Posts

Showing posts from May, 2019

रायचंदभाई

रायचंदभाई 🌿☘🌸🍀🍁 ( प्रभाव आणि जीवन मार्गावर विचारांचे महत्व ) रायचंद भाई वय २५ वर्ष. चारित्र्यवान, ज्ञानी. पहिल्याच भेटीत त्यांचा गांधींवर  परिणाम पडला. डॉ मेहतांनी  गांधींना त्यांची परीक्षा घ्य्यायला सांगितले. गांधींनी काही १ाब्द (प्रयत्नपूर्वक, आपले सर्व भाषाज्ञान खर्ची घालून) सांगीतले. गांधींनी ज्या क्रमाने शब्द सांगीतले ,त्याच क्रमाने  रायचंद्र भाईंनी पून्हा शब्द सांगीतले.या त्यांचे क्षमतेचा गांधींना हेवा वाटला. भाईंचे शास्त्रज्ञान,शुद्ध चारित्र्य आणि आत्मदर्शन करण्यांची त्यांची तीव्र उत्कंठा गांधींना भावे. भाईंचा हजारोंचा रुपयांचा मोठा व्यापार. पक्के व्यापारी  हिऱ्या- मोत्यांची पारख. व्यापारातील ज्ञान तल्लख. इतरजण त्यांचा सल्ला घेत. पण त्यांचा मुख्य पुरुषार्थ आत्मदर्शन,देवाची शिकवण हाच होता. त्यांचे पेढीवर एखादे धार्मिक पुस्तक असायचे. वेळ मिळेल तेंव्हा ते धार्मिक वाचन,चर्चा करीत. टिपणं काढीत. या टिपणावरून त्यांनी अनेक लेख लिहले.पुढे प्रसिद्ध केले. गांधी त्यावेळी बॅरिस्टर असून बेरोजगार होते. ते कित्येक वेळा भाईंबरोबर धार्मिक चर्चा करीत. ...

अवधान

अवधान 🍀🍁🌸☘🌿 महात्माजी एकदा महाबळेश्र्वरला होते.सायंकाळी रोज फिरायला जाणे हा गांधींचा शिरस्ता. त्या दिवशी ते फिरायला निघाले. जवळच्या खेडयातून आलेला एक १०- १२ वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला हात जोडून उभा होता. कमरेला एक मळकट लंगोटी फक्त होती. खांदयावर एक मळलेले पटकूर होते. आंघोळही बहुधा केलेली नसावी. गांधींजी बरोबरच्या माणसास म्हणाले, ' त्याच्याजवळून ते अंगावरचं फडकं मागून घ्या .म्हणावं उद्या आणून देऊ ' मुलाला फडके मागण्यात आलं पण तो काही फडके देईना. गांधी त्या मुलास म्हणाले. -' उदया इथेच आलास तर खाऊ मिळेल. ' .असे त्याला सांगायला सांगून गांधींजी पुढे निघाले. दुसऱ्या दिवशी फिरायला निघायची वेळ झाली. गांधींजीनी प्यारेलालजींना थोडे खादीचे कापड, खाऊ व साबण बार बरोबर घ्यायला सांगितले. तो मुलगा तेथे आला होता. गांधींनी त्याला जवळ घेतले. त्याला कुरवाळले. त्याला खाऊ दिला आणि साबणही ! गांधी त्या मुलास म्हणाले - ' अंग व कपडे स्वच्छ धुऊन उदया ये. आणखी खाऊ मिळेल . ' आणि मग पुढे रोज तो मुलगा स्वच्छ अंघोळ करून येई. स्वच्छ कपडे घाली. हात जोडून तो मुलगा गा...

हिंदुस्थानचा राजा

हिंदूस्थानचा राजा🍀🌸☘🍁🌿 स्वातंत्र्यलढयात गांधीजीना अनेकवेळा तुरुंगवास झाले. गांधीजी त्यावेळी येरवड्यास होते. कोठून तरी परदेशातून गांधींना पत्र आले होते. त्या पत्रात एक निरागसता होती, निर्मळपणा होता. त्या पत्राच्या लिफाफ्यावर पत्ता लिहला होता... To THE KING OF INDIA DELHI, INDIA असा प्रथमदर्शनी विचित्र पत्ता. आतील मजकूर वाचला गेला. मजकूराहून कळाले ते पत्र म गांधींजींना उद्देशून लिहले आहे. अखेर ते पत्र येरवड्यास आले. लाखो भारतीयांचा आराध्य , हिंदी जनतेचा राजा तुरूंगात होता. त्या अजान बालकास म गांधी म्हणजे भारताचे राजे वाटले. जनतेसाठी अंगावर एक धोतर ,उपरणे असलेला हा राजा. हातातील काठी म्हणजे त्यांचा राजदंड ! राज्य कुठले त्यांचे ?.. भारतीयांच्याच नव्हें जगातील लोकांच्या हृदयात त्यांचे चिरंतन स्थान आहे. ( पुढे दिल्लीच्या राजघाटावर प्रदर्शनात या पत्राचा लिफाफा मांडला होता. ) (आधारित ) गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

संयम आणि प्रेम

संयम आणि प्रेम 🍁☘🍀🍀🌸 ....आपला भाऊ बॅरिस्टर होऊन आला याचा गांधींच्या बंधूना अभिमान होता. आणि मोठी आशाही ! त्यांचे भरवश्यावर त्यांनी स्वप्नांचे इमले रचले होते. पैश्यांचे, किर्तीचे आणि सामाजिक स्थानाचे ! गांधीसाठी त्यांचे मन दयाळू होते. पण हा बॅरिस्टर खूप पैसे कमविणार हेच त्यांनी ठरवून टाकले होते. घरच्या खर्चाचे आराखडे बदलले होते. ज्ञाती बांधवात गांधी बॅरिस्टर झाले याचा परिणाम झालाच होता. त्यांचेत दोन गट पडले, गांधींना जातीत घ्यायचे का नाही यावरून. एका गटाने गांधींना लगेच जातीत घेतले. पण एक गट जातीत न घेण्याबद्दल दृढ होता. जातीत घेणाऱ्या पक्षाचे समाधानासाठी  वडील बंधूनी गांधींना गोदावरी स्नान व ज्ञातीभोजन घातले. ज्या गटाने गांधींना वाळीत टाकले. गांधींनी त्यांना त्यांचे मार्गे जाऊ दिले.त्यात प्रवेश करण्याचा गांधींनी कधी प्रयत्नही केला नाही. जे गांधीकडे रागाने, तिरस्काराने पाहत ,गांधी त्यांच्यांशी प्रेमाने वागत, नम्रपणे वागत. ज्ञातींचा उपसर्ग आपल्या पाहूण्याना होऊ नये म्हणून गांधीनी अनेक काळजी घेतली. ते सासू - सारखे, बहिणी, जवळचे पाहुणे याकडे पाणीही पित नसत. पाहुणे ...

