👓ती केरातील बाटली....🔑 . राजेंद्र गुरव, यमाई औध. घंटागाडीची घणघण झाली. मी पळतच केराची टोपली घेऊन आलो. दोन_ तीन टोपल्या भरलेल्या... गडबडीत ओतल्या. एवढयात माझे लक्ष त्या पडलेल्या प्लॅस्टीकच्या बाटलीवर पडले. मी तिला ओळखले .. पुढे पळणाऱ्या गाडीतून कसेबसे तीला ओढून घेतले. . . परगावहून आलेली बहीण रागावली माझे कृतीने.. अरे अमुक हीने काढला होता केर... कशाला परत काढली घाण , अडगळ कुठली .. . मी काहिच न बोलता ती बाटली नारळाच्या झाडाच्या कठ्यावर ठेवली.... हा कठ्ठा जून -जुलै मध्ये अशा अनेक बाटल्याने भरून जाई. ..गेली पंधरा - वीस वर्षे पावसाळाच्या तोंडावर माझा हा उद्दोग चाललेला. वापरलेल्या प्लॅस्टीकच्या बाटल्या गोळा करायच्या, त्याची तोंड कापायची , बुडाला गरम खिळ्याने २-४ छिद्र पाडायची... त्यात माती भरायची, आणि गल्ली - बोळातून गोळा केलेली रोपे त्यात लावून टाकायची.चांगली साठ सत्तर..कधी कधी शंभर रोपे तयार व्हायची ! . . माझ्या वडिलांना याचे फार कौतुक ! तेही सामील व्हायचे माझेत... खरं तर हा उपक्रम त्यांचाच , ते अशीच घरी कण्हेर, जास्वंदाची झाडे लावायचे. तळ्यावरील मोकळाई व यमाईचे युद्ध रुप असलेल्या मोराळाईमंदिराला त्यांनी लावलेल्या कण्हेरीने फुलांची सेवा दिलेली आहे. . बापाच्या या उपक्रमात मी विस्ताराचे माप टाकले. बाटली संख्या, रोपप्रकार इ. मध्ये वाढ केली. कधी नाल्याकाठची रोपे गोळा केली. तर कधी इमारतीवरील रोपे कष्ट पूर्वक काढून लावली. . घरातील बाटल्याची अडगळ संपे.. मी दवाखान्यातून सलाईनच्या बाटल्याही गोळा करु लागलो. गावातील मोठया इमारती वरील रोपे गोळा करणे हा मुद्दा मी पुढे जोडला.. गावातील श्रीयमाई मंदिरातील शिखर, सभामंडप व आवारातून , मूळपीठाचा सजा व तत्सम ठिकाणाहून मी शेकडो रोपे व पक्ष्यांचे विष्टेतून पडलेल्या - रुजलेल्या बियांगोळा केल्या आहेत... . नाही म्हटले तरी याचा पसारा खूपच वाढला. . एकदा एका पाहूण्याने त्यातील दोन रोपे मागीतली. आम्ही ती आनंदाने दिली. यानंतर नवीनच मुद्दा आला. भक्त, पाहुणे यांचे घरी झाडे जाऊ लागली. . वाढदिवस , मला भेटायला येणारे मित्र, देवीभक्त इ. मी ही रोपे भेट देवू लागलो. . . माझे कार्यक्षेत्रात मी या उपक्रमाचा विविध अंगानी व्याप वाढवत गेलो . आमचे खबालवाडी प्राथ. शाळेस यशवंतराव चव्हाण आदर्श शाळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.त्यावेळी दर्शक उपक्रमात विविध उपक्रमांबरोबर विद्यार्थ्यासह रोपनिर्मितीच्या राबविलेल्या उपक्रमाचा सहभाग होता. औंधच्या गणेश मंडळाला मिळालेल्या गणरायां अॅवार्ड मध्येही 'औषधी वनस्पती कक्ष ' हा उपक्रम होता....माझे बी.एड व एम.एडच्या च्या अभ्यासक्रमातील
