Posts

Showing posts from October, 2019
म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 🌸🍃☘🍂🌺🌸 गांधीजींच्या कामाने सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता.  चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा येथील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली लढे यशस्वी झाली होते. गांधींजी भारतातील विविध भागात, आडवळणी गावात, लाखों लोकापर्यंत आणि विविध विचारसरणीचे नेत्यांपर्यंत पोहचले होते.  1920 पर्यंत गांधीजींचे सामाजिक व राजकीय अभिसरण वाढले होते त्यांच्या भोवती लोकप्रियतेचे एक आगळेच वलय होते. जनमानसात, ब्रिटीश सरकारात आणि काँग्रेसमध्येही त्यांच्या शब्दाला मान होता .गांधीजीनी या राष्ट्रीय संघटनेच्या घडणीत, स्वरूपात व उद्दिष्टात अनेक बदल घडवून आणले. ही संघटना सर्वसामान्यांसाठी कशी काम करेल? यावर गांधींचा जोर होता .काही ठराविक लोकांप्रती आणि काही शहरांमध्ये असलेली ही संघटना गांधीजींनी गावोगावी आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचली .गांधीजीं आपल्या कार्याने अनेक लोक जोडले होते .अनेक महत्त्वपूर्ण नेतेही गांधींना येऊन मिळाले आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ही राष्ट्रीय संघटना  बनली. आता तिची कार्यमर्यादा काही शिक्षित लोकांपर्यंत न राहता ती सर्वसामान्य, गरीब लोकांच्या ...
*कायदेभंगाचे फलीत* 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 सविनय कायदेभंगाची चळवळ भारतभर जोमाने पसरली. सरकारच्या जुलूमशाहीचा वरवंटा फिरला. सहा-सात महिन्यात  एक लाखावर लोक तुरुंगात डांबले गेले . ... आणि सविनय कायदेभंगाच्या सर्वात मोठे वैशिष्ट्य ,सर्व स्तरावरील लोक यात सामील झाले. मुंबईतील गिरणी मालकांनी ,कारखानदार आणि व्यापारी यांनी चळवळीला सढळ हाताने मदत केली. या चळवळीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील महिलांनी या चळवळीत सहभाग घेतला .सामान्य कुटुंबातील महिलांप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातील वृद्ध स्त्रीयांआणि तरुण मुलीही चळवळीत सामील झाल्या आणि हसतमुखाने त्यांनी तुरुंगवास स्वीकारला. चूल आणि मूल एवढीच व्याप्ती असलेली स्त्री ,ही भारतीय स्त्रीची ओळख . ,आणि  घराबाहेर  पाऊल न टाकणाऱ्या , प्रतिष्ठित कुटुंबातील महिला हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर मिरवणूका काढत होत्या. पोलिसांच्या लाठ्यांचे प्रहार सहन करत होत्या. आणि हे सर्व पाहून परदेशी पत्रकारही चकीत होत होते. हे सारे अद्भुत होतं .भारतीय महिलांची ब्रिटिशांच्या जोखडापासून दूर होण्याची धडपड आणि त्यांच्या देशप्रेमाचा हा अपूर्व आविष्कार होता.  ...
*देशभक्तींच्या धारा* 🌸🍃🌺🍂🌿🍃🌿🌸 म गांधींना दांडी सत्याग्रहानंतर अटक झाली .मात्र म गांधींजींनी जाहीर केल्याप्रमाणे धारासना हे सत्याग्रहींचे पुढील ध्येय होते. म गांधीं नंतर अब्बास तय्यबजी नेतृत्व करणार त्यांनाही अटक. सरकारने धारासनाच्या सर्व वाटा बंद केल्या. वाहतूकीवर बंदी .तरीही सुमारे ३००० सत्याग्रही मैदानी थडकलेच. आता नेतृत्व होते सरोजिनी नायडूंकडे .त्यांनी पूर्वसंध्येला सर्वांना सत्याग्रहांच्या उद्दिष्टांची जाणीव करून दिली.लाठीमार झाला तरी प्रतीकार नको ,हे कळकळीचे आवाहन केले. मिठागारावर सर्वांनी एकदम न जाता तुकडीने जायचे ठरले. २२ मेला सकाळी,१ली तुकडी रवाना.शांतपणे, शिस्तीत. मिठागाराला  सरकारी सैनिकांनी घेरलेले, काठी घेतलेले - बंदुका घेतलेले सैनिक.... सत्याग्रही मिठागाराजवळ पोहचले ... त्यांना माघारी पोहचविण्याचे आदेश..  सत्याग्रही चालतचं राहीले... लाठ्यांचा वर्षाव करीत सैन्य त्यांचेवर तुटून पडले.... डोक्यांवर,छातींवर वार होत होते. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भूमींवर पडत होते. नकळतही कोणाचा हात ,प्रतिकार करत नव्हता आणि कोणीही मागे हटत नव्हते. एक तुकडी संपली... त...
