Posts

Showing posts from September, 2019

गांधींनी आभाळ पेलले सारे

गांधींनी आभाळ पेलले सारे 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 भेदाभेदाच्या भिंती  होत जातसे अभंग दिला एकच त्याला भारतीयत्वाचा रंग खाचखळगे निसर रस्ता अखंड,निश्चयी चालणे गांधींनी आभाळ पेलले सारे - १ अज्ञानाचे धूके भारतवर्षा भोवती जगापासून दूर गतैत सापडे मती दिली गती विचारा, पोलादी प्रयत्ने गांधींनी आभाळ पेलले सारे - २ लाखोंची बॅरिस्टरी परंपरेचा दिवाण कारभारी वसन, सदन आर्थिक झरे इच्छा ,आकांक्षा  संसारी देशसंसाराप्रत सर्वस्व त्यागले गांधींनी आभाळ पेलले सारे - ३ सक्षम विरोधक इंग्रज ठाके गुलामगिरी मनी,प्रसंग बाके परंपरेने हतबल जो-तो वाके घडवीत बदल जाई काळापुढे नाही नुसते क्रांतीचे नारे गांधींनी आभाळ पेलले सारे - ४ निर्भयतेचा मंत्र देई गांधी राजकर्त्यांची होई वांदी नेता सामान्य सर्वां सांधी एकरूप सर्व होऊन राही मंत्र दिला निर्भय तुम्ही व्हा रे ! गांधींनी आभाळ पेलले सारे - ५ लोकांस लोक जोडून भेदांच्या भिंती तोडूनी परंपरेची वाट मोडूनी नवमार्ग सर्वां दावूनी एकतेचे वाहिले वारे गांधींनी आभाळ पेलले सारे -६ दिला चलेजावचा नारा चवताळे देश उठला सारा विविधांगी उचली क्...

मुत्सद्दी गांधी

आयर्विन आणि मुत्सद्दी म गांधी 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 गांधींनी आयर्विनला पत्र लिहिले आणि त्यामध्ये मागण्या केल्या.  पूर्ण मदय(दारू )बंदी केली जावी. जमिनीच्या महसुलात पन्नास टक्के कपात केली जावी.  परदेशी कापडावर आयात कर लावला जावा. भारतीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी. राजकीय बंद्यांची मुक्तता केली जावी. या प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश होता. *या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर चळवळीचा संकल्प सोडून देऊ अशी तयारी गांधींनी दाखवली होती*  देश राष्ट्रव्यापी चळवळीच्या उंबरठ्यावर आहे ,काँग्रेस संघटना चळवळीसाठी तयार आहे ,उत्सुक आहे आणि अश्या वेळी गांधीजी   थोड्या मागण्या करून , चळवळ रद्द करण्याचा मानस व्यक्त करतात हे काहींना अविश्वसनीय वाटत होतं, तर्कसंगत वाटत नव्हतं,विसंगत वाटत होतं.  गांधीजींच्या एकूण जाणिवेची, त्यांच्या राजकीय तंत्राची ज्यांना ओळख नव्हती त्यांना असं नेहमीच वाटत आलं असतं.  पण गांधीजींच्या मागण्या सकृतदर्शनी दिसायला सामान्य वाटत असल्या तरी सरकारने त्या मान्य करणे शक्य नव्हतं. *कारण सरकारचा प्रचंड महसूल बुडत होता, त्यांच...

लाहोर आणि सविनय चळवळ

लाहोर अधिवेशन आणि कायदेभंग चळवळ पा१र्वभूमी 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 1919 मध्ये लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते .सरळ सनदशीर  मार्गाने सरकार ऐकत नाही तर काँग्रेसने कृतिशील होण्याची वेळ आली आहे ,असे काँग्रेसमधील तरुण नेत्यांची मते होती. अशावेळी काँग्रेसमधील जहालमतवादी तरुणगटाचे नेतृत्व पं नेहरू यांजकडे आले. त्यांचेकडेच लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद आले.यामागे गांधींची प्रेरणा होती. यामुळे तरुणांत व सदस्यांत उत्साह. अधिवेशनात पं नेहरुंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. त्यांनंतर संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ सुरु करण्याचा प्रस्ताव म गांधींनी  मांडला. प्रस्ताव पारित व चळवळीचे नियोजन करण्याचा अधिकार कार्यकारणीला. *२ जाने ३०, काँग्रेस कार्यकारीणी बैठक. चळवळीचा कार्यक्रम निश्चीत करण्याचा अधिकार म गांधींना देण्याचा ठराव, एकमताने मंजूर.* २६ जाने १९३० हा स्वातंत्र्यदिन पाळण्याचे नियोजन. देशभर उत्साह. *सरकारवर दडपण. आयर्विन यांचा जनमत शांत करण्याचा प्रयत्न. २५ जाने स घटनात्मक सुधारण्याचा नवा हप्ता देऊ आश्वासन* *परिस्थितीवर म गांधींचे ब...

म गांधींचे वारसदार

*गांधीजींचा वारसदार* 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸  राजकीय क्षेत्रामध्ये गांधीजींना अनेक वारसदार असू शकतील. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये गांधीजींचा वारसा समर्थपणे पेलणारे पूजनीय आचार्य म्हणजे विनोबा भावे. या थोर तत्वज्ञ विचारवंताची आज 11 सप्टेंबर ही जयंती . या वर्षी 2019, त्यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आज पासून सुरू होत आहे.  बहुभाषिक ,भाषा पंडित, विद्वान आणि आपले विविध ज्ञान अत्यंत सोप्या ,रसाळ आणि नेमक्या भाषेत सांगणारे वक्ते. गीतेचे तत्वज्ञान ,वेद उपनिषद,षट्दर्शनाचा गाढा अभ्यास असणारे ,प्राचीन भारताचे तत्वज्ञान चांगले अवगत असणारे आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत ते प्रसारीत करणारी विनोबा भावे हा चिरंतर अभिमानाचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे. *महात्मा गांधी यांचे माझ्यावर ऋण आहे* असे ते नेहमी नमूद करत.  त्यांच्या 'एकादश व्रते ' यावर महात्मा गांधी भाष्य करीत असत. गांधीजी व विनोबाजी यांच्यामध्ये जे स्नेहबंदधहोते, त्याला खूप आयाम आहेत . सेवाग्राम मध्ये गांधी अनुयायांची सेवाही करीत. आजाऱ्यांची सुश्रुषा करत . पूज्य विनोबाजी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नसत. गांधी म्ह...

भूपाळी

जय जगदंबे अंबा बाई ,तूच आम्हां माउली शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली --अमृतयोगे तुझ्या रुपाची,प्रगटती प्रतिबिंबे आशीषाची सुवर्णपुप्षे ,सुगंधिती जीवने तुझ्या कृपेची गंगा वाहे ,सदा या राउळी      शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली - // १ // मातृत्वाची लेणी भरली ,तुझीया हृदय कमली दातृत्वाचे देणे देते ,सुखाची अंजली तुझ्या दर्शनी भेटतो माते ,स्वर्ग या मंदिरी शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली -२ पराक्रमाची विराट रूपे ,वधति दानवा ते तपस्विनी ची सौम्य रूपे .दिसति नाम स्मरणे तुझा महिमा किती गाऊ ,थिटी इथ जीवनी  शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली  -- कवी - राजेंद्र बाळकृष्ण गुरव २४. १९९७ नाताळ यमाई मंदिर ,देवी आराधना -या पुस्तकातून rajendra Gurav

बदनामी गाढवाची

गाढव   म्हणालामाणसाला "कशाला मला बदनाम करतो? लाथा (ळ्या )तुझ्या …। अनं उगाचं माझं नाव घेतो !" रचना -राजेंद्र गुरव

धनत्रयोदशी

धन्वंतरी जयंती "भारताची भ्रष्टाचाराची जखम कशी होईल बरी ? "जेथे भूखंडाची न्याहारी घोटाळ्यांचे पेव नेत्यांच्या उदरी तेथे निराशा माझे पदरी " … वदले धन्वंतरी … !

सहचारिणी

पाडवा (आपल्या सहचारीनिकडून प्रत्येक पुरुषाची अशीच अपेक्षा असावी …। )         आवडत्या पक्ष्यास स्वच्छंदी पक्ष्या तू गावे नित तराणे जीवनाशी गप्पा _गोष्टी अन अवखळ उखाणे       नभ्याच्या सप्तरंगी अवतरणात रंगुनी जावे       ध्येय ,प्रेम ,आशा -सोबतीला मलाही घ्यावे जीवन काय कसे?खुणावती हि क्षितिजे पंखी बळ तुझ्या असावे,ना भय कोठे जावे    प्रज्ञा तुझी अपार ,परी अंकुश हि असावा     सहजीवनात आपुल्या कसाही भेद तो नसावा !                            कवी -राजेंद्र गुरव १-१-२००४,पाटण ,स्मुति आणि स्वप्ने :'या पुस्तकातून

शोध

शोध एंक -"तुला काही कळतंच नाही !        तुला काडीच काम  येत नाही " मी -"उगाच भाव खाऊ नको !       फुकटच श्रेय घेऊ नको ……………। हा शोध मागचं लागलाय ! ( राजेंद्र गुरव ९५६११५४१४०

