Posts

Showing posts from 2021

गुरुद्वादशी व भगवान शिव

 *वसु बारस_2 यादिवशी गुरुद्वादशी  साजरी केली जाते*  आपल्या संस्कृती मधील महान गुरू परंपरांचे या दिवशी स्मरण केले जाते. भगवान महादेव हे आदीगुरु ,आदिनाथ, योगेश्वर ,योगीनाथ म्हणून संपूर्ण भारतामध्ये पूजले जातात आणि वैभवशाली समृद्ध गुरुपरंपरा भगवान शिवापासून सुरू झालेल्या आहेत. भगवान शिव हे नटराज असून अनेक कलांची उद्गाते आहेत. त्यांच्यापासूनच अनेक कलांची निर्मिती झाली आहे.विविध  कला परंपरेने शिकवणारी गुरु-शिष्य परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. अनेक आध्यात्मिक पंथ शंकराच्या विचारधारा घेऊन आपल्या संस्कृतीचं भरण-पोषण करीत आलेले आहेत. गुरु परंपरा ही त्यातील उत्तम परंपरा आहे . (ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तिनाथ हे नाथपंथीय होते. तर ज्ञानेश्वर स्वतःची ओळख सांगताना ,*आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा* आदिनाथ महादेवांच्या सन्मान करताना गुरुपरंपरेचे महत्त्वही विशद करतात. )  आयुर्वेद शास्त्र यासंबंधीही भगवान महादेव यांचे योगदान आहे म्हणून त्यांना वैद्यनाथ असेही संबोधले जाते. बेलाचे पान रुद्राक्ष हे अत्यंत औषधी गुणकारी आहे.हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे.  बेलाचे पान हे त्र...

नवरात्र अष्टमी* 2021

 *नवरात्र अष्टमी* नवरात्र अष्टमी महाष्टमी म्हणूनही ओळखले जाते. सर्वसाधारण भक्तासाठी अष्टमी अत्यंत महत्त्वाची आहे .तसेच ती साधकांसाठी, साधू संत, शैवपंथीय नाथपंथीय इत्यादी योगीलोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज दिवसभर शक्तीची साधना केली जाते.  देवीने महिषासुरादी अनेक  राक्षस आज मारले अशा प्रकारच्या कथा भागा भागात प्रचलित आहेत.  ज्यांना नवरात्राचे नऊ दिवस उपवास काही कारणाने जमत नाहीत ते लोक आज् अहोरात्र उपवास करून नवमीला  घट उठल्यानंतर उपवास  सोडतात.  श्री यमाई देवी मूळपीठ  औंध आज अष्टमी निमित्त दुपारी देवीचा छबिना असतो.अलंकृत पूजा करून उत्सवमूर्ती पालखीत आरूढ होते आणि मंदिराला पाच प्रदक्षिणा घालते.

मरत असतील तुझ्यावर !

 मरत असतील लाखो तुझ्यावर आणि मी जगत आहे तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी मरत असतील  तुझ्यावर लाखो  तुझीया प्राप्तीसाठी आणि मी जगत आहे सजग  तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी..........॥

भ्रमित

 ती काय वाटतं तुला मला पाहिल्यावर ? तो (मनातच... ) भानं कोणतं राहतं शब्दबंबाळ दारुड्यागत

