकारी वकील, मॅजिस्टेट इत्यादींना काय करावे कळेना. ते दडपणाखाली गेले. सुनावणी पुढे ढकलावी असे सरकारी वकील मांडू लागले. गांधीजी मध्ये पडले - " तारीख पुढे ढकलण्याची गरज नाही. चंपारण्य सोडून जायची नोटीस मी मोडली. हा गुन्हा मी केला आहे हे मी कबूल करतो. " त्यांना कोर्टाला निवेदन दिले. त्याचा सारांश असा होता. " हुकूम मोडून मी ही जोखीम  का पत्करतोय? त्याशिवाय मला लोकांपर्यंत जाता येणार नाही. लोकांचे म्हणणे कळणार नाही. त्याचा सम्रग अभ्यास होणार नाही. प्रश्नाचा अभ्यास करून ते मला सरकारपुढे मांडता येईल. सरकार, मळेवाले, शेतकरी यांना यातून साहयच होईल. " " तुम्ही माझी शिक्षा कमी क...

चंपारण्य ३

*चंपारण्य - ३* 🌸☘🍀🍁🌿🌹🌸 कमीशनर साहेबांनी धमकावूनही म गांधींनी आपले काम चालूच ठेवले.गावागावातील शेतकऱ्यांच्या भेटी ,त्यांच्याशी चर्चा इ. मोतीहारीपासून जवळच्या एका शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. म गांधीं त्यांना भेटावयास चाललेले.मध्येच पोलीस सुपरिटेंडची नोटीस .. ' चंपारण्य सोडून जा. ' *गांधींनी जबाब लिहून दिला _ " *मी चंपारण्य सोडून जाण्यास तयार नाही.मला माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे.* चंपारण्य सोडण्याचा हुकूम मोडला म्हणून दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर रहावे असे समन्स मिळाले. गांधींनी रातोरात नियोजीत कामे केली.जागून पत्रे लिहली. नियोजनाच्या सूचना व्रजकिशोर बाबूंना दिल्या. समन्सची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. गांधीं जिथे-जिथे जात लोकांची गर्दी तिकडे जात होती. गांधींनी नोटीशीचा प्रतिकार न त्या स्वीकारल्या. गांधींचे सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरचे वागणे नम्रपणाचे होते,सौजन्याचे होते. गांधी म्हणतात *मला सरकारला,कायदयाला विरोध करावयाचा नव्हता तर त्यांचे हुकमाचा सविनय भंगच करावयाचा होता.* *सरकारी कर्मचारी गांधींच्या एकूण वर्तनाने निर्भय झाले.पण त्यांचबरोबर त्यांनी हे ...

चंपारण्य २

*चंपारण्य २* 🌸🌿🍁🍀☘🌱🌸 गांधींनी चर्चेदरम्यान सांगीतले इतर कामामूळे या कामासाठी माझेकडे कमी वेळ आहे. होईल ती मदत करण्याचा वज्रकिशोरबाबूंनी शब्द दिला. गांधींनी पुढील दिशेसंबंधी बोलताना काही गोष्टी आगावू सूचीत केल्या '' "या कामी तुरुंगात ही जावे लागेल कदाचित ! पण ते नाही जमले तरी इतर मदत तुम्हांस करावी लागेल. कागदपत्रांचा सारांश सांगणे, भाषांतर करण्यासारखी कामे करणे मी अपेक्षीतो. " व्रजकिशोरांनी गांधींना अनेक शंका विचारल्या. त्याचे निरसन झालेवर ते म्हणाले -" आम्ही तुम्ही सांगाल ते काम करून दयायला तयार आहोत. पण तुरुंगात जाणे नवीन आहे.... गांधींनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकलेच पण निळीच्या मालकांचे म्हणणे ऐकले आणि कमिशनबरोबर पत्रव्यवहारही केला. मळेवाल्यांचे त्यांच्या चिटणीसाचे म्हणजे - *गांधी तुम्ही परकीय आहात ,यात पडू नये !* गांधी नम्रपणे,निर्भयपणे म्हणाले *मी स्वतःला परके समजत नाही. शेतकऱ्यांची इच्छा असेल तर त्यांच्या स्थितीची चौकशी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.* गांधी कमिशनरला भेटले तर ते गांधींनाच धमकावू लागले. 'आता आणखी यात पुढे लक्ष घालू नका मा...