माता आणि मातृभूमीकडे

माता आणि मातृभूमीकडे 🌸🍀🌿☘🍁🀊 १० जून १८९१ रोजी गांधी बॅरिस्टर झाले. ११ तारखेस फी भरून गांधींनी हायकोर्टात आपले नाव नोंदवले. १२ जूनला गांधी ..हिंदूस्थानला परत येण्यासाठी निघाले. पदवी घेतली खरे. अभ्यास केला.पुस्तके वाचली. पण वकिली करता येईल का ? ही भीती गांधींजींच्या मनात होती. गांधी मुंबईला पोहोचले.वडील भाऊ बंदरावर आला होता. ते खंबीरपणे गांधीच्या मागे होते. जातपंचायतने गांधींना जातीबाहेर काढले तरी. गांधीजींचा सारा खर्च भावानेच उचलला होता. तर गांधींनी पैसा अत्यंत काटकसरीनी वापरला होता. गांधीच्या प्रवासात एडनपासून समुद्राला तुफान होते. मुंबईतही समुद्र खवळलेला होता. हे वादळ बाहय स्वरूपाचे होते. गांधींना आंतरिक वादळाची चाहूल लागली. ज्ञातीचे विचार येत होते. तो प्रश्न मोठा होता. .... आणि महत्वाची आईला भेटण्याची उत्कंठा लागली होती. आईला दिलेले वचन गांधीनी तंतोतंत पाळले होते. विषम परिस्थितीतही त्यांचा निश्चय ढळला नव्हता. किंवा दूरवर कोण आहे बघायला म्हणून मदय,मांसाच्या आगारात ते वाहून गेले नव्हते. वडिल स्वर्गीय..आईच मायेचा आसरा... माझे यश पाहून तिला किती आनंद होईल ? इतक्या दि...

बॅरीस्टर गांधी

बॅरिस्टर गांधी 🌿🍀🌸☘🌹 म गांधीजी बॅरिस्टर पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. खाणे - पिणे - खर्च यासंबंधी त्यांची झालेली ओढाताण त्यांनी आत्मकथेत व्यक्त केली आहे. कायदयाच्या या पदवीच्या अनुशंघाने गांधी म्हणतात - ' कायदयाचा अभ्यास सोपा होता. दोन परीक्षा होत्या. रोमन लॉ व इंग्लंडचा कायदा. दोन हप्त्यांनी दयावयाच्या या परीक्षांची पुस्तके ठरलेली होती.पण क्वचित कोणी वाचीत. रोमन लॉ साठी छोटी टिपणे लिहिलेली होती. ' गांधी मात्र  टिपणीच्या पुस्तकांच्या ऐवजी मूळ पुस्तके वाचून काढावे या मताचे होते. गांधींनी मूळ पुस्तके खरेदी केली. रोमन लॉ लॅटिनमधून वाचला. इंग्लडच्या कायद्याचे वाचन गांधींनी खूप मेहनत घेऊन केले. त्यासाठी त्यांना ब्रूमचे कॉमन लॉ चे पुस्तक उपयोगी पडले. गांधी म्हणतात 'कॉमन लॉ ' हे पुस्तक बरेच सुरस होते. पुढे गांधींना स्नेलच्या ' इक्विटी ' मध्ये गोडी वाटली. व्हाइट व ट्यूडर चे वाचन झाले. गांधींनी पुढे विलीयम्स् व एडवर्डसचे स्थावर मिळकतीवरील पुस्तक आणि गुडिपचे जंगम मिळकतीवरील पुस्तकाचे अध्ययन केले. गांधीजी बॅरिस्टर झाले. १o जून १८९१ त्य...

खरी उपासना

खरी उपासना 🌸🌿🍀🍁☘ गांधी म्हणतात - असली उपासना,असली प्रार्थना हा काही वाणीचा विकास नव्हें. प्रार्थना _ उपासनेचा उगम कंठ नव्हे, तर ह्रदय आहे. म्हणून जर आपण आपले ह्रदय शुद्ध राखले, तेथे असलेल्या तारा व्यवस्थित ठेवल्या तर त्यांतून जो सूर निघेल तो गगनाला भेदून जाईल. त्यासाठी जिभेची आवश्यकता नाही. ती स्वभावतःच अद्भूत वस्तू आहे. विकाररूपी मळाच्या क्षालनासाठी अंतःकरणापासून केलेली उपासना ही एक महौषधी आहे, याबद्दल मला शंकाच वाटत नाही.पंरतु तो प्रसाद मिळवायचा तर आपल्याकडे संपूर्ण नम्रता पाहिजे. गांधी एका ठिकाणी म्हणतात - धर्मशास्त्र आणि जगातील धर्म यांची साधारण माहिती तर मला झाली . पण मनुष्यमात्रास या पेक्षा वेगळं ज्ञान हवं.केवळ धार्मिक ज्ञान त्याचे जीवनासाठी, मनुष्याच्या बचावासाठी अपुरे आहे. संकटसमयी जी गोष्ट मनुष्यास साहय करते. तिचे त्याला त्यावेळी भान नसते, ज्ञान नसते. संकटावेळी तो कुणाचा धावा ही करतो. नास्तिक मनुष्य संकटातून बचावला तर तो म्हणतो, की मी यदृच्छेने बचावून गेलो. अशा वेळी आस्तिक म्हणतो ,की मला ईश्वराने बचावले. दैवी शक्ती माझे सोबत होत्या. धर्माच्या परिशीलनाने तो परिणाम...

