Gulmohar गुलमोहोर
👁🌴👁
*वाचावे आनंदे!* २१
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
*औंधसह १६ गावांना शेतीसाठी पाणी मिळालच पाहिजे*
*गुलमोहोर*
*गुलमोहोर फुलून येई ,मात उन्हाच्या झळावर*
*जणू लढे जवान , घेवूनी जखमा अंगभर* ॥
लिहावयास बसावे अनं विषय चारी बाजूनी चाल करूनी यावे, असे होते कित्येकदा !
काय करावे ? काय लिहावे ... मग येथे स्तब्धता !
१मे- महाराष्ट्र दिन , जागतिक कामगार दिन, गुलमोहोर दिन !
याच दिवशी औंध मध्ये १६ गावाचे पाणी प्रश्नी आंदोलन सुरू झाले.
श्री. दत्ताभाऊ जगदाळे या प्रश्नी उपोषणास बसले आहेत... सामान्य जनता, शेतकरी यांचे उपस्थितीत आंदोलन चालू आहे...
गेली कित्येक वर्ष शेतीसाठी पाणी हा प्रश्न लोबंकळत आहे. खटाव - माणच्या कपाळी दुष्काळी शिक्का अजुनही आहे !
कित्येक आंदोलन झाली, जनता रस्त्यावर आली.... शेतकऱ्यांचे मूकमोर्चे, बैलगाडी मोर्चे झाले...
नेते, अधिकारी, पदाधिकारी औंधला आले.
आंदोलनकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांचेबरोबर चर्चेची आवर्तने झाली !
दत्ताभाऊंनी आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडली !
उरमोडीचे पाणी सांगली जिल्हात कसे गेले आहे. त्या भागात पाप्याचा वापर ठिबक पद्धतीने केला
तर, किती पाणी शिल्लक राहिल .. औंधसह १६ गावांना ते कसे पोहचवता येईल ,
बंदीस्त पाईपलाईनचा वापर कसा करता येईल...
या सर्व बाबींचा अभ्यासपूर्ण आढावा दत्ताभाऊंनी मांडला .
त्यांचे विवेचन अनं अचूक मांडणी - यामुळे राज्यपालांनी चर्चेस आमंत्रण दिले...
दत्ता भाऊंसह शिष्टमंडळ मुंबईत !
तेथेही चर्चेची पुनः आवर्तने ... आश्वासन.. काही कामे सुरूही...
पण माशी कुठं शिकते कुणास ठाऊक?... दत्ता भाऊंचे मते कामाची गती - कासवगती !
दरम्यान दत्ताभाऊंनी गावपातळीवर कामाचा तडाका लावला.... औंधमधील तेलकी तलाव, गवाळा तलावाची कामे मार्गी लावली... मोठा जलसाठा उभारला...
पिण्याचे पाणी प्रश्न यामुळे सुटेलच !... पण
शेतीसाठी पाणी हवेच ना ?
दत्ताभाऊंचा पुनः पुनः सरकारी दरबारी पत्रव्यवहार.... आणि पुनः हा आंदोलनाचा एल्गार !
' बाहेर दुष्काळी झळा - अंगाची लाही- लाही होतेयं अनं हा पोरगा १ मे पासून उपोषणावर... भरपेट जेवणानंतरही पाच वाजता चहाची तलप होतेच .... हा असा उपाशीपोटी ... कुणाला कळवळा येतो की नाही ?
कोष्टी आजींची ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया !
प्रतिकूल परिस्थितीत गुलमोहोर फुलूनी येतो !
दुष्काळी जनतेच्या आकांक्षासाठी, त्यांचे शेतीच्या पाण्यासाठी, विषम परिस्थितीत.. उन्हाच्या झळा झेलीत दत्ताभाऊंचे आंदोलन पुनः फुलून आलयं..... रणात जखमांनी अंगभरून आलेल्या विरांप्रमाणे ... गुलमोहारासारखं !
