*आंदोलने शांत असताना..*
🌸🍃☘🍂🌺🍃🌸

असहकार चळवळ शांत झाली आणि गांधीजींनी आपले आणखी एककाम सुरू केले .
शासकांच्या विरुद्ध लढताना जनता सर्व बाजूंनी सक्षम पाहिजे, यासाठी लोकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे गांधींनी मनोमन ठरवले होते.

 गांधीजी पुन्हा लोकांच्यांमध्ये जाऊन मिसळू लागले.
 ग्रामीण लोकांमध्ये  लोकजीवन कसे. आहे .लोकांच्या समस्या काय आहेत?लोकांच्या सुप्तशक्ती काय आहेत ? लोकांच्या भावना काय आहेत? याचा अभ्यास करण्यासाठी म गांधी गावोगावी फिरत होते.
 गांधींनी देशाचा हा दौरा काढला  होता.या दौऱ्यामध्ये अनेक लोकांना गांधीजींना प्रत्यक्ष भेटता आले, गांधीजींना अनुभवता आले ,गांधींचे विचार अनुभवतताआले. हा सन्यं स्त योध्दास लोकांना पाहता आले.

 या गावभेटीत गांधीजी  खादीचा प्रचार करीत.
गावोगावी जाऊन लोकांना स्वच्छतेचे संदेश देत .गावागावातील सफाईवर म गांधींचा भर होता.
म गांधी ठायोठायो सभा भरवीत. लोकांना ऐकीने राहण्याचे महत्व सांगत. त्यासाठी स्पृश-अस्पृशतेचे भिंती दूर केल्या पाहिजेत हे समजावत.
हिंदू - मुस्लीम एकीसाठी प्रयत्न करीत.
स्वत : भंगीकाम करीत. आपल्या कामातून श्रमप्रतिष्ठेस महत्व देत. गावागावातील कुटीर उद्योंगाचा आढावा घेत.

*लोकभावना ,राष्ट्रभावनेस पूरक करणेस अत्यंत कठोर,सातत्याने प्रयत्न म गांधींनी  केले. या महात्म्यांचे सहवासाने कोटयावधी जनता नव स्फुल्लींग घेत असे.*

म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510