आधु भारतचा नेता
म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता
🌸🍃☘🍂🌺🌸
गांधीजींच्या कामाने सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता. चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा येथील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली लढे यशस्वी झाली होते.
गांधींजी भारतातील विविध भागात, आडवळणी गावात, लाखों लोकापर्यंत आणि विविध विचारसरणीचे नेत्यांपर्यंत पोहचले होते.
1920 पर्यंत गांधीजींचे सामाजिक व राजकीय अभिसरण वाढले होते त्यांच्या भोवती लोकप्रियतेचे एक आगळेच वलय होते.
जनमानसात, ब्रिटीश सरकारात आणि काँग्रेसमध्येही त्यांच्या शब्दाला मान होता .गांधीजीनी या राष्ट्रीय संघटनेच्या घडणीत, स्वरूपात व उद्दिष्टात अनेक बदल घडवून आणले. ही संघटना सर्वसामान्यांसाठी कशी काम करेल? यावर गांधींचा जोर होता .काही ठराविक लोकांप्रती आणि काही शहरांमध्ये असलेली ही संघटना गांधीजींनी गावोगावी आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचली .गांधीजीं आपल्या कार्याने अनेक लोक जोडले होते .अनेक महत्त्वपूर्ण नेतेही गांधींना येऊन मिळाले आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ही राष्ट्रीय संघटना बनली. आता तिची कार्यमर्यादा काही शिक्षित लोकांपर्यंत न राहता ती सर्वसामान्य, गरीब लोकांच्या पर्यंत पोहोचली. अज्ञानी ,अशिक्षित लोक या चळवळीत सामील झाले .काही विशिष्ट मुद्द्यावर लढणारी ही संघटना असे तिचे स्वरूप बदलून सातत्याने संघर्ष करुन सर्वसामान्यांसाठी लढणारी, त्यांचे साठी कामे करणारी ,त्यासाठी आंदोलने उभारणारी आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारी संघटना म्हणून काँग्रेस उभी राहीली.त्याचबरोबर विधायक कार्यक्रमाच्या आधारे लोकांचे लहान-सहान प्रश्न सोडवणारी, लोकशिक्षणाची ,लोकजागृतीची आणि लोकसंघटनेची अखंड कामे करणारी सतत कार्य करणारी.सतत कार्य करणारी ही एकमेव राष्ट्रीय संघटना बनली
1920 आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षे आहे .गांधीजींच्या कार्यपद्धतीमुळे काँग्रेसची एकूण जडणघडण आणि कार्यपद्धती यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्यामुळे काँग्रेस संघटनेतील अग्रस्थान ,महत्त्वाचे स्थान गांधीजींच्याकडे येणे क्रमप्राप्त होते कालसंगत होते .
ऑगस्ट 1920 रोजी देशात गांधीजीनी अहिंसक ,असहकार चळवळीची गर्जना केली. या सुमारास घडलेले जालियनवाला बाग हत्याकांड व त्यासंबंधी सरकारची कार्यपद्धती, रौलेटच्या रूपाने आलेला काळा कायदा सरकारची दडपशाही आणि 1919 च्या सुधारणा कायद्यातील त्रुटीयुक्त तरतुदी , या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय राजकीय गोटात, जनमाणसांल सरकारविरुद्ध असंतोष होता. या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन गांधीजीनी सरकारविरुद्ध चळवळीची घोषणा केली.
काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजीनी कार्यक्रमाचा आराखडा मांडला चित्तरंजन दास ,मोतीलाल नेहरू, मोहम्मद अली जिना , लाला लजपतराय ,बिपिनचंद्र पाल या ज्येष्ठ नेत्यांनी गांधींच्या कार्यक्रमावर अनेक आक्षेप घेतले.तरीही गांधीजींचा कार्यक्रम बहुमताने मंजूर झाला.
डिसेंबर पर्यंत वरील नेत्यांपैकी लाला लजपतराय मोतीलाल, नेहरू, चित्तरंजन दास यांची गांधीजींच्या कार्यक्रमासंबंधी ,आंदोलनाबाबत अनुकूल मत तयार झाली.
काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या अधिवेशनातही गांधीजींचा कार्यक्रम पुन्हा मांडण्यात आला आणि नागपूरच्या या अधिवेशनात गांधीजींचा कार्यक्रम मंजूर झाला.याच्या निषेधार्थ अॅनी बेझंट, पंडित मालवीय ,जिना इत्यादी मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली.
मात्र एकूणच गांधीजींच्या भावी कार्याला प्रचंड बहुमताने सदस्यांनी साथ दिली होती... आधुनिक भारतीय पर्वाला सुरुवात झाली.
म गांधी १५० वी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
🌸🍃☘🍂🌺🌸
गांधीजींच्या कामाने सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता. चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा येथील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली लढे यशस्वी झाली होते.
गांधींजी भारतातील विविध भागात, आडवळणी गावात, लाखों लोकापर्यंत आणि विविध विचारसरणीचे नेत्यांपर्यंत पोहचले होते.
1920 पर्यंत गांधीजींचे सामाजिक व राजकीय अभिसरण वाढले होते त्यांच्या भोवती लोकप्रियतेचे एक आगळेच वलय होते.
जनमानसात, ब्रिटीश सरकारात आणि काँग्रेसमध्येही त्यांच्या शब्दाला मान होता .गांधीजीनी या राष्ट्रीय संघटनेच्या घडणीत, स्वरूपात व उद्दिष्टात अनेक बदल घडवून आणले. ही संघटना सर्वसामान्यांसाठी कशी काम करेल? यावर गांधींचा जोर होता .काही ठराविक लोकांप्रती आणि काही शहरांमध्ये असलेली ही संघटना गांधीजींनी गावोगावी आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचली .गांधीजीं आपल्या कार्याने अनेक लोक जोडले होते .अनेक महत्त्वपूर्ण नेतेही गांधींना येऊन मिळाले आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ही राष्ट्रीय संघटना बनली. आता तिची कार्यमर्यादा काही शिक्षित लोकांपर्यंत न राहता ती सर्वसामान्य, गरीब लोकांच्या पर्यंत पोहोचली. अज्ञानी ,अशिक्षित लोक या चळवळीत सामील झाले .काही विशिष्ट मुद्द्यावर लढणारी ही संघटना असे तिचे स्वरूप बदलून सातत्याने संघर्ष करुन सर्वसामान्यांसाठी लढणारी, त्यांचे साठी कामे करणारी ,त्यासाठी आंदोलने उभारणारी आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारी संघटना म्हणून काँग्रेस उभी राहीली.त्याचबरोबर विधायक कार्यक्रमाच्या आधारे लोकांचे लहान-सहान प्रश्न सोडवणारी, लोकशिक्षणाची ,लोकजागृतीची आणि लोकसंघटनेची अखंड कामे करणारी सतत कार्य करणारी.सतत कार्य करणारी ही एकमेव राष्ट्रीय संघटना बनली
1920 आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षे आहे .गांधीजींच्या कार्यपद्धतीमुळे काँग्रेसची एकूण जडणघडण आणि कार्यपद्धती यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्यामुळे काँग्रेस संघटनेतील अग्रस्थान ,महत्त्वाचे स्थान गांधीजींच्याकडे येणे क्रमप्राप्त होते कालसंगत होते .
ऑगस्ट 1920 रोजी देशात गांधीजीनी अहिंसक ,असहकार चळवळीची गर्जना केली. या सुमारास घडलेले जालियनवाला बाग हत्याकांड व त्यासंबंधी सरकारची कार्यपद्धती, रौलेटच्या रूपाने आलेला काळा कायदा सरकारची दडपशाही आणि 1919 च्या सुधारणा कायद्यातील त्रुटीयुक्त तरतुदी , या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय राजकीय गोटात, जनमाणसांल सरकारविरुद्ध असंतोष होता. या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन गांधीजीनी सरकारविरुद्ध चळवळीची घोषणा केली.
काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजीनी कार्यक्रमाचा आराखडा मांडला चित्तरंजन दास ,मोतीलाल नेहरू, मोहम्मद अली जिना , लाला लजपतराय ,बिपिनचंद्र पाल या ज्येष्ठ नेत्यांनी गांधींच्या कार्यक्रमावर अनेक आक्षेप घेतले.तरीही गांधीजींचा कार्यक्रम बहुमताने मंजूर झाला.
डिसेंबर पर्यंत वरील नेत्यांपैकी लाला लजपतराय मोतीलाल, नेहरू, चित्तरंजन दास यांची गांधीजींच्या कार्यक्रमासंबंधी ,आंदोलनाबाबत अनुकूल मत तयार झाली.
काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या अधिवेशनातही गांधीजींचा कार्यक्रम पुन्हा मांडण्यात आला आणि नागपूरच्या या अधिवेशनात गांधीजींचा कार्यक्रम मंजूर झाला.याच्या निषेधार्थ अॅनी बेझंट, पंडित मालवीय ,जिना इत्यादी मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली.
मात्र एकूणच गांधीजींच्या भावी कार्याला प्रचंड बहुमताने सदस्यांनी साथ दिली होती... आधुनिक भारतीय पर्वाला सुरुवात झाली.
म गांधी १५० वी जयंती वर्ष
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment