Posts

Showing posts from May, 2020

तो

काहीही म्हणा तो संसाराचा कणा घरादाराचा तंबू त्याच्याविना उणा ॥ रुंद त्याची छाती अनं बळकट खांदा अनेक रुपे अनेक मार्गे तो जगाचा पोशिंदा ॥ आघाडीवर लढून झेली संकटाचा मारा जीवन कसरतीने सांभाळी जगाचा डोलारा ॥

सृजन मन

कष्ट करुनी थकलो आता आलो निवासस्थाना काही हरवले - गवसले परि ना कोणता बहाणा ॥ जे.जे आले समोरा त्या त्या गेलो सामोरा केले सहजच सारे ना तऱ्हा, वेगळा तोरा ॥ आतुर मी क्षणिक निशेच्या कवेत सामावन्या ही झिंग अथक कष्टाची उतरेल झोपेत माझ्या ॥ वाकला जरी आज व्यस्त कामाने कणा उदया उभारीन पुन्हा खुणगाठ सृजनमना ॥

नवीन ४ प्रतिक्रिया - उदय, कवनप्रीत, उद्धव

[30/05, 7:25 AM] guravrajendra546: वा ! उदयजी वा ! १ाब्द कळा पाहून भरून आनंद मनात सौंदर्यही आरसपानी फुले प्रत्येक रोमात ॥ [30/05, 8:17 AM] guravrajendra546: प्रतिमेहूनी प्रतिभा व्हावी येथ उदात्त उदयजी शद्ब आपुले रुतून राहती मनात 🌟🌟 [30/05, 8:28 AM] guravrajendra546: वा ! कुणाच्या मनी दाटावी पुन्हा ओढ मानवी मनाची ही उदात्त खोड ॥ कवण आणि प्रीत दोन्ही शब्दात सांधलेले ते कोवळे प्रेम शब्दाशब्दात मांडलेले ॥ [30/05, 8:32 AM] guravrajendra546: मन हरळूनी जाते पहाता जीवंत चित्रा उद्धवा,सजग तुझा कॅमेरा क्या बात है मित्रा ॥

म गांधीजींचा परिसस्पर्श

🇮🇳🇮🇳 *परिसस्पर्श* सामान्यांना नव्हत्या राजकीय आकांक्षा राजसत्तेच्या खिजगणीत त्यांच्या अपेक्षा परंपरेची मानसिक ,राजकीय गुलामगिरी.,  समता कोठे?...सदा लोकांची उपेक्षा ॥ भरडून जाणे , पिचत पडणे वरूनी चाले - परंपरेचा वरवंटा थपडा खाणे, वाकून जगणे , एकवार विरोधक ठरे करंटा ॥ सत्ताधांच्या साठमारीत सामान्यांचे  अस्तित्वच लपणे त्यांचे अश्रू,दुःख अपार गांधींनी  सह्रदयतेने जाणणे ॥ सलामीलाच त्यांनी हे दैन्य टिपले I राजदरबारी परखड स्पष्ट सत्य मांडले लोकांना, पीडीतांना,श्रमवंताना आपली भाषा बोलणारे, दुःख मांडणारे गांधी आपुले वाटले ॥ सीमीत असलेली राष्ट्रसभा गांधींनी गावोगावी नेली सर्वसामान्यांची नेतृत्व त्यातूनी पुढे आली ॥ चंपारण्य,अमदाबाद खेडा आंदोलनानी रान उठवले सामान्यांचे प्रश्न कसे सोडवावे भारतावर्षात पटविले, रुजविले ॥ आंदोलनातूनी प्रश्न सोडविले असंख्य लोक नेते जोडले संसारी स्वप्नं अपेक्षा सोडूनी भारताचे चरणी सर्वस्व अर्पिले ॥ जे येवूनी त्यांना मिळाले सर्वस्वी त्यांचे झाले सरदार, राजेंद्रप्रसाद इ नेताजी एक जीव कायम राहिले ॥ २७ वी वर्षाचीअखंड ...

