Posts

Showing posts from April, 2018

परंपराचे बोट, traditional way

झेन गुरू ८० वर्षांचे झाले, म्हणाले, आता मरणघटिका समीप आली. सगळे शिष्य गोळा झाले. म्हणाले, गुरुजी, तुमच्याबरोबर तुमचं मार्गदर्शनही हरवणार. तुम्ही एखादं पुस्तक तरी लिहायला हवं होतं. आमच्यासाठी तो धर्मग्रंथ ठरला असता. गुरू म्हणाले, म्हणूनच नाही लिहिला. तुम्ही जुन्या काळाला, माणसांना आणि मतांना पकडून ठेवण्यात पटाईत आहात. त्यात तुम्हाला नव्याने विचार न करण्याची सोय सापडते. मी आयुष्यभर सगळ्या तथाकथित धर्मग्रंथांची होळी केली, सत्य हे शब्दातीत आहे, हे सांगत राहिलो आणि मीच ग्रंथ लिहू? पण, शिष्य ऐकेनात. म्हणाले, फार मोठं नाही, मार्गदर्शक सूत्रांपुरतं लिहा. तुम्हाला गवसलेलं सत्य लिहा. काहीतरी लिहा. काही दिवसांनी गुरू मरणशय्येवर पोहोचला. सगळे शिष्य भोवती गोळा झाले. गुरूने उशाखालून एक चोपडी काढली आणि सांगितलं, हा घ्या माझा ग्रंथ. माझी सगळी शिकवण यात लिहिली आहे. यात जीवनाचं सार आहे. गुरूने प्रमुख शिष्याला जवळ बोलावून ती चोपडी त्याच्या हातात दिली. त्याने क्षणाचाही विचार न करता, विलंब न लावता ती चोपडी समोरच्या आगीत फेकून दिली. बाकीचे शिष्य चपापले, काही विलाप करू लागले. गुरूने ...

सुखाचा शोध In the search of happiness

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* ७                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸                  .                                                                           ॥ *सुखाचा शोध* ॥                            🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹                               आता तरी देवा मला पावशील का ?                                                           सुख सुख म्हणत्यात ते दावशील का ?  .    ...

Mahatma Basaveshwara बसवेश्वर

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* - ६                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *अक्षय तृतीया २* _ क्रांतिकारक समाजसुधारक : बसवेश्वर. (इ.स. ११०५ - इ. स. ११६७)   बसवेश्वर हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी वैदिक धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला.  त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला  *लिंगायत धर्म* या नावाने ओळखले जाते.  लिंगायत पंथाचे   संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची अक्षय्यतृतीयेला जयंती आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीतील लोकांना लिंगायत समाजात प्रवेश दिला स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, वारांगणांचे पुनर्वसन असे कार्य केले. सध्याच्या जातीधर्माच्या राजकारणात त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्य़ातील बागेवाडी येथे बसवेश्वरांचा जन्म झाला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिवस. ...

अक्षय तृतीया Akshay trutiya

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* ५                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *अक्षय तृतीया*         महात्मा बसवेश्वर यांची  आज जयंती. या उदार मानवाने समतेची द्वाही दिली ,त्यांचा स्मरण दिनचं ! अक्षय तृतीया... अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे  दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया... अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. प्रथेप्रमाणे या दिवशी मातीचे घागरीऐवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. गरजूंना, भुकेलेंना अन्नदान होते. प्राणी पक्ष्यांसाठी अन्न, पाणी याची सोय  केली जाते, असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्’(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. ...