चंपारण्य १

चंपारण्य 🌸🍃🍂☘🍀🌸 लखनौ येथे काँग्रेस सभेस गांधी आलेले. शुक्ल नावाचा एक शेतकरी तेथे गांधींना भेटावयास आला. त्याने तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा सांगीतल्या  "तीनकठिया " पद्धत - जमिनीच्या तीन विसांश भाग जमिनीच्या मूळ मालकासाठी निळीचीच लागवड करावी ,अशी सक्ती होती. *गांधींनी प्रत्यक्ष चंपारण्यात यावे, प्रश्न पहावेत आणि सोडविण्यासाठी मदत करावी* असा घोषा त्याने सदैव लावलेला.   गांधींनी प्रत्यक्ष ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष प्रश्न समजून घेतला. या काळात त्यांचा राजेंद्र बाबू व आचार्य कृपलानी यांच्याशीं संबंध आला     *कृपलानींनी बिहार भागातील स्थितीची जाणीव करून दिली. गांधींचे काम किती कठीण आहे. हे पण सांगीतले* या दरम्यान व्रजकिशोर बाबू व मौलाना ह्क्क यांचेबरोबरही गांधींचा संबंध आला. , लोकांना सरकारची भीती होती.. राजेंद्रबाबू , व्रजकिशोर बाबू कायदयाची लढाई लढत होते. सर्व केसेसचा अभ्यास करून गांधींचे मत असे बनले की *खटले चालवून लाभ होणार नाही. रयत ऐवढी भयग्रस्त व चिरडलेली आहे की केवळ खटल्याने काय होणार ?* *लोकांना निर्भय बनविणे* हाच सर्वोत्तम इलाज - इति गांधी . ...

आश्नमाची स्थापना

आश्रमाची स्थापना 🌸🌿🍁🍀☘🌸 म गांधींच्या आयुष्यात साबरमती, वर्धा वा आफ्रिकेतील टॉलस्टॉय फार्मचे आपले महत्व आहे. भारतात आल्यानंतर आपला आश्रम स्थापन्याचा त्यांचा मनोदय होता. त्यांचे या इच्छेस अनेकांनी दुजोरा दिला. स्वामी श्रद्धानंदजींनी मागणी केली गांधींनी हरद्वारमध्ये आश्रम स्थापन करावा. गुजरातचे स्नेही म्हणत आपण गुजरात मध्ये यावे,राजकोटला रहावे. तर कलक्त्त्याच्या अनेकांना वाटे गांधींनी वैदयनाथधाममध्ये यावे. अहमदाबाद गांधींचे दृष्टीने ठीक होते. अनेक मित्रांनी तशी गळ घातलेली. त्यांनी आश्रमाचा खर्च उचलण्याचे ठरविले होते. अहमदाबाद अजुन दोन दृष्टीने योग्य होते ,एकतर अहमदाबाद हातमागांचे मोठे केंद्र होते त्यामुळे चरखा ,सूतकताई साठी ते पूरक होते. व गुजराथमधील परिचीत स्नेही व्यापारी यांचेकडून आर्थिक मदतीची अधिक शक्यता होती.. सर्व बाजूंचा विचार होऊन अहमदाबाद पक्के झाले. आश्रमाचे नावासंबंधी चर्चा झाली. सेवाश्रम, तपोवन इ नावाचा उहापोह होऊन शेवटी *सत्याग्रहाश्रम* असे नाव ठरले. सत्याचा शोध घेणे ,त्यासाठी कार्य करणे हे यातून ध्वनीत होत होते. आणि द आफ्रिकेतील कार्याला उजाळा व त्याची भा...

प्रजेच्या दुःखाशी नाते

प्रजेच्या दुःखाशी नाते 🌸☘🍀🍁🌿🌸 १९१६ ची ही गोष्ट आहे. बनारसची.पं मदनमोहन मालवीय यांनी म गांधींना निमंत्रण दिले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमासाठी. गांधीजीनी निमंत्रण स्वीकारले. काठेवाडी फेटा,अंगावर उपरणे,लांब अंगरखा अशा पोषाखात गांधीजी गेले. कार्यक्रमाला मोठे मोठे लोक आले होते. राजे - रजवाडे उपस्थित होते. राजा - महाराजांचा डामडौल होता,उंची वस्त्रे, मौल्यवान अलंकार यासह राजे नटून थटून आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अॅनी बेझंट या होत्या. गांधींजीना बोलण्याची विनंती करण्यात आली. गांधीनी भाषण सुरू केले. भाषण हिंदीतून होते. भारतातील सर्वसामान्यांची, संस्थानिकांचे प्रजेचे दुःख मांडताना महात्मा म्हणाले - *"संस्थानातील प्रजा दुःखीकष्टी आहे.प्रजा अशिक्षीत आहे अज्ञानी आहे. द्रारिद्रयात आहे. त्यावेळी हे संस्थानिक अलंकाराने मढवलेले.मला हे पाहवत नाही.त्यांना असे वागायचा काय अधिकार? संस्थानची संपत्ती ही प्रजेची ठेव आहे. प्रजेच्या विकासासाठी ही वापरायला हवी.* भाषण सुरु होते. व्यासपीठांवर राजे-रजवाडयांच्यात चुळबुळ सुरू होती. अध्यक्ष बेझंट "आता पुरे ...

कुंभमेळा

कुंभमेळा 🌸🌿🍁🍀☘🌸 सन १९१५. हरद्वारचा कुंभमेळा. गांधींना महात्मा मुनशीरामजींच्या दर्शनाला जायचे होते. कुंभमेळ्यास गोखल्यांच्या सेवकसमाजाची एक तुकडी मदतीस होती. या तुकडीबरोबर एक मदतनीस तुकडी म गांधींनीही सोबत आणावी,असे ठरले होते. मगनलाल गांधी तुकडी घेऊन हरद्वारला जाऊन मिळाले. कुंभात गांधीं अनेक लोक भेटावयास येत. अनेक यात्रेंकरुबरोबर गांधी धर्मविषयक चर्चा करीत. लोकांची सदैव गर्दी म गांधींकडे राही की त्यांना फुरसत मिळत नसे. द आफ्रिकेतील कामामुळे गांधींना जी प्रसिद्धी मिळाली, त्यामुळेच ही गर्दी ! कुंभमेळ्यात गांधींना धर्मातील अनेक बाबी अनायस्या अभ्यासायला मिळाल्या. कुंभातील काही अनुभवाअंती गांधींनी एखादे कडक व्रत घ्यावयाचे ठरविले. *आहाराच्या वस्तूंची संख्या मर्यादीत ठेवणे आणि अंधार पडण्यापूर्वी जेवण आटोपणे .असे दोन मुद्दे गांधींनी ठरविले* गांधींनी हे व्रत कसोसीने पाळले. या व्रतांमुळे अनेक आजारापासून आपण वाचलो अशी म गांधींची समजूत होती. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४१४०,  🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸...

एका प्रश्नाचा निपटारा

एका प्रश्नाचा निपटारा 🌸🌿🍁🍀☘🌸 गांधी पुण्याला पोहचले.ना गोखले यांची उत्तरक्रिया वगैरे आटोपली. पुढचा मार्ग ठरविण्यासाठी सभा भरली. गांधींना सोसायटीत घ्यावे का न घ्यावे ? या प्रश्नांवर चर्चा झाली. गोखले असेपर्यंत गांधी सोसायटीत असल्याप्रमाणेच होते.  गोखल्यांचे इच्छेप्रमाणे  गांधींनी सोसायटीत दाखल होणेसाठी प्रयत्न चालविले. काही गांधींना सभासद करणेस उत्सुक तर काही विरुद्ध ! गांधीबद्दल दोन्ही गटांना प्रेम.पण काहींना सोसायटीचे नियम प्रेम व नियमनिष्ठा ! चर्चेअंती अनेक बाबींवर गांधी व सभासद दोन ध्रुवांवर होते ... पुष्कळ चर्चेअंती प्रश्न मिटला नाही.निर्णय पुढील सभेत घ्यायचे ठरले. गांधी घरी जाताना विचारांच्या भोवऱ्यात ! विचारांती गांधींनी पत्र लिहले. *माझे दाखल प्रश्नांवर सभा भरवू नका* सभासदांत मतभेद असता आपण दाखल होण्याचा आग्रह अनुचित आहे. असे गांधींना मनोमन वाटले. उगाच आपल्यासाठी गोखलेंच्या सोसायटीत मतभेद नकोत. """ *गांधींचा हा निश्चय मतभेद वाल्यांना आवडला* गांधींचा व सोसायटीचा स्नेह ही राहीला. मतभेदाची जाणीव होती पण त्याचे कटुतेत रूपांतर झाले नाही. म गां...

सर्व मनुष्य एक आम्ही

सर्व मनुष्य एक आम्ही 🌸☘🍀🍁🌿🌹🌸 मनुष्यमात्रातील भेदाची भावना ही अनेक समस्यांचे मूळ आहे. संत परंपरेने आणि गांधी - आंबेडकर सारख्या थोर पुरुषांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गुजरातमध्ये आश्रम स्थापताना गांधी म्हणाले " एखादा लायक अंत्यज बंधू  भेटला आणि  जर त्याने  आश्रमात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली तर मी त्यास आश्रमात नक्की घेईन. काही दिवसांनी भाई अमृतलाल ठक्कर यांचा निरोप - "एक गरीब व प्रामाणिक अत्यंज कुटुंब आश्नमात येऊ इच्छिते. तुम्ही प्रवेश दयाल ? " "ते कुटूूंब आश्नमाचे सर्व नियम पाळेल का ? "एवढी विचारणा करुन गांधींनी त्यांना आश्रमात सामील करून घेतले. गांधींना अभिप्रेत अंतज्य एवढया लवकर येतील अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. ही प्रक्रिया त्वरीत घडल्याने , गांधींच्या मित्र - अनुयायांत एकच खळबळ उडाली. आश्रमासाठीची  विहीर शेजारील बंगल्याचा भाग होती. .. आता त्याचे पाणी विटाळनार होते. त्या पाण्याचे शिंतोडे मोटवाल्याच्या अंगावर उडले तर त्याचेसाठी हे पाप होते. त्याची शिवागीळ सुरु, त्या कुंटूंबाला ते त्रास देऊ लागले. ...

गोखले यांनी दाखविलेला मार्ग

गोखले यांनी दाखविलेला मार्ग 🌸🍀🌿🌺☘🍂🍃🌸 गांधीजी शांतीनिकेतन रमून गेले होते. काही काळ शांतीनिकेतन राहण्याचे गांधींनी ठराविले होते. पण नियतीला वेगळेच मंजूर होते. पुण्याहून तार आली. ना गोखले गेल्याची ती बातमी. शांतीनिकेतनचा नूरच बदलला. सर्व दुःखसागरात बुडाले. जो- तो येई गांधीजवळ हळहळ व्यक्त करीत. मंदिरामध्ये शोकसभा आयोजीत केली होती. ना गोखल्यांच्या किती आठवणी सांगीतल्या गांधींनी ! सर्व सभा स्तब्ध ! गांधींजी पुण्यास जाण्यास निघाले मन मात्र भूतकाळात रमत होते. ना गोखल्यांची किती आठवणी ! त्यांचा सहवास, आफ्रिकेतील चळवळीतील त्यांची मध्यस्ती ! गोखल्यांचे म्हणणे त्यांना आठवत होते. *एक वर्षपर्यंत तुम्ही भारत अभ्यासा, भारतभर प्रवास करा. कोणत्याही सार्वजनिक प्रश्नांत लगेच हस्तक्षेप करू नका. एखादे प्रश्नांसंबंधी आपली मते निश्चीत करु नका .आपली मते सार्वजनिक करु नका..* म गांधीनीही तसे  वचन दिले होते. काही बोलण्यासारखं असेल तरच गांधी बोलणार होते. आणि किमान काही दिवस गांधी सत्याग्रह करणार नव्हते. गोखले गांधींना म्हणाले होते, ' एक वर्षभर तुम्ही भारतात राहून अनुभव घेतलात म्हणजे तुमचे...

शांतीनिकेतनातील प्रयोग

शांतीनिकेतनमधील एक प्रयोग 🌸🍃🍂☘🌿🌺 🌸 शांतीनिकेतनमध्ये गांधी एकरूप होऊन गेले. गांधीजी विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारीत. त्यांना गोष्टीही सांगत. त्यांचेबरोबर क्रीडा शिक्षण व मेहनतीच्या कामासंबंधीही चर्चा करीत.  गांधींनी एक सूचना मांडली ' पगारी आचाऱ्याऐवजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वयंपाक केला तर ?... विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे पाठ मिळतील.. गरजेवेळी ते स्वतःचा स्वयंपाक करतील. उत्तम आरोग्याकडे लक्ष ठेवतील. बहुतेकांना प्रयोग आवडला. तो प्रयोग  बहुतांशी शिक्षकांना आवडला. गांधींनी योजना गुरुदेवांपुढे मांडली. गुरुदेव म्हणाले , "शिक्षकांची संमती असेल तर हा प्रयोग आपल्याला तर अवश्य आवडेल. " विद्यार्थ्यांना त्यांनी सांगीतले , " यांत स्वराज्याची गुरुकिल्ली आहे. " छोटया गोष्टीमागचा मोठा विचार हा म गांधींच्या व्यक्तीमत्वाचा  सातत्याने आढळणारा एक गुण . गांधींच्या प्रयोगाला त्यांचे इतर साथीदारांनी साथ दिली. पियर्सननी कष्ट घेतले. नगीनबाबूनीं शास्त्रशुद्ध पद्धतीने भोजनगृह सफाईचे काम स्वीकारले. एक भाजीचिरणारे मंडळ होते तर एक धान्य निवडणारे ! पण मेहनतीचे ...

शांतीनिकेतन

गुरुदेवांच्या शांतीनिकेतनमध्ये 🌸☘🍀🍁🌿🌸 ना गोखले यांनी म गांधींना सूचविले होते. ' आपण हिंदुस्थान फिरा.अभ्यासा. हिंदूस्थानला  जाणा. मग पुढे काय करायचे ते ठरवा. ' गांधींनी ना गोखल्यांचा निरोप घेतला व ते हिंदुस्थानचा अभ्यास करावयास निघाले. गांधींनी प्रथमतः  शांतीनिकेतनला जायचे ठरविले होते, गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना भेटायचे होते. गांधीजी शांतिनिकेतमध्ये पोहचले. सर्व शिक्षक विद्यार्थी त्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. तेथील साधेपणा,निसर्गप्रेम, शिस्त, कलाप्रेम इ पाहून गांधी रमून गेले. म गांधी  व गांधींजींची मंडळी यांची राहण्याची स्वतंत्र सोय केली होती. मगनलाल गांधी सर्वांची सोय तत्परतेने करीत होते. फिनिक्स आश्नमातील सर्व नियमांची सर्वांकडून ते अंमलबजावणी करुन घेत. गांधी सर्वांत मिसळून गेले. विद्यार्थ्यांना एकत्र जमवून गप्पा मारु लागले. गोष्टी सांगू लागले. विद्यार्थी सकाळ पासून काय करतात. मेहनत किती घेतात, त्यांचा आहार कसा, शिक्षण कसे असते. गांधींनी हे सारे पाहिले अभ्यासले ! . म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६१...

सरकारची सजगता

सरकारची सजगता  🌸🌿☘🍀🍂🍃🌺 विरमगाव प्रकरणी सत्याग्रहाचा श्री गणेशा यशस्वी झाला. विरमगावाच्या प्रकरणात गांधींनी लक्ष घातले व सरकारशी संवाद चालू केला. त्यावेळी मुंबईचे सेक्रेटरीने गांधींशी संपर्क केला. गांधींचे बगसरामध्ये जे भाषण केले ,त्याची प्रत सरकारकडे आहे असे सांगीतले .आणि त्या भाषणात सत्याग्रहाचा जो उल्लेख झाला त्या संबंधी त्यांनी नापसंती नमूद केली. सेक्रेटरी - " आपला सत्याग्रहाचा उल्लेख म्हणजे सरकारला धमकी rनव्हे काय ? .. " गांधी - ही धमकी नव्हे, हे लोकांचे प्रबोधन आहे. लोकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी योग्य मार्ग दाखवणे हा उद्देश आहे आणि माझ्यासारख्याचे कर्तव्य आहे. ज्या राष्ट्राला उदयाला  स्वातंत्र्य हवे आहे. त्या राष्ट्रापाशी स्वतःच्या संरक्षणाचा अंतिम इलाज असणे आवश्यक आहे. सामान्यपणे असले इलाज हिंसक असतात. सत्याग्रह हे शुद्ध अहिंसक शस्त्र आहे. त्याचा उपयोग व त्याची मर्यादा दाखवून देणे मी स्वतःचा धर्म समजतो. इंग्रज सरकार सर्वशक्तिमान आहे. याबद्दल मला शंका नाही.पण सत्याग्रह हे सर्वश्रेष्ठ शस्त्र आहे. या विषयीही मला शंका नाही." सेक्रेटरीने '' ...

सत्याग्रहाचे मंगला चरण

सत्याग्रहाचे मंगलाचरण 🌸🌺🌿☘🍂🍀🌸 शांतीनिकेतनला जाण्यापूर्वीं प्रवासात गांधी रेल्वे प्रवासात विरमगावला पोहोचले. तेथे जकात तपासणीच्या अनुषंघाने गांधींना खूप त्रास झाला. गांधींजीनी मुद्दाम तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास केला.अंगावर कपडे सामान्य माणसाचे होते. विरमगाव येथे प्लेगमुळे ३ऱ्या वर्गाची तपासणी होई. गांधींना थोडा ताप होता. अंमलदाराने त्यांना राजकोटला डॉक्टरांना भेटावयास सांगीतले. त्या दरम्यान गांधींना भेटलेल्या मोतीलाल यांनी विरमगावची जकाततपासणी व त्यामुळे होणारा त्रास विशद केला. हुकूमाप्रमाणे गांधी राजकोटला डॉक्टरांकडे. गांधींना पाहून डॉक्टर खजील. पुढे त्याने गांधींच्या मुक्कामी तपासणीची सोय केली. ३ऱ्या वर्गाला ही तपासणी आवश्यक होती. अंमलदार या वर्गाला पशूवत वागवी. बोलणे म्हणजे खेकाटणेच ! ३ऱ्या वर्गाचा उतारु जणू त्यांचा नोकर ! त्याला बोलावे, मारावे, लुटावे. तिकीट देताना रखडवावे, मुद्याम विलंब करून गाडी चुकवावी. हे स्वतः गांधींनी पाहिले. काठेवाडात जकाततपासणीपायी होणारे त्रास इतरांनी गांधींचे कानावर घातले.अनेक तक्रारी. त्यावेळी लॉर्ड विलिंग्डन यांनी गांधींना भ...

म गांधी व संत तुकाराम

गोखल्यांचे प्रेम

गोखल्यांचे प्रेम 🌸🌿🍁🍀☘🌸 ना गोखल्यांच्या आमंत्रणावरून गांधीजी पुण्यास गेले. गोखले व त्यांच्या सोसायटी सदस्यांनी गांधींचे प्रेमभरे स्वागत केले. गांधींनी सर्वाशी अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. मन मोकळेपणाने आपले मुद्दे मांडले. दुसऱ्यांचे ऐकले. गोखले यांची इच्छा होती की गांधींनी सोसायटीमध्ये सामील होऊन कार्य करावे. काही सभासदांची मात्र कार्यपद्धतीवरून गांधींशी मतभेद होते. गांधींचा आपल्या ध्येयाशी चिकटून राहण्याचा गुण गोखले यांना ठाऊक होता. त्याचप्रमाणे गांधी दुसऱ्यांच्या गुणांची कदर करतात. दुसऱ्यांची पूज्य स्थानातील मर्मस्थाने अभ्यासतात. त्यातील चांगले अंगीकारतात हे ना गोखलेना ज्ञात होते. पण सभासदांना हे ज्ञात नव्हते . ते गांधींना समावून घ्यायला तयार होईनात. गांधींनी स्वतःच्या मनातील कल्पना गोखल्यांकडे विशद केली. *मी एक आश्रम स्थापून फिनिक्समधील सहवासी मंडळीला घेऊन राहायचे ठरविले आहे* गोखले - "तुम्ही अवश्य तसे करा. या निर्णयात आम्ही तुमचे पाठी आहोत सभासदांबरोबरच्या चर्चेचा निकाल कसाही लागो, आश्रमासाठी लागणारे द्रव्य तुम्ही माझ्यापासून घ्यायचे. मी तो माझा आश्रम ...

भारतात पुन्हा पहिली पाऊले

भारतात पहिली पाऊले 🌸🌿🍁🍀☘🌸 स्वदेशी आलेवर गांधींजींचा मुंबई मध्ये सन्मान झाला. आफ्रिकेमध्ये गांधींजीनी जो लढा दिला, त्याचा सन्मानाप्रित्यर्थ सभा भरली होती. गांधींजींच्या कामाचा सन्मान केला गेला. तशीच सन्मान सभा गुजराथी लोकांनीही आयोजीत केली होती. उत्तमलाल त्रिवेदी आयोजक होते. मि.जिना गुजराथी म्हणून सभेस हजर होते. त्यांनी इंग्रजीत भाषण केले. इतर  बहुतेक सर्वांनीही इंग्रजीत भाषण केली. ... गांधींवर बोलण्याची वेळ आली.... तेव्हा त्यांनी गुजराथीतच उत्तर दिले. गुजरात व हिंदुस्थान बद्दल आपुलकी आपले शब्दात व्यक्त केली. आणि गुजराथी लोकांच्या सभेत इंग्रजीचा उपयोग करण्यास आपला विरोध नम्रपणे व्यक्त केला. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

नेताजी - कस्तुरबा गांधी बाबत काय म्हणाले ?

त्या त्यागावरती उभी आज स्वातंत्र्य मंदिरे 🌸🍁🍀☘🌿🌸 कस्तुरबा गांधी आता आपल्यात नाहीत. 74 वर्षांच्या असताना इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुण्याच्या कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. कस्तुरबा यांच्या मृत्यूमुळे देशातल्या अडतीस कोटी ऐंशी लाख आणि परदेशात राहणाऱ्या देशवासीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांचा मृत्यू दु:खद परिस्थितीत झाला असला तरी गुलामगिरीत असलेल्या देशात असा मृत्यू गौरवशाली आणि सन्मानजनक आहे. *हे भारताचं वैयक्तिक नुकसान आहे*. दीड वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधीना पुण्याच्या कारागृहात डांबलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा दुसरा मृत्यू आहे. आधी महादेव देसाईंचा मृत्यू झाला आहे. देसाईंनी गांधींबरोबर आयुष्यभर काम केलं. ते गांधींचे खासगी सचिव होते. आता या कारावासादरम्यान हा दुसरा धक्का गांधींना सहन करावा लागला आहे. कस्तुरबा एक हुतात्मा. कस्तुरबा म्हणजे संपूर्ण देशाला आईसारख्या होत्या. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीणसमयी मी गांधीजींचं सांत्वन करतो. कस्तुरबांबरोबर माझा अनेकदा संपर्क व्हायचा, याबद्दल मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो. कस्तु...

सर्वसमावेशक नेतृत्व

*सर्वसमावेशक नेतृत्व* 🌸🌿☘🍁🍀 भारतीय स्वातंत्र्यसंग्रामास गांधींजींचे जे नेतृत्व लाभले. ते भारताच्या एकात्मतेच्या पथ्यावर पडले आहे. अनेक भाषा, विविध भूषा, नाना पंथ. झेंडे वेगवेगळे अजिंडे भिन्न - भिन्न... ! या साऱ्यांना त्यांच्या क्षमता आणि उणीवासह एका सूत्रात बांधण्याचे काम म गांधींनी केला .तो निश्चीत प्रवाह त्यांनी स्वातंत्र्ययुद्धाकडे वळविला. म गांधींची सत्यप्रियता आणि सर्वसमावेशकता यांचा अगदी वैचारिक विरोधकांनी ही सन्मान केला आहे. म गांधीसह काम करणाऱ्या आणि त्यांचे कार्यपद्वधतीला जवळून पाहणाऱ्या , अभ्यासणाऱ्या नेताजींचा गांधींच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर निःसंदेह विश्वास होता. *१९ फेब्रुवारी १९३८ ची संध्याकाळ. (काँग्रेसच्या एक्कावनाव्या अधिवेशनासाठी ) हरिपुऱ्याला जत्रेसारखी गर्दी लोटली होती. टाळ्यांच्या कडकडाटात सुभाषचंद्र बोस (काँग्रेस अध्यक्ष) बोलायला उभे राहिले.* *व्यासपीठावर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल बसले होते.........* *सुभाषबाबूंनी आपल्या भाषणात समाजवादावर भर दिला आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला आपला पाठींबा राहील असे जाहीर केले. सु...