पहाट

👁️🌴👁️   🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘                         *सृजन* २               यमाई औंध,राजेंद्र गुरव __________________________ . .  *पहाट* झुंजूमुंजू होते..  आणि जगाचा पुन्हा जन्म होतो. पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते.  दूरवर मोरांचं ओरडणं कानी पडते. पानांची सळसळ वाढू लागते.  सूर्याच्या आगमनाचे पडसाद उमटू लागतात . उषा रंगीबेरंगी कपड्यात स्वागताला सज्ज होते. आणि तेजोनिधी भास्कराचे आगमन होतं !  सूर्य म्हणजे चराचराची चेतक शक्ती !  सूर्य म्हणजे ऊर्जेचा महा स्त्रोत !  सूर्य आपल्या रवी करांनी डोंगर-दऱ्या एकेक भुभाग पादाक्रांत करत राहतो. सारी पृथ्वी कल्याणी प्रकाशित होते.  सर्व चराचर जागे होतात . कष्टाळू शेतकरी भल्यापहाटे  उठतात आणि आपल्या कामाची सुरुवात करतात. पूर्वीच्या काळी बाया-बापड्यांचा दिवस तर रामप्रहरी सुरू व्हायचा. सकाळचे साफसफाई ,सडा संमार्जन, रांगोळी ,सगळी इतर सफाई, स्नानादी कर्मे करून  गृहणी स्वयंपाकाला लागत. गोठ्याती...

सृजन १

👁️🌴👁️   🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘                         *सृजन* १             यमाई औंध,राजेंद्र गुरव __________________________ . .  *वेगवेगळ्या अनुभूती विचारांना गती देत असतात. अनुभूतींचा परिणाम संवेदनशील मनावर होत राहतो. यामधूनच विविध कला प्रकार उदयाला आलेले आहेत.*  *माणसाच्या भावभावनांच्या खेळातून ,मंथनातून कला उदयाला येते . कधी जीवनाच्या रणकंदनातून तावून सुलाखून  जन्माला येते, असे म्हटले तर वावगे होणार नाही.*  *चित्र ,नाट्य ,शिल्प, गायन-वादन इत्यादी विविध कला माणसाच्या भावभावनांचे व्यक्त रूप आहे, हे निश्चित!*  *काम, क्रोध ,मद, मोह ,मत्सर,दंभ विविध षड्रीपु ,सुखदुःख त्याचे आवेग माणसाच्या विविध आत्मिक प्रतिसादाला जन्म देतात.* *काही संवेदनशील माणसं या आपल्या आवेगांना विविध रुपात व्यक्त करतात,अमूर्त भावनेला कलेचे मूर्तरूप देऊन जातात* *एखादा कवी काव्यातून व्यक्त होतो. एखादा चित्रकार चित्रकलेत जीव ओततो. एखादं काव्य जन्माला येतं कारण हृदय तीरावरती कुठलातरी भाव रु...

दोन काष्ठ - गरूड आणि नाग

Image

दोन काष्ठ, रमेश - अमूर्त कोंबडा, राहूल - डायनासोर

Image

चैतन्य साठलेली सकाळ आणी बगळा

Image

संत काशिबा गुरव महाराज

🕉🕉🕉🕉 युनोस्को प्रणित गांधीभवन,पुणे येथे झालेल्या *माझे सांस्कृतिक संचित माझा शाश्वत विकास*  या  जागतिक परिषेदेत सादर झालेल्या शोधनिबंधावर आधारित लेखमाला *भाग  २७*** *संत काशिबा गुरव महाराज*  अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर संत म्हणून काशिबा महाराज यांच्याकडे पाहिले जाते. इस 1250 ते 1295 असा त्यांचा कालखंड ! त्यांची समाधी अरणगाव येथे आहे. काशिबा महाराज यांचे कार्य -कर्तृत्व मोठे आहे आणि गुरव समाजाने यासंदर्भात अधिकचा अभ्यास करायला हवा. कारण संत सावतामाळी यांचे अभंग संत काशिबा महाराज यांनी लिहिलेले, हीच ठळक ओळख होऊन राहिली आहे.  त्यांच्या इतर कार्यावरही प्रकाश टाकायला हवा. संत सावता महाराजांचे अभंग त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने ,आंतरिक आत्मीयतेने शब्दबद्ध झाले.  काशिबा महाराज यांचे मूळ गाव अरण जिल्हा सोलापूर. त्यांच्या जन्मतारखे विषयी व इतर प्रापंचिक माहिती आज निश्चितपणे उपलब्ध नाही.  संत जनाबाईंच्या रचनेत अनेक संतांच्या अभंग रचना कोणी केल्या याबाबत उल्लेख करताना आलेला एक उल्लेख आहे. *सावता माळ्याचा काशिबा गुरव कुरम्याचा वासुदेव काईत होता...

