रायचंदभाई
रायचंदभाई 🌿☘🌸🍀🍁 ( प्रभाव आणि जीवन मार्गावर विचारांचे महत्व ) रायचंद भाई वय २५ वर्ष. चारित्र्यवान, ज्ञानी. पहिल्याच भेटीत त्यांचा गांधींवर परिणाम पडला. डॉ मेहतांनी गांधींना त्यांची परीक्षा घ्य्यायला सांगितले. गांधींनी काही १ाब्द (प्रयत्नपूर्वक, आपले सर्व भाषाज्ञान खर्ची घालून) सांगीतले. गांधींनी ज्या क्रमाने शब्द सांगीतले ,त्याच क्रमाने रायचंद्र भाईंनी पून्हा शब्द सांगीतले.या त्यांचे क्षमतेचा गांधींना हेवा वाटला. भाईंचे शास्त्रज्ञान,शुद्ध चारित्र्य आणि आत्मदर्शन करण्यांची त्यांची तीव्र उत्कंठा गांधींना भावे. भाईंचा हजारोंचा रुपयांचा मोठा व्यापार. पक्के व्यापारी हिऱ्या- मोत्यांची पारख. व्यापारातील ज्ञान तल्लख. इतरजण त्यांचा सल्ला घेत. पण त्यांचा मुख्य पुरुषार्थ आत्मदर्शन,देवाची शिकवण हाच होता. त्यांचे पेढीवर एखादे धार्मिक पुस्तक असायचे. वेळ मिळेल तेंव्हा ते धार्मिक वाचन,चर्चा करीत. टिपणं काढीत. या टिपणावरून त्यांनी अनेक लेख लिहले.पुढे प्रसिद्ध केले. गांधी त्यावेळी बॅरिस्टर असून बेरोजगार होते. ते कित्येक वेळा भाईंबरोबर धार्मिक चर्चा करीत. ...