शिवजयंती २०२४व मूळपीठभवानी
*शिव जयंती २०२४*
यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला साडेतीनशे (३५० ) वर्षे पूर्ण होऊन गेलेली आहेत .
तर 1659 च्या घटनेला 365 वर्ष पूर्ण झालेली आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने बारा मावळ आणि अठरापगड प्रोत्साहित झाले होते .16 59 च्या अफुजलखानचा स्वराज्याचा आक्रमणाचे फार मोठे संकट ,या मोठ्या संकटामध्ये प्रजाजनही धीरोदात्तपणे सामोरे गेले , त्यातील एक इतिहास प्रसिद्ध कथा म्हणजे -
*सन १६५९_ श्री मूळपीठ भवानी यमाई मंदिराचा गुरव लोकांकडून बचाव*
श्री यमाई देवी मूळपीठ औंध हे अनेक लोकांचे आराध्य .अनेकांची कुलस्वामिनी ,शैव परंपरेतील अनेक मंदिर गुरव समाजाकडे असून परकीय आक्रमणामध्ये गुरव समाजाने अनेक मंदिरांचे रक्षण केलेले आहे. यवन आक्रमणापासून मंदिर वाचवली आहेत ...
श्री यमाई देवी औंध संदर्भाने चालुक्य काळापासून देऊळ निर्मितीपासून १५०० वर्षात ज्या अनेक ऐतिहासिक घटना झाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची घटना _
*सन १६५९.*. शिवरायांना ' जिंदा या ;मुर्दा पकडण्याची ' प्रतिज्ञा घेऊन विजापूरहून बलाढय अफजलखान बाहेर पडला. सपाट भागावर युद्ध झालेस ते आपले पथ्यावर पडेल , म्हणून छ शिवाजी राजेंना डोंगरी भागापून मैदानावर येण्यास भाग पडावे म्हणूनी खानाने अनेक डाव टाकले . त्यातील एक डाव , पूज्य देवस्थानावर आक्रमण करणे व त्याची बातमी कडेकपारीत घनदाट जंगलातील शिवरायांपर्यंत पोहचविणे ! जेणेकरून शिवराय चिडतील व डोंगर उतरून मैदानी भागात येऊन खानावर आक्रमण करतील व हे खानाच्या पथ्यावर पडेल .
मंदिरावर आक्रमण याची आर्थिक कारणही होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. मंदिरामध्ये अनेकवेळा संपत्ती साठवली जायची.... आणि सैन्य पोटावर चालते. काफीला चालवण्यासाठी आर्थिक बळ हवेच ना ?
तुळजाभवानीवर खानाने चाल केली. यानंतर खान औंधाला येणार ही कुणकुण श्री यमाईचे तत्कालिन गुरव- पुजाऱ्यांना लागली, त्यांनी एक युक्ती केली . श्री यमाई मंदिरासमोर मशिदसदृश भिंत उभी केली . पांढरा रंग, दुरुन यवनांना फसविणारे रुप दिले. गुरव पुजारी फकीर बनून नमाज पडू लागले . काहींचे बळी गेले तरी आम्ही आपले जातभाई आहोत हे पालपूद गुरवलोकांनी लावून धरले .
पुजाऱ्यांची हि युक्ती सिद्धीस गेली खान फसला. मंदिरास कोणताही उपसर्ग झाला नाही .
श्री यमाई.मूळपीठभवानी ,गाव मारुती इ मंदिरे व गुरव पुजाऱ्यांचा बचाव झाला. ...
*खान औंधला का आला असेल?* ...
खानाचे शिवरायांची कुलस्वामीनी म्हणून तुळजाभवानीवर डोळा होता. तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलदैवत शिवरायांची अस्मिता तुळजाभवानीला त्रास दिला म्हणजे शिवराय व त्यांचे सैन्य चिडतील व डोंगर उतरून मैदानी भागात येऊन खानावर आक्रमण करतील व हे खानाच्या पथ्यावर पडेल .
औंधची यमाई छ .शिवरायांना पूज्य !मंगल प्रसंगी छत्रपती तुळजाभवानी नंतर औंधच्या मूळपीळ भवानीला आमंत्रित करत !
औंध (जि.सातारा ) येथील यमाई मूळपीठ भवानी या नावानेही प्रसिद्ध आहे.
-( १ औध येथील प्रसिद्ध संग्रहालयाचे नाव " भवानी वस्तू संग्रहालय " असे देवी नावावरून आहे.
- २ " *औंधात ' भवानी ' अनं मुलखात नायटा*- हि प्रसिद्ध लोक म्हण .
-३ *मन्मथ शिवलिंग लिखीत मराठी साहित्यातील सर्वांत जुन्या लावणीचे नाव" ; मूळपीठ भवानीची लावणी ' असे आहे*.
b पूर्वी मंदिर परिसरात संपत्ती साठविली जायची
c विजापूर- सातारा रस्त्यापासून औंध जवळ आहे .
*गुरव - पुजाऱ्यांचे कामगीरीचे महत्व* ....
.राजा संकटात अन प्रजा भयभीत. इतर मंदिरे भ्रष्ट झालेच्या बातम्या. बलाढय खानाची जरब , ह्या गोष्टी असताना गुरव पुजारी घाबरले नाहित वा यमाईमंदिर सोडून पळून गेले नाहित .
त्यांनी धैर्याबरोबर सुजान युक्तीचा सहारा घेताला. गुरव लोकांनी आपली नावे बदलून आमला ( आमले ), सातभाई , फकीर, पछाडा (पछाडे ),सुखधरणे अशी आडनावे धारण करण्याची युक्ती केली. मंदिरालगत मशिद सदृश भिंत, चबुतरे उभारले. सैन्य मंदिर परिसरात आलेवर त्यांनी दरडावून तलवारी रोखीत गुरव पुजाऱ्यांना जाब विचारले, तेंव्हा आम्ही आपले जातभाई आहोत असे म्हणून त्यांनी प्रसंगावधान राखले. त्यामुळे मंदिर वैभवाचे रक्षण झाले .
. .
*ऐतिहासिक पान*
स्वतःचा जीव संकटात टाकून वंदनीय देवतेचे रक्षण करण्याची वृत्ती चिंतनीय आहे.
खान विजापूर ते औंध मार्गाक्रमण करताना एवढया कमी वेळेत दगडी मंदिरांचे केलेले रुपांतर वा मशिदी सदृश व्यवस्था गुरव पुजाऱ्यांचे त्यांचे उत्तम नियोजनाचे , परस्पर सहकार्यवृत्तीचे त्याचप्रमाणे स्थापत्यशास्त्राचे ज्ञान, प्रचंड कष्टवृत्ती व त्यांच्यातील एकात्मभावनेचे गौरवशाली सुवर्ण पान आहे .
जय जगदंब !
🔷🔷🔶🔶🔶🔹
🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
@
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
Comments
Post a Comment