विविध धर्म तत्वज्ञान आणि गांधी

*विविध धर्म तत्वज्ञान"आणि गांधी* 🍁☘🍀🌿🌸 इंग्लडला जाऊन गांधीना वर्षभर झाले असेल. लोकशाहीच्या उगम स्थानी गांधींना विविध विचार प्रवाह भेटले. विविध पंथाचे,विविध धर्मांचे लोक भेटले. त्यात दोन थिऑसॉफिस्ट मित्र होते. गांधींजी जवळ त्यांनी गीतेसंबंधी विषय काढला. चर्चेतून गांधींना हे समजले की ते *एडविन आर्नल्डनी गीतेचे केलेले भाषांतर* वाचीत होते. त्यांचेबरोबर गांधीं *गीता* वाचू लागले. त्यातील २रा अध्याय वाचताना त्यातील काही श्लोक गांधींचे मनात रुतून बसले. गांधी म्हणतात गीतेच्या श्लोंकाचें ध्वनी माझ्या कानात घुमत राहिले. गीता हा अमूल्य ग्रंथ आहे. अशी माझी समजूत झाली. हळूहळू समजूत दृढ होत गेली. *आज जीवनाचा एवढा प्रवास झालेवरही तत्वज्ञानाच्या बाबतीत मला गीता हा सर्वोत्तम ग्रंथ वाटतो.* ज्या वेळी मी आयुष्यात निराश झालो,त्यावेळी या ग्रंथाने मला अमूल्य मदत दिली आहे.  गीतेची बहुतेक इंग्रजी भाषांतरे गांधींनी वाचली. पण एडविन आर्नल्डचे भाषांतर त्यांना सर्वोत्तम वाटले. गांधी म्हणतात - 'मूळ ग्रंथातील भावार्थाला मुळीही बाधा आलेली नाही. ' गीता हा गांधींजींच्या वाचनातील नित ग्रंथ...

अन्न हेच औषध

अन्न हेच औषध 🌿🍀☘🌸🍁 *योग्य आहार हेच औषध आहे. अति सेवन विषासमान असते.* असे लेख मध्यंतरी वाचनात आले. गांधी सारख्या अखंड कार्यरत असलेल्या मानसाचा आहार कसा असेल ? ... मांसाहाराला पुरते सोडून गांधी शाकाहारी झाले. अन्न आहाराबाबत गांधी अधिकच सजग झाले. अन्नाहारावरील त्यांची श्रद्धा वाढत गेली.  सॉल्टच्या पुस्तकाने आहारविषयक गांधींची जिज्ञासा अधिक तीव्र झाली. गांधींना आहारविषयक पुस्तके मिळविण्याचा छंदच लागला. अनेक पुस्तकापैकी गांधींनी ' *हॉवर्ड विल्यम्स्च्या - आहारनिती* पुस्तकाचा चांगला अभ्यास केला.या पुस्तकात निरनिराळ्या उत्तम,ज्ञानी पुरुषांचे आहारांचे व आहारविषयक ज्ञानाचे वर्णन केले होते. *पायथागोरस ,येशू इ लोक केवळ अन्नाहारी होते असे सिद्ध करण्याचा त्यात प्रयत्न केलेला.*  *डॉ.मिसेस अॅना किंग्सफर्डचे - 'उत्तम आहार पद्धति '* हे पुस्तकही विविध विषयांवर प्रकाश टाकणारे होते. यात आणखी एक महत्वाचे म्हणजे *अॅलिन्सनच्या आरोग्य विषयक लेखा* चीही गांधीना मदत झाली. *औषधांऐवजी फक्त आहारातील फेरफारांनीच रोग्याला बरे करण्याच्या पद्धतीचे समर्थन केले होते*****/*गांधीजींनी डॉ अ...

अन्नाहार

अन्नाहार 🌸☘🍀🌿🍁 इंग्लंडमधील सहवासात गांधींना मुक्काम बदलावे लागे. मित्र प्रेमाने मांसाहाराची विनंती करीत. पण त्या आमिष आहारापुढे गांधींनी हार मानली नाही. खाण्याची पंचाईत रोखण्यासाठी गांधीजींनी शोध सुरु केला. त्यासाठी पायपीट. गांधींना निरामिष अर्थात शाकाहार देणारे भोजनगृह शोधायचे होते. शाकाहारी भोजन मिळेल ,अशी कुणकुण गांधींना लागली. मग शोध सुरु. रोज १०-१२ मैलाचे चालणे. भटकंतीत गांधी एकदा फेरिंग्डन स्ट्रीटमध्ये पोहचले व ' व्हेजिटेरियन रेस्टोराँ (शाकाहारी भोजनगृह ) नाव वाचले. अर्थात त्यांना आनंद झाला. ते आत जाणार एवढ्यात बाहेर ठेवलेली पुस्तके त्यांना दिसली. विक्रीची पुस्तके. *अन्ना हाराचे समर्थन हे पुस्तक त्यांनी पाहिले, लेखक - सॉल्ट. एक शिलींग किमत देऊन त्यांनी खरेदी केले.* .....आणि ते जेवायला बसले. गांधी लिहतात, ' इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांना प्रथमच पोटभर खायला मिळाले. भूक शमली जणू ! *गांधींनी सॉल्टचे पुस्तक मनापासून वाचले. उत्कृष्ट पुस्तक, उत्तम परिणाम. हे पुस्तक वाचल्यानंतर गांधींचा शाकाहारावरील विश्वास आणखी वाढला. त्यांनी स्वेच्छेने आणि विचारपूर्वक शाकाहाराच...

विलायत - एक प्रवास १

विलायत प्रवास ☘🍀🌿🍄🍁🌸 आई समोर गांधींनी प्रतिज्ञा केली होती . - ' मद्य ,मांस व परस्त्री यांना स्पर्श करणार नाही. '... विलायतेला गांधींचा बोटीने प्रवास. वरील प्रतिज्ञेप्रमाणे बोटीवरील मांसाहार त्यांनी टाळला. घरच्या शिदोरीवर त्यांची गुजराण ! एका इंग्रज प्रवाश्याला त्यांची दया आली,त्यांनी गांधी बरोबर चर्चा केली. मांस न खाण्याचा त्यांचा आग्रह ऐकून त्याला हसू फुटले. तो म्हणाला -'एकवेळ दारू पासून दूर राहता येईल.पण मांसाहार टाळता येणार नाही. .. पोर्ट सय्यद पर्यंत ठीक पण बिस्केच्या उपसागरापर्यंत तू विचार बदलशील !. . इंग्लडमध्ये एवढी थंडी कि मांसाहार आवश्यक ! बिस्के आले पण मांसाची जरूर पडली नाही गांधींना...त्या इंग्रज मित्राने पाठ थोपटली ! इंग्लंडच्या वास्तवात गांधींनी आपला शब्द कसोशीने पाळला. गांधी शद्ब पाळणारे होते... निश्चयी होते. गांधीचे जीवनप्रवासात अशी अनेक उदाहरणे सापडतील. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

