🕉🕉🕉🕉 युनोस्को प्रणित गांधीभवन,पुणे येथे झालेल्या *माझे सांस्कृतिक संचित माझा शाश्वत विकास* या जागतिक परिषेदेत सादर झालेल्या शोधनिबंधावर आधारित लेखमाला *भाग २७*** *संत काशिबा गुरव महाराज* अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर संत म्हणून काशिबा महाराज यांच्याकडे पाहिले जाते. इस 1250 ते 1295 असा त्यांचा कालखंड ! त्यांची समाधी अरणगाव येथे आहे. काशिबा महाराज यांचे कार्य -कर्तृत्व मोठे आहे आणि गुरव समाजाने यासंदर्भात अधिकचा अभ्यास करायला हवा. कारण संत सावतामाळी यांचे अभंग संत काशिबा महाराज यांनी लिहिलेले, हीच ठळक ओळख होऊन राहिली आहे. त्यांच्या इतर कार्यावरही प्रकाश टाकायला हवा. संत सावता महाराजांचे अभंग त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने ,आंतरिक आत्मीयतेने शब्दबद्ध झाले. काशिबा महाराज यांचे मूळ गाव अरण जिल्हा सोलापूर. त्यांच्या जन्मतारखे विषयी व इतर प्रापंचिक माहिती आज निश्चितपणे उपलब्ध नाही. संत जनाबाईंच्या रचनेत अनेक संतांच्या अभंग रचना कोणी केल्या याबाबत उल्लेख करताना आलेला एक उल्लेख आहे. *सावता माळ्याचा काशिबा गुरव कुरम्याचा वासुदेव काईत होता...
श्री *यमाई ( मूळपीठ ) देवीचे पुजारी* श्री.राजेंद्र बाळकृष्ण गुरव ( सर ) काका, एम.ए. एम एड कवी, लेखक, इतिहास संशोधक साै.स्वाती राजेंद्र गुरव , कम्प्युटर इंजीनिअर संपर्क- ८२७५३७००३२, ८२७५३७००२८, ९५६११५४१४० *श्री यमाई देवीच्या सर्व धार्मिक, शुभ कार्यक्रमासाठी* इतर बाबींचा परिचय आपल्या सारख्या सह्णदय व्यक्ती सहवासाने वाढेल .. या अपेक्षेसह _ राजेंद्र
Comments
Post a Comment