नागाचे पिल्लू, एक सूर्योदय, उन्मत्त हत्ती

Image

सहवास*

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग २८ यमाई औंध,राजेंद्र गुरव *सहवास* पावसाचा थेंब नभातून खाली पडला. शेतावर पडला आणि  बियांना सृजन देणारा झाला.उभ्या पिकाला नवसंजीवनी देणारा झाला. जीवास उभारी देण्याची शक्ती त्याला मिळाली. फुफाटयात पडला आणि त्याचा चिखल होऊन राहिला. गरम भांड्यावर पडला त्याची पुन्हा वाफ झाली आणि  शिंपल्यामध्ये पडला त्याचा सुंदर असा मोठी होऊन राहिला.  पाण्याचा- थेंब एकच पण त्याला मिळायला सहवास वेगळा आणी परिणाम वेगळा. सहवासाचा परिणाम  सांगणारी ही कथा ,कोठे तरी वाचलेली! एक साधू रस्त्याने चालले असतांना त्याना खूप तहान लागली, पुढे गेले तर एका कुंभाराच घर लागले, साधू तिथे गेले आणि पाणी मागितले त्यानेही त्या साधूंना आदर पूर्वक नमस्कार करून पाणी दिले, पाणी पीत असताना अचानक त्यांच लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेलं, एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं, त्या साधूंनी त्याला विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकंच मडकं वेगळ का रे बाबा ठेवलं आहेस? तेंव्हा तो म्हणाला, महाराज ते मडकं खराब आहे.. त्याला गळती लागली आहे....

जगनही जानन्या झालं मुश्किल

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग २७ यमाई औंध,राजेंद्र गुरव *जगनही जान्यां झालं मुश्किल !* कित्येक लोकांचे पुढे अनपेक्षित परिस्थिती !  नियोजनाला वेळ नाही आणि हाताशी फारशी साधने नाहीत. घरातील, बाहेरील उद्याचं चित्र स्पष्ट नाही .घरातील संपत आलेला बाजार... आणि तरीही माणसं लढतच आहेत. शासनावर या साऱ्याचा  फार मोठा भार असणार आहे. फार मोठी तरतूद जेवण आणि आरोग्य या दोन घटकांच्या करावी लागते आहे.  हातावर ज्यांचे पोट आहे अशी माणसं अगोदरच संसाराची दोन टोकं मिळताना मेटाकुटीला आलेली. दोन घासाची ज्यांना भ्रंत, त्यांना कशी मिळेल विश्रांत ! मिळेल ते खाणे . त्याचा दर्जा न पाहता खाली आणि पोटाची खळगी भरणे पोटाची आग शांत करणे. हे गरिबांच्या पाचवीला पुजलेले.... सज्जन शक्तीची सजगता एवढेच काय त्यांच्या हाती राहिले आहे. लॉकडाऊन होण्यासाठी माझ्याकडे घर आहे, दोन्ही वेळा भागवायला अन्नही पोटभर आहे ! १ मनोरंजन खूप आहे, टीव्ही आणि इंटरनेट, हवं ते मिळतंय सारं, एक फोन करता थेट ! २ दिवसभर व्हॉट्स अप चालू, भ्रमणध्वनी हाताशी, कपाटात पुस्तकांच्या रचून ठेवलेल्या राशी ! ३ खूप जरी नसले तरी ...

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग २९ यमाई औंध,राजेंद्र गुरव 🇮🇳 *महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या अनेक शुभेच्छा!*  महाराष्ट्राला स्वतःचा वैभवशाली इतिहास आहे... आणि वैशिष्ट्यपूर्ण भूगोल ही. वैभवशाली महाराष्ट्र  भारताचा एक भाग !चालुक्य ,वाकाटक, शिलाहार ,यादव, छत्रपती शिवराय अशा उत्तुंग राजवटी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत.  महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर स्वतःची अशी एक संस्कृती हजारो वर्ष निपजत असलेली दिसून येते.  आजही महाराष्ट्र म्हणजे भारत देशाचे चैतन्य आहे. अनेक आर्थिक वाहिन्या महाराष्ट्रातून वाहतात. मजबूत भारताचा महाराष्ट्र म्हणजे कणा आहे. * महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो! दिनदिन महाराष्ट्र चमकत राहो ! उन्नत होऊन पोषित होऊ दे  दहा दिशांनी विकसित होऊ दे ! प्रगतीच्या वाटा अखंड चालो महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो॥  संतांची ,योग्यांची ही भूमी शुर विरांची  कर्मवंतीची भूमी देशाच्या विकासाला हातभार  लागो महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥  महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकच  आकांक्षा  रुळा...