अन्नाहार

अन्नाहार 🌸☘🍀🌿🍁 इंग्लंडमधील सहवासात गांधींना मुक्काम बदलावे लागे. मित्र प्रेमाने मांसाहाराची विनंती करीत. पण त्या आमिष आहारापुढे गांधींनी हार मानली नाही. खाण्याची पंचाईत रोखण्यासाठी गांधीजींनी शोध सुरु केला. त्यासाठी पायपीट. गांधींना निरामिष अर्थात शाकाहार देणारे भोजनगृह शोधायचे होते. शाकाहारी भोजन मिळेल ,अशी कुणकुण गांधींना लागली. मग शोध सुरु. रोज १०-१२ मैलाचे चालणे. भटकंतीत गांधी एकदा फेरिंग्डन स्ट्रीटमध्ये पोहचले व ' व्हेजिटेरियन रेस्टोराँ (शाकाहारी भोजनगृह ) नाव वाचले. अर्थात त्यांना आनंद झाला. ते आत जाणार एवढ्यात बाहेर ठेवलेली पुस्तके त्यांना दिसली. विक्रीची पुस्तके. *अन्ना हाराचे समर्थन हे पुस्तक त्यांनी पाहिले, लेखक - सॉल्ट. एक शिलींग किमत देऊन त्यांनी खरेदी केले.* .....आणि ते जेवायला बसले. गांधी लिहतात, ' इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांना प्रथमच पोटभर खायला मिळाले. भूक शमली जणू ! *गांधींनी सॉल्टचे पुस्तक मनापासून वाचले. उत्कृष्ट पुस्तक, उत्तम परिणाम. हे पुस्तक वाचल्यानंतर गांधींचा शाकाहारावरील विश्वास आणखी वाढला. त्यांनी स्वेच्छेने आणि विचारपूर्वक शाकाहाराच...

यज्ञ - गांधी अभिप्रेत

*MEANING OF _YAJNA_* _Yajna_ means an act directed to the welfare of others, done without desiring any return for it, whether of a temporal or spiritual nature. ‘Act’ here must be taken in its widest sense, and includes thought and word, as well as deed. ‘Others’ embraces not only humanity, but all life. - *M.K. Gandhi* ( _From Yeravda Mandir_, p. 53 )  *यज्ञाचा अर्थ*                                                                                                                                                     फलाशेशिवाय इतरांच्या कल्याणाकरिता करण्यात आलेले कर्म म्हणजे यज्ञ. हे कर्म लौकिक वा आध्यात्मिक असे क...

गांधी - युगाचा चेहरा व आसरा

गांधी - युगाचा चेहरा व आसरा ☘🌿🍀🍁🌸 गांधी: एका युगाचा चेहरा ज्यांच्या नजरेला तो जगत असलेल्या शतकांची हिंस्त्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत. आणि इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भविष्यातील पिढ्यांना दिसेल, असा.            -बाबा आमटे जगातील ध्येय गाठण्यावरून वेगवेगळे मार्ग असू शकतात. साधना विषयी मतभेद असू शकतात . पण ध्येय एक असलेने व स्वतः त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणा-या लोकांना दुसऱ्याच्या उत्तुंग कामाचा आदर होता. नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे व्यक्तीमत्व वेगळा विचारमार्ग स्वीकारताना मूळ स्वातंत्र्याचे मार्गापासून वेगळे झाले नाहीत. त्यांनी आपल्या यशासाठी  म गांधीजींचे आशिर्वाद मागीतले. आपल्या पलट नीला गांधी, नेहरू, आझाद ही नावे दिली. ... पण ज्या मतभेदांचे मार्गात ध्येय नव्हते समष्टि कलाण्याचे , होती असूया - द्वेष तेथे लाखो ज्यूनां संपवले गेले. लाखो बौद्ध भिंखूच्या कत्तली झाल्या.. गांधार मध्ये भव्य मूर्तीभंजन पासून दिव्य मानवी परंपरा तोडल्या गेल्या... मात्र  या हिंसक प्रवृत्ती बुद्ध वा तत्सम प्रवृत्ती संपवू शकल...

गांधी और बुद्ध का पाठ !

🔸 भगवान  बुद्ध  की  अहिंसा  का  पाठ महात्मा  गांधी  के  जीवनकाल  की  एक  घटना । गांधीजी  अपनी  पढ़ाई  के  लिए  लंदन  में  थे ।  अपने  मिलनसार  स्वभाव  के  कारण  उनके  अनेक  एशियाइ  मूल  के  एवं  फिरंगी  लोग  मित्र  बने  थे ।  उन  मेसे  कुछ  मित्रो  के  घर  गांधीजी  का  आना जाना  लगा  रहता  था ।  उन  मेसे  एक  फिरंगी  महिला  मित्र  भी  थी , जिनके  दो  छोटे  छोटे  बच्चे  थे । एक  दिन  गांधीजी  उस  फिरंगी  बहन  के  घर  गए  तो , उस  बहन ने  गांधीजी  से  कहा  कृपया  आज  के  बाद  आप  मेरे  घर  ना  आया  कीजिए ।  ये  सुनकर  गांधीजी ने  बड़ी  विनम्रता  पूर्व...

एक आव्हान

एक आव्हान 🌿☘🌸🍁🌸🌞 सन १८८७ साली गांधी मॅट्रिक झाले.पुढील शिक्षणासाठी विलायतेला जायचे ठरले. गांधींनी थोरा-मोठयांचे आशिर्वाद घेतले. समुद्राचे तुफान शांत झाले की नोव्हेंबर मध्ये गांधी जाणार... त्या अगोदर दुसरेच एक तुफान आले. ज्ञातींपर्यंत बातमी पोहचली. सर्वांनी गांधींना सभेपुढे बोलावले. एक _ ' तू विलायतेला जाणार,हे बरोबर नाही. आपल्या धर्मात समुद्र ओलांडने गुन्हा.शिवाय विलायतेत धर्म संभाळता येणार नाही, साहेबांबरोबर खावे- प्यावे लागणार ' गांधी -' मला वाटते विलायतेत जाणे अधर्म नाही. मी तिथे विदयाभ्यास करणार ! ज्या गोष्टींची आपणास भिती वाटते.त्यापासून दूर राहण्याची मी आईजवळ शपथ घेतली आहे. ' एक- धर्मपालन शक्य नाही,तू आमचे ऐकावे गांधी - आपण वडिल माणसं, पण याबाबतीत माझा निरुपाय. आम्ही सारे थोरांच्या सल्ल्याने ठरविले. ' परंतु ज्ञातीचा हुकूम तू माननार नाही. ' गांधी - निरुपाय आहे, ज्ञातींनी या मध्ये न पडणे बरे आवाज वाढले... ठराव - ' या मुलाला जातबहिष्कृत करा ' ! गांधीवर या ठरावाचा परिणाम झाला नाही. त्यांनी ज्ञातांची रजा घेतली. बंधू गांधींचे ...

धर्मसंस्कार

धर्मसंस्कार 🌞🍀🍁🌿☘🌸 गांधी आत्मकथेत म्हणतात - वयाच्या ६व्या वर्षापासून १६ व्या वर्षाचा होईपर्यंत मी शाळेत अभ्यास केला. पण शाळेत कोठेही धर्माचे शिक्षण मिळाले नाही. आणि धर्माचा अर्थ गांधी व्यापक घेतात,धर्म = आत्मभान,आत्मज्ञान. लहानपणी गांधीवर घरी रामरक्षा, रामकथा यांचे संस्कार झाले. महादेव, बिल्वपत्र, एकादशी, भागवत, उपवास इ विविध बाबींशी परिचय झाला. गांधी म्हणतात - *मला राजकोटमध्ये अनायासेच सर्व संप्रदायांविषयी समभाव राखण्याचे शिक्षण मिळाले. हिंदूधर्माच्या प्रत्येक संप्रदायाबद्दल समभाव शिकलो. आईबाप हवेलीला जात, शिवालयात जात, राममंदिरात ही शिवाय वडिलांकडे जैन धर्माचार्य येत. वडिलांचे मुसलमान,पारशी मित्रही होते.ते आपापल्या धर्माबद्दल बोलत, आणि वडील त्यांचे म्हणणे आदरपूर्वक व पुष्कळ वेळा रसपूर्वक ऐकत असत.* पुष्कळ वेळा गांधी तेथे हजर राहत. या सर्व वातावरणाचा असा परिणाम झाला की सर्व धर्माबद्दल माझ्या मनामध्ये समभाव निर्माण झाला. अनेक धार्मिक ग्रंथ गांधींने वाचले. पण त्यातील ६ चरण गांधींचे ह्रदयाला भिडले. *पाणी आपने पाय, भलुं भोजन तो दीजे* *आवी नमावे शीश,दंडवत कोड कीजे* *आपण...

गांधी - सच्चा माणूस

गांधी -  सच्चा माणूस 🌸☘🌿🍁🍀🌞 भारतीय राजकारणातील धूलवड अद्याप चालू आहे. देशाचे सर्वोच्च नेते सभांमधून, मुलाखतीतून थापांची बरसात करीत आहेत. संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही मंदिरातही असत्याची पाठराखण ?.. नेताचं थापाडया मग अनुयायी ..? सामान्य जनतेपुढे हे असले आदर्श ? आज बुद्ध, राम , गांधी यांच्या भारतात अशी व्यवस्था होऊ पहात आहे? *जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय होताना दिसतात. राजकारणात मोठया पदावर  विराजमान होतात. नाना असत्यांचा आधार घेत ते उच्चस्थानी स्थानापन्न !पण सर्वजणांना सर्व वेळी फसवता येत नाही.*  *सत्य हे कटू असले,ते काहींना अप्रिय असले .काही लोकांना ते अडचणीचे वाटते .तो सत्याचे नावे खडे फोडतो,  ते सत्य लपवतो,तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी झाली, कालांतराने  ती अभ्यासू सूज्ञ व्यक्तीपुढे उघड होते व समाजात त्या फेकूंची काहीच किंमत राहत नाही.* *लबाडी ही एक आखूड चादर आहे....

चुकांची कबूली

*चुकांची कबूली आणि सुधारण्याची आस.* 🍀🍁🌿☘🌸🌞 म गांधींजी आपल्या चुका जाहीररित्या मान्य करीत. ना त्याबद्दल भीती. ना चुक लपविण्याचा प्रयत्न ! राजकारणातून आलेली अपरिहार्यता ही नाही. शाळेतील आपल्या चुका, दर्शनी बावळटपणा गांधींनी सहज कबूल केला आहे. तरुणपणातील मांसाहार व विडीचे व्यसन कसे लागले या गोष्टी गांधी प्रकट सांगतात. विडीच्या व्यसनासाठी घरी केलेली चोरी व त्याची वडिलांसमोर दिलेली प्रांजल कबूली ही कथा तर प्रसिद्ध आहेच ! गांधींनी आपली आत्मकथा अत्यंत प्रामाणिकपणे लिहली आहे. आपल्या आयुष्यातील बाबी प्राजंलपणी पानोपानी मांडल्या आहेत. आपल्या चुका मांडताना त्यापासून आपल्याला काय तोटा होईल ? आपली लोकप्रियता कमी होईल का ? आपला जनाधार कमी होईल का ? असे विचार गांधीच्या मनाला कधी शिवले नाहीत. १९२० साली गांधीजींनी असहकार चळवळ चालविली. अनेक हिंदुस्थानी  यात सामील झाला. १९२२ साली गांधीजी येथे बार्डोली तालुक्यात करबंदीची चळवळ करणार होते. पण चौरी चौरा येथे हिंसात्मक प्रकार घडले आणि गांधींजींनी आपली चळवळ थांबवली. अनेकांनी कटु टीका केली. तुरुंगवास भोगणाऱ्या सत्याग्रही रागावले. गांध...

शिक्षण व कसरत

*शिक्षण व कसरत* 🌸☘🌿🍁🍀🌞       गांधीच्या शाळेत कसरत, काही खेळ आवश्यक केले होते. गांधींना त्याची आवड नव्हती. ते क्रिकेट वा फुटबॉल खेळायला कधी गेले नाहीत. त्यांचा भिडस्त स्वभाव आडवा येई. कसरतीचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही,अशी एक चुकीची समजूत त्यांनी करून घेतली होती. तरीही कसरती न केल्यामुळे वा खेळत भाग  नसल्यामुळे काही नुकसान झाले नाही असे गांधी नमूद करतात. कारण गांधी रोज मोकळ्या हवेत फिरायला जात. शाळेत वरच्या वर्गापर्यंत जाईपर्यंत फिरणेही गांधींची सवय होऊन गेलेली. फिरणे हा उत्तम व्यायाम. त्यामुळे गांधीजींचे शरीर काही अंशी कसलेले बनले. खेळ वा कसरतीकडे गांधीजींचे दूर्लक्ष व्हायचे कारण म्हणजे वडिलांची सेवा करण्याची तीव्र इच्छा. शाळा बंद झाली की ते घरी येऊन सेवा कामास लागत. पुढे कसरत आवश्यक केल्यामुळे सेवेत विघ्न येऊ लागले. सेवेसाठी कसरतीत माफी मिळण्याची विनंती शाळेने नाकारली. चुकीला दंडही झाला. पुढे वडिलांच्या पत्रांमुळे त्यांना त्यांना कसरतीतून सूट मिळाली. वडिलांच्या सेवेसाठी वेळ हा मुद्दा शाळेने मान्य केला. कसरीतून होणारा व्यायाम होत नसे, मात्र ...

शिक्षणातील उणीवा

*शिक्षणातील उणीवा* 🍀🍁🌿☘🌸 हायस्कूल मधील शिक्षणात गांधीजी कडून काही चुका झाल्या. गांधी म्हणतात त्यातील एका चुकीची शिक्षा मी अजुन भोगत आहे. *गांधी म्हणतात - शिक्षणामध्ये चांगले हस्ताक्षर असावे हे काही जरूरी नाही असे मला वाटे. हा चुकीचा समज माझ्यामध्ये कोठून निर्माण झाला हे मला आठवत नाही.* थेट विलायतेत जाईपर्यंत गांधीबरोबर हा विचार होता. द आफ्रिकेत गांधीबरोबर जे वकील काम करीत त्यांचे सुंदर अक्षर पाहून गांधींना आपल्या अक्षराची शरम वाटे. तेथील नवयुवकांची मोत्यासारखी अक्षरे पाहून गांधींना विषाद वाटे. गांधींना यावेळी सुंदर अक्षराचे महत्व पटे. ते म्हणत - ' खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी समजली पाहिजे. इतरांची अक्षरे पाहून गांधीनी आपले अक्षर सुधारायचा पर्यंत केला. वेली कोवळ्या तोपर्यंत त्यास आकार देणे सोपे.माती ओली तो पर्यंत आकार देणे सोपे, वेळ जाईल तसे वळण देणे अवघड होत जाते. गांधीजींनी याबाबत नवशिक्षितांना जागे करायचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात माझे उदाहरणावरून नवयुवक / युवतीनी सावध व्हा. *सुंदर अक्षर हे शिक्षणाचे आवश्यक अंग आहे. चांगल्या अक्षरासाठी चांगले रेखाटन प...

बालपण _ सेवा व सत्य

बालपण- ( सत्य आणि सेवा ) 🌿☘🍀🍃🍂🍁 गांधीजी बालपणी विनयशील होते. मोठ्यांचे ते आदर करत, त्यांचे दोष न पाहता. गांधीजी म्हणतात - त्यांना अवांतर वाचन आवडत नसे. शालेय पुस्तकाच्या बाहेर ते जात नसत. फक्त पुस्तक वाचले पाहिजे असे ते ठरवित. पण आळस आडवा येई. वाचलेले लक्षात रहात नसे. शाळेतल्या अभ्यासाची ही परिस्थिती मग अवांतर अभ्यास कधी ?.. मध्येच वडिलांनी त्यांना एक पुस्तक आणून दिले - "श्रावण बाळाची पितृभक्ती " . त्यांना ते खूप आवडले. श्रTवणबाळ आपल्य़ा आई_ वडिलांना कावडीत बसवले आहे,ते यात्रेस़ जात आहे. हे चित्र पाहिले होते. यामुळे उपरोक्त पुस्तक त्यांनी आवडीने वाचले. ' आपण श्रावणबाळासम व्हावे ' असे त्यांना वाटे. श्रावण पितृभक्ती नाटकातील गाणे त्यांनी पाठ केले. गाणे बाजावर बसवले. त्यासाठी वडिलांकडून एक बाजाही मिळविला. हरिश्चंद्र नाटक पाहून त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. हरिश्चंद्राप्रमाणे आपण सत्यवादी व्हावे असे वाटू लागले. मोठे झाल्यावर त्यांना समजले की हरिश्चंद्र ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसावी. पण त्यांचे कथेतील त्यांची ती दुःखे पाहून पुनः डोळे भरून येतील ,...

शिक्षण - आठवणी

शिक्षण - आठवणी. ☘🍀🍁🌿🌺 शालेय जीवनात गांधींचा स्वभाव खूप भिडस्त होते.ते कमालीचे लाजाळू होते. ते फारसे कोणाबरोबर मिसळून वागत नसत. शाळेत माझे काम भले आणि मी भला ! वेळेत शाळेत जायचे आणि शाळा सुटल्यावर अक्षरशः पळायचे, घर गाठायचे. गांधी म्हणतात - ' मी शाळेत कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे वा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही. शाळेतील त्याची एक आठवण ठळक आहे.शाळा तपासण्यासाठी एक मुख्य अधिकारी जाइल्स आले होते. त्यांनी १लीतील विद्यार्थ्यांचे श्रृत लेखन घेतले .त्यांनी काही इंग्रजी शद्ब सांगितले. त्यातील एक शद्ब होता केटल (kettle). गांधीजींनी तो शब्द चुकीचा लिहला. शिक्षकांचे ते लक्षात आले. ते गांधींना खूणावू लागले. पायाच्या बुटाचे इशारे करु लागले.जवळच्या मुलाचे पाहून लिहण्यास सूचवत होते. पण गांधींना काही समजेना. कॉपीची ते कल्पना ही करु शकत नव्हते. इतर सर्व विद्यार्थ्यांचे सर्व शब्द बरोबर. कमी गुण फक्त गांधींना. मागावून शिक्षकांनी त्यांचा समजूतीचा घोटाळा त्यांना दाखवून दिला. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,( ५ )🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravra...