Maharani Yesubai

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* ४                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥ *रुजलेले विचार*॥ भावकीची सुंदोपसुंदी इतिहासाला भलतीच वळणे देत जाते. शत्रुशी लढणे सोपे, पण स्वकीयांशी लढणे अवघड होऊन जाते ! छ. शिवरायांचे मृत्यूनंतर वारसा हक्कावरुन कुरबुरी झाल्याही असतील... पण काही माणसं हेवेदावे, द्वेष यापेक्षा सर्वसमावेशक , समष्टिकल्याणार्थ सर्वस्व वाहतात. त्यांचे त्यागावर, बलीदानावर इतिहासाची मंगलमंदिरे उभी राहतात... छ. संभाजी महाराजांचे मृत्यूनंतर ,औरंगजेबाने अत्यंत त्वेषाने स्वराज्यावर झडप घातली.. .. रायगडला वेढा पडला... महाराणी येसूबाई, पुत्र छ.शाहू , छ.राजाराम गडावर अडकलेले. ! प्रसंग बाका ! रायगड पडण्याची वेळ , .. सगळा काफिला यवनांच्या हातात पडण्याची शक्यता  ..... सारे स्वराज्यच धोक्यात.. अशावेळी म. येसूबाई निर्णय घेतात - छ. राजारामांनी लढाईत न गुंतता.., गडावरून बाहेर पडून जिंजी गाठायचे !... येसूबाई छोट्या छ.शाहू सह गडावरच राहतील... म्हणजे शत्रुचे लक्ष.. गडावर राहील अनं छ.राजारामांना पळून जाणे शक्य होईल....

Dr Babasaheb Ambedkar

👁🌴👁 *वाचावे आनंदे!*                  यमाई औंध, राजेंद्र गुरव.     🕉🌸☘💫🍀🍂🦅   डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनाअभिवादन !                            *जीवनचेतना*                                      गावकुसावरची आमची घरं...   प्रस्थापितांच्या 'फ्रेम सारखी . माणूसकी अन दयाभावालाही  जनता झाली पारखी ॥    आमचं माणूसपण गारठलं  व्यवस्थेच्याओझ्याखाली ..        आमचं जीवन चैतन्य गोठलं ... मनस्मृतीची सावली पडली॥                                                 आम्ही पण माणसं आहोत - हाडा मासांची...रक्ताची          विसरून गेलो होतो ओळख स्वतःची अन ... अस्तीत्वाची ॥ ...

Chandrakant Dalvi _a Bhala Manus

[29/03 7:47 pm] Rajendra Gurav: *चंद्रकांत दळवी साहेब - एक भला माणूस..* (साहेबांची सेवानिवृत्ती समजली.. उस्फूर्तपणे हा लेख उमटला.... यमाई औंध, राजेंद्र गुरव )🍀🌿🍀🌸🌿🍀☘ आई  यमाईच्या सेवेत आम्ही मूळपीठी सेवावाही ! अनेक माणसांच्या भेटी ,चर्चा.. त्यातून अनेक स्नेहबंधही ! त्यातच एक समीर मुलाणी... मूळ निढळचा ! त्याचे तोंडी सारखे नाव ... दळवी साहेबांचे ! दळवी साहेब असे आहेत... तसे आहेत..., फोनवरून बोलतात.. माईक - स्पिकर सेट वरून अवघी निढळ ग्रामसभा मार्गदर्शन ऐकते, त्याप्रमाणे कामे व्हायची,  !. . ... पोरसवदा समीरच्या शद्बा -शब्दात दळवी साहेबांबद्दलची आपुलकी पाझरायची ! दळवी साहेबांबद्दल माझे मनात त्यामुळे कायम आकर्षण...,  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, म.गांधी तंटामुक्ती योजनांतून साहेबांची कल्पकता उभ्या महाराष्ट्राला उपयोगी पडली !. ... सरकारी तिजोरीच्या खडखडापुढे या योजनांचा वैचारिक लखलखाट , अन विकास कामाचा  खणखणाट फारच प्रभाव पाडून गेला...साहेबांना जनमाणसांत उदंड प्रसिद्धी मिळाली.. जनह्रदयस्थान मिळाले ! औंधसारख्या छोटया गावातील गुरव गल्लीतील गणपती...