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा*

👁️🌴👁️वाचावे आनंदे ३० 🕉🕉🕉🕉 *महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा* या विषयावरील शोधनिबंध माननीय श्री सदानंद आगलावे जेजुरी  यांनी सादर केला होता.  ते म्हणतात - ' ' उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा !  खंडोबाम्हणजे साक्षात शिव शंकराचा अवतार असं म्हणलं जाते. कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल या दोन देवतांचा दैत्यांचा बिमोड करण्यासाठी भगवान शिवांनी जो अवतार घेतला तो खंडोबा.  अवताराचा दिवस होता चैत्री पौर्णिमा. देवाचे अवतार स्थान कही पठार (कडेपठार ) तर देवानी राक्षसाला मारलेला दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा अष्टमी. महादेवांनी हातात खड्ग घेऊन राक्षसाचे खंडन केले म्हणून खंडोबा नामाधिमान  !  देवांची पत्नी माळसादेवी अर्थात साक्षात पार्वती माता ! जेजुरी या तीर्थस्थळी दोघांचे एकत्र स्वयंभू लिंगस्थान आहे .त्यामुळे नवदांपत्यांना जेजुरीला दर्शनासाठी आणतात अशी प्रथा  ! मल्ल दैत्याचा संहार केला म्हणून देव मल्हारी नाम पावला.  सदा आनंद निर्माण करणारा भक्तांसाठी तोच सदाआनंद झाला आहे. भंडारा उधळताना सदानंदाचा येळकोट असा जयजयकार करत...

रणशिंगांची रणधुमाळी*

👁️🌴👁️ वाचावे आनंदे - ३१ *रणशिंगांची रणधुमाळी*  शिंग म्हणजे चैतन्य,स्फूर्ती.. अंगात शिरणारे वारे !  शिंग, तुतारी ,रणशिंग, मोगलशिंग पिंपोळी इत्यादी अनेक नावाने शिंग ओळखलं जायचं .स्वागतासाठी, स्फूर्ती दायक वातावरणासाठी  शिंग आणि युद्धभूमीवर ही रणशिंग फुंकले जायचं  उत्सव समारंभ यांची सुरुवात, पाहुण्यांचे स्वागत यासाठी शिंग फुंकले जाते.  भगवान शंकरांचे पाच शिष्य, त्यातील शृंगी नावाच्या शिष्याने महादेवांच्या विवाहावेळी नंदी बैलाचे शिंग  वाजवले. मंगलमय वातावरणात पुष्पवृष्टी वेळी, शिंग वाजले तेव्हापासून लग्नकार्यात शिंग वाजवण्याची प्रथा प्रचलित आहे .शृंगी यांनी आपल्या ओठाच्या साह्याने एकाच श्वासात  फुंकून जो नाद निर्माण केला ता शिंगनाद  म्हणून आजही प्रसिद्ध आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शिंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.   गडावरून पायथ्याशी असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला तुतारी मार्फत वेगवेगळे संदेश दिले जात . शिंगाचा जणू मोबाईल झालेला. तसेच युद्धात स्फूर्ती देण्यासाठी हर हर महादेव ,जय भवानी या गोष्टी बरोबर रणशिंगाची ही सा...

आळंदीतील गुरव समाजाची पूर्वपीठीका व थोर संत ह भ प पानसरे महाराज गुरव*

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३३ यमाई औंध,राजेंद्र गुरव 🕉🕉🕉🕉 *आळंदीतील गुरव समाजाची पूर्वपीठीका व थोर संत ह भ प पानसरे महाराज गुरव* हा शोधनिबंध ॲड कृष्णाजी ज्ञानेश्वर पानसरे यांनी सादर केला होता.  या शोधनिबंधाचे सुरुवातीला गुरव समाजाच्या संबंधीने काही बाबींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे . संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी ,हजारो वर्षापासून सिद्धेश्वराचे मंदिर आळंदी येथे आहे व गुरव समाजातील पुजारी हजारो वर्षापासून तिथे पूजा-अर्चा करीत आलेले आहेत . संत नामदेव म्हणतात *आळंदी हे गाव! पुण्यभूमी ठाव! दैवताचे नाव! सिद्धेश्वर!* ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंती शेजारी ग्रामदैवत भैरोबाचे मंदिर आहे व अशी वंदता आहे की, त्या मंदिराखाली काशीची गंगा गुप्त रूपाने आहे व नदीच्या काठी  मणिकर्णिका घाटावर ती अवतीर्ण झाल्याचे दिसते. येणारे भाविक सारे तीर्थ अवश्य घेतात. दर्शनास गेलेल्या भक्तास गुरव ही माहिती अवश्य देतात . 1920 च्या सुमारास आळंदी तीर्थक्षेत्र येथे गुरवांची बहुसंख्य घरे होती.  गुरवांची प्रामुख्याने आडनाव वाघमारे आहे. त्यासंबंधी कथा सांगितली जाते सिद्ध...