बाळकडू

बाळकडू 🌸🌺🌿🍁🍀☘ म गांधीचे वडिल व्यवहार चतुर होते, बहुश्रुत होते. जगातील विविध अनुभवांचा साठा होता त्यांचेजवळ !        ते राजकोटचे दिवाण होते. त्याचे ठाकूर साहेबांचा त्यांचे दरबारातील पॉलिटिकल एजंटने अपमान केला. पॉलिटिकल एजंट म्हणजे राजदरबारातील इंग्रजांचा राजनैतिक अधिकारी. तो राज्यकारभारावर नजर ठेवी, सल्ला देई. भारतीय राजे व इंग्रज यामधील दुवा असे तो. असे पॉलीटिकल एजंट  भारतीयांना तुच्छ लेखी. त्या पॉ.एजंटने ठाकूरसाहेबांचा अपमान केला. स्वामीनिष्ठ दिवाण करमचंदाना तो सहन झाला नाही. पॉ एजंटची त्यांनी कानउघाडणी केली. एजंट चिडला.त्यांनी दिवाणास माफी मागावयास सांगीतले. त्यांनी माफी नाही मागीतली. पॉ एजंटने त्यांना तुरुंगात टाकण्याचा हुकूम केला. करमचंद तुरुंगात गेले पण डगमगले नाहीत. अखेरीस त्यांचा अभंग निश्चय पाहून साहेब नरम ला. त्याने करमचंदाना सोडून दयायचा हुकूम केला. गांधींना या गुणांचे जणू बाळकडूच मिळाले ! म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,(४ )🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील ले...

गांधींचे आई - वडिल

गांधीजींचे आई - वडिल 🌸🍀🍁🌿☘ करमचंद गांधी व पुतळीबाईचा शेवटचा मुलगा म्हणजे मोहन. वडील परंपरागत कुटूंबप्रेमी, धीट, उदार, सत्यनिष्ठ आणि रागीटही होते. ते धर्मनिष्ठ होते आणि व्यवहारात फसवेगिरी त्यांना मान्य  नव्हती. लाच त्यांना मान्य  नव्हती . त्यामुळे त्यांचे न्यायदानात पारदर्शकता राही. अन्यायाविरुद्ध ते लढत .. गरजेपेक्षा जादाचा त्यांना लोभ नव्हता. अतिरिक्त द्रवसंचयास त्यांचा विरोधच असे. करमचंदाचे शिक्षण जेमतेमच . पण जगाच्या शाळेत त्यांना अनुभवाचे शिक्षण मिळाले होते. त्यामुळे त्यांचेकडे उत्तम व्यवहारज्ञान होते. करमचंदाकडे इतर लोकांकडून काम करवून घ्यायचा हातखंडा होता. गांधींजींची आई धार्मिक वृत्तीची होती. अत्यंत भक्तीभावाने ती पूजापाठ करी. परमेश्वरास प्रसाद अर्पण केल्याशिवाय त्या कधी अन्नग्रहण करीत नसत. मंदीरात जाणे हा त्यांचा नित्यनियम होता. विविध व्रत-वैकल्य त्या पार पाडत. चातुर्मास ती हटकून करी. इतर कठीण व्रतही ती कसोशीने पाळी. धार्मिक वृत्तीबरोबर आई व्यवहार कुशल होती. समाजातील स्त्रियांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते. आई - वडिलांचा मोठा प्रभाव म गांधीच्यावर...

गांधी - अक्षय वारसा

*म गांधी  आरसा आणि वारसा* 🍁☘🌿🍀🌸🌺 भारतीयांच्या मनातील गांधीजींचा चिरस्मरणीय ठसा कायम आहेच ! गांधी विचारसरणी समर्थक गांधीवादाची भलावण करतोच... पण इतर विचारसरणीला तुलनेसाठी गांधीजी हवाच असतो. राजकारण्यांच्या  व्यासपीठावरील भाषणांचा आधार गांधी असतो. शद्बोशब्दी गांधीचा उदोs उदो ही त्यांची मजबूरी ही असू शकते... *'एक रुपाया चांदीचा ,सारा देश गांधींचा असा जयघोष स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी, गांधी जयंती दिवशी देशभर घुमत असतो. तसाच तो जागतिक पटलांवर घुमत असतो, भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांचे तोंडीही.* सरकार कोणत्याही पक्षाचे असतो. बाह्य जगतात  भारताचा चेहरा म्हणून गांधी हवेतच ! गांधीचा  संदर्भ घ्यावाच लागतो महद नेत्यांना ! भारतातील आंदोलने असो, उपोषणे असो वा क्रांतीचे नारे असो त्याला गांधीवादाची फोडणी असते. सर्वसामान्यांचे प्रश्न गांधीच्या चेहऱ्याआडून मांडण्याचा अनेकांचा कल असतो. अर्थातच शेतकरी, मजदूर, स्त्रीयां सर्वांपर्यंत... सर्वसामान्यांपासून विचारवंतापर्यंत सहजपणे पोहण्यासाठी गांधी हे अजून सोपान आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आ...

सत्याग्रह प्रयोग

सत्याग्रह प्रयोग 🍀🍁☘🌿🌸गांधीजींच्या १४ दिवसाच्या उपवासानंतर ते लगेच युद्धसाह्यक कवायतीत सामील झाले. शरीर अशक्तच होते उपोषणाने.. कवायती पर्यंत जाणे पायीचं . घरापासून ते अंतर २ मैलाचं ! जाणे - येणे - कवायत, गांधीजी आजारी , अंथरुणावर खिळले. तरीही काही वेळात सर्वांना कँपमध्ये जाणे भाग पडले... .... कँपमध्ये अंमलदार हुकूमशाही करी ! चर्चेतून अनेक तक्रारी गांधींपर्यंत. गांधी अंमलदाराकडे. त्यांनी सर्व तक्रारी कथन. तो अधिकारी म्हणाला - "लेखी दया. आणि तुम्ही स्वतः फिर्याद करू शकत नाही,दुय्यम अधिकाऱ्यांमार्फत मांडा " गांधी - " दुय्यम अधिकारी आमच्या तुकडीला विचारल्याशिवाय नेमला आहे. व त्याच्याविषयीच तक्रारी आहेत. यास्तव त्यांना बदला. तुकडीला स्वतःचे अधिकारी निवडण्याचा अधिकार असावा " पुष्कळ ऊहापोह, चर्चा.. निष्पती नाही. शेवटी गांधीजींनी पीडितांची सभा भरवली. प्रथमतः सत्याग्रहाचे गंभीर परिणाम चर्चा. सत्याग्रहाची शपथ, ठराव, वरिष्ठांना पत्र _.. ' सध्याचा अधिकारी बदला, नव्याची नेमणूक करा, तोपर्यंत आमच्या तुकडीची कवायत,लष्कर सेवा बंद करावी " पुन्हा चर्चा.. ...

हीच का ती अहिंसा ?

