Posts

Showing posts from May, 2021

हनुमंत आकाशी उडाला

 हनुमंते मारली उडी गेला नभांवरी निला रंग गगनाचा उतरला नयनांतरी निळ्याशार जादुईने निळी जादू गेली डोळ्यांची बुबळ त्यात विलीन झाली निळ्या आकाशाची  उंची सागर खेचू पाही दोघे आपण अथांग दुजी नाही जोडी ॥              राजेंद्र गुरव,यमाई औंध ९५६११५४१४०

वसंत व संत

*॥👁वाचावे आनंदे👁॥!*                      राजेंद्र गुरव, यमाई औंध 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *॥वसंत व संत ॥* 'माणूसकी ' वगैरे गोष्टीवरील चर्चा आपण ऐकतो, वाचतो... लिहतो !माणूसकीच्या गोष्टी ऐकून गहिवर येतो ! कुणावर बेतलेले संकट आपलं वाटायला लागतं . त्याच्या दुःखाशी आपण तादाम्य पावतो !                               कारण आपण सारे मानव !                                        परवा - परवा हे कोठेतरी वाचनात आले.  *एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं.....आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी*, *आजोबा:माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही....!*"' *नसेल ही स्पर्धा ! हजारों काजव्यांचे प्रकाशाने नाही जीवनमान उजळून जात ! .... एखादा 'रवीकर ' ही पुरा आहे त्यास !...   दाटून आला जरी तिमीर ,त्यात उभा राहतो दीपस्तंभ !...

लक्ष्मण रेषा

👁🌴👁 *वाचावे आनंदे!*        यमाई औंध राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *लक्ष्मण रेषा*  प्रत्येकाची जशी शक्तीस्थाने असतात तशा असतात उणिवा..., असतात मर्यादाही !  माणसाने एखादे क्षेत्रात खूप  मेहनत घेतलेलेली असते. ते  क्षेत्र त्याचे बलस्थान ठरत जाते. तसे प्रत्येकाची एक मर्यादाही राहून जाते. ....आपल्या बुद्धीची,देहाच्या बलाची, सामर्थ्याची, विचारांची एक मर्यादा आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी तशी प्रत्येकाची मर्यादा वेगवेगऴी आहे.  'व्यक्ती तितक्या प्रकृती ' जगात आढऴतात आणि त्या त्या मर्यादांवरून माणसाचे कार्यक्षेत्र ठरत असते.  एखादा शेती करेल, एखादा समाजकारणात  जाईल,एखादा उद्योग करेल,एखादा नोकरी करेल,तर एखादा हमाली करेल. म्हणून कोणतेही कार्य करताना माणसाने आपल्या बुद्धीच्या ,सामर्थ्याच्या,, मर्यादेचा विचार केलाच पाहिजे. क्षमता नसताना एखादे कार्य हे प्रचंड कष्ट, मनस्ताप, वेळेचा अपव्यय देण्याची शक्यता जास्त ! एखादे रबर किती ताणावे ?... त्याची मर्यादा पाहून ... नाहीतर तुटून जाईल ते !.  माणसाला स्व जाणीव झाली की माणू...

जुगलबंदी : