Chandrakant Dalvi _a Bhala Manus
[29/03 7:47 pm] Rajendra Gurav:
*चंद्रकांत दळवी साहेब - एक भला माणूस..*
(साहेबांची सेवानिवृत्ती समजली.. उस्फूर्तपणे हा लेख उमटला....
यमाई औंध, राजेंद्र गुरव )🍀🌿🍀🌸🌿🍀☘
आई यमाईच्या सेवेत आम्ही मूळपीठी सेवावाही ! अनेक माणसांच्या भेटी ,चर्चा.. त्यातून अनेक स्नेहबंधही ! त्यातच एक समीर मुलाणी... मूळ निढळचा !
त्याचे तोंडी सारखे नाव ... दळवी साहेबांचे ! दळवी साहेब असे आहेत... तसे आहेत..., फोनवरून बोलतात.. माईक - स्पिकर सेट वरून अवघी निढळ ग्रामसभा मार्गदर्शन ऐकते, त्याप्रमाणे कामे व्हायची, !.
.
... पोरसवदा समीरच्या शद्बा -शब्दात दळवी साहेबांबद्दलची आपुलकी पाझरायची !
दळवी साहेबांबद्दल माझे मनात त्यामुळे कायम आकर्षण...,
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, म.गांधी तंटामुक्ती योजनांतून साहेबांची कल्पकता उभ्या महाराष्ट्राला उपयोगी पडली !.
... सरकारी तिजोरीच्या खडखडापुढे या योजनांचा वैचारिक लखलखाट , अन विकास कामाचा खणखणाट फारच प्रभाव पाडून गेला...साहेबांना जनमाणसांत उदंड प्रसिद्धी मिळाली.. जनह्रदयस्थान मिळाले !
औंधसारख्या छोटया गावातील गुरव गल्लीतील गणपती उत्सवात आम्ही लिहलेल्या - निर्मलग्राम, 'मुली देऊ त्याचे घरी - शौचालय आहे ज्याचे दारी, झोपलेलं गाव इ.नाटीकेतून निढळ गावचे अढळ स्थान अनं दळवीसाहेब अनेकदा शब्दबद्ध झाले !
[29/03 8:02 pm] Rajendra Gurav मा.चंद्रकांत दळवी उत्तम प्रशासनाचा अनुकरणीय चेहरा झाले .. ते त्याचे कर्तृत्वाने आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्यांमुळे !
वडाच्या फांदा विस्ताराने गगनाला गवसणी घालतात.. अनं त्यांचे मुळा -पारंब्याचे नाते जमिनीशी घट्ट विणत असतात... दळवी साहेबांचे अगदी तसेच !
निढळ गावचं त्यांचं नातं याचं धरतीचं..
साहेब नेहमीच निढळला येतं.
साहेबाचं औंधला ही येणं.. औंधच्या यमाईवर त्यांची अखंड श्रद्धा !
साहेबाचं औंधला येणं मात्रं फार शांततेत... गाजावाजा न करता !
असेच एकदा साहेब आले - अचानक ! आमचेकडे गावातील श्री यमाईच्या पूजेचा वार होता. गणपतीचे दिवस , गर्दी नव्हतीचं .. साहेब आले ! ..
गडबडीने आम्ही उठलो ! श्री यमाईचे दर्शन, ओटीभरण , प्रसाद .. इतर सोपस्कर पार पडले.
माझे मित्र उदय जगदाळे साहेबांचे सोबत होतेच.. त्यांनीच औपचारिक ओळख करून दिली !
साहेबांचे परवाणगीने आम्ही श्री.यमाई व औंधबद्दल पौराणिक, ऐतिहासिक संदर्भाने अनेक गोष्टीबद्दल माहिती पोहचवली ! ही मैफील अर्धा तासांपर्यत रंगली.. एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी हे इतका वेळ ऐकत होता( ..सहन करीत होता ) ही त्या मैफीलीची यशस्वीता !.. साहेबांनी काही प्रश्न विचारले.. त्यांच्या आगमनामुळे गडबडीत बाजूला ठेवलेल्या बाडा बद्दल ही त्यांनी विचारले ! ती मी लिहलेली एक कथा होती. साहेबांनी ती सारांशाने ऐकली,... प्रशंसाही केली.
थोडया चर्चेनंतर साहेब निघून गेले.. . तो काळ अगदी मंतरलेला होता.
ज्यांचे बद्दल अनेक गोष्टी मनात रुजून बसलेल्या .. त्यांना प्रत्यक्ष पाहताना , आनंदाचे भरते आले होते. मंदीरातील त्यांचे भेटीत... ' देवमाणूस देवळात आला.. ' हे बोल जणू पार्श्वसंगीताप्रमाणे ह्रदयी गुंजन घालीत होते.
स्वकर्तृत्व अन सर्वसामान्यांशी नाळ... म्हणून चंद्रकांत दळवींचे नावाला विशाल आभाळ !