हीच का अहिंसा ? 🌸🌿☘🍁🍀 प्रशिक्षणानंतर गांधीसह मित्रांनी सरकारकडे लढाईत काम करण्याचे काम मागीतले. ही बातमी द आफ्रिकेत पोहचली. तिकडून २ तारा - एक मित्र पोलाकची. पत्रात पोलाकचा प्रश्न - ' तुमचे हे कार्य तुमच्या अहिंसा तत्वाच्या विरुद्ध नाही काय ? अशी तार गांधींनी गृहीत धरली होती. ' हिंद- स्वराज्य मध्ये त्यांनी खुले आम विषय मांडला होता. व युद्धातील  सहभागाचे सुतोवाच ही केले होते. आफ्रिकेतील लोकांसाठी गांधीजींच्या बोअर वॉर युद्धातील सहभागाचा अनुभव होता. पण आता गांधीजींच्यात फरक झाला असेल असे वाटून त्यांनी पत्रं आलं... ' आपण युद्धात भाग घेणं हे आपल्या अहिंसेच्या तत्वाविरुद्ध नाही काय ? .. गांधीजी आपल्या आत्मकथेत लिहतात. परस्परांसंबंधाबाबत आपले मताचा विचार वेगळा आहे. एखादया व्यक्ती तिरस्कार करताना, माझे त्याचेबरोबरचे वागणे . त्याचे हिंसेला शांततेत उत्तर देणे वेगळे.  अहिंसेचे तत्व माझ्यात रुजणे हे वेगळे. पण दोन परस्परविरोधी गटात, राष्ट्रात युद्ध होणे ही वेगळी गोष्ट आहे. ...आणि युद्ध चालू असताना हातांवर हात धरून बसणे कितपित योग्य ? अहिंसा माननाऱ्या व्यक्तीने युद...

प्रशिक्षण

प्रशिक्षण 🍀🍁☘🌿🌸 गांधीजी इंग्लंडला पोहचले तेंव्हा महायुद्धाचे ढग जमू लागले.नागरिक यथाशक्ती राष्ट्रास मदत करीत होते गांधी व टिम प्रसिद्ध डॉक्टर कॅंटली यांच्या हाताखाली जखमी लोकांची शुश्रुषा करण्याचे प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ६ आठवडयांचा छोटा अभ्यासक्रम होता. प्रथमोपचार, जखमी लोकांची सुश्रुषा, अडचणीच्या वेळी मदत कशी करावी अश्या सर्व क्रिया, या सर्वांचे प्रशिक्षण ! गांधीसह ८० जणांनी प्रशिक्षण घेतले. ६ आठवडयानंतर परीक्षा झाली , त्यात ७९ पास झाले. पास झालेल्यांना सरकारकडून कवाईत शिकविण्याचे वर्ग होते. कर्नल बेकर यांचेकडे कवाईत शिकविण्याचे काम होते. म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त ( भाग ९४ )🌸🌸🌸🌸 यमाई औंध, राजेंद्र गुरव ९५६११५४०,  8275370028 guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

अहिंसा - गांधी आत्मकथेतून

अहिंसा 🌸🌿☘🍁🍀 ' अहिंसा ही व्यापक वस्तू आहे. आपण हिंसेच्या वणवाच्या मध्यभागी. *'जीवो जीवस्य जीवनम् ' हे वचन खोटे नाही.मनुष्य क्षणभरही बाहय हिंसेशिवाय जगू शकत नाही.' पाणी पिता,बसता,उठता,सर्व क्रिया करताना,इच्छा असो वा नसो,थोडी तरी हिंसा तो करीतच असतो.तो हिंसेमधून सुटण्याचा तो महत्प्रयास करीत असेल,त्याची भावना केवळ दयेचीच असेल,तो सूक्ष्मात सूक्ष्म जंतूचाही नाश इच्छीत असेल, आणि यथाशक्ती त्याला वाचविण्याचाच प्रयत्न करीत असेल, तर तो अहिंसेचा पुजारी होय. त्याच्या हरएक कार्यामध्ये नेहमी वाढता संयम राहील , त्याची करूणावृत्ती निरंतर वाढत जाईल. पण काही झाले तरी कोणीही देहधारी बाहय हिंसेपासून सर्वथैव मुक्त होऊ शकत नाही. आणखी असे की अहिंसेचा पाया अद्वैतभावना आहे.आणि जर प्राणीमात्रच अभिन्न आहेत तर एकाच्या पापाचा परिणाम दुसऱ्यावर होणारच दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध होते तेव्हा अहिंसा मान्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य ते युद्ध थांबविण्याचे आहे. जर तो कर्तव्य पार करू शकत नसेल. ज्याच्याकडे विरोधाची शक्ती नसेल, ज्याला विरोधाचा अधिकार नसेल, त्याने लढाईच्या कामात भाग घ्यावा. आणि ...

म.गांधी आणि महाराष्ट्र

म गांधी आणि महाराष्ट्र 🍀🍁☘🌿🌸 महात्मा गांधीचे आणि महाराष्ट्राचे एक विशेष नाते आहे. महाराष्ट्र म्हणजे गांधीजींची कर्मभूमीचं ! सुमारे २४ वर्ष, म्हणजे जवळ - जवळ २ तपे गांधीजी सेवाग्राम वर्धा आश्रमात कार्यरत राहिले. इथूनच त्यांनी अनेकदा राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले,मार्गदर्शन केले. वर्धा शिक्षण पद्धती त्यांनी महाराष्ट्राचे मातीतूनच सर्वांना दिली. गांधींनी बॅरीस्टर म्हणून मुंबईला  काम केले. गांधी ज्यांना राजकीय गुरू मानीत ते नामदार गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्रातील पुण्यातूनच . पुण्यातील येरवडा तुरूंगात गांधींनी तुरुंगवास सोसला आहे. त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे स्मारक ' आगाखान पॅलेस ' पुणे येथे आहे. गांधीचे आध्यात्मिक क्षेत्रातील वारसदार त्यांचे शिष्य विनोबा भावे महाराष्ट्रातून होते. गांधीजींच्या अनेक चळवळीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते. *चले जाव ' चळवळीचे नियोजन वर्धा येथे झाले व चले जाव हा ऐतिहासिक ठराव मांडण्यास मुंबई हे ठिकाण निवडण्यात आले."* म गांधी म्हणत , ' *मराठी मातीत कार्यकर्त्यांचे मोहोळ रुजले आहे* म.गांधी १५० व्या जयंती वर्षा...