Posts

Showing posts from January, 2018

गुण गाईन Gun gayin

🌞 ज्ञाती बांधवाना दिलासा देणारा, त्यांचे गुण सांगणारा माणूस🌝 वडील माणूस, जाणकार , गुणवान यांचे विषयी भरभरून बोलणे, स्पष्ट बोलणे हा राजेंद्र गुरव यांचा गुणधर्म - देवळातील कामा बद्दल लोक राजेंद्रला भरभरून  प्रतिक्रिया देताना आपणांस मदत करणाऱ्यांचे श्रेय देण्यास राजेंद्र चुकत नसे. मंदिरात लिहिलेल्या असंख्य श्रेयनामावली त्याचेच द्योतक आहेत. ... आमची आई अशी वागली.. पण हणमंत सरांनी ते बाजूला सारले अलीकडे अमोलच्या विचारात फरक पडत चालला आहे. हा गुरव उत्तम शिंग वाजवतो ( राजेंद्र गुरव प्रस्तुत यमाई कॅसेट मध्ये थुई थुई . शिंगाला गाणे लिहून ही व्यक्ती व गुरव शिंग प्रसिद्ध केले. ) या व्यक्तीने आपले गुडघे झिजवले पण गुरवांना गुडघे टेकू दिले नाही. ही व्यक्ती अपघातातून बाहेर आली आहे. पण मनापासून सेवा करते या दोघांनी दुसऱ्या गावातील गुरवांना पूजा मदत केली. त्यांचे अनुकरण हवे. ही व्यक्ति माझेवर आता चिडली आहे पण त्यांनी समाजाचे भले केले आहे. राजेंद्रने कित्येकांचे अभिनंदन ठराव पास केले आहेत. धन्य यमाई विचारांची

Speech as president sharavni श्रवणी भाषण

॥ हक्काची अनं कर्तव्याची जाणीव झाली तर गुरवसमाज मोठा होईल ( श्रावणी २०१५ च्या मा.श्री राजेंद्र गुरव यांचे भाषणातून ) निव्वळ मानवी हक्क दिना दिवशी मानवतेचा उदोउदो करून उपयोग नाही. हक्काची जाणीव ही सुद्धा प्रक्रिया आहे. जिथे भगवान शिवा सारख्या सर्वमान्य प्रतिकालाही दूषीत करण्याचे प्रयत्न झाले ( शंकर हा भोलेनाथ , पण त्यास भोळे बनविण्यात आले. ) . तिथे मंदिरात अडकून बसल्यांची काय कथा ? गुरव समाजाच्या व्यथा जर दूर करावयाच्या असतील तर आपल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव गुरवांचे डोक्यात हवी... मंदीरातील प्रत्येक कृतीला त्याची पाश्र्र् वभूमी हवी *राजेंद्र गुरवअध्यक्षीयभाषण खटाव तालुका गुरव समाज श्रावणी* सोहळा* )

प्रतिक्रिया - दत्त Datta

Garima गदिमा

॥ ग दि मा - औंधाचे ॥ काल गदिमांचा स्मृतीदिन .. औंधमध्ये कित्येक दिन त्यांचे स्मृतीसह आलेले. श्री.श्री चा विद्यार्थी, पंचवटी वसतीगृह, अभिनेते गदिमा . मंतरलेल्या दिवसांचे औंध सगळाच अभिमानास्पद वारसा ! किती सुंदर पोस्ट वाचल्या काल ! आज आपण त्यांच्या पाईक व्हावे असे ठरवूया, कला, खेळ वा इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देवूया ! चांगल्याची ओळख ग्रुपला करुन देवूया ! श्री दत्तात्रय शिंदे म्हणजे स्वामी समर्थ आश्रमातील दादा ! त्यांनी या पुण्यपर्वात दिलेली प्रतिक्रिया चिरंतन स्मरणीय राहिल ! अध्यात्म्य क्षेत्रातील वडिलकिच्या नात्याने त्यांनी  दिलेल्या या हार्दिक मनोकामना [08/12 08:48] Shinde Dattatraya: 💐हार्दिक अभिनंदन.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.! ✌मी औंधमध्ये जेव्हां कधी एखाद्या कार्यक्रमात दोन शब्द बोलतो, तेव्हां "औंध नगरी ही रत्नांची खाण आहे" असा आवर्जून उल्लेख करतो. इतिहास साक्षी आहे. परम आदरणीय कै. बाळासाो. पंत प्रतिनिधी, गदिमा, साने गुरूजी यांच्या रूपाने हे सिध्द झालेच आहे. आपली प्रतिभासुध्दा कमी नाही.! आपल्या रूपाने या नगरीच्या नावलौकिकात आणखी...

सुविचार, Good thought

॥ श्री.यमाई प्रसन्न ॥        श्री.यमाई मंदिरात श्री.राजेंद्र गुरव यांनी अनेक प्रकारचे विचार , माहिती भक्त लोकांसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रासंगिक माहिती लोकांना आवडली आहे.तसेच त्यांचे उत्स्फूर्त विचार ही ! ३०.११.१६ ला लिहलेला हा सुविचार त्यांचे भाषेत 🕉💐🕉 ' गोठलेले आचार सुधारण्यासाठी सूर्यप्रकाश उपयोगी पडतो. तसेच विचारांबाबत ज्ञानप्रकाश आपले काम करीत असतो. '                               जय जगदंब !                            यमाई मंदिर, औंध 🕉( सकाळच्या थंडीत श्री.यमाई मंदिरात सूचलेला विचार .🕉

zings shinga झिंगा - शिंगा

[22/12/2016 8:34 am] ‪+91 75882 01988‬: 🌞 शिंगा- झिंगा 🌝 तळ्याकाळी शंकराचे मंदिर, गुरव खोल पायऱ्या उतरून ,पाणी आणून शंकराला घालायचे . आता गुरव आहे शिंगा. झिंगा वामन शिंगाकडे आला म्हणाला _ ' मी मासे धरू का , दक्षिणा देतो. शिंगा गुरव विचारात,  वामन म्हणाला - मी पाणी काढून देईन तुला. शिंगाला पोहायला येत नव्हते. 'ठीक आहे , पण पैसे वेळेवर दया ! वामन पाणी आणून देतो. मी घालू का पाणी देवाला : शिंगा विचारात ' आमचही भक्ती आहे. तुझा हात पण दुखतोयं ना ! ' वामन आता पूजा, अर्चा ही करी ! ऐके दिवशी वामन उशीरपर्यंत आला नाही ! शिंगा गुरव गडबडीने पाणी आणण्यास उतरला,   बऱ्याच दिवसाने घसरला, पाण्यात पडला, ओरडला ,बुडला काठावर झिंगा वामनाचा हासण्याचा आवाज घुमला ! आता वामन सगळ्या गुरवाना सांगतो.मी झिंगा नाव पहा ,तळ्यावर पाण्यावर  मास्यावर माझा अधिकार ! मी पूजा केली दक्षिणा माझी . ! तुम्ही फुका (चे ) शिंगा गुरव ! गेली २० वर्ष तो ही गोष्ट गुरव भक्तांना सांगतोय, सगळ्यांच्या डोक्यात : शिंगाची पोरं मोठी झाली. रंगा अनं नंगा रंगाने रंगून अभ्यास केला. रंगा -. ' झ...

Vadapav read by me , वडापावचा इतिहास

*वडापावाचा इतिहास....*🌹🌹🌹 मी वाचलेले काही लेख ७                  यमाई औंध, राजेंद्र गुरव आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? Being Marathi टिम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे.. 1965-70 चा तो काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या,उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेल...