शैव संस्कृती भाग २

 🕉🕉🕉🕉🕉🕉* *शैव गुरव संस्कृती, आपला इतिहास*  २ मंदिर हे हिंदू धर्माच्या संस्कृतीचे प्रमुख वाहक आहे. मंदीरांचे संरक्षण,  संस्कृतीचे संवर्धन आणि नवनीत संस्कृती निर्मितीचे महान कार्य गुरव समाज पिढ्यानपिढया करत आला आहे.भगवान शिवापासून ज्या समाजाची निर्मिती झाली. त्यांनी भगवान शिवापासून जी जीवनपोषक तत्वे दिली त्यांचे समाजातील सर्व घटकांपर्यंत वहन करण्याचे काम गुरव पुजारी करीत आले आहेत. आजही हा समाज आपली नैतिकता, पावित्र्य टिकवून आहे. भारतीय जनमानसात शिव शक्तीला मानले जाते,  त्यांचे विविध रुपांचे जनमाणसांत स्थान आहे. त्या विविध रूपांचे पूजन पूर्ण भारतभर केले जाते. भारतवर्षात स्थित असलेल्या कृषीसंस्कृतीतील विविध सण,समारंभ, लोकविधी,लोककथा, लोकाचार इत्यादीमध्ये भगवान शिवांशी निगडीत विधी, कथा, पूजा पद्धती प्रचलीत आहेत.  शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारी स्वरूप.  शिव महादेव सुर असुर देव ,दानव ,मानव, पशु प्राणी या सर्वांचे प्रभू आहेत, आराध्य आहेत. शिवानेच सत्य शिव सुंदरम अशा विविध जीवनोपयोगी शाश्वत तत्त्वाची निर्मिती मानवी जीवनात केली आहे. सृष्टी निर्माण कर्त्या या भगव...

प्राजक्त !

 फुले चौफेर पसरली पखरण अंगणात प्राजक्ताचा सडा नाजूक मऊशार बालअंग  सुगंध बोलतो घड़ा घडा ॥

ध्येय

 ध्येय कितीही दूर असली तरी  मार्ग सदैव साथ करतात  कारण,लाख अडथळे आले तरी   उद्योगी, साहसी प्रयत्ने मात करतात ॥

शांतता

 ते म्हणतात शब्दांपेक्षा मागची शांतता जाणावी अहो... !  इथे शब्दांचा अर्थ नाही माहित  शांतता कोणती म्हणावी ?            _ राजेंद्र 9561154140

ओल्या आठवणी

 ओल्या ओल्या पावसात आठवणींची आर्द्रता ॥ पानोपानी ठिबकते साठवणीतील शुभ्रता ॥

गद्ये पंचविशी

 *॥👁* *वाचावे आनंदे* 👁!*॥*               .        राजेंद्र गुरव, यमाई औंध *॥गद्ये पंचवीशी ॥* पंचवीशी म्हणजे जीवनाचा रौप्य महोत्सव ! प्रत्येक गोष्टीला जणू स्वप्नांची किनार लाभलेली !  यात तरुणाईच्या स्वप्नाळ वाटा !... ज्याच्या त्याच्या अंगात कवी शिरलेला ! ' 😄😀 शद्बांची उलथा पालथ अन चेष्टा - मस्करीचं  मायंदाळ पिकं आलेले !  गाढवपणाचा पण भादवा !😀  गाढवपणाला पण बहर आलेला ! ... अन त्या वाटा चालून गेलेला जेष्ठ पण गप्प बसून खुशीत गाजरं कशी खातोयं हे पाहणारे ! ....😷 ' पोरगं बिलंदरच आहे ! ' बाप पण महाबिलंदर होता !.... काय तरी उतरणारचं की पोरात ! ' . बाया - बापड्या तोंडाला पदर लावून पुटपुटणारं !😀 '* 'पंचविशी म्हणजे -' *ड्रीमलॅण्ड*  !'* **स्वप्नांना उधाण आलेलं.... !* *कल्पनांना भरती!* दिवसांढवळ्या तारे चमकतात डोळ्यांसमोर ! दिवास्वप्नांची वरात !  उगाचं फुरफुरणाऱ्या बाहया ! अंगाच्या लाह्या लाह्या ! मुद्दयावरून लगेच गुद्दयावर यायची तत्परता ! कधी भविष्य पाहण्यासाठी पुढं जाणारा हात ! तर कधी भीती.... आई -...

क्रांतीदिन ९ ऑगस्ट

 *॥👁वाचावे आनंदे!👁॥*                 .               राजेंद्र गुरव, यमाई औंध *॥क्रांती ॥*.. '८ ऑगस्ट १९४२ रोजी  इंग्रज सरकार विरुद्ध '  ठराव मांडला गेला - 'चले जाव ! ' ९ ऑगस्ट हा क्रांती दिन ! नेतृत्व करणारे नेते तुरुंगात ... चळवळीची सूत्रे जनतेच्या हातात ! गांधी, पटेल, नेहरु, आझाद गजाआड ! जनताचं पुढे आली क्रांतीची मशाल धगधगत ठेवण्यासाठी ! कालचा ८ ऑगस्ट ... आजचा ९ ऑगस्ट - ७५ वे ! हा *अमृतमहोत्सवी योग व अमृत महोत्सवी वर्ष !* ' कांग्रेसचे ते अधिवेशन ७ ऑगस्टला सुरु झाले. ८ ऑगस्टला गांधीजींंनी ( वय  ७३ ) सुमारे अडीच तास भाषण केले..    त्या महात्माचे शद्बनशब्द लोक मनात  ठसवीत होते. श्रोत्यांची उसळलेली गर्दी मंत्रमुग्ध झाली ! " *या क्षणापासून सर्व भारतीयांनी आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजावे आणि 'करेंगे या मरेंगे ' या निर्धाराने चळवळ चालवावी* ! असा मंत्र गांधींनी दिला. ९ ऑगस्टला बिर्ला भवनात नेते येतील व आपणास चळवळीचा कार्यक्रम देतील म्हणून हजारो कार्यकर्ते जमलेले ! गांधी ...

आत्मविश्वास

 *॥👁वाचावे आनंदे!II*                 . राजेंद्र गुरव, यमाई औंध *#आत्मविश्वास#* . मध्यंतरी आत्मविश्वास नावाचा एक सिनेमा आला होता . ' संसाराचा गाडा ओढताना खिचपत पडलेली स्त्री . !सर्वांच्या अपेक्षांच्या डोंगराखाली अडकलेली ! तिला तिची पूर्वाश्रमीची मैत्रीण भेटते !.. दया डोंगरे ! ती तीला आत्मविश्वास देते आणि तिच्या जीवनात परिवर्तन घडून येते . असा कथाभाग ! ' आत्मविश्वास म्हणजे स्वतःलाच जागे करणे ! ' तुझं आहे तुजपाशी , परी जागा चुकलाशी ' अशी अवस्था काहींची होते.  पण वेळीच दिलेला आत्मविश्वास त्याचे जीवन उन्नत करुन जातो. मनाची चंचलता नष्ट होते . बुद्धीला नवे तेज येते... हजरजबाबीपणा येतो.निर्णयक्षमता येते असाच बोध देणारी गोष्ट वाचलेली...  -'एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिशेल सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगीत बोलू शकतो का? ओबामांनी होकार दिला. त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी ति...

गुंता की अविष्कार

 उगाच मनाचा गुंता  उद्‌भवे मनी  विकार मन गुंतवा उत्तम छंदात करा कलासक्त अविष्कार. ॥

माझी कविता म्हणते

 माझीच कविता.. माझीच कविता.. कधीमधी मला शिकवते त्या स्फुरलेल्या अंकुरात भूतकाळाचे गीत आळवते I माझी कविता म्हणते मी तुझीच निर्मिती ह्रदयातून प्रकटली सगुण साकार आकृती | माझी कविता म्हणते प्रकटले जेव्हां होते दिव्य मी धन्य होईल जेंव्हा  घडेल काही भव्य ॥

सोडून

 सोडून गेली ती ...हिंमत आली मनी उभारी मनाची शतदा किंमत कळली जनी ॥

आरसा व वारसा

 बदलली फ्रेम बदलला आरसा ना बदलू शके ( हृदयातील चेहऱ्यावरील ) भूतकाळाचा वारसा

नव्याने भेटली

 ती नव्याने भेटली मला मृग नक्षत्री पावसाळी ॥ मोसमी तिचं बरसणेच चिंब भिजलो अवकाळी ॥

सुख आणि दुःख

 कधी सुख अनं दुःख  जीवनाच्या दोन बाजू जायचे दोघां सामोरा बनूनी निर्लेप साधू ॥

जपले आहे

 ह्रदयात वाकून बघ  तुझेच चित्र लपले आहे कारण भावनांकुरातही तुलाच जपले आहे

गुलाब पाकळी

 गुलाबाची नाजूक  पाकळी त्यावर दवबिंदूची साखळी आसमंते सुगंधी माखली त्यापुढे रसिक फांदी वाकली ॥ राजेंद्र गुरव,यमाई औंध ९५६११५४१४०

हनुमंत आकाशी उडाला

 हनुमंते मारली उडी गेला नभांवरी निला रंग गगनाचा उतरला नयनांतरी निळ्याशार जादुईने निळी जादू गेली डोळ्यांची बुबळ त्यात विलीन झाली निळ्या आकाशाची  उंची सागर खेचू पाही दोघे आपण अथांग दुजी नाही जोडी ॥              राजेंद्र गुरव,यमाई औंध ९५६११५४१४०

वसंत व संत

*॥👁वाचावे आनंदे👁॥!*                      राजेंद्र गुरव, यमाई औंध 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *॥वसंत व संत ॥* 'माणूसकी ' वगैरे गोष्टीवरील चर्चा आपण ऐकतो, वाचतो... लिहतो !माणूसकीच्या गोष्टी ऐकून गहिवर येतो ! कुणावर बेतलेले संकट आपलं वाटायला लागतं . त्याच्या दुःखाशी आपण तादाम्य पावतो !                               कारण आपण सारे मानव !                                        परवा - परवा हे कोठेतरी वाचनात आले.  *एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं.....आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी*, *आजोबा:माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही....!*"' *नसेल ही स्पर्धा ! हजारों काजव्यांचे प्रकाशाने नाही जीवनमान उजळून जात ! .... एखादा 'रवीकर ' ही पुरा आहे त्यास !...   दाटून आला जरी तिमीर ,त्यात उभा राहतो दीपस्तंभ !...

लक्ष्मण रेषा

👁🌴👁 *वाचावे आनंदे!*        यमाई औंध राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *लक्ष्मण रेषा*  प्रत्येकाची जशी शक्तीस्थाने असतात तशा असतात उणिवा..., असतात मर्यादाही !  माणसाने एखादे क्षेत्रात खूप  मेहनत घेतलेलेली असते. ते  क्षेत्र त्याचे बलस्थान ठरत जाते. तसे प्रत्येकाची एक मर्यादाही राहून जाते. ....आपल्या बुद्धीची,देहाच्या बलाची, सामर्थ्याची, विचारांची एक मर्यादा आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी तशी प्रत्येकाची मर्यादा वेगवेगऴी आहे.  'व्यक्ती तितक्या प्रकृती ' जगात आढऴतात आणि त्या त्या मर्यादांवरून माणसाचे कार्यक्षेत्र ठरत असते.  एखादा शेती करेल, एखादा समाजकारणात  जाईल,एखादा उद्योग करेल,एखादा नोकरी करेल,तर एखादा हमाली करेल. म्हणून कोणतेही कार्य करताना माणसाने आपल्या बुद्धीच्या ,सामर्थ्याच्या,, मर्यादेचा विचार केलाच पाहिजे. क्षमता नसताना एखादे कार्य हे प्रचंड कष्ट, मनस्ताप, वेळेचा अपव्यय देण्याची शक्यता जास्त ! एखादे रबर किती ताणावे ?... त्याची मर्यादा पाहून ... नाहीतर तुटून जाईल ते !.  माणसाला स्व जाणीव झाली की माणू...

