Read by me 1 वाचलेले लेख १
👁🌴👁मी वाचलेले काही लेख
यमाई औंध,राजेंद्र गुरव
*कुरुंदकर आजही समकालीन आणि पथदर्शक आहेत* ... हे आश्चर्य आणि दुर्दैवही.
ते लिहितात,
"आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो. समाजाचे हे चिडणे मी समर्थनीय नसले तरी क्षम्य मानतो; पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असं मला वाटत नाही.
जोपर्यंत मी हे सर्वसामान्य भाषेत बोलत आहे, तोपर्यंत सगळे ठीक आहे. पण मी उद्या लो. टिळकांच्या मर्यादा दाखवू लागलो, तर पुणे खवळणार! राजर्षी शाहूंच्या मर्यादा दाखवू लागलो तर कोल्हापूर खवळणार! आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मर्यादा दाखवू लागलो तर नवबौद्ध खवळणार, हे मला माहीत आहे.
मी जे विवेचन करीन ते सर्वस्वी बरोबर आणि सर्वमान्य समजावे असा आग्रह कुणीच धरू नये; पण मला माझे विवेचन करण्याइतका निर्भयपणा वाटावा एवढे वातावरण अपेक्षिण्याचा माझा हक्क आहे. वर खवळण्याचा उल्लेख केला आहे त्याच्याशेजारी टाळ्यांचाही उल्लेख केला पाहिजे. जेव्हा मी टिळकांच्या विषयी त्यांच्या मर्यादा सांगणारे लिहीन तेव्हा एक गट टाळ्या वाजवील. शाहू महाराजांच्या विषयी लिहीन तेव्हा दुसरा गट टाळ्या वाजवील आणि जर बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी लिहिले तर वरील दोन्ही गट एकत्र येऊन टाळ्या वाजवतील.
नेत्याची जात कोणती यावर आदर बाळगणाऱ्यांची जात ठरते आणि लिहिणाऱ्याची जात कोणती यावर टाळ्यांचा अगर जोड्यांचा कार्यक्रम ठरतो, हा प्रकार चालू असेपर्यंत चिकित्सेला फारसे भवितव्य नाही."
- नरहर कुरुंदकर
🦋☘🌷🌱☘🌷🦋
यमाई औंध, राजेंद्र गुरव
8275370028, gurarrajendra546@gmail.com🦅🐬🌿☘🌸🍃🌷
यमाई औंध,राजेंद्र गुरव
*कुरुंदकर आजही समकालीन आणि पथदर्शक आहेत* ... हे आश्चर्य आणि दुर्दैवही.
ते लिहितात,
"आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो. समाजाचे हे चिडणे मी समर्थनीय नसले तरी क्षम्य मानतो; पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असं मला वाटत नाही.
जोपर्यंत मी हे सर्वसामान्य भाषेत बोलत आहे, तोपर्यंत सगळे ठीक आहे. पण मी उद्या लो. टिळकांच्या मर्यादा दाखवू लागलो, तर पुणे खवळणार! राजर्षी शाहूंच्या मर्यादा दाखवू लागलो तर कोल्हापूर खवळणार! आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मर्यादा दाखवू लागलो तर नवबौद्ध खवळणार, हे मला माहीत आहे.
मी जे विवेचन करीन ते सर्वस्वी बरोबर आणि सर्वमान्य समजावे असा आग्रह कुणीच धरू नये; पण मला माझे विवेचन करण्याइतका निर्भयपणा वाटावा एवढे वातावरण अपेक्षिण्याचा माझा हक्क आहे. वर खवळण्याचा उल्लेख केला आहे त्याच्याशेजारी टाळ्यांचाही उल्लेख केला पाहिजे. जेव्हा मी टिळकांच्या विषयी त्यांच्या मर्यादा सांगणारे लिहीन तेव्हा एक गट टाळ्या वाजवील. शाहू महाराजांच्या विषयी लिहीन तेव्हा दुसरा गट टाळ्या वाजवील आणि जर बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी लिहिले तर वरील दोन्ही गट एकत्र येऊन टाळ्या वाजवतील.
नेत्याची जात कोणती यावर आदर बाळगणाऱ्यांची जात ठरते आणि लिहिणाऱ्याची जात कोणती यावर टाळ्यांचा अगर जोड्यांचा कार्यक्रम ठरतो, हा प्रकार चालू असेपर्यंत चिकित्सेला फारसे भवितव्य नाही."
- नरहर कुरुंदकर
🦋☘🌷🌱☘🌷🦋
यमाई औंध, राजेंद्र गुरव
8275370028, gurarrajendra546@gmail.com🦅🐬🌿☘🌸🍃🌷
Comments
Post a Comment