Read by me 4 , वाचलेले लेख ४

"मी वाचलेले काही लेख ४ .                  यमाई औंध, राजेंद्र गुरव "अभिमान वाटण्यासारख्या ज्या उज्ज्वल घटना भूतकाळात घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी आपल्या मनात गौरव वाटणं स्वाभाविकच असतं. ज्यांच्यामुळं त्या घटना घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता जरूर बाळगली पाहिजे. त्याचं यथोचित स्मरणही ठेवलं पाहिजे. ते संतुलित मार्गांनी व्यक्तही केलं पाहिजे. तसेच, वर्तमानकाळात आपली क्रियाशीलता योग्य दिशेनं वाढवण्यासाठी आणि भविष्यकाळात कर्तृत्वाची उंच शिखरं गाठण्यासाठी भूतकाळातील इतिहासापासून बोध आणि प्रेरणाही जरूर घेतली पाहिजे. अनेकदा बोधही घेतला जात नाही, कृतज्ञताही बाळगली जात नाही, प्रेरणाही घेतली जात नाही आणि मग महान वारसा देखील वाया जातो. भारतीय इतिहासात असं फार फार वेळा घडलं आहे. हे पुन्हा होऊ नये, म्हणून दक्षता घ्यायलाच हवी." *(संदर्भग्रंथ : अंधाराचे बुरुज ढासळतील, प्रकाशन : लोकायत प्रकाशन, सातारा, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १५)* https://www.facebook.com/Subhashite/🦋☘🌷🌱☘🌷🦋 यमाई औंध, राजेंद्र गुरव 8275370028, gurar...

Read by me 3, वाचलेले लेख ३

मी वाचलेले काही लेख ३                  यमाई औंध, राजेंद्र गुरव रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर आला. मुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे. जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल. मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत. तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना? पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या. आम्...

Read by me 1 वाचलेले लेख १

👁🌴👁मी वाचलेले काही लेख                 यमाई औंध,राजेंद्र गुरव *कुरुंदकर आजही समकालीन आणि पथदर्शक आहेत*       ... हे आश्चर्य आणि दुर्दैवही. ते लिहितात, "आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो. समाजाचे हे चिडणे मी समर्थनीय नसले तरी क्षम्य मानतो; पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असं मला वाटत नाही. जोपर्यंत मी हे सर्वसामान्य भाषेत बोलत आहे, तोपर्यंत सगळे ठीक आहे. पण मी उद्या लो. टिळकांच्या मर्यादा दाखवू लागलो, तर पुणे खवळणार! राजर्षी शाहूंच्या मर्यादा दाखवू लागलो तर कोल्हापूर खवळणार! आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मर्यादा दाखवू लागलो तर नवबौद्ध खवळणार, हे मला माहीत आहे. मी जे विवेचन करीन ते सर्वस्वी बरोबर आणि सर्वमान्य ...

रंग प्रभातीचे ५० वा भाग, Golden jubally

👁🌴👁 *रंग प्रभातीचे*. *आकाशीचे* ..  चा हा पन्नासावा अन शेवटचा , निरोपाचा भाग . आपल्या सर्वांची गेल्या पन्नास दिवसांची  आपुलकीची सुरुवात - ' प्रभातीच्या या विविध रंगाने होत आलेली आहे हे माझे प्रातः फेरफटक्यात घेतलेला तेजो-छाया वेध आहेत. छाया घेताना मनात डोकावलेली कल्पना शब्द रुपात  मांडलेली आहे.                 वाचावे आनंदे , वाचलेल्या अन कुठंतरी साचलेल्या  कविता ' , स्फूट अन प्रासंगिक लेखन, चित्र त्यांचे शब्द आपुले..या सदराप्रमाणे रसिक व चोखळंद वाचकांचा  यास प्रतिसाद मिळाला. जुन्या, परिचीत वाचकांचा  परिचय  वृद्धींगत झाला.. नव्यांशी  गाठ पक्की होत आहे. सर्वशक्तीमान सूर्य दर्शनावेळी सूचलेले विचार यमाई मंदिरातील फलकावर लिहित आलो. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला ! .  श्री.यमाई मंदिर - ३०.११. १६ ' *गोठलेले आचार* *सुधारण्यासाठी सूर्यप्रकाश उपयोगी पडतो*. *तसेच विचारांबाबत ज्ञानप्रकाश आपले काम करीत असतो.* '    जय जगदंब !    यमाई मंदिर, औंध ( सकाळच्या थंडीत श्री.यमाई मंदिर...

वाचावे आनंदे_ मनोगत १

👁॥ *रंग प्रभातीचे.. आकाशीचे* ॥👁 माझी सकाळ सुरु होते एक तर श्री.यमाई पूजेने वा मंदिर नसेल तर पदभ्रमंतीने..  डोळे दृष्टाचा ठाव घेतात.. अन हृदय शब्दांचे पार्श्व संगीत ! जे कॅमेऱ्यानं टिपलं - ते तसेच मांडले ! जे सहज स्फुरले ते - सांडले.. उधळले ! कुणा त्यातील क्लिक आवडली कुणा शब्द ! कुणा छाया .. तेजाच्या कल्पना तर कुणा सूर्याच्या वल्गना ! मी काही कुणी व्यावसायिक छायाचित्रकार नाही.. पण एवढया लोकांना ते आवडावे .. कारण ते फोटो सर्वशक्तीमान सूर्याचे आहेत ! . वाचावे आनंदाचे ३३ कोटी प्रकार अनं  व ज्याने रौप्य महोत्सवाचे पुढे गेलेला ' वाचलेल्या अन कुठंतरी साचलेल्या कविता ' -. ज्यावर रसिकांनी मोठ्या मनाने दसऱ्याची सोन्याची उधळण केली ! रंग प्रभातीचे .. हा उपक्रम माझ्या एका फोनमधील ५१ whatsapp.ग्रुप , दुसऱ्या फोनमधील ९ ग्रुप २ निवडक ब्रॉडकास्ट लिस्ट , माझे वैयक्तिक उपक्रम,.. माझे मित्रांचे मिडिया व न्यूज ग्रुपद्वारे असंख्य लोकांकडे रवाना होत आहेत.. आई जगदंबेची कृपा असावी ! सगळ्याचं प्रतिक्रिया पाहताही येत नाही. सूर्याचे तेज वर्णिता येत नाही . : तरीही प्रसिद्ध छायाचित्रकार ह...

Happy new year, नूतन वर्षाभिनंदन

👁🌴👁 यमाई औंध, राजेंद्र गुरव 🌿🍀पालवी🍀🌿 🌞 *गुढी उदयाची उंच धरू* 🕉 *आमचं नववर्ष सुरू होतं ऋतूचक्रांच्या नियमांवलीनंं ! *वसंताच आगमन होतं..., नवपालवी फुटते वृक्ष - पल्लवींना...!*  *त्याचं एक ऋतू चक्र पूर्ण होतं आणि आमच्या जीवनवेलीचही* ! *३१ डिसेंबरप्रमाणे आम्ही रात्री नववर्ष साजरं करीत नाही*.. *सर्वशक्तीमान सूर्याच्या साक्षीनं आम्ही नवसंकल्पनांच्या गुढ्या उभारीत असतो*... ; *त्याची कमान नभाच्या माथ्याकडे पहात  उन्नत होत असते....  मदिरेसंगे भूमीवर लोटांगणे घालत नाहीत ती* ! *अतिरेकी खाद्यांच्या  पार्टीपेक्षा शरीरोपयोगी कडुलिंब आम्ही गोड मानूनी घेतो.* *डॉल्बीच्या संगे केलेल्या हातवाऱ्यांपेक्षा - मंगलवाद्यांची ललकारी पाडव्याला प्रिय आहेत. फटाक्यांच्या नांदीपेक्षा आप्तजणांची  भेट आम्हांस प्यारी ! समष्टिच्या हितचिंतनाचं ह्दयगीत पाडवा गातो.... जनप्रगतीच्या वाटा शोधतो.. नवसंकल्पाच्या नियोजनात शक्ती खर्ची घालतो आणि सर्वांच्याच कल्याणाची अपेक्षा करतो !* सर्वांना शुभेच्छा. .. शुभ भवंतु ! (मूळलेख - पाडवा २०११, पुनर्प्रसिद्धी १.१. १८) 🕉🦅🌿🌿🌸☘ यमाई औ...