Posts

Showing posts from 2018

Think positive सकारात्मक विचार

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* १२                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *THINK POSITIVE* *जीवनात सकारात्मक विचारांचे खूप महत्व आहे.जीवन एक आव्हान असेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक विचार ही ऊर्जा आहे.* *आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे* मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं. *ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते. सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज ...

तोची संत जाणावा The Real Saint

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* १९                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥ तोची संत जाणावा ॥ जगाच्या कलाण्या संताच्या विभूती I देह कष्टविती उपकारे ॥ आपले विचार, आचार, हर कर्म परोकारार्थ वाहतात - ते संत ! संशोधनात मग्न होऊन लग्नाची वेळ विसरणारे.. आणि पुढे सगळे आयुष्य देशाला वाहणारे - अे.पी.जे. अब्दुल कलाम,  स्वतःचे शरीरावर प्रयोग करणारे - शारीरिक हानी सोसणारे लुई पाश्चर, एडवीन जेन्नर, अहोरात्र प्रयोगात बुडालेला एडिसन,  ही नावे आपल्या किती लक्षात राहतात.... नट,नट्या, क्रिकेटपटू हेच आपले हिरो.. आदर्श ! शास्त्रज्ञ आपले मनात औषधापुरतेच ! *डाॅ. शंकर आबाजी भिसे* या महान भारतीय शास्त्रज्ञांची २९ एप्रिल ला जयंती झाली . किती जणांचे लक्षात  आली ? *४० पेटंट्स घेणारे आणि २०० शोध नावावर असणारे वैज्ञानिक, भारताचे एडिसन* असणाऱ्या या महर्षीचे काम खरं तर चिरस्मरणीय व्हायला हवे ! डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई ला २९ एप्रिल १८६७ला झाला .हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जात...

Gulmohar गुलमोहोर

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २१                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *औंधसह १६ गावांना शेतीसाठी पाणी मिळालच पाहिजे* *गुलमोहोर* *गुलमोहोर फुलून येई ,मात उन्हाच्या झळावर* *जणू लढे जवान , घेवूनी जखमा अंगभर* ॥ लिहावयास बसावे अनं विषय चारी बाजूनी चाल करूनी यावे, असे होते कित्येकदा ! काय करावे ? काय लिहावे ... मग येथे स्तब्धता ! १मे- महाराष्ट्र दिन , जागतिक कामगार दिन, गुलमोहोर दिन ! याच दिवशी औंध मध्ये १६ गावाचे पाणी प्रश्नी आंदोलन सुरू झाले. श्री. दत्ताभाऊ जगदाळे या प्रश्नी उपोषणास बसले आहेत... सामान्य जनता, शेतकरी यांचे उपस्थितीत आंदोलन चालू आहे... गेली कित्येक वर्ष  शेतीसाठी पाणी हा प्रश्न लोबंकळत आहे. खटाव - माणच्या कपाळी दुष्काळी शिक्का अजुनही आहे ! कित्येक आंदोलन झाली, जनता रस्त्यावर आली.... शेतकऱ्यांचे मूकमोर्चे, बैलगाडी मोर्चे झाले... नेते, अधिकारी, पदाधिकारी औंधला आले. आंदोलनकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांचेबरोबर चर्चेची आवर्तने झाली ! दत्ताभाऊंनी आपली  अभ्यासपूर्ण भूमिका मांडली ! उरमोडीचे पा...

लक्ष्मणरेषा limitations

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २२                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *लक्ष्मण रेषा*    प्रत्येकाची जशी शक्तीस्थाने असतात तशा असतात उणिवा..., असतात मर्यादाही !  माणसाने एखादे क्षेत्रात खूप  मेहनत घेतलेलेली असते. ते  क्षेत्र त्याचे बलस्थान ठरलेल. तसे प्रत्येकाची एक मर्यादा आहे.आपल्या बुद्धीची,देहाच्या बलाची, सामर्थ्याची, विचारांची एक मर्यादा आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी तशी प्रत्येकाची मर्यादा वेगवेगऴी आहे.  व्यक्ती तितक्या प्रकृती ' जगात आढऴतात आणि त्या त्या मर्यादांवरून माणसाचे कार्यक्षेत्र ठरत असते.  एखादा शेती करेल, एखादा समाजकारणात  जाईल,एखादा उद्योग करेल,एखादा नोकरी करेल,तर एखादा हमाली करेल. म्हणून कोणतेही कार्य करताना माणसाने आपल्या बुद्धीच्या,सामर्थ्याच्या,, मर्यादेचा विचार केलाच पाहिजे. क्षमता नसताना एखादे कार्य हे प्रचंड कष्ट, मनस्ताप, वेळेचा अपव्यय देण्याची शक्यता जास्त ! एखादे रबर किती ताणावे ?... त्याची मर्यादा पाहून ... नाहीतर तुटून जाईल ते !.  माणस...

संगत relationship

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* 23                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥ *संगत* ॥ माणसाची किंमत त्याचे संगतीवरून होते अशी लोकम्हण रुढ आहे. संत तुकाराम सारखे संत पुरुष उत्तम संगतीसाठी परमेश्वर चरणी धावा करतात सुसंगती सदा घडो... ही मागणीच संगतीचे महत्व सांगणारी आहे. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो.  संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्याशी आपण संगत करावी, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात  तर संगतीने काही गुण नष्ट होतात. *कर्पूरासी झाला दिपाचा शेजार , काय त्याचा गुण राहिला सार ?* दीव्याच्या संगतीनं शुभ्र कापूर नष्टच होतो. एक उदा.घ्या - काही लोकांनी इथे यायचे ठरविले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसर्‍याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल; म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगती...

Mother's day मातृदिन

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २४                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *मातृदिन* मातृदेवो भव !.. असे सांगणारी आपली संस्कृती... परंपरा ! आपले राष्ट्र ही आपणास भारतमातेच्या रूपात आणि स्नेहार्द्र देव, संत माऊलीच्या रुपात दिसू लागतात... आमची विठू माऊली म्हणत जनमाणस तल्लीन होऊन जाते ! अनं आपली भाषा ही मातृभाषा ! परस्त्री मातेसमान मानायचा वारसा छ्त्रपतींनी दिलेला.. अर्थात त्या मातृत्वही बावणकशी होतं  हिरकणीच्या दर्जाचं ! आईच्या दूधावर संस्कृती पोसते असे म्हणतात... निसर्ग रचनेनुसार हर अर्भक आईच्या सहवासात वाढत... भरण, पोषण, संवर्धन.... सर्व बाजूनी मोठं होणं... या सर्वांची सुरुवात आईच्या स्नेहार्द्र नजरेतून, स्पर्शातून ..सहवासातून ! म.गांधी, साने गुरुजी इ. महापुरुषांनी आईचे महात्म्य जाणले. आणि गायलेलेहीी. म.गांधीच्या प्रत्येक लढयातील स्त्रियांचा व्यापक व परिणामकारक सहभाग स्वातंत्र्य लढयाच्या एका पिढीवर एक वेगळाचं परिणाम घडवून गेला ! महात्माने मातृत्वाची ताकद जाणली होती. मे चा दुसरा रविवार जगभर आईदिन म्हणून पाळल...

बदल, The change

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २५                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥बदल॥ सध्या बदलीचा ऋतू आहे.. सर्व खात्यात बदल होण्यासाठी बदली नावाचे वादळ... बदली वसंत इ. हवामान प्रकार येत आहेत.  बदली मुळे हे - हे बदल होणार आहेत... अशी अनेक मुद्दांंची बदली बद्दल चर्चा आहे. बदल हा जीवनाचा नियम आहे... तर बदली हा नोकरीतील नियम ! या दोन्हीत आपणास बदल करता येत नाही ! बदलीमुळे झालेल्या बदलांची जीवनाशी सांगड घालणे एवढचं आपले हाती रहाते ! *आवडलेलं काम, व्यक्ती आणि निवडलेलं .. मिळालेलं, कधी कधी माथी मारलेल ,यांचा मेळ घालणे यात आयुष्य जात.या सर्वांची जेंव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड* *".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:*  *"काही क्षणासाठी व कामानिमित्त जवळ आलेली माणसे...* *काही क्षणात  तुटतात, जीवनात नियती आदेश देते अन ही दूर वर जातात !* *पण विचारांनी व प्रेमानी* *जुळलेली माणसे...* *आयुष्यभर सोबत राहतात".*  त्यांचे आठवण...

महाराष्ट्र गाणं Maharashtra gaane

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* १७                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *महाराष्ट्र गाणं* महाराष्ट्राच्या प्रगतीची उंच उंच शिखरे दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥ शिवरायांचा नितीचा असे आम्हां वारसा काळाशी झुंजताना तोची आम्हां आरसा ॥ काळाची आव्हाने  स्वीकारा , जा उत्कर्षाकडे दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥1 ज्ञान विज्ञानाच्या वाटा चालती सह्यगिरीचे कडे ग्राकाळासह उद्याच्या स्वागता घुमती चौघडे नावासह कर्तृत्वाने..., भारतवर्षी मिरवे दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥2 संत महात्मे, शूर विरांची धन्य ही भूमी सदा पुढेच पाऊले, ग्वाही देतो आम्ही ॥ काळाची भालावरती उमटू दे महाराष्ट्र पाऊले दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥3 जय महाराष्ट्र, जय हिंद ! रचना - १ मे २०१८ 🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅 यमाई औंध, राजेंद्र गुरव What's app no 8275370028 ९५६११५४१४० guravrajendra546@gmail.com मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

मानवतेचे गाणे, Humanity

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* १८                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺 T🍁🌿🌸☘ ॥ *गाऊ मानवतेचे गाणे* ॥  मुंबईच्या रस्तावर भिकारी भिक मागतं होता... गाणे म्हणत होता,... येणारे - जाणारे पैसे देत कमाई जेमतेम... एक सद्‌गृहस्थ रस्ताने चालले होते... भिकाऱ्याकडे पाहून हात खिश्याकडे गेला... पण खिश्यात पैसे नव्हते.. आपण भिकाऱ्याला पैसे देऊ शकलो नाही याचे त्या गृहस्थास शल्य वाटले असावे. क्षणभरात तो गृहस्थ भिकाऱ्याच्या शेजारी जाऊन बसला...  कानावर पडलेले सुमधुर स्वर ऐकून तो भिकारी चकीतच झाला. त्या सद्गृहस्थाचे स्वर्गीय स्वराने ते वातावरण भरून गेले. भिकाऱ्याच्या ताटात पैश्याचा सडा पडला... तो खणखणाट आगळाच नाद देत होता. भिकाऱ्याने हर्षानंदाने त्या गायकाचे हात हातात घेतले... भिकाऱ्यास दिलासा देत तो गायक आनंदाने उठला व मार्गस्थ झाला.. कोण होते ते गृहस्थ !.. जगविख्यात गायक स्व.मोहम्मद रफी साहेब ! मोठा गायक... मोठा माणूसही ! मा.विद्याधर शुक्ल (.माजी शिक्षण संचालक ) साहेबांनी मला एका प्रसिद्ध गायकेची व्हिडीओ क्लि...

परंपराचे बोट, traditional way

झेन गुरू ८० वर्षांचे झाले, म्हणाले, आता मरणघटिका समीप आली. सगळे शिष्य गोळा झाले. म्हणाले, गुरुजी, तुमच्याबरोबर तुमचं मार्गदर्शनही हरवणार. तुम्ही एखादं पुस्तक तरी लिहायला हवं होतं. आमच्यासाठी तो धर्मग्रंथ ठरला असता. गुरू म्हणाले, म्हणूनच नाही लिहिला. तुम्ही जुन्या काळाला, माणसांना आणि मतांना पकडून ठेवण्यात पटाईत आहात. त्यात तुम्हाला नव्याने विचार न करण्याची सोय सापडते. मी आयुष्यभर सगळ्या तथाकथित धर्मग्रंथांची होळी केली, सत्य हे शब्दातीत आहे, हे सांगत राहिलो आणि मीच ग्रंथ लिहू? पण, शिष्य ऐकेनात. म्हणाले, फार मोठं नाही, मार्गदर्शक सूत्रांपुरतं लिहा. तुम्हाला गवसलेलं सत्य लिहा. काहीतरी लिहा. काही दिवसांनी गुरू मरणशय्येवर पोहोचला. सगळे शिष्य भोवती गोळा झाले. गुरूने उशाखालून एक चोपडी काढली आणि सांगितलं, हा घ्या माझा ग्रंथ. माझी सगळी शिकवण यात लिहिली आहे. यात जीवनाचं सार आहे. गुरूने प्रमुख शिष्याला जवळ बोलावून ती चोपडी त्याच्या हातात दिली. त्याने क्षणाचाही विचार न करता, विलंब न लावता ती चोपडी समोरच्या आगीत फेकून दिली. बाकीचे शिष्य चपापले, काही विलाप करू लागले. गुरूने ...

सुखाचा शोध In the search of happiness

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* ७                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸                  .                                                                           ॥ *सुखाचा शोध* ॥                            🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹                               आता तरी देवा मला पावशील का ?                                                           सुख सुख म्हणत्यात ते दावशील का ?  .    ...

Mahatma Basaveshwara बसवेश्वर

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* - ६                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *अक्षय तृतीया २* _ क्रांतिकारक समाजसुधारक : बसवेश्वर. (इ.स. ११०५ - इ. स. ११६७)   बसवेश्वर हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी वैदिक धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला.  त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला  *लिंगायत धर्म* या नावाने ओळखले जाते.  लिंगायत पंथाचे   संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची अक्षय्यतृतीयेला जयंती आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीतील लोकांना लिंगायत समाजात प्रवेश दिला स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, वारांगणांचे पुनर्वसन असे कार्य केले. सध्याच्या जातीधर्माच्या राजकारणात त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्य़ातील बागेवाडी येथे बसवेश्वरांचा जन्म झाला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिवस. ...

अक्षय तृतीया Akshay trutiya

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* ५                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *अक्षय तृतीया*         महात्मा बसवेश्वर यांची  आज जयंती. या उदार मानवाने समतेची द्वाही दिली ,त्यांचा स्मरण दिनचं ! अक्षय तृतीया... अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे  दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया... अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. प्रथेप्रमाणे या दिवशी मातीचे घागरीऐवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. गरजूंना, भुकेलेंना अन्नदान होते. प्राणी पक्ष्यांसाठी अन्न, पाणी याची सोय  केली जाते, असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्’(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. ...