संयम*

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३२ यमाई औंध,राजेंद्र गुरव *संयम* मोहाचा एक क्षण जसा माणसाला खोल  गर्तेत नेवू शकतो त्याचप्रमाणे संयमाचा एक क्षण माणसाला हिमालयाची उंची देऊ शकतो. संयमाचं लक्ष त्याचं आयुष्य घडू शकतो.  संयम  एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याची खासीयत असेलेली .सर्वसामान्यांना त्याचा परिसस्पर्श  प्राप्त झाला की त्याचे जीवन बदलणारी ती किमयगार असू शकेल !  सर्वसामान्य लोकांनी संयम राखण्याची स्वतःची  परीक्षा घेतली तर ती आयुष्याला दिशा देणारं  योग्य ठरू शकेल  ! वाहत्या पाण्याने धरणात संयम राखला आणि त्याच संचित वर्षभर टिकून राहील .तसं संयमाचंसंचित माणसाला आयुष्यभर मिळत राहील !  युधिष्टिर हा धर्मराज  !  तो संयमाने जीवनाला सामोरा गेला, त्यामुळे श्रीकृष्णाचा हात त्याच्या पाठीमागे सदैव राहिला . संयमाची भलावण करणारे ही गोष्ट कुठेतरी वाचलेली *एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चाँकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली*    मुलानो!  मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो, तो पर्यंत...

दृष्टी - आधारित

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३४ यमाई औंध,राजेंद्र गुरव *" दृष्टी"* माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचं वागणं हे त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. .. आणि योग्य दृष्टीचे देणे एखादा सर्वोत्तम गुरु देऊ शकतो. *गुरु विना कोण दाखवील वाट?* असं उगीच म्हटले जात नाही. माणसाचा दृष्टीकोन  त्याचं वागणं ठरवित असतो. .. आणि गुरूंकडून मिळाला योग्य उपदेश यामुळे माणसाचे जीवन आमूलाग्र बदलून जाऊ शकते. नयन...नयन नाव होतं त्याचं. प्रचंड हुश्शार, सातवीत सगळ्या तुकड्यांमधे पहिला आलेला तो...आठवीत नेनेसरांच्या वर्गात. हुश्शार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही ? नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, ऊर्मट, एखाद्या डाॅनसारखा कुप्रसिद्ध, आपल्याच शिक्षकांना तोंडघशी  पाडणारा, शिक्षकांची व्यवस्थित  नक्कल करणारा, निगरगट्टासारखा मार खायचा, वर फिदीफिदी  हसायचा, १००% गाॅन केस, पोरं सोडा, शिक्षकसुद्धा वचकून असायचे त्याला. दुसरा कुणी असता, तर कधीच एल. सी. हातात मिळालं असतं.. *कारण एकच..त्याची हुशारी...☝* स्काॅलरशीपच्या परीक्षेत सुद्धा जिल्ह्यात पहिला. शाळेला तो हवा होता आणि नकोही. १४ जून ...

बुद्ध पौर्णिमा

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३५ यमाई औंध,राजेंद्र गुरव * बुद्ध पौर्णिमा* गौतम बुद्धांची ही कथा तर प्रसिद्ध आहे. कित्येकदा वाचलेली,  ऐकलेली.                                      . ...युध्दातील लढवय्या हत्ती म्हातारपणी चिखलात रूतला. बराच प्रयत्न करून बाहेरच येता येईना. शेवटी मनाने खचून खाली बसला. माहूताने अनेक लोकांच्या सहाय्याने वेगवेगळया दोर्‍या-काठया वापरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. तेथून गौतम बुद्ध जात असताना लोकांनी ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी लोकांना हत्ती हा पूर्वीचा युद्धलढवय्या असल्याने चिखलाच्या चारही दिशेला युद्धाचे वातावरण तयार करून युद्धनगारे वाजवण्याचा सल्ला दिला. या कृतीने नगार्‍याचा ध्वनी ऐकून हत्ती शरीराची हालचाल करून उठून जोरात मुसंडी मारून चिखलाच्या बाहेर पडला. हत्तीच्या आत चिखलातून बाहेर पडण्याची प्रचंड ऊर्जा मुळातच होती. फक्त तिला जागवण्याचे काम लोकांनी युद्ध नगार्‍यांच्या माध्यमातून केले. म्हणून आपल्या आत असले...

