*प्रसिद्ध दांडीयात्रा*
🌸🍃🌹🍂🌺🍃🌸

सरकारने गांधींच्या मागण्या फेटाळल्या. आणि १९३० च्या प्रसिद्ध सविनय कायदेभंग चळवळीचा पाया घातला गेला. ह्या आंदोलनाची पूरी जबाबदारी काँग्रेसने गांधींच्यावर सोपवली .गांधींचे नियोजन चालू झाले.

 मार्च१९३०मध्ये आपण मिठाचा कायदा मोडण्यासाठी सत्याग्रह चालू करणार, असा गांधींनी आपला निर्णय जाहीर केला. *आणि अनेकांना तो हास्यास्पद वाटला.काहींनी याची जाहीर टवाळी केली* कॉग्रेसमधीळ ज्ञानी वश्रेष्ठींना मात्र या निर्णयातील गम्य जाणवले .त्याचा लोकमाणसावरील अपेक्षीत परिणाम ही जाणवला .

मीठ हा सर्वसामान्यांच्या जीवनातील सर्वांचे दैनंदिन गरजांशी संबंधीत  होता. *अतिशय गरजेच्या वस्तूंवरही सरकार कर लादत आहे. आणि हा भारतीयांवर मोठा अन्याय आहे. याची जाणीवजागृती सर्वसामान्यांत करणे व त्यांना या अन्यायकारी कायदयाविरुद्ध उभे करण्याचे गांधींचे ध्येय होते.*
*यामागे योजना कुशलता होती. दूरदृष्टी हाती होती .होती मुत्सद्गिरी ही*

*सामान्यजनतेचा गांधींना पूरा अभ्यास होता. त्याना सार्थ अर्थाने आखिल भारतीय लोकनेते संबोधले जाते ते याच अर्थाने. * म गांधींचालोकसंपर्क दांडगा आणि लोकांचा या महात्मांवरील विश्वासही मोठा*.
त्यामुळे गांधींनी हाक मारली. तर लाखों जनता रस्त्यावर येईल. असा कयास अनेक महद् नेत्यांचा होताच.*

चळवळीचं नियोजन झालं आणि आणि गांधी आपल्या नेहमीच्या नियोजनाप्रमाणे कार्यरत झाले .
त्यांनी सरकारच्याबरोबर पत्रव्यवहार केला आणि सरकारने प्रस्थापित केलेल्या मिठाच्या कायद्याचा त्यांनी कडक शब्दात निषेध केला. या कायद्यामुळे गरीब जनतेवर अन्याय होत आहे .याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि हा अन्यायकारक कायदा तोडण्यासाठी 12 मार्च रोजी आपण आपल्या सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमाबाहेर पडू असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

 गांधीजीनी पाठवल्या पत्रास  अत्यंत त्रोटक उत्तर आले.
*गांधी आपल्या लोकांना चिथावणी देत आहेत , अराजक माजवित आहेत*.
गांधींनी यास दिलेले उत्तर जनभावना चेतविण्यास पुरेसे होते.
*सरकारला मी नम्रपणे भाकरी मागीतली तर त्यांनी दगड दिला.लीनपणे मागण्यास सरकार भीक घालीत नाही. कायदेभंग करावाचं लागणार,असे निर्वाणीचे शब्द होते गांधींचे*
* १२ मार्चला म गांधी आपल्या ७८ निवडक सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमांतून बाहेर पडले.सहकाऱ्यात सर्व प्रांत, धर्म,जात आणि महिलांच्या आग्रहांस्तव त्यांनाही प्रतिनिधीत्व दिले होते.
६२ वर्षांच्या महात्म्यांकडे नेतृत्वाची कमान, त्यांचा उत्साह तरुणांईला लाजवणारा. *तब्बल २४१मैलाचे अंतर.पदयात्रेत १०-१२ मैलाचे टप्पे, खेड्यात मुक्काम. रात्री सभा,प्रबोधन इ.*
गावोगावचे लोक दांडीयात्रेत मिसळत गेले. *वाटेवर परदेशी पत्रकारही,जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून ते स्तंभित होत. म गांधींच्या या प्रयोगाला देशात व देशाबाहेर प्रचंड प्रसिद्धी. ही निव्वळ पदयात्रा नव्हती. तर मुत्सद्गगिरीने राबविलेले असामान्य प्रचारतंत्र होते.अमेरिका, इंग्लड,जर्मनी,जगभरातून समर्थन संदेश आले.*

*२४ दिवसानंतर यात्रा मुक्कामी. म गांधींनी कायदा मोडताच ५००० गावी कायदा मोडण्याचे नियोजन होते. म गांधींना अटक झाली तरी नियोजन होते. ६ एप्रिल रोजी सकाळी म गांधी , सहकाऱ्यांसह समुद्रात उतरले. मीठांचा कायदा मोडला.जनक्षोमापुढे सरकारने दांडी येथे म गांधींना हात लावला नाही.मात्र चळवळीचा प्रसार न होण्यासाठी नेहरू,पटेल इ अनेकांना अटक झाली.*

सभा, मिरवणूकांवर बंदी झाली,वृत्तपत्रांवर निर्बंध. *म गांधी यांनी सूरतजवळील धारासना येथे जाऊन कायदेभंगाचा मनोदय सरकारला कळविला. म गांधींना अटक झाली.*
*गांधींच्या अटकेचे प्रतिसाद देशभर,देशाबाहेर उमटले.सर्व मातब्बर तुरुंगात मात्र चळवळ पेटलीच.सभा ,मिरवणूका,हरताळ,बहिष्कार,कायदेभंग यांना उधाण..१०० अमेरीकन धर्मगुरूंनी निवेदन पाठवून ब्रिटिश पंतप्रधानांनी कॉंग्रेसची तडजोड करावी असे विनविले. ***

तत्कालीन परिस्थितीवरील दोन प्रतिक्रिया दांडी यात्रेचे महत्व अधिकच विशद करतात.
*मीठ या शद्बाला अचानक एक आगळेवेगळे सामर्थ प्राप्त झाले. दैनंदिन गरजच्या साध्या वस्तूंच्या राष्ट्रीय चळवळीशी सबंध जोडणे आम्हांला सोपे वाटत नव्हते.  मात्र ही किमया म गांधी यांनी करून दाखविली* असे पं नेहरू उद्गारले.

म गांधींच्या प्रत्येक निर्यण्याचे चिकित्सक अभ्यासक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात - ... *आणिबाणीच्या वेळी म गांधींचे उपजत नेतृत्व, मुत्सद्गिरीचा किती उच्चांक गाठू शकते याची कल्पना आपत्याला मिठाने सत्याग्रहावेळी आली*.

म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510