Maharani Yesubai

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* ४                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥ *रुजलेले विचार*॥ भावकीची सुंदोपसुंदी इतिहासाला भलतीच वळणे देत जाते. शत्रुशी लढणे सोपे, पण स्वकीयांशी लढणे अवघड होऊन जाते ! छ. शिवरायांचे मृत्यूनंतर वारसा हक्कावरुन कुरबुरी झाल्याही असतील... पण काही माणसं हेवेदावे, द्वेष यापेक्षा सर्वसमावेशक , समष्टिकल्याणार्थ सर्वस्व वाहतात. त्यांचे त्यागावर, बलीदानावर इतिहासाची मंगलमंदिरे उभी राहतात... छ. संभाजी महाराजांचे मृत्यूनंतर ,औरंगजेबाने अत्यंत त्वेषाने स्वराज्यावर झडप घातली.. .. रायगडला वेढा पडला... महाराणी येसूबाई, पुत्र छ.शाहू , छ.राजाराम गडावर अडकलेले. ! प्रसंग बाका ! रायगड पडण्याची वेळ , .. सगळा काफिला यवनांच्या हातात पडण्याची शक्यता  ..... सारे स्वराज्यच धोक्यात.. अशावेळी म. येसूबाई निर्णय घेतात - छ. राजारामांनी लढाईत न गुंतता.., गडावरून बाहेर पडून जिंजी गाठायचे !... येसूबाई छोट्या छ.शाहू सह गडावरच राहतील... म्हणजे शत्रुचे लक्ष.. गडावर राहील अनं छ.राजारामांना पळून जाणे शक्य होईल....

Dr Babasaheb Ambedkar

👁🌴👁 *वाचावे आनंदे!*                  यमाई औंध, राजेंद्र गुरव.     🕉🌸☘💫🍀🍂🦅   डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनाअभिवादन !                            *जीवनचेतना*                                      गावकुसावरची आमची घरं...   प्रस्थापितांच्या 'फ्रेम सारखी . माणूसकी अन दयाभावालाही  जनता झाली पारखी ॥    आमचं माणूसपण गारठलं  व्यवस्थेच्याओझ्याखाली ..        आमचं जीवन चैतन्य गोठलं ... मनस्मृतीची सावली पडली॥                                                 आम्ही पण माणसं आहोत - हाडा मासांची...रक्ताची          विसरून गेलो होतो ओळख स्वतःची अन ... अस्तीत्वाची ॥ ...

Chandrakant Dalvi _a Bhala Manus

[29/03 7:47 pm] Rajendra Gurav: *चंद्रकांत दळवी साहेब - एक भला माणूस..* (साहेबांची सेवानिवृत्ती समजली.. उस्फूर्तपणे हा लेख उमटला.... यमाई औंध, राजेंद्र गुरव )🍀🌿🍀🌸🌿🍀☘ आई  यमाईच्या सेवेत आम्ही मूळपीठी सेवावाही ! अनेक माणसांच्या भेटी ,चर्चा.. त्यातून अनेक स्नेहबंधही ! त्यातच एक समीर मुलाणी... मूळ निढळचा ! त्याचे तोंडी सारखे नाव ... दळवी साहेबांचे ! दळवी साहेब असे आहेत... तसे आहेत..., फोनवरून बोलतात.. माईक - स्पिकर सेट वरून अवघी निढळ ग्रामसभा मार्गदर्शन ऐकते, त्याप्रमाणे कामे व्हायची,  !. . ... पोरसवदा समीरच्या शद्बा -शब्दात दळवी साहेबांबद्दलची आपुलकी पाझरायची ! दळवी साहेबांबद्दल माझे मनात त्यामुळे कायम आकर्षण...,  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, म.गांधी तंटामुक्ती योजनांतून साहेबांची कल्पकता उभ्या महाराष्ट्राला उपयोगी पडली !. ... सरकारी तिजोरीच्या खडखडापुढे या योजनांचा वैचारिक लखलखाट , अन विकास कामाचा  खणखणाट फारच प्रभाव पाडून गेला...साहेबांना जनमाणसांत उदंड प्रसिद्धी मिळाली.. जनह्रदयस्थान मिळाले ! औंधसारख्या छोटया गावातील गुरव गल्लीतील गणपती...