जुगलबंदी : काव्य व छाया

 [30/04, 8:27 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव : काव्य - कॅमेऱ्याची  जुगलबंदी चाले दृश्य आणि शब्दाची  जणू दिवाळी फुले ॥ [30/04, 8:36 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव:  (हे मात्र बरं आहे...? . ) कॅमेरा तुमचा, शब्द तुमचे जागा आम्हां नाही, हे मात्र बरं नाही ! दृश्य तुम्ही टिपणार, शब्दमाला ही गुंफणार सहवास आमचा नाही  हे मात्र बरं नाही ! साद तुम्ही घालणार, प्रतिसाद तुम्हीच देणार प्रतिक्रिया आमची ना घेणार, हे मात्र बरं नाही ! छाया तुमची, रचना ही तुमची माया ही आमची नाही हे मात्र बर नाही        _😃😃😃    राजेंद्र [30/04, 9:30 AM] Udhav Nikam:  शब्द आमचे ,चित्र आमचे प्रेरणा मात्र तुमचीच बरं का! साधा मी ,सहज तुम्ही शोधतो तुमची पदचिन्हे मी वाटसरू मी, माईलस्टोन तुम्ही महामार्ग तुम्ही ,टाकतो पाऊले मी शोधतो मलाच मी,गूगल मॅप तुम्ही पोहचण्या चरणापाशी, उत्सुक मी

छांदीष्टय : कमी ना भारी

 [30/04, 10:41 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव:  छांदीष्टयांच्या दुनियेतील सहप्रवासी कुणी ना कमी, कुणी ना भारी 🙏🙏 शब्द चित्र काष्ठ शिल्प उधळावे जीवनी...     जे मिळाले अल्प ज्ञानसागरी विखुरले मोती संतुष्टी दाटावी, घेऊनी स्वल्प !        मैत्र जीवाचे आपण सारे       नटराजाचे द्वारी देतो पहारे        जोडले गेलो कलेच्या द्वारे        जीवनी वाहे चैतण्याचे वारे ! कला साधकांनों !  आपल्या देण्याचा मी आभारी छाया पाहून काव्य घेई उभारी कला सादर नटराजाच्या दारी कुणी ना कमी, कुणी ना भारी ! 🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏 -     राजेंद्र

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

 👁️🌴👁️ *वाचावे आनंदे*               यमाई औंध,राजेंद्र गुरव 🇮🇳 *महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या अनेक शुभेच्छा!*  महाराष्ट्राला स्वतःचा वैभवशाली इतिहास आहे... आणि वैशिष्ट्यपूर्ण भूगोल ही !  वैभवशाली महाराष्ट्र  भारताभू एक गौरवशाली भाग आहे ! चालुक्य ,वाकाटक, शिलाहार ,यादव, छ. शिवराय अशा उत्तुंग राजवटी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत.  महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर स्वतःची अशी संस्कृती हजारो वर्ष निपजत असलेली, प्रवाहीत होत असलेली दिसून येते.  आजही महाराष्ट्र म्हणजे भारत देशाचे चैतन्य आहे. अनेक आर्थिक वाहिन्या महाराष्ट्रातून वाहतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मजबूत भारताचा महाराष्ट्र म्हणजे कणा आहे. *महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो!*  *दिनदिन महाराष्ट्र चमकत राहो !* उन्नत घडत, पोषित होऊ दे,  दहा दिशांनी विकसित होऊ दे ! महाराष्ट्र माथा उन्नत पाहो किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥ *संतांची ,योग्यांची ही भूमी*  *शुरविरांची, कर्मवंतीची भूमी* *देश विकासा हातभार  लागो*  *किर्तीचा ध्...
 मुग्ध कळी ती मुग्ध स्तब्ध कळी मनात रुतूनी बसली  जणू लावण्याची खणी तारुण्यतिरावरी वसली ॥ शब्द अबोल मुग्धबालेचे परी अस्तीत्व बोलते मंतरलेल्या बहूलोकांची नजर  सदा ती तोलते ॥ ओढूनी घेतो गंध करी हालचाली मंद हेलपाटी जीवाला लावी आगळा छंद ॥ नजर करी काबीज विचार बीज ओढुनी गुंजारती नित भ्रमर लोकलज्जा सोडुनी ॥ ढळला हिरवा पदर अवचित माथ्यांवरूनी गुलाबी रहस्य सदर वाहते ओसांडूनी ॥ भ्रमराची बाधी होऊनी कित्येक झाले भ्रमित वर ' प्राप्त एखादयास बाकी नको ठरू शापीत ॥ [08/10, 9:49 AM]  यमाई औंध ,राजेंद्र गुरव