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳
*वाचावे आनंदे!* २१
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
*औंधसह १६ गावांना शेतीसाठी पाणी मिळालच पाहिजे*
*गुलमोहोर*
*गुलमोहोर फुलून येई ,मात उन्हाच्या झळावर*
*जणू लढे जवान , घेवूनी जखमा अंगभर* ॥
लिहावयास बसावे अनं विषय चारी बाजूनी चाल करूनी यावे, असे होते कित्येकदा !
काय करावे ? काय लिहावे ... मग येथे स्तब्धता !
१मे- महाराष्ट्र दिन , जागतिक कामगार दिन, गुलमोहोर दिन !
याच दिवशी औंध मध्ये १६ गावाचे पाणी प्रश्नी आंदोलन सुरू झाले.
श्री. दत्ताभाऊ जगदाळे या प्रश्नी उपोषणास बसले आहेत... सामान्य जनता, शेतकरी यांचे उपस्थितीत आंदोलन चालू आहे...
गेली कित्येक वर्ष शेतीसाठी पाणी हा प्रश्न लोबंकळत आहे. खटाव - माणच्या कपाळी दुष्काळी शिक्का अजुनही आहे !
कित्येक आंदोलन झाली, जनता रस्त्यावर आली.... शेतकऱ्यांचे मूकमोर्चे, बैलगाडी मोर्चे झाले...
नेते, अधिकारी, पदाधिकारी औंधला आले.
आंदोलनकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांचेबरोबर चर्चेची आवर्तने झाली !
दत्ताभाऊंनी आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडली !
उरमोडीचे पाणी सांगली जिल्हात कसे गेले आहे. त्या भागात पाप्याचा वापर ठिबक पद्धतीने केला
तर, किती पाणी शिल्लक राहिल .. औंधसह १६ गावांना ते कसे पोहचवता येईल ,
बंदीस्त पाईपलाईनचा वापर कसा करता येईल...
या सर्व बाबींचा अभ्यासपूर्ण आढावा दत्ताभाऊंनी मांडला .
त्यांचे विवेचन अनं अचूक मांडणी - यामुळे राज्यपालांनी चर्चेस आमंत्रण दिले...
दत्ता भाऊंसह शिष्टमंडळ मुंबईत !
तेथेही चर्चेची पुनः आवर्तने ... आश्वासन.. काही कामे सुरूही...
पण माशी कुठं शिकते कुणास ठाऊक?... दत्ता भाऊंचे मते कामाची गती - कासवगती !
दरम्यान दत्ताभाऊंनी गावपातळीवर कामाचा तडाका लावला.... औंधमधील तेलकी तलाव, गवाळा तलावाची कामे मार्गी लावली... मोठा जलसाठा उभारला...
पिण्याचे पाणी प्रश्न यामुळे सुटेलच !... पण
शेतीसाठी पाणी हवेच ना ?
दत्ताभाऊंचा पुनः पुनः सरकारी दरबारी पत्रव्यवहार.... आणि पुनः हा आंदोलनाचा एल्गार !
' बाहेर दुष्काळी झळा - अंगाची लाही- लाही होतेयं अनं हा पोरगा १ मे पासून उपोषणावर... भरपेट जेवणानंतरही पाच वाजता चहाची तलप होतेच .... हा असा उपाशीपोटी ... कुणाला कळवळा येतो की नाही ?
कोष्टी आजींची ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया !
प्रतिकूल परिस्थितीत गुलमोहोर फुलूनी येतो !
दुष्काळी जनतेच्या आकांक्षासाठी, त्यांचे शेतीच्या पाण्यासाठी, विषम परिस्थितीत.. उन्हाच्या झळा झेलीत दत्ताभाऊंचे आंदोलन पुनः फुलून आलयं..... रणात जखमांनी अंगभरून आलेल्या विरांप्रमाणे ... गुलमोहारासारखं !
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳
Comments
Post a Comment