New year

👁🌴👁 यमाई औंध, राजेंद्र गुरव 🌿🍀पालवी🍀🌿 🌞 *गुढी उदयाची उंच धरू* 🕉 *आमचं नववर्ष सुरू होतं ऋतूचक्रांच्या नियमांवलीनंं ! *वसंताच आगमन होतं..., नवपालवी फुटते वृक्ष - पल्लवींना...!*  *त्याचं एक ऋतू चक्र पूर्ण होतं आणि आमच्या जीवनवेलीचही* ! *३१ डिसेंबरप्रमाणे आम्ही रात्री नववर्ष साजरं करीत नाही*.. *सर्वशक्तीमान सूर्याच्या साक्षीनं आम्ही नवसंकल्पनांच्या गुढ्या उभारीत असतो*... ; *त्याची कमान नभाच्या माथ्याकडे पहात  उन्नत होत असते....  मदिरेसंगे भूमीवर लोटांगणे घालत नाहीत ती* ! *अतिरेकी खाद्यांच्या  पार्टीपेक्षा शरीरोपयोगी कडुलिंब आम्ही गोड मानूनी घेतो.* *डॉल्बीच्या संगे केलेल्या हातवाऱ्यांपेक्षा - मंगलवाद्यांची ललकारी पाडव्याला प्रिय आहेत. फटाक्यांच्या नांदीपेक्षा आप्तजणांची  भेट आम्हांस प्यारी ! समष्टिच्या हितचिंतनाचं ह्दयगीत पाडवा गातो.... जनप्रगतीच्या वाटा शोधतो.. नवसंकल्पाच्या नियोजनात शक्ती खर्ची घालतो आणि सर्वांच्याच कल्याणाची अपेक्षा करतो !* नूतन वर्षाभिनंदन !सर्वांना शुभेच्छा. .. शुभ भवंतु ! (मूळलेख - पाडवा २०११, पुनर्प्रसिद्धी १.१. १८) ...

Shivaji the great

*॥शिवाजी आमुचा राजा॥* यमाई औंध, राजेंद्र गुरवRajendra Gurav:  छत्रपती शिवाजी महाराज या नावाची मोहिनी , इतकी वर्षे झाली तरी आपल्या मनाला का पडून रहावी ? शिवजयंतीला शिवरायांचे नाम आसमंती दुमदुमतेच ! पण एरवीही कित्येकांचे मनी त्यांचे नाव गुंजन करीत रहाते ! महाराष्ट्राच्या प्रत्येक दिवशी कुठेना कुठे त्यांचे पुण्यस्मरण होतच रहाते ! शिवराय म्हणजे अखंड स्फूर्तीचा झरा आहे... त्यांचेपेक्षा बरा असा आदर्श आपल्यापुढे अद्याप निर्माण झाला नाही ! पद्मावतच्या निमित्ताने अल्लाउद्दिन खिलजीचा उद्दामपणा आपण पाहिला,.. अनुभवला ! विंध्य पर्वत ओलांडून त्याचे आक्रमण देवगिरीला भिडले !... यादवांच्या दूदैवाने देवगिरी पडला.... आणि पुढची चारशे वर्ष उभ्या महाराष्ट्रावर पाशवी युगाचा अंधार पडला ! सतराव्या शतकात शिवरायांचे रुपाने स्वराज्याचे विचार रुजेपर्यंत .. दख्खनच्या पठारावर गुलामींची कुसळच उगवीत, त्याची सल उभ्या मराठी मातीला होती. माना खाली घालून, पाच पातशाहीच्या थपडा खात जीणं.... जगणं कसले .. मढ्यांच्या आवालादिचं ! आत्माशिवाय शरीराचं ! शिवरायांनी अशी मढी जागी केली.. त्यांना आत्मभान दिलं, त्...

गुण गाईन Gun gayin

🌞 ज्ञाती बांधवाना दिलासा देणारा, त्यांचे गुण सांगणारा माणूस🌝 वडील माणूस, जाणकार , गुणवान यांचे विषयी भरभरून बोलणे, स्पष्ट बोलणे हा राजेंद्र गुरव यांचा गुणधर्म - देवळातील कामा बद्दल लोक राजेंद्रला भरभरून  प्रतिक्रिया देताना आपणांस मदत करणाऱ्यांचे श्रेय देण्यास राजेंद्र चुकत नसे. मंदिरात लिहिलेल्या असंख्य श्रेयनामावली त्याचेच द्योतक आहेत. ... आमची आई अशी वागली.. पण हणमंत सरांनी ते बाजूला सारले अलीकडे अमोलच्या विचारात फरक पडत चालला आहे. हा गुरव उत्तम शिंग वाजवतो ( राजेंद्र गुरव प्रस्तुत यमाई कॅसेट मध्ये थुई थुई . शिंगाला गाणे लिहून ही व्यक्ती व गुरव शिंग प्रसिद्ध केले. ) या व्यक्तीने आपले गुडघे झिजवले पण गुरवांना गुडघे टेकू दिले नाही. ही व्यक्ती अपघातातून बाहेर आली आहे. पण मनापासून सेवा करते या दोघांनी दुसऱ्या गावातील गुरवांना पूजा मदत केली. त्यांचे अनुकरण हवे. ही व्यक्ति माझेवर आता चिडली आहे पण त्यांनी समाजाचे भले केले आहे. राजेंद्रने कित्येकांचे अभिनंदन ठराव पास केले आहेत. धन्य यमाई विचारांची