कार्यानुभव उपक्रमातील यशात या उपक्रमाने मला हात दिला आहे... अशी अनेक उदाहरणे देता येतील. . . .... विविध कारणांमुळे आमचे घरी येणारे जाणकार या उपक्रमाचे कौतुक करीत. अनाहुतपणे या उपक्रमाचे मोठे नाव झाले. . फारसे काम नसेल ही मोठे ... पण मोठ्या मनाची माणसे चार चांगले शब्द बोलायची , सर्वापुढे स्तुतीही करायचे ! . आमचे घरातील काहीजण मात्र नाक मुरडायचे. 'कसले आलयं कौतुक , सगळा पसारा आहे नुसता ! आम्ही घर आवरायचे अन यांनी हे मांडायचे दारात.. माझे वृद्ध _ वडिलांचे काहीजण डोकं उठवायचे ! ... मग आई घालून- पाडून बोलायची . .. मी समजून सांगायचो. ती तेवढया पुरती शांत व्हायची , परत बे चे पाढे सुरु... मी माझी बाजू मांडायचो, .बडबडयचो, चिडायचो ! .. मला समजायचे नाही. ... आपण एका वेगळ्या हेतू साठी हे करतोय... अनं यांना हे समजतं नाही... मग वडिलांकडे मुद्दा जायचा. माझी बरोबरची बाजू त्यांना पटायची ! . पण पुढे पुढे वडिल ही इतरांपुढे हताश आहेत हे मला जाणवू लागले. .. 'व्यक्ती संपते पण विचार नाही ' या न्यायाने प्रेरक दूर झाला तरी मी विचार वसा सोडला नाही. .माझेत अनं वडिलांच्यात काही मतभेद झाले तरीही. ( माझे वडिलांचे मेंदूत गाठ आहे. त्यामुळे त्यांचे तात्कालीन स्मृतीवर परिणाम होतोयं हे पुढे मला कधीतरी कळलं ) . . पुढेही काही कारणांमुळे, नियतीनं दिलेल्या आदेशामुळे मी बराच काळ दूर होतो. वडिलांचे आजारपणांमुळे मी घरी येवू लागलो. ... माझे नारळाच्या कठ्यांकडे लक्ष गेले.. एकही झाड तिथे नव्हते ... मी विचारल्यावर. " मला नाही माहित. ! हे उत्तर यायचे ! .. .. मी वडिलांना विचारले . ते अगदी शून्यात नजर लावून बसलेले.. .. मीच म्हटले ' राहू दे ! आपण पुनः झाडे लावूया या जूनमध्ये ! तुम्ही करणार ना मदत ? . . तो आजारी बाप 'वट' वृक्ष मानेनंच हो म्हणाला... . आता २-.३ महिन्यात पुलाकडून बरेचं पाणी गेले .. आई अंथरूणाला खिळलेली, मोठ्या आजारातून बाहेर पडलेले आमचे वडिल छोट्या अपघातात आम्हांला सोडून गेलेले. . दशक्रियेआधी घरची सफाई .. घर मोठे तर साठणारी म्लानता ही तेवढीच ... सफाई करता,सासरहुन आलेली बहिण म्हणते मला तर वडिलांचे आजारपण आठवतच नाही. केर घंटागाडीत ओतताना ती बाटली मला दिसली. . रात्रभर ती बाटली माझ्या उशाशीचं ! कुणी केर म्हणून टाकलेली तर कुणा अडगळ वाटलेली. .. ती बाटली व्यवस्थित वरून कापलेली, खाली दोन तीन छिद्र ही.. कोणी कापली असेल वडिलांनी का मी ?... कुणीही कापलेली असो. त्याचं झाडंही कुणाच्यातरी बांधावर आले असेल ! कुणीतरी त्याचं फळं चाखत असेल, त्यात लावलेली रोपं कुणातरी सावली देत असेल ... ती बाटली अनं..... रूजलेले विचार माझेकडे आहेत... . येणाऱ्या अनेक मृग नक्षत्रांची अनं जुन महिन्यांची मला आस आहे. राजेंद्र गुरव, यमाई औंध .
