क्रांतीदिन ९ ऑगस्ट
*॥👁वाचावे आनंदे!👁॥* . राजेंद्र गुरव, यमाई औंध
*॥क्रांती ॥*..
'८ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रज सरकार विरुद्ध ' ठराव मांडला गेला - 'चले जाव ! '
९ ऑगस्ट हा क्रांती दिन !
नेतृत्व करणारे नेते तुरुंगात ...
चळवळीची सूत्रे जनतेच्या हातात !
गांधी, पटेल, नेहरु, आझाद गजाआड !
जनताचं पुढे आली क्रांतीची मशाल धगधगत ठेवण्यासाठी !
कालचा ८ ऑगस्ट ... आजचा ९ ऑगस्ट - ७५ वे !
हा *अमृतमहोत्सवी योग व अमृत महोत्सवी वर्ष !*
' कांग्रेसचे ते अधिवेशन ७ ऑगस्टला सुरु झाले. ८ ऑगस्टला गांधीजींंनी ( वय
७३ ) सुमारे अडीच तास भाषण केले..
त्या महात्माचे शद्बनशब्द लोक मनात ठसवीत होते. श्रोत्यांची उसळलेली गर्दी मंत्रमुग्ध झाली !
" *या क्षणापासून सर्व भारतीयांनी आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजावे आणि 'करेंगे या मरेंगे ' या निर्धाराने चळवळ चालवावी* ! असा मंत्र गांधींनी दिला.
९ ऑगस्टला बिर्ला भवनात नेते येतील व आपणास चळवळीचा कार्यक्रम देतील म्हणून हजारो कार्यकर्ते जमलेले !
गांधी वगैरे नेते अटकेत ही वार्ता वणव्यासारखी पसरली ! संतप्त लोक एकत्र येवू लागले ! निषेध मोर्चे , मिरवणूका व चले जावच्या घोषणांनी मुंबईचे रस्ते दणाणले.... अश्रुधुर व गोळीबारास जनता जुमानेना ! काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक !
८ ऑगस्ट पूर्वी झालेली वर्धा बैठक - अहिंसेला बळ पण वेळप्रसंगी बळाचा प्रयोग करण्यास मुभा ! . गांधींनी तर हया वेळेची चळवळ उघड बंडाची व स्थगिती न घेणारी आहे असे म्हटलेले वर करेंगे या मरेंगेचा संदेश !
*लोकांनी हा लोकलढा चालविला ! अभूतपूर्व उत्साह, असीम धैर्य , . असामान्य निश्चय .... लक्षावधी लोक सरकारशी सामना करण्यास पुढे !*
अच्युतराव पटवर्धन लोहिया इ. भूमिगत नेते :त्यांचा गनिमा कावा आणि पुढील टप्यात सरकारी यंत्रणा खिळी खिळी करण्याचे प्रयत्न .. सारचं जनतेच्या नेतृत्वाखाली त्यांना हवे तसेही!
साताऱ्याचे पत्रीसरकार, संस्थानी प्रजेची मदत , रत्नापा कुंभार यांच्या प्रजा परिषदेची मदत.... सर्वच अभूतपूर्व
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्य लढ्याचे ते पर्व हर भारतीयांस चिरंतन स्मरण होणारच !... लोकांनी केलेली ती केवळ चळवळ नव्हती तर ' *जनक्रांतीच*' होती !
*जयहिंद* !
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
Comments
Post a Comment