*प्रसिद्ध दांडीयात्रा* 🌸🍃🌹🍂🌺🍃🌸 सरकारने गांधींच्या मागण्या फेटाळल्या. आणि १९३० च्या प्रसिद्ध सविनय कायदेभंग चळवळीचा पाया घातला गेला. ह्या आंदोलनाची पूरी जबाबदारी काँग्रेसने गांधींच्यावर सोपवली .गांधींचे नियोजन चालू झाले.  मार्च१९३०मध्ये आपण मिठाचा कायदा मोडण्यासाठी सत्याग्रह चालू करणार, असा गांधींनी आपला निर्णय जाहीर केला. *आणि अनेकांना तो हास्यास्पद वाटला.काहींनी याची जाहीर टवाळी केली* कॉग्रेसमधीळ ज्ञानी वश्रेष्ठींना मात्र या निर्णयातील गम्य जाणवले .त्याचा लोकमाणसावरील अपेक्षीत परिणाम ही जाणवला . मीठ हा सर्वसामान्यांच्या जीवनातील सर्वांचे दैनंदिन गरजांशी संबंधीत  होता. *अतिशय गरजेच्या वस्तूंवरही सरकार कर लादत आहे. आणि हा भारतीयांवर मोठा अन्याय आहे. याची जाणीवजागृती सर्वसामान्यांत करणे व त्यांना या अन्यायकारी कायदयाविरुद्ध उभे करण्याचे गांधींचे ध्येय होते.* *यामागे योजना कुशलता होती. दूरदृष्टी हाती होती .होती मुत्सद्गिरी ही* *सामान्यजनतेचा गांधींना पूरा अभ्यास होता. त्याना सार्थ अर्थाने आखिल भारतीय लोकनेते संबोधले जाते ते याच अर्थाने. * म गांधींचालोकसंपर्क दां...
विज्ञान आणि गांधी 🌸🌿🍃🌺🍂🍃🌸 सामान्यपणे असे मानले जाते की गांधीजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विरोधी होते. परंतु खरेतर तसे नाही. सत्याचा शोध घेणे ही विज्ञानाची प्रेरणा आहे. गांधीजींचे संपूर्ण जीवन हे सत्याचा शोध घेणे आणि त्याकरिता सतत प्रयोग करत राहणे यांनाच वाहिलेले होते.गांधीजींच्या प्रयोगांमध्ये अनेक विषय दिसून येतात, जसे आहार, आरोग्य, शिक्षण, खादी, शेती, सफाई, ग्रामोद्योग, उत्पादन-तंत्र, अर्थव्यवहार, लोकव्यवहार, इत्यादी. गांधीजी यंत्रविरोधी नव्हते. गांधीजीं स्वत:च म्हटले आहे की मी यंत्रांच्या विरोधी कसा असू शकेन, जेव्हा माझे शरीरच एक नाजुक आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे! मात्र अशी यंत्रे असू नयेत की त्यामुळे माणसालाच काम न राहिल्यामुळे तो निष्क्रिय व बेकार बनेल. गांधीजींचा विज्ञानविषयक विचारही त्यांच्या सर्व विचारांप्रमाणेच मानवतेवर आधारित आहे. केवळ वस्तूंचे ज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे, अशी त्यांची धारणा आहे.गांधीजींनी विज्ञानाचे, वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व जाणले होते. विज्ञानात सत्याला स्थान आहे, सत्याच्या शोधाला स्थान आहे. पूर्वापार चालत आली आहे म्हणून त्याच एका कारणाने एखादी...
