*देशभक्तींच्या धारा*
🌸🍃🌺🍂🌿🍃🌿🌸

म गांधींना दांडी सत्याग्रहानंतर अटक झाली .मात्र म गांधींजींनी जाहीर केल्याप्रमाणे धारासना हे सत्याग्रहींचे पुढील ध्येय होते. म गांधीं नंतर अब्बास तय्यबजी नेतृत्व करणार त्यांनाही अटक.
सरकारने धारासनाच्या सर्व वाटा बंद केल्या. वाहतूकीवर बंदी .तरीही सुमारे ३००० सत्याग्रही मैदानी थडकलेच.

आता नेतृत्व होते सरोजिनी नायडूंकडे .त्यांनी पूर्वसंध्येला सर्वांना सत्याग्रहांच्या उद्दिष्टांची जाणीव करून दिली.लाठीमार झाला तरी प्रतीकार नको ,हे कळकळीचे आवाहन केले. मिठागारावर सर्वांनी एकदम न जाता तुकडीने जायचे ठरले.

२२ मेला सकाळी,१ली तुकडी रवाना.शांतपणे, शिस्तीत. मिठागाराला  सरकारी सैनिकांनी घेरलेले, काठी घेतलेले - बंदुका घेतलेले सैनिक....
सत्याग्रही मिठागाराजवळ पोहचले ... त्यांना माघारी पोहचविण्याचे आदेश..  सत्याग्रही चालतचं राहीले... लाठ्यांचा वर्षाव करीत सैन्य त्यांचेवर तुटून पडले.... डोक्यांवर,छातींवर वार होत होते. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भूमींवर पडत होते. नकळतही कोणाचा हात ,प्रतिकार करत नव्हता आणि कोणीही मागे हटत नव्हते. एक तुकडी संपली...
त्याची जागा दुसरीने घेतली... पहिल्या तुकडीवरील अमानुष अत्याचार यांनी पाहिलेले. तरीही कोणती भीती नाही, खदखद नाही.
दुसरी तुकडे पुढेच... पुन्हा ते पाशवी अत्याचार ... कोणाचे डोके फुटतयं, कोणाचा हात मोडतोय तर कोणाचा पाय ! खादीचे पांढरे कपडे रक्ताने भिजून जात होते.

... पुढची तुकडी तयारच! त्यांचा निर्धार अभंग.,दुपारी १ पर्यंत हा प्रकार चाललेला..घटना पाहणारे गोळा झालेले लोक, परदेशी पत्रकार यांना हा प्रकार पाहवेना.
या प्रसंगाचा साक्षीदार युनाइटेड प्रेसचा अमेरीकन वार्ताहर मिलर लिहतो
*अठरा वर्षाच्या माझ्या पत्रकारितेत, २२ देशातील जनआंदोलने मी पाहीली.पण धारासनासारखी हृदयद्रावक व चित्तथरारक घटना मी पाहिली नाही. तेथील दृश्य ऐवढे भयानक आणि लाजिरवाणे होते की उघड्या डोळ्याने ते बघवत नव्हते. निःशस्त्र सत्याग्रहावरील तो हल्ला पाहुन शिसारी येत होती.*

*दुपारी १ नंतर सत्याग्रही मिठागाराजवळ पोहचलेच. त्याच वेळी सरोजिनी नायडू,अलीइमाम, मणिलाल गांधी या नेते लोकांना अटक झाली. जखमी सत्याग्रही त्यांनीच उभ्या केलेल्या तंबूत थोडीफार उपचार घेऊन तळमळत पडलेले.सरकारने त्यांना वैद्यकीय मदत ही दिली नाही*

*धारासनाचा तो सत्याग्रह, सत्यांग्रहींनी झुंझार वृत्तीने केलला कायदेभंग. तीच वृत्ती दाखवित देशभर कायदेभंग पसरला. मुंबईत १५००० सत्याग्रहांनी सत्याग्रह केला.भीषण लाठीमारापुढे असीम धैर्य, निर्धार.*  *करबंदी, जंगल सत्याग्रह, परकीय मालाची होळी, दारुबंदीसाठी प्रदर्शने, मोर्चे,मिरवणूका,... लक्षावधी नागरिक, तरूण,वृद्ध, स्त्रीयां रस्तांवर, सरकारची दमननीती ,तरीही देशभक्तीचा महापूर***

म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510