१६५९_ श्री यमाई मंदिराचा गुरव पुजाऱ्यांकडून बचाव*

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३६ *सन १६५९_ श्री यमाई मंदिराचा गुरव पुजाऱ्यांकडून बचाव* श्री यमाई देवी मूळपीठ औंध हे अनेक लोकांचे आराध्य .अनेकांची कुलस्वामिनी !. शैव परंपरेतील अनेक मंदिर गुरव समाजाकडे असून परकीय आक्रमणात मध्ये  गुरव समाजाने अनेक मंदिरांचे रक्षण केले आहे. यवन आक्रमणापासून मंदिर वाचवली  आहेत.. श्री यमाई देवी औंध संदर्भाने चालुक्य काळापासून ज्या अनेक  ऐतिहासिक घटना झाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची घटना _ *सन १६५९.*. शिवरायांना ' जिंदा या ;मुर्दा पकडण्याची ' प्रतिज्ञा घेऊन विजापूरहून बलाढय अफजलखान बाहेर पडला. सपाट भागावर युद्ध झालेस ते आपले पथ्यावर पडेल , म्हणून राजेंना डोंगरी भागापून मैदानावर येण्यास भाग पडावे म्हणूनी खानाने अनेक  डाव टाकले . त्यातील एक डाव ', पूज्य देवस्थानावर आक्रमण व त्याची बातमी शिवरायांपर्यंत पोहचविणे ! मंदिरावर आक्रमण याची आर्थिक कारणही होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. मंदिरामध्ये अनेकवेळा संपत्ती साठवली जायची.... आणि सैन्य चालवण्यासाठी आर्थिक बळ हवे.  तुळजाभवानीवर खानाने चाल केली. यानंतर खान औंधाला येणार ही...

कौंडण पुर

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग  ३८ यमाई औंध,राजेंद्र गुरव *कौंडणपुर*  सह्याद्रीच्या कुशीत सिंहगड उर्फ कोंढाणा !त्याच्या पायथ्याशी कौंडणपुर*, तुकाई देवी मंदिर, देवीची मूर्ती साडेतीन फूट  काळ्या पाषाणातील, देवी चतुर्भुज _ ढाल तलवार, त्रिशूळ आणि एका हातात महिषासुराचे मस्तक !  मंदिर पूर्वाभिमुख, गर्भगृहाच्या बाहेर अंतराल ,सभामंडप ,द्वारमंडप अशी मंदिराची रचना ! सभामंडपाला पूर्व-दक्षिण व उत्तरेला दरवाजे !  मंदिर तंत्रविद्येतील श्री यंत्रातील रचनेनुसार स्थापित केलेले असून  चौथऱ्याची रचना त्या प्रकारची दिसते.  मंदिरा परिसरात मोगल काळातील मिनार आहेत, नगरखाना ही आहे.  शिखर रम्य व उंच आहे.  मुख्य मंदिरामध्ये इतर छोट्या देवता आहेत .संत निवृत्ती, सोपान व मुक्ताई यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतर मंदिरात वास्तव्य केले होते . छत्रपती शिवाजी महाराज, लो. टिळक अहिल्यादेवी होळकर इत्यादी महान विभूती मंदिरात आल्याच्या नोंदी आहेत . दैनंदिन धार्मिक कार्यक्रम  देवीचा साडेपाच वाजता अभिषेक होतो. नऊवारी साडी परिधान केली जाते .दूध दही, मध ,साखर इत...

प्रा हन्स - संकलित

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग  ३९ यमाई औंध,राजेंद्र गुरव  *व्यक्तीवेध : प्रा. सुरजित हन्स* - प्रा हन्स   यांनी इंग्रजी आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून बीए  केले. अभ्यास करताना ते मॅकबेथ आणि हॅम्लेट या नाटकांत महाविद्यालयीन रंगमंचावर छोटय़ा भूमिका केल्या तेव्हापासून ते शेक्सपिअरच्या प्रेमात पडले.. १९५५ मध्येच मॅकबेथचे त्यांनी पंजाबीत भाषांतर केले. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणून मिळालेली नोकरी करतानाच ते ‘रॉयल शेक्सपिअर कंपनी’चे सदस्य झाले.. आणि अखेर ‘शेक्सपिअरच्या सर्वच्या सर्व नाटय़कृतींचे पंजाबीत एकहाती भाषांतर करणारे’ अशी प्रा. सुरजित हन्स यांची एक ओळख उरली! - ‘एक ओळख’; कारण हे प्रा. हन्स १७ जानेवारीस निवर्तले, तेव्हा कथा, कादंबऱ्या, ‘पंजाबी साहित्यातून पंजाबच्या इतिहासाचे दर्शन’ हे संशोधनपर खंड, ‘जलियाँवाला बाग : एका राष्ट्रीय प्रतीकाचा उदय’ अशी स्वत: लिहिलेल्या एकंदर २५ पुस्तकांची यादीही त्यांच्या नावावर आहे. - साहित्याची आतून समज आणि अपार आवड या दोन गुणांपायी ते सतत लिहिते राहिले. अगदी अलीकडे चार्ल्स डार्विनच्या ‘द ...

अरुण सावंत

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग  40 यमाई औंध,राजेंद्र गुरव ❇ *⁠व्यक्तीवेध: अरुण सावंत* - एव्हरेस्टवरील पहिल्या आरोहणानंतर (१९५३) महाराष्ट्रात गिर्यारोहण या साहसी खेळाचा हळूहळू प्रसार होऊ लागला. सुरुवातीच्या टप्प्यात महाविद्यालयीन स्तरावर आणि त्याच वेळी काही तुरळक संस्थांतून गिर्यारोहणाची पाळेमुळे रुजत गेली. या पार्श्वभूमीवर, ऐंशी-नव्वदच्या दशकांत महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्र सह्याद्रीला भिडतानाच एक्स्पान्शन बोल्टसारखी साधने वापरू लागले. याच घडणीच्या काळात, १९७५ मध्ये अरुण सावंत यांची डोंगराशी ओळख झाली. १९८३ मध्ये नाणेघाटाजवळचा वानरलिंगी म्हणजेच खडा पारशी सुळक्यावर यशस्वी आरोहणानंतर सह्य़ाद्रीत सुळके आरोहणाचे पेवच फुटले. - अरुण सावंत यांनी या सुळके आरोहणात वेगाने मुसंडी मारली. नेचर लव्हर्स, हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्स्प्लोर्स अशा संस्थांनी एकत्रितपणे अनेक सुळक्यांवर आरोहणाचा धडाकाच लावला. अरुण सावंत यांनी त्यात चांगलीच आघाडी घेतली. डिसेंबर १९८३ मध्ये माहुलीतील भटोबा सुळका, पाठोपाठ एप्रिल १९८४ मध्ये सटाण्याजवळच्या तुंगी सुळक्यावर त्यांनी आरोहण केले. हरिश्चंद्रगडाजवळचा शेंडी...

मानवाचा अर्धयंत्रमानव - संकलन

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग  ४१ यमाई औंध,राजेंद्र गुरव ❇ *⁠ “व्योममित्र”: भारताचा ‘अर्धयंत्रमानव’ गगनयानातला सहभागी* -  ‘मानवी अंतराळ मोहीम आणि शोध’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ‘व्योममित्र’ या नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवाचे अनावरण करण्यात आले. - भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे. - कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो. - गगनयान मोहीम गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे...

कुणी ना पाहिले संकट ?

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग  ४४ यमाई औंध,राजेंद्र गुरव *जीवनी कुणाच्या आले ना संकट, कुणाचे जीवन सदा निष्कंटक*  ज्यानं आपल्या जीवनामध्ये संकट पाहिलं नाही, दुःख पाहीले नाही असा मनुष्यच नसावा  मुळी ! 'सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताएवढे ' ही मानवाची अवस्था आहे . पण आलेल्या परिस्थितीला माणूस कसे सामोरे जातो हेही महत्त्वाचे आहे. स्थितीचे रडगाणे गायचे कि तिला हसत-हसत समोर जायचे.  दुःखही चांगलंच झोंबतयं, अशी माणसाची प्रवृत्ती दुःखाला दुःख वाटू देणार नाही. सदानंदाचे रुप देण्याची ही प्रवृत्ती  व्यक्तीला वेगळ्या यशस्वी उंचीवर नेऊन ठेवेल ही निश्चित !  *अनुपम खेरचा हा एक किस्सा ऐकला होता.* *त्यात त्यांनी एक प्रसंग सांगितला, मनाला खूप भावला..* *'आखरी रास्ता' ची शूटिंग चालू होती. अनुपम खेर तयार होत होते. सेट वर एसी नव्हता..प्रचंड गर्मी होत होती. मी इतका मोठा कलाकार आणि आणि माझ्यासाठी एसी नाही, ह्या भावनेने त्यांचा इगो दुखावला गेला.* *त्यांनी व्यवस्थापन कमिटीला धाऱ्यावर धरलं.* *खूप काही ऐकवलं.*  *थोड्या वेळाने त्यांचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं..तिथे अम...

अथांग सागर, आईवडिल, जिराफ

Image

दिवसरात्र, गर्द काळोखात,गंध तुझा.

Image

सरडा

Image
प्रत्येक माणसांत एक सुप्त रंग बदलणारा जीव  असतो माणूस  मात्र त्याच्यावरती विश्वासाने गाफिल असतो बदलत नसतात रंग क्षणोक्षणी  त्याची ठरलेली एक वेळ  असते. त्या रंगात लपवलेल्या भरोशाला सप्तरंगी भावनेची किनार असते पावलात असते अति सावधानी भक्ष्यास कुठे नजरेची फिकीर असते निघून जाते वेळ, क्षणात केले जाते  लक्ष्य  विश्वासघाताला नात्याची मधुर लकेर असते. आपण नजरे आड करतोअनेक गोष्टी तो चाणाक्ष निष्णात फरडा असतो . निघून जाते वेळ तेव्हा कळते तो रंग बदलण्यात तरबेज सरडा असतो .                                    उदय जगदाळे                           8/5/202

सरडा

Image
सरडा

सामावले

Image

योद्धा

Image

Afazal Khan in 1659- yamaidevi Pujari

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३६ *सन १६५९_ श्री यमाई मंदिराचा गुरव पुजाऱ्यांकडून बचाव* श्री यमाई देवी मूळपीठ औंध हे अनेक लोकांचे आराध्य .अनेकांची कुलस्वामिनी !. शैव परंपरेतील अनेक मंदिर गुरव समाजाकडे असून परकीय आक्रमणात मध्ये  गुरव समाजाने अनेक मंदिरांचे रक्षण केले आहे. यवन आक्रमणापासून मंदिर वाचवली  आहेत.. श्री यमाई देवी औंध संदर्भाने चालुक्य काळापासून ज्या अनेक  ऐतिहासिक घटना झाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची घटना _ *सन १६५९.*. शिवरायांना ' जिंदा या ;मुर्दा पकडण्याची ' प्रतिज्ञा घेऊन विजापूरहून बलाढय अफजलखान बाहेर पडला. सपाट भागावर युद्ध झालेस ते आपले पथ्यावर पडेल , म्हणून राजेंना डोंगरी भागापून मैदानावर येण्यास भाग पडावे म्हणूनी खानाने अनेक  डाव टाकले . त्यातील एक डाव ', पूज्य देवस्थानावर आक्रमण व त्याची बातमी शिवरायांपर्यंत पोहचविणे ! मंदिरावर आक्रमण याची आर्थिक कारणही होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. मंदिरामध्ये अनेकवेळा संपत्ती साठवली जायची.... आणि सैन्य चालवण्यासाठी आर्थिक बळ हवे.  तुळजाभवानीवर खानाने चाल केली. यानंतर खान औंधाला येणार ही...

मीन

Image
तपस्वीला हि मोहित केले लतिके अनुपम  सौंदर्याने..  महाभारताचे बिजं अंकुरले मत्स्यगंधे तुझ्या रूपाने

नवे सूर

Image

स्पॉयडर मॅन

Image

भूतदया

Image
भूतदया

रणशिंग व शिंगवादकपांडूरंग गुरव

👁️🌴👁️ वाचावे आनंदे - ३१ *रणशिंगांची रणधुमाळी*  शिंग म्हणजे चैतन्य,स्फूर्ती.. अंगात शिरणारे वारे !  शिंग, तुतारी ,रणशिंग, मोगलशिंग पिंपोळी इत्यादी अनेक नावाने शिंग ओळखलं जायचं .स्वागतासाठी, स्फूर्ती दायक वातावरणासाठी  शिंग आणि युद्धभूमीवर ही रणशिंग फुंकले जायचं  उत्सव समारंभ यांची सुरुवात, पाहुण्यांचे स्वागत यासाठी शिंग फुंकले जाते.  भगवान शंकरांचे पाच शिष्य, त्यातील शृंगी नावाच्या शिष्याने महादेवांच्या विवाहावेळी नंदी बैलाचे शिंग  वाजवले. मंगलमय वातावरणात पुष्पवृष्टी वेळी, शिंग वाजले तेव्हापासून लग्नकार्यात शिंग वाजवण्याची प्रथा प्रचलित आहे .शृंगी यांनी आपल्या ओठाच्या साह्याने एकाच श्वासात  फुंकून जो नाद निर्माण केला ता शिंगनाद  म्हणून आजही प्रसिद्ध आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शिंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.   गडावरून पायथ्याशी असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला तुतारी मार्फत वेगवेगळे संदेश दिले जात . शिंगाचा जणू मोबाईल झालेला. तसेच युद्धात स्फूर्ती देण्यासाठी हर हर महादेव ,जय भवानी या गोष्टी बरोबर रणशिंगाची ही सा...

तारुण्य व वृद्धत्व

Image
तारुण्य व वृद्धत्व