आयर्विन आणि मुत्सद्दी म गांधी 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 गांधींनी आयर्विनला पत्र लिहिले आणि त्यामध्ये मागण्या केल्या.  पूर्ण मदय(दारू )बंदी केली जावी. जमिनीच्या महसुलात पन्नास टक्के कपात केली जावी.  परदेशी कापडावर आयात कर लावला जावा. भारतीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी. राजकीय बंद्यांची मुक्तता केली जावी. या प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश होता. *या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर चळवळीचा संकल्प सोडून देऊ अशी तयारी गांधींनी दाखवली होती*  देश राष्ट्रव्यापी चळवळीच्या उंबरठ्यावर आहे ,काँग्रेस संघटना चळवळीसाठी तयार आहे ,उत्सुक आहे आणि अश्या वेळी गांधीजी   थोड्या मागण्या करून , चळवळ रद्द करण्याचा मानस व्यक्त करतात हे काहींना अविश्वसनीय वाटत होतं, तर्कसंगत वाटत नव्हतं,विसंगत वाटत होतं.  गांधीजींच्या एकूण जाणिवेची, त्यांच्या राजकीय तंत्राची ज्यांना ओळख नव्हती त्यांना असं नेहमीच वाटत आलं असतं.  पण गांधीजींच्या मागण्या सकृतदर्शनी दिसायला सामान्य वाटत असल्या तरी सरकारने त्या मान्य करणे शक्य नव्हतं. *कारण सरकारचा प्रचंड महसूल बुडत होता, त्यांच...
लाहोर अधिवेशन आणि कायदेभंग चळवळ पा१र्वभूमी 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 1919 मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते .सरळ सनदशीर  मार्गाने सरकार ऐकत नाही तर काँग्रेसने कृतिशील होण्याची वेळ आली आहे ,असे काँग्रेसमधील तरुण नेत्यांची मते होती. अशावेळी काँग्रेसमधील जहालमतवादी तरुणगटाचे नेतृत्व पं नेहरू यांजकडे आले. त्यांचेकडेच लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद आले.यामागे गांधींची प्रेरणा होती. यामुळे तरुणांत व सदस्यांत उत्साह. अधिवेशनात पं नेहरुंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. त्यांनंतर संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्याचा प्रस्ताव म गांधींनी  मांडला. प्रस्ताव पारित व चळवळीचे नियोजन करण्याचा अधिकार कार्यकारणीला. *२ जाने ३०, काँग्रेस कार्यकारीणी बैठक. चळवळीचा कार्यक्रम निश्चीत करण्याचा अधिकार म गांधींना देण्याचा ठराव, एकमताने मंजूर.* २६ जाने १९३० हा स्वातंत्र्यदिन पाळण्याचे नियोजन. देशभर उत्साह. *सरकारवर दडपण. आयर्विन यांचा जनमत शांत करण्याचा प्रयत्न. २५ जाने स घटनात्मक सुधारण्याचा नवा हप्ता देऊ आश्वासन* *परिस्थितीवर म गांधींचे ब...
सत्याग्रह आणि गांधी 🌸🍃🌺🍂☘🍃🌸 सत्य म्हणजे गांधींचा जीव की प्राण गांधीजींनी आपल्या आयुष्यभर त्याचं अनुकरण केलं.  अहिंसेबरोबर गांधीजींच्या तत्वज्ञानाचा दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह. गांधींजींनी आपले सार्वजनिक जीवनात सत्याग्रहाचा शस्त्रांप्रमाणे वापर केला. जे -जे म्हणून वाईट आहे, अनिष्ट आहे , अन्यायकारक आहे,असत्य आहे.त्याच्याविरुद्ध उभे राहणे म्हणजे सत्याग्रह.  त्यासाठी सत्याग्रही तयारीचा हवा.त्याने  प्रेम, आत्मक्‍लेश आणि आत्मसिद्धी या मार्गाने प्रतिस्पर्धीच्या  चांगल्या भावनेला साद घालने आवश्यक आहे. त्याने प्रेमशक्तीने त्याचे  दैवी अंशाला अहवान  देणे आणि त्याच्याविरुद्ध ,त्याच्या वाईटविरुद्ध लढा देण्याचे तंत्र म्हणजे सत्याग्रह.  गांधी त्याला प्रेमाचे सामर्थ्य किंवा आत्मशक्ती म्हणत. बळाचा वापर न करता अन्यायाविरुद्ध लढण्याचे, शूरांनी वापरण्याची ते सर्वात बलशाली शस्त्र आहे असे गांधी म्हणत.  *जर साध्य आहे तर अहिंसा हे साधन  आहे* माणसातील दृष्टतेचा प्रतिकार करताना, जुलमी सत्तेचे हृदयपरिवर्तन प्रेम...
म गांधी आणि शिक्षण पद्धती 🌸🍃🍂🌺🍃🌸  आफ्रिकेत असल्यापासून गांधीजींनी शिक्षणविषयक विविध प्रयोग  केलेले होते. शिक्षणाविषयीच्या विविध कल्पना गांधीजींनी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. आपल्या लेखांमधून गांधीजीनी शिक्षण विषयक विचार चर्चा केली आहे. *विद्यार्थ्यांचे चारित्र्य संवर्धन हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय असावे याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती*  ज्या शिक्षणाने आपण चारित्र्यसंपन्न नागरिक बनवू तेच खरे शिक्षण असे ते नेहमी म्हणत .इंग्रजांचे शिक्षण हे जीवनाशी संबंधित नसणारे, विद्यार्थ्यांना परावलंबी बनवणारे ,देशी संस्कारापासून दूर नेणारे असे शिक्षण आहे .हे शिक्षण केवळ पुस्तकी आहे आणि या पुस्तकात शिक्षणातून केवळ पुस्तक पंडित निर्माण होणार असे गांधी  म्हणत. *शासन यंत्रणेसाठी  लागणारे केवळ कारकून या शिक्षणातून तयार होतील* शाळा म्हणजे असे एक कारकून निर्माण करणारे कारखाने आहेत असे गांधी म्हणत. आणि म्हणूनच असहकार चळवळीत विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा मध्ये शिकण्यापेक्षा राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवाहात यावे, अशा पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या शाळेतून शिकावे यावर गांधीनी ...
*आंदोलने शांत असताना..* 🌸🍃☘🍂🌺🍃🌸 असहकार चळवळ शांत झाली आणि गांधीजींनी आपले आणखी एककाम सुरू केले . शासकांच्या विरुद्ध लढताना जनता सर्व बाजूंनी सक्षम पाहिजे, यासाठी लोकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे गांधींनी मनोमन ठरवले होते.  गांधीजी पुन्हा लोकांच्यांमध्ये जाऊन मिसळू लागले.  ग्रामीण लोकांमध्ये  लोकजीवन कसे. आहे .लोकांच्या समस्या काय आहेत?लोकांच्या सुप्तशक्ती काय आहेत ? लोकांच्या भावना काय आहेत? याचा अभ्यास करण्यासाठी म गांधी गावोगावी फिरत होते.  गांधींनी देशाचा हा दौरा काढला  होता.या दौऱ्यामध्ये अनेक लोकांना गांधीजींना प्रत्यक्ष भेटता आले, गांधीजींना अनुभवता आले ,गांधींचे विचार अनुभवतताआले. हा सन्यं स्त योध्दास लोकांना पाहता आले.  या गावभेटीत गांधीजी  खादीचा प्रचार करीत. गावोगावी जाऊन लोकांना स्वच्छतेचे संदेश देत .गावागावातील सफाईवर म गांधींचा भर होता. म गांधी ठायोठायो सभा भरवीत. लोकांना ऐकीने राहण्याचे महत्व सांगत. त्यासाठी स्पृश-अस्पृशतेचे भिंती दूर केल्या पाहिजेत हे समजावत. हिंदू - मुस्लीम एकीसाठी प्रयत्न करीत. स्वत : भंगीकाम ...
*जनआंदोलनाचे विराट पर्व* 🌸🍃🌺🍂☘🍂🌸 1920 चे असहकार आंदोलन भारताच्या इतिहासातील पहिलेच जन आंदोलन !गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चळवळीमुळे लोकांच्यामध्ये चैतन्य पसरलं.  चौरीचौरा येथील हिंसक घटनेने गांधी व्यथीत झाले, चिंतीत झाले. असे अनेक हिंसकप्रकार होतील आणि सरकारही कडक पाऊले उचलेलं याची गांधींना जाणीव होती. सर्वसामान्य जन हे अत्याचार सहन करणार नाहीत. त्यांना हालअपेष्टा सहन करणे शक्य नाही.( जालीयन वाला बागेचा काळा इतिहास पार्श्वभूमीला होताचं )चळवळींचा अनुभव नसलेली माणसे सरकारी अत्याचारामुळे खचतील,  पुन्हा कदाचित उभारी घेणार नाहीत.  हे जाणून  ही चळवळ गांधीनी. माघारी घेतली. ..आणि जरी  गांधींच्या अहिंसक लढ्यावरील लोकांचा विश्वास जरी कमी झाला. सर्वसामान्य लोकांची सत्याग्रह बद्दलची धारणा बदलली असली, गांधींच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडण्याची मनीषा त्यांच्या मनी दाटलेली असली...तरीसुद्धा या आंदोलनाने भारतातील जनतेचे अभूतपूर्व असं आंदोलन उभे राहिले .या आंदोलनामुळे ब्रिटिशांविरुद्ध भारतभर जनता उभी राहिली. ब्रिटिशांविरुद्ध व्यापक क्षेत्रातील,कानाकोप...

कणखर गांधी

कणखर गांधी 🌸🍃🌺🍂☘🍃🌸 असहकार चळवळीदरम्यान सरकार व कॉंग्रेस यामध्ये तडजोडीसाठी जेष्ठ मवाळ नेत्यांनी प्रयत्न केले. पण गव्हर्नर जनरल लॉर्ड रीडींगने तडजोड नाकारली. ... उलट प्रचंड दमननीती ! या भूमिकेमूळे गांधी वाकतील अशी रिडींगची अपेक्षा भ्रामक ठरली. *गांधींनी त्या कळविले ; 'आम्ही वाकणार नाही,अन्याय सहन करणार नाही. असे ठाम सांगत वर बार्डोली सत्याग्रहाचा निर्णय झाला आहे,असे कळविले.* ६ फेब्रु १९२२ एका जाहीर वक्तव्यात रिडींगने गांधींवर दोषारोप लावले. *गांधींनी एका निवेदनाद्वारे रीडींगचे सर्व आरोप खोडून काढले व त्याचा खोटेपणा सप्रमाण सिद्ध केला.* *स्वतः पारतंत्र्यात अडकलेल्या व्यक्तीने परकीय महद् राजकर्त्यांना परखड शब्दात आव्हान देणे.ही अपूर्व घटना होती.* *म गांधी सारखी आत्मिक आणि नैतिकदृष्या प्रबळ असणारी व्यक्तीच असे करू शकत होती.या निर्भीड आव्हानांमुळे जनतेला लढण्यास प्रचंड मनोबल मिळत होते.* म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त 🌸🌿☘🍀🍂🍃🌺 राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी guravraj.blogspot.com 🌹🕉🇳🇪🇳🇪

आधु भारतचा नेता

म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 🌸🍃☘🍂🌺🌸 गांधीजींच्या कामाने सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता.  चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा येथील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली लढे यशस्वी झाली होते. गांधींजी भारतातील विविध भागात, आडवळणी गावात, लाखों लोकापर्यंत आणि विविध विचारसरणीचे नेत्यांपर्यंत पोहचले होते.  1920 पर्यंत गांधीजींचे सामाजिक व राजकीय अभिसरण वाढले होते त्यांच्या भोवती लोकप्रियतेचे एक आगळेच वलय होते. जनमानसात, ब्रिटीश सरकारात आणि काँग्रेसमध्येही त्यांच्या शब्दाला मान होता .गांधीजीनी या राष्ट्रीय संघटनेच्या घडणीत, स्वरूपात व उद्दिष्टात अनेक बदल घडवून आणले. ही संघटना सर्वसामान्यांसाठी कशी काम करेल? यावर गांधींचा जोर होता .काही ठराविक लोकांप्रती आणि काही शहरांमध्ये असलेली ही संघटना गांधीजींनी गावोगावी आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचली .गांधीजीं आपल्या कार्याने अनेक लोक जोडले होते .अनेक महत्त्वपूर्ण नेतेही गांधींना येऊन मिळाले आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ही राष्ट्रीय संघटना  बनली. आता तिची कार्यमर्यादा काही शिक्षित लोकांपर्यंत न राहता ती सर्वसामान्य, गरीब लोकांच्या ...