( क्रमश : )
🌿☘🕉🍀💐☘🌿🕉
यमाई औंध, राजेंद्र गुरव, ९५६११५४१४०☘🌸🍀🕉
*चंद्रकांत दळवी साहेब - एक भला माणूस..*
(साहेबांची सेवानिवृत्ती समजली.. उस्फूर्तपणे हा लेख उमटला....
यमाई औंध, राजेंद्र गुरव )🍀🌿🍀🌸🌿🍀☘
आई यमाईच्या सेवेत आम्ही मूळपीठी सेवावाही ! अनेक माणसांच्या भेटी ,चर्चा.. त्यातून अनेक स्नेहबंधही ! त्यातच एक समीर मुलाणी... मूळ निढळचा !
त्याचे तोंडी सारखे नाव ... दळवी साहेबांचे ! दळवी साहेब असे आहेत... तसे आहेत..., फोनवरून बोलतात.. माईक - स्पिकर सेट वरून अवघी निढळ ग्रामसभा मार्गदर्शन ऐकते, त्याप्रमाणे कामे व्हायची, !.
.
... पोरसवदा समीरच्या शद्बा -शब्दात दळवी साहेबांबद्दलची आपुलकी पाझरायची !
दळवी साहेबांबद्दल माझे मनात त्यामुळे कायम आकर्षण...,
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, म.गांधी तंटामुक्ती योजनांतून साहेबांची कल्पकता उभ्या महाराष्ट्राला उपयोगी पडली !.
... सरकारी तिजोरीच्या खडखडापुढे या योजनांचा वैचारिक लखलखाट , अन विकास कामाचा खणखणाट फारच प्रभाव पाडून गेला...साहेबांना जनमाणसांत उदंड प्रसिद्धी मिळाली.. जनह्रदयस्थान मिळाले !
औंधसारख्या छोटया गावातील गुरव गल्लीतील गणपती उत्सवात आम्ही लिहलेल्या - निर्मलग्राम, 'मुली देऊ त्याचे घरी - शौचालय आहे ज्याचे दारी, झोपलेलं गाव इ.नाटीकेतून निढळ गावचे अढळ स्थान अनं दळवीसाहेब अनेकदा शब्दबद्ध झाले !
[29/03 8:02 pm] Rajendra Gurav मा.चंद्रकांत दळवी उत्तम प्रशासनाचा अनुकरणीय चेहरा झाले .. ते त्याचे कर्तृत्वाने आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्यांमुळे !
वडाच्या फांदा विस्ताराने गगनाला गवसणी घालतात.. अनं त्यांचे मुळा -पारंब्याचे नाते जमिनीशी घट्ट विणत असतात... दळवी साहेबांचे अगदी तसेच !
निढळ गावचं त्यांचं नातं याचं धरतीचं..
साहेब नेहमीच निढळला येतं.
साहेबाचं औंधला ही येणं.. औंधच्या यमाईवर त्यांची अखंड श्रद्धा !
साहेबाचं औंधला येणं मात्रं फार शांततेत... गाजावाजा न करता !
असेच एकदा साहेब आले - अचानक ! आमचेकडे गावातील श्री यमाईच्या पूजेचा वार होता. गणपतीचे दिवस , गर्दी नव्हतीचं .. साहेब आले ! ..
गडबडीने आम्ही उठलो ! श्री यमाईचे दर्शन, ओटीभरण , प्रसाद .. इतर सोपस्कर पार पडले.
माझे मित्र उदय जगदाळे साहेबांचे सोबत होतेच.. त्यांनीच औपचारिक ओळख करून दिली !
साहेबांचे परवाणगीने आम्ही श्री.यमाई व औंधबद्दल पौराणिक, ऐतिहासिक संदर्भाने अनेक गोष्टीबद्दल माहिती पोहचवली ! ही मैफील अर्धा तासांपर्यत रंगली.. एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी हे इतका वेळ ऐकत होता( ..सहन करीत होता ) ही त्या मैफीलीची यशस्वीता !.. साहेबांनी काही प्रश्न विचारले.. त्यांच्या आगमनामुळे गडबडीत बाजूला ठेवलेल्या बाडा बद्दल ही त्यांनी विचारले ! ती मी लिहलेली एक कथा होती. साहेबांनी ती सारांशाने ऐकली,... प्रशंसाही केली.
थोडया चर्चेनंतर साहेब निघून गेले.. . तो काळ अगदी मंतरलेला होता.
ज्यांचे बद्दल अनेक गोष्टी मनात रुजून बसलेल्या .. त्यांना प्रत्यक्ष पाहताना , आनंदाचे भरते आले होते. मंदीरातील त्यांचे भेटीत... ' देवमाणूस देवळात आला.. ' हे बोल जणू पार्श्वसंगीताप्रमाणे ह्रदयी गुंजन घालीत होते.
स्वकर्तृत्व अन सर्वसामान्यांशी नाळ... म्हणून चंद्रकांत दळवींचे नावाला विशाल आभाळ !
( क्रमश : )
🌿☘🕉🍀💐☘🌿🕉
यमाई औंध, राजेंद्र गुरव, ९५६११५४१४०☘🌸🍀🕉
Comments
Post a Comment