वेळोवेळी सर्वस्व अर्पणारा नेता

वेळोवेळी सर्वस्व पणाला... 🌸🍃🌺🍂☘🌿🌸 म गांधी यांनी तन- मन अर्पून अथक देशसेवा केली.उच्चशिक्षीत आणि लोकांचे अनिभिष्टीत राजांकडे स्वतःचे म्हणून धन ते नव्हतेच . १९२० चे दरम्यान म गांधींच्या सर्वव्यापी भूमीकेमूळे हिंदू - मुस्लिम ऐक्य दिसून आले होते. असहकार चळवळ मध्ये दोन्ही समाज सामील झाले होते ,आणि चळवळ स्थगित झाल्यानंतर ही ऐक्य लुप्त झाले. नुसते ऐकय कमी झाले नाहीतर, देशात निराळ्या ठिकाणी गंभीर व हिंसक दंगली झाल्या. 1924 मध्ये हिंदू-मुस्लीम चळवळीला दंगलीला ऊत आला होता. ब्रिटीशांची भूमिका बघ्याची होती. वायव्य सरहद्द प्रांत प्रांतातील कोहत येथे झालेल्या दंगली अतिशय क्रूर होत्या, उग्र होत्या .अनेक हिंदू मारले गेले होते.  या दंग्याची चौकशी करण्यासाठी गांधीजी प्रत्यक्ष त्या भागात फिरले .अनेकांच्या भेटी ,अनेकांचे अश्रू पुसले ,अनेकांचे सांत्वन... भडकलेली माथी शांत करण्याचा प्रयत्न. सामान्यांत शांतता रहावी म्हणून प्रयत्न.... हिंदू - मुस्लीम नेत्यांतील सुसंवादासाठी प्रयत्न. ...या दंग्यांच्या निषेधार्थ गांधीनी दिल्लीला 21 दिवसाचे उपोषण केले. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची एकी झाली. ...

गांधी म्हणजे

*गांधी म्हणजे...* 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 *गांधी म्हणजे नुसता प्रतिसाद नाही, गांधी म्हणजे प्रक्रिया आहे.*  एका दिवसात लावलेले ते धडामधूम लग्न नाही   सर्व बाजू संभाळीत, केलेला संसार आहे . गांधी म्हणजे संकरित पावडर लावून पिकवलेला आंबा नाही...  मोहरापासून झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आहे गांधी म्हणजे आगडोंब नाही तर चेतवली जाणारी अग्नी आहे. गांधी म्हणजे लखलखीत वीज नाही, तर धगधगती मशाल आहे. गांधी म्हणजे क्षणातली क्रांती नाही, तर युगायुगाची उत्क्रांती आहे गांधी म्हणजे नुसते रसपान नाही ,तर समरस होणे आहे  गांधी म्हणजे नुसता शब्दजाल नाही तर प्रेम आलाप आहे गांधी म्हणजे नुसती कृती नाही ,तर कृती कार्यक्रम आहे. गांधी म्हणजे नुसता डामडौल नाही, तर सत्याचा कौल आहे. गांधी म्हणजे फुकाचे शब्द नाहीत, कृतीडोलारा सांभाळणारी सबलकृती आहे. गांधी म्हणजे नुसता विचारजन्म नाही, तर सांगोपांग संवर्धन आहे. गांधी म्हणजे अवचित झालेला बदल नाही ,परत जाणून-बुजून केलेली व्यवस्था आहे. म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त 🌸🌿☘🍀🍂🍃🌺 राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील ल...

सत्याग्रही गांधी

सत्याग्रह आणि गांधी 🌸🍃🌺🍂☘🍃🌸 सत्य म्हणजे गांधींचा जीव की प्राण गांधीजींनी आपल्या आयुष्यभर त्याचं अनुकरण केलं.  अहिंसेबरोबर गांधीजींच्या तत्वज्ञानाचा दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह. गांधींजींनी आपले सार्वजनिक जीवनात सत्याग्रहाचा शस्त्रांप्रमाणे वापर केला. जे -जे म्हणून वाईट आहे, अनिष्ट आहे , अन्यायकारक आहे,असत्य आहे.त्याच्याविरुद्ध उभे राहणे म्हणजे सत्याग्रह.  त्यासाठी सत्याग्रही तयारीचा हवा.त्याने  प्रेम, आत्मक्‍लेश आणि आत्मसिद्धी या मार्गाने प्रतिस्पर्धीच्या  चांगल्या भावनेला साद घालने आवश्यक आहे. त्याने प्रेमशक्तीने त्याचे  दैवी अंशाला अहवान  देणे आणि त्याच्याविरुद्ध ,त्याच्या वाईटविरुद्ध लढा देण्याचे तंत्र म्हणजे सत्याग्रह.  गांधी त्याला प्रेमाचे सामर्थ्य किंवा आत्मशक्ती म्हणत. बळाचा वापर न करता अन्यायाविरुद्ध लढण्याचे, शूरांनी वापरण्याची ते सर्वात बलशाली शस्त्र आहे असे गांधी म्हणत.  *जर सत्य साध्य आहे तर अहिंसा हे साधन  आहे* माणसातील दृष्टतेचा प्रतिकार करताना, जुलमी सत्तेचे हृदयपरिवर्तन ...