कार्यानुभव उपक्रमातील यशात या उपक्रमाने मला हात दिला आहे... अशी अनेक उदाहरणे देता येतील. . . .... विविध कारणांमुळे आमचे घरी येणारे जाणकार या उपक्रमाचे कौतुक करीत. अनाहुतपणे या उपक्रमाचे मोठे नाव झाले. . फारसे काम नसेल ही मोठे ... पण मोठ्या मनाची माणसे चार चांगले शब्द बोलायची , सर्वापुढे स्तुतीही करायचे ! . आमचे घरातील काहीजण मात्र नाक मुरडायचे. 'कसले आलयं कौतुक , सगळा पसारा आहे नुसता ! आम्ही घर आवरायचे अन यांनी हे मांडायचे दारात.. माझे वृद्ध _ वडिलांचे काहीजण डोकं उठवायचे ! ... मग आई घालून- पाडून बोलायची . .. मी समजून सांगायचो. ती तेवढया पुरती शांत व्हायची , परत बे चे पाढे सुरु... मी माझी बाजू मांडायचो, .बडबडयचो, चिडायचो ! .. मला समजायचे नाही. ... आपण एका वेगळ्या हेतू साठी हे करतोय... अनं यांना हे समजतं नाही... मग वडिलांकडे मुद्दा जायचा. माझी बरोबरची बाजू त्यांना पटायची ! . पण पुढे पुढे वडिल ही इतरांपुढे हताश आहेत हे मला जाणवू लागले. .. 'व्यक्ती संपते पण विचार नाही ' या न्यायाने प्रेरक दूर झाला तरी मी विचार वसा सोडला नाही. .माझेत अनं वडिलांच्यात काही मतभेद झाले तरीही. ( माझे वडिलांचे मेंदूत गाठ आहे. त्यामुळे त्यांचे तात्कालीन स्मृतीवर परिणाम होतोयं हे पुढे मला कधीतरी कळलं ) . . पुढेही काही कारणांमुळे, नियतीनं दिलेल्या आदेशामुळे मी बराच काळ दूर होतो. वडिलांचे आजारपणांमुळे मी घरी येवू लागलो. ... माझे नारळाच्या कठ्यांकडे लक्ष गेले.. एकही झाड तिथे नव्हते ... मी विचारल्यावर. " मला नाही माहित. ! हे उत्तर यायचे ! .. .. मी वडिलांना विचारले . ते अगदी शून्यात नजर लावून बसलेले.. .. मीच म्हटले ' राहू दे ! आपण पुनः झाडे लावूया या जूनमध्ये ! तुम्ही करणार ना मदत ? . . तो आजारी बाप 'वट' वृक्ष मानेनंच हो म्हणाला... . आता २-.३ महिन्यात पुलाकडून बरेचं पाणी गेले .. आई अंथरूणाला खिळलेली, मोठ्या आजारातून बाहेर पडलेले आमचे वडिल छोट्या अपघातात आम्हांला सोडून गेलेले. . दशक्रियेआधी घरची सफाई .. घर मोठे तर साठणारी म्लानता ही तेवढीच ... सफाई करता,सासरहुन आलेली बहिण म्हणते मला तर वडिलांचे आजारपण आठवतच नाही. केर घंटागाडीत ओतताना ती बाटली मला दिसली. . रात्रभर ती बाटली माझ्या उशाशीचं ! कुणी केर म्हणून टाकलेली तर कुणा अडगळ वाटलेली. .. ती बाटली व्यवस्थित वरून कापलेली, खाली दोन तीन छिद्र ही.. कोणी कापली असेल वडिलांनी का मी ?... कुणीही कापलेली असो. त्याचं झाडंही कुणाच्यातरी बांधावर आले असेल ! कुणीतरी त्याचं फळं चाखत असेल, त्यात लावलेली रोपं कुणातरी सावली देत असेल ... ती बाटली अनं..... रूजलेले विचार माझेकडे आहेत... . येणाऱ्या अनेक मृग नक्षत्रांची अनं जुन महिन्यांची मला आस आहे. राजेंद्र गुरव, यमाई औंध .
Comments
Post a Comment