Mahatma Gandhi again, म गांधी पुन्हा
*म.गांधी .. पुन्हा अनुभवताना !*
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🇮🇳☘🌺🌿💫🦅
विविध राजेशाहीच्या अनं विशेषतः मराठी साम्राज्याच्या पतनानंतर उभ्या भारताने गुलामीचे अंधारयुग पाहिले होते. परकिय सत्तांची आपल्याला परंपरा आहेच . या सत्तांची दडपशाही आपण पिढयांन पिढया पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे.
परकीय अंमल पाचवीला पूजलेला !..
त्या गुलामगिरीविरुद्ध विविध प्रकारे दिलेला लढा हा आपल्या इतिहासाचा भाग होऊन राहिला आहे.
अशाच काळाच्या एका तुकड्याने पिचलेल्या भारतीयांना निर्भयतेचा मंत्र दिला म.गांधींनी !
परकीयांच्या सत्ते विरूद्ध लढताना
गांधीनी भारतीयांना निर्भयता दिली, सत्यशक्ती दिलेली, स्वतःहून काम करण्याचा आत्मविश्वास दिला आणि सदृढ नैतिक शक्तीही दिली .
राष्ट्राला राष्ट्रपण देणाऱ्या गांधीजीच्या वैचारिक शक्तीमुळे, व्यवहारी अधिष्ठांनामुळे भारतातील विविध वैचारिक पंथ, लोक एकात्म झाले . त्या सर्वांचे नेतृत्व करून गांधीजींनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला,म्हणूनच महात्मांजींना राष्ट्रपिता म्हणून यथार्थपणे गौरवितात !
हिंसाचाराचे थैमानाने ,विध्वंस - विनाशाच्या हैवानांनी हे जग ज्या-ज्या वेळी त्राही भगवान झाले आहे , त्या -त्या वेळी म.गांधीची आठवण आपणास झाली आहे.
जगभर म.गांधी त्यांच्या अहिंसेचे तत्वज्ञानाबद्दल स्मरले जातात. अहिंसेचे पुजारी म्हणून म.गांधीजी जागतिक शांतीदूत ठरले आहेत, ठरत आहेत.
(म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,)🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🇮🇳☘🌺🌿💫🦅
विविध राजेशाहीच्या अनं विशेषतः मराठी साम्राज्याच्या पतनानंतर उभ्या भारताने गुलामीचे अंधारयुग पाहिले होते. परकिय सत्तांची आपल्याला परंपरा आहेच . या सत्तांची दडपशाही आपण पिढयांन पिढया पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे.
परकीय अंमल पाचवीला पूजलेला !..
त्या गुलामगिरीविरुद्ध विविध प्रकारे दिलेला लढा हा आपल्या इतिहासाचा भाग होऊन राहिला आहे.
अशाच काळाच्या एका तुकड्याने पिचलेल्या भारतीयांना निर्भयतेचा मंत्र दिला म.गांधींनी !
परकीयांच्या सत्ते विरूद्ध लढताना
गांधीनी भारतीयांना निर्भयता दिली, सत्यशक्ती दिलेली, स्वतःहून काम करण्याचा आत्मविश्वास दिला आणि सदृढ नैतिक शक्तीही दिली .
राष्ट्राला राष्ट्रपण देणाऱ्या गांधीजीच्या वैचारिक शक्तीमुळे, व्यवहारी अधिष्ठांनामुळे भारतातील विविध वैचारिक पंथ, लोक एकात्म झाले . त्या सर्वांचे नेतृत्व करून गांधीजींनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला,म्हणूनच महात्मांजींना राष्ट्रपिता म्हणून यथार्थपणे गौरवितात !
हिंसाचाराचे थैमानाने ,विध्वंस - विनाशाच्या हैवानांनी हे जग ज्या-ज्या वेळी त्राही भगवान झाले आहे , त्या -त्या वेळी म.गांधीची आठवण आपणास झाली आहे.
जगभर म.गांधी त्यांच्या अहिंसेचे तत्वज्ञानाबद्दल स्मरले जातात. अहिंसेचे पुजारी म्हणून म.गांधीजी जागतिक शांतीदूत ठरले आहेत, ठरत आहेत.
(म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,)🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳
Comments
Post a Comment