Speech as president sharavni श्रवणी भाषण

॥ हक्काची अनं कर्तव्याची जाणीव झाली तर गुरवसमाज मोठा होईल ( श्रावणी २०१५ च्या मा.श्री राजेंद्र गुरव यांचे भाषणातून ) निव्वळ मानवी हक्क दिना दिवशी मानवतेचा उदोउदो करून उपयोग नाही. हक्काची जाणीव ही सुद्धा प्रक्रिया आहे. जिथे भगवान शिवा सारख्या सर्वमान्य प्रतिकालाही दूषीत करण्याचे प्रयत्न झाले ( शंकर हा भोलेनाथ , पण त्यास भोळे बनविण्यात आले. ) . तिथे मंदिरात अडकून बसल्यांची काय कथा ? गुरव समाजाच्या व्यथा जर दूर करावयाच्या असतील तर आपल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव गुरवांचे डोक्यात हवी... मंदीरातील प्रत्येक कृतीला त्याची पाश्र्र् वभूमी हवी *राजेंद्र गुरवअध्यक्षीयभाषण खटाव तालुका गुरव समाज श्रावणी* सोहळा* )

प्रतिक्रिया - दत्त Datta

Garima गदिमा

॥ ग दि मा - औंधाचे ॥ काल गदिमांचा स्मृतीदिन .. औंधमध्ये कित्येक दिन त्यांचे स्मृतीसह आलेले. श्री.श्री चा विद्यार्थी, पंचवटी वसतीगृह, अभिनेते गदिमा . मंतरलेल्या दिवसांचे औंध सगळाच अभिमानास्पद वारसा ! किती सुंदर पोस्ट वाचल्या काल ! आज आपण त्यांच्या पाईक व्हावे असे ठरवूया, कला, खेळ वा इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देवूया ! चांगल्याची ओळख ग्रुपला करुन देवूया ! श्री दत्तात्रय शिंदे म्हणजे स्वामी समर्थ आश्रमातील दादा ! त्यांनी या पुण्यपर्वात दिलेली प्रतिक्रिया चिरंतन स्मरणीय राहिल ! अध्यात्म्य क्षेत्रातील वडिलकिच्या नात्याने त्यांनी  दिलेल्या या हार्दिक मनोकामना [08/12 08:48] Shinde Dattatraya: 💐हार्दिक अभिनंदन.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.! ✌मी औंधमध्ये जेव्हां कधी एखाद्या कार्यक्रमात दोन शब्द बोलतो, तेव्हां "औंध नगरी ही रत्नांची खाण आहे" असा आवर्जून उल्लेख करतो. इतिहास साक्षी आहे. परम आदरणीय कै. बाळासाो. पंत प्रतिनिधी, गदिमा, साने गुरूजी यांच्या रूपाने हे सिध्द झालेच आहे. आपली प्रतिभासुध्दा कमी नाही.! आपल्या रूपाने या नगरीच्या नावलौकिकात आणखी...

सुविचार, Good thought

॥ श्री.यमाई प्रसन्न ॥        श्री.यमाई मंदिरात श्री.राजेंद्र गुरव यांनी अनेक प्रकारचे विचार , माहिती भक्त लोकांसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रासंगिक माहिती लोकांना आवडली आहे.तसेच त्यांचे उत्स्फूर्त विचार ही ! ३०.११.१६ ला लिहलेला हा सुविचार त्यांचे भाषेत 🕉💐🕉 ' गोठलेले आचार सुधारण्यासाठी सूर्यप्रकाश उपयोगी पडतो. तसेच विचारांबाबत ज्ञानप्रकाश आपले काम करीत असतो. '                               जय जगदंब !                            यमाई मंदिर, औंध 🕉( सकाळच्या थंडीत श्री.यमाई मंदिरात सूचलेला विचार .🕉

zings shinga झिंगा - शिंगा

[22/12/2016 8:34 am] ‪+91 75882 01988‬: 🌞 शिंगा- झिंगा 🌝 तळ्याकाळी शंकराचे मंदिर, गुरव खोल पायऱ्या उतरून ,पाणी आणून शंकराला घालायचे . आता गुरव आहे शिंगा. झिंगा वामन शिंगाकडे आला म्हणाला _ ' मी मासे धरू का , दक्षिणा देतो. शिंगा गुरव विचारात,  वामन म्हणाला - मी पाणी काढून देईन तुला. शिंगाला पोहायला येत नव्हते. 'ठीक आहे , पण पैसे वेळेवर दया ! वामन पाणी आणून देतो. मी घालू का पाणी देवाला : शिंगा विचारात ' आमचही भक्ती आहे. तुझा हात पण दुखतोयं ना ! ' वामन आता पूजा, अर्चा ही करी ! ऐके दिवशी वामन उशीरपर्यंत आला नाही ! शिंगा गुरव गडबडीने पाणी आणण्यास उतरला,   बऱ्याच दिवसाने घसरला, पाण्यात पडला, ओरडला ,बुडला काठावर झिंगा वामनाचा हासण्याचा आवाज घुमला ! आता वामन सगळ्या गुरवाना सांगतो.मी झिंगा नाव पहा ,तळ्यावर पाण्यावर  मास्यावर माझा अधिकार ! मी पूजा केली दक्षिणा माझी . ! तुम्ही फुका (चे ) शिंगा गुरव ! गेली २० वर्ष तो ही गोष्ट गुरव भक्तांना सांगतोय, सगळ्यांच्या डोक्यात : शिंगाची पोरं मोठी झाली. रंगा अनं नंगा रंगाने रंगून अभ्यास केला. रंगा -. ' झ...

Vadapav read by me , वडापावचा इतिहास

*वडापावाचा इतिहास....*🌹🌹🌹 मी वाचलेले काही लेख ७                  यमाई औंध, राजेंद्र गुरव आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? Being Marathi टिम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे.. 1965-70 चा तो काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या,उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेल...

Read by me 4 , वाचलेले लेख ४

"मी वाचलेले काही लेख ४ .                  यमाई औंध, राजेंद्र गुरव "अभिमान वाटण्यासारख्या ज्या उज्ज्वल घटना भूतकाळात घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी आपल्या मनात गौरव वाटणं स्वाभाविकच असतं. ज्यांच्यामुळं त्या घटना घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता जरूर बाळगली पाहिजे. त्याचं यथोचित स्मरणही ठेवलं पाहिजे. ते संतुलित मार्गांनी व्यक्तही केलं पाहिजे. तसेच, वर्तमानकाळात आपली क्रियाशीलता योग्य दिशेनं वाढवण्यासाठी आणि भविष्यकाळात कर्तृत्वाची उंच शिखरं गाठण्यासाठी भूतकाळातील इतिहासापासून बोध आणि प्रेरणाही जरूर घेतली पाहिजे. अनेकदा बोधही घेतला जात नाही, कृतज्ञताही बाळगली जात नाही, प्रेरणाही घेतली जात नाही आणि मग महान वारसा देखील वाया जातो. भारतीय इतिहासात असं फार फार वेळा घडलं आहे. हे पुन्हा होऊ नये, म्हणून दक्षता घ्यायलाच हवी." *(संदर्भग्रंथ : अंधाराचे बुरुज ढासळतील, प्रकाशन : लोकायत प्रकाशन, सातारा, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १५)* https://www.facebook.com/Subhashite/🦋☘🌷🌱☘🌷🦋 यमाई औंध, राजेंद्र गुरव 8275370028, gurar...

Read by me 3, वाचलेले लेख ३

मी वाचलेले काही लेख ३                  यमाई औंध, राजेंद्र गुरव रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर आला. मुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे. जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल. मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत. तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना? पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या. आम्...

Read by me 1 वाचलेले लेख १

👁🌴👁मी वाचलेले काही लेख                 यमाई औंध,राजेंद्र गुरव *कुरुंदकर आजही समकालीन आणि पथदर्शक आहेत*       ... हे आश्चर्य आणि दुर्दैवही. ते लिहितात, "आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो. समाजाचे हे चिडणे मी समर्थनीय नसले तरी क्षम्य मानतो; पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असं मला वाटत नाही. जोपर्यंत मी हे सर्वसामान्य भाषेत बोलत आहे, तोपर्यंत सगळे ठीक आहे. पण मी उद्या लो. टिळकांच्या मर्यादा दाखवू लागलो, तर पुणे खवळणार! राजर्षी शाहूंच्या मर्यादा दाखवू लागलो तर कोल्हापूर खवळणार! आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मर्यादा दाखवू लागलो तर नवबौद्ध खवळणार, हे मला माहीत आहे. मी जे विवेचन करीन ते सर्वस्वी बरोबर आणि सर्वमान्य ...

रंग प्रभातीचे ५० वा भाग, Golden jubally

👁🌴👁 *रंग प्रभातीचे*. *आकाशीचे* ..  चा हा पन्नासावा अन शेवटचा , निरोपाचा भाग . आपल्या सर्वांची गेल्या पन्नास दिवसांची  आपुलकीची सुरुवात - ' प्रभातीच्या या विविध रंगाने होत आलेली आहे हे माझे प्रातः फेरफटक्यात घेतलेला तेजो-छाया वेध आहेत. छाया घेताना मनात डोकावलेली कल्पना शब्द रुपात  मांडलेली आहे.                 वाचावे आनंदे , वाचलेल्या अन कुठंतरी साचलेल्या  कविता ' , स्फूट अन प्रासंगिक लेखन, चित्र त्यांचे शब्द आपुले..या सदराप्रमाणे रसिक व चोखळंद वाचकांचा  यास प्रतिसाद मिळाला. जुन्या, परिचीत वाचकांचा  परिचय  वृद्धींगत झाला.. नव्यांशी  गाठ पक्की होत आहे. सर्वशक्तीमान सूर्य दर्शनावेळी सूचलेले विचार यमाई मंदिरातील फलकावर लिहित आलो. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला ! .  श्री.यमाई मंदिर - ३०.११. १६ ' *गोठलेले आचार* *सुधारण्यासाठी सूर्यप्रकाश उपयोगी पडतो*. *तसेच विचारांबाबत ज्ञानप्रकाश आपले काम करीत असतो.* '    जय जगदंब !    यमाई मंदिर, औंध ( सकाळच्या थंडीत श्री.यमाई मंदिर...

वाचावे आनंदे_ मनोगत १

👁॥ *रंग प्रभातीचे.. आकाशीचे* ॥👁 माझी सकाळ सुरु होते एक तर श्री.यमाई पूजेने वा मंदिर नसेल तर पदभ्रमंतीने..  डोळे दृष्टाचा ठाव घेतात.. अन हृदय शब्दांचे पार्श्व संगीत ! जे कॅमेऱ्यानं टिपलं - ते तसेच मांडले ! जे सहज स्फुरले ते - सांडले.. उधळले ! कुणा त्यातील क्लिक आवडली कुणा शब्द ! कुणा छाया .. तेजाच्या कल्पना तर कुणा सूर्याच्या वल्गना ! मी काही कुणी व्यावसायिक छायाचित्रकार नाही.. पण एवढया लोकांना ते आवडावे .. कारण ते फोटो सर्वशक्तीमान सूर्याचे आहेत ! . वाचावे आनंदाचे ३३ कोटी प्रकार अनं  व ज्याने रौप्य महोत्सवाचे पुढे गेलेला ' वाचलेल्या अन कुठंतरी साचलेल्या कविता ' -. ज्यावर रसिकांनी मोठ्या मनाने दसऱ्याची सोन्याची उधळण केली ! रंग प्रभातीचे .. हा उपक्रम माझ्या एका फोनमधील ५१ whatsapp.ग्रुप , दुसऱ्या फोनमधील ९ ग्रुप २ निवडक ब्रॉडकास्ट लिस्ट , माझे वैयक्तिक उपक्रम,.. माझे मित्रांचे मिडिया व न्यूज ग्रुपद्वारे असंख्य लोकांकडे रवाना होत आहेत.. आई जगदंबेची कृपा असावी ! सगळ्याचं प्रतिक्रिया पाहताही येत नाही. सूर्याचे तेज वर्णिता येत नाही . : तरीही प्रसिद्ध छायाचित्रकार ह...

Happy new year, नूतन वर्षाभिनंदन

👁🌴👁 यमाई औंध, राजेंद्र गुरव 🌿🍀पालवी🍀🌿 🌞 *गुढी उदयाची उंच धरू* 🕉 *आमचं नववर्ष सुरू होतं ऋतूचक्रांच्या नियमांवलीनंं ! *वसंताच आगमन होतं..., नवपालवी फुटते वृक्ष - पल्लवींना...!*  *त्याचं एक ऋतू चक्र पूर्ण होतं आणि आमच्या जीवनवेलीचही* ! *३१ डिसेंबरप्रमाणे आम्ही रात्री नववर्ष साजरं करीत नाही*.. *सर्वशक्तीमान सूर्याच्या साक्षीनं आम्ही नवसंकल्पनांच्या गुढ्या उभारीत असतो*... ; *त्याची कमान नभाच्या माथ्याकडे पहात  उन्नत होत असते....  मदिरेसंगे भूमीवर लोटांगणे घालत नाहीत ती* ! *अतिरेकी खाद्यांच्या  पार्टीपेक्षा शरीरोपयोगी कडुलिंब आम्ही गोड मानूनी घेतो.* *डॉल्बीच्या संगे केलेल्या हातवाऱ्यांपेक्षा - मंगलवाद्यांची ललकारी पाडव्याला प्रिय आहेत. फटाक्यांच्या नांदीपेक्षा आप्तजणांची  भेट आम्हांस प्यारी ! समष्टिच्या हितचिंतनाचं ह्दयगीत पाडवा गातो.... जनप्रगतीच्या वाटा शोधतो.. नवसंकल्पाच्या नियोजनात शक्ती खर्ची घालतो आणि सर्वांच्याच कल्याणाची अपेक्षा करतो !* सर्वांना शुभेच्छा. .. शुभ भवंतु ! (मूळलेख - पाडवा २०११, पुनर्प्रसिद्धी १.१. १८) 🕉🦅🌿🌿🌸☘ यमाई औ...