महात्मा फुले

 👁️🌴👁️ *वाचावे आनंदे*                 यमाई औंध ,राजेंद्र गुरव *महात्मा जोतीराव गोविंदराव फुले*   ज्योत लावली शिक्षणाची तिमिर मिटविला अज्ञानाचा रावा पासून रंका पर्यंत वसंत फुलवला ज्ञानाचा  फुले म्हणुनी झाले थोर लेवुनि महात्म्याचे मोल     ह्रदयी आमच्या नेहमी       रहावे        महात्मा फुल्यांचे बोल म फुले म्हणजे क्रांतीसूर्य, द्रष्टा महात्मा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले  समाजसुधारक लेखक, विचारवंत होत. त्यांचा जन्मदिन - एप्रिल ११  इ.स. १८२७ होय तर मृत्यूदिन नोव्हेंबर २८, इ.स. १८९० .  महात्मा फुले  हे द्रष्टे व कर्ते बंडखोर समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे वि...

रंग होळीचे

 वसंताच्या चाहूलीत आले होळीला उधाण स्वागतीला पालवीने  केली रंगांची पखरण चौफेर उधळले,माखले  रंग रंगीले फुलफुलांचे  दाटले छत उतरले स्वर्गातून किती मजेचे? रंगरंगील्या रंगांची  जो तो दंग, महती गात  मंतरलेला निश्चल निश्चित उभा आहे एका सुरात |  रंगाची खाण आपसूक दावे  किती विविधता  डंका पसरे चोहीकडे उधळे सौंदर्य  शुद्धता कोणी पाहे रंग रुप  कोणी निवडला आकार विविधांगा एका जागी  हर मनींचे स्वप्नं साकार ॥ जणू रंग अवघा आसमंती पुरला  श्रीरंग त्या रंगमोहनीत उतरला  रंगमाला नशीला उरल्या नयनात  सप्तसुर बासरीचे  निनादे गगनात I रंगांची मदहोष पखरण मोहीनी शिंपडली आसमंतात मनाचे होडी रंगाचेच तरंग श्रीरंग पडे चपलख संभ्रमांत I @राजेंद्र गुरव

कलाकार

 रंग,रेषा, आकार, शब्द  अंतरीचे वापरूनही खास  चित्र ,काव्य... साधना  निर्मिते कलेचा आभास  श्रेष्ठ आवलिया तो शिल्पकार  कलाकृतीला परिपूर्ण आकार ॥

गुंतता तुझ्यात !

 कितीही आवरल स्वतःला,तरी मन बेफाम एक झलक तुझी, ह्रदया कसला लगाम ? वास्तव जरी टोचले - जखम भळभळली नशा ही चढलेली अन् गात्रं कळवळलेली । डोळ्यातील भावनांचा वेगळाच रंग हृदय कालवीत, वेदनां आगळकीत दंग।  फुटतात भलतेच शब्द, भावनांना ना आवर  कल्पनांना पंख गुंजारत , तुझी तू सावर I काळजाचा  घात, मन करी शंख बसला चेहरा मख्ख ,की आतूनी डंख।  असण्याशीच बंड करून उठते शरीर माथ्यावरती तडतडा करते जणू शीर। ना उमगली मती, ना मिळे ती गती राग, द्वेष हे फुकाचे मनाची स्थिती शद्ब कधी औषधही, कधी करतो घाव शद्बांचा अंदाज अवचित काळजाचा ठाव। आगळेच वागणे रितीभाती  सोडूनिया सुगंधांवरही स्वार विसरुनी भूमिका। संयम कुठला जीभेला वेगळीच धार  ठेचकाळूनी विवेक खातो मधूनच मार I भविष्यांचे अंकुर फुटती स्वप्नांना तुझा लगाम कल्पनांही तुझ्या क्षितीजी, परिस्थितीचा गुलाम।

निष्पर्ण

 जीवनातील सायंकाळी निष्पर्ण मी उभा पसरली तिन्हींसांज निरसली  आभा ॥ वाहत्या वाऱ्यात हात धूवून, पिवून फुगून काही पळाले काळाला भिवून l  काही उडाले क्षणभर सळसळ अखेरच्या श्वासाची ते स्मृतीक्षण... अहाहा Ss खूण माझ्या वैभवाची | काही क्षणांत लोटांगले भूवरी काही गिरमिटले गेले मातीत मिसळून ॥ वसंताची रया गेली शिशिरपंथी केली जीवनछाया गेले कवी छंदी ॥ आता कोकीळ यावी टाकत आहे दाणे आळवीत मनी आहे भूतकाळाचे गाणे

प्रेम बाकी..Love

 प्रेम बाकी प्रेम असतं तुमचं आमचं सेम नसतं ! जीवनी अनुभवाची विविधता वागणं त्याच प्रतिबिंब असतं ! कुणाला कुठली गरज कुणाला कुठली उबळ कुणाला कसले खूळ प्रत्येकाचा जगणं अंदाज असतं तुमचं आमचं  कधी सेम का असतं ? कुणाचा केवढा वकूब ? कुणाच्या मनी चूक कुणाचे सारे काही ठीक ज्याचं त्याचं एक गणित असतं तुमचं आमचं प्रेम असतं पण कधी सेम का असतं ?

मोबाईल mobile

  झोप आली जीवाची  पण डोळा मोबाईल  पेंग  आपटला काचेवरी  परी जीव आत कोंडलेला ओपन विंडोच वाटती ज्ञानाचा सागर  जणू छोट्या पडदी घागर मे सागर ॥  युट्युब, फेसबुक आणि  व्हाट्सअप नाना सुविधा  सगळ्याच विंडो ओपन   आस्वाद आधा आधा ॥               यमाई औंध,राजेंद्र गुरव           ९५६११५४१४०

वळणे...कळणे

 साध्या सरळ आयुष्यात  येती अवचित वळणे  कधी त्यांचे छळणे  कधी नव्याने मिळणे  वळणाचे असेच  चुकवूनी दृष्टीला वळणे  मग मनाचे खवळणे  कधी हृदयाचे ढवळणे  वळणा वळणावरती अनुभवओळख घडणे  कधी मिळमिळीत  कधी झणझणीत उरणे कधी वळणाचा आगाऊपणा मेंदूची शीर उठणे कधी क्षणांचा वांझपणा मागे भले शून्य उरणे  नव्या परिस्थितीतही जावे  मनाने स्तब्ध सामोरे  कधी गळाभेट ही ...  अभ्यासावे सारे कंगोरे  नवीकल्पना वेचीत जावे  भरावे अनुभवाचे गाठोडे  मागच्याच शहाणपण देण्या?  अनुभवांती उरावे ॥

तो दिस पहिला..

 तो दिस पहिला गोड होता ! अवचित भेटणे आणि... ते डोळ्यांचे मिळणे मिसळूनी जाणे, एक होणे त्या किमयेस जोड नव्हता तो दिस पहिला गोड होता !  ते शब्दांचे कातरणे मनही दडपून जाणे भावांची गर्दी होणे चुकांतही अल्लड गोडवा होता तो दिस पहिला गोड होता ! स्पर्शाचे ओझरते देणे क्षणांचे झाले जणू लेणे आता दुनियेशी देणे न घेणे गोड अनुभूतींचा मारवा होता ॥ तो दिस पहिला गोड होता ! थेंबाने धूंद होणे एकतारी गीत गाणे ते क्षणांचे देणे घेणे क्षण विश्वरूप वाटला होता तो दिस पहिला गोड होता ! आपुले आपल्याशी बोलणे इतर संवेदना बोथट होणे मनाचे पुनः पुन्हा मिसळणे त्या आठवणींचा गारवा होता तो दिस पहिला गोड होता !               यमाई औंध,राजेंद्र गुरव                 ( कृष्णनंदन )                   ९५६११५४१४०

नेताजी सुभाषचंद्र बोस काय म्हणाले !

 काय म्हणाले नेताजी... मा. कस्तुरबा बद्दल    त्या त्यागावरती उभी आज स्वातंत्र्य मंदिरे ! 🌸🍁🍀☘🌿🌸 कस्तुरबा गांधी आता आपल्यात नाहीत. 74 वर्षांच्या असताना इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुण्याच्या कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. कस्तुरबा यांच्या मृत्यूमुळे देशातल्या अडतीस कोटी ऐंशी लाख आणि परदेशात राहणाऱ्या देशवासीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांचा मृत्यू दु:खद परिस्थितीत झाला असला तरी गुलामगिरीत असलेल्या देशात असा मृत्यू गौरवशाली आणि सन्मानजनक आहे. *हे भारताचं वैयक्तिक नुकसान आहे*. दीड वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधीना पुण्याच्या कारागृहात डांबलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा दुसरा मृत्यू आहे. आधी महादेव देसाईंचा मृत्यू झाला आहे. देसाईंनी गांधींबरोबर आयुष्यभर काम केलं. ते गांधींचे खासगी सचिव होते. आता या कारावासादरम्यान हा दुसरा धक्का गांधींना सहन करावा लागला आहे. कस्तुरबा एक हुतात्मा. कस्तुरबा म्हणजे संपूर्ण देशाला आईसारख्या होत्या. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीणसमयी मी गांधीजींचं सांत्वन करतो. कस्तुरबांबरोबर माझा अनेकदा संपर्क व्हायचा, य...

माझ्या अत्यांच्या पावलांनी

 माझ्या अत्यांच्या पावलांनी अत्यांच्या पावलांनी गतकाळ घरी येतो स्मृतींचे बोट धरुनीं माहेरी विसावतो ॥ अत्यांच्या आठवासंगे आम्ही चिंब नाहतो तिच्या शब्दचित्रासह स्मृती सरितेत वाहतो ॥ अत्यांच्या आठवणी चहुबाजूंनी उतू जातात डोळ्यांसमोर क्षणांच्या मैफिली रंगवितात ॥ बाप जरी गेला काही वर्षापूर्वी आत्यांच्या पाठी दिसते त्याची सावली खरी ॥ माझा बाप असता तर कशी असती पाठवण ? कसा वागला बोलला स्मरते पार्श्वभूमी आठवण ॥ असे प्रश्न सदा भोवती  गुंज करतात माझ्या मनांतरी प्रश्नचिन्हं उमटतात ! अत्यांच्या असण्याने बापाचे जीवंत होणे तिच्या वागण्या बोलण्यात बापाचे अस्तीत्व प्रकटणे ॥ आत्याच्या चेहऱ्यावर भूतकाळाची स्मरणे तिच्याच्या शब्दात काळाचे सहज विरणे ॥ माझ्या अत्यांच्या येण्यात स्मृतींची सुगंधी पर्वणी  तिच्या सहवासात  जीवन गाण्या गवसणी ॥             यमाई औंध,राजेंद्र गुरव                  ९५६११५४१४०

सृजन

 👁️🌴👁️   🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘                         *सृजन*                 यमाई औंध,राजेंद्र गुरव ____________________________________________  * मानवी मन  स्पंजसारखे असते.  जीवन पथावर  मनाला जे भावते,  ते ते शोषून घेत ते पुढे चालत रहाते.  जीवन विविध अंगाने सामोरे येते.कधी सुखावते, कधी बोचते ... कधी खरचटते, कधी आत रुतून बसते, कधी आरपार निघून जाते.जीवनाचा आस्वाद  वेगवेगळ्या अनुभूती देतात. वेगवेगळ्या अनुभूती विचारांना गती देत असतात. अनुभूतींचा परिणाम संवेदनावर होत राहतो. संवेदन मनावर उमटत राहतात. कधी निःशब्द तर कधी व्यक्त होतात. यामधूनच विविध कला व्यक्त होतात. त्यांचे प्रकार उदयाला येतात.* उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यात कुणाला चैतन्य दिसतं, भिरभिरणाऱ्या वाऱ्यात कुणाला गाणं ऐकू येत, उगवणाऱ्या सूर्यात कोणाला आशेचे किरण दिसतात, विशिष्ट जागच्या नेहमीच्या दगडात कोणाला आसरा सापडतो अनं सवयींच्या मानसात निवारा... '  *माणसाच्या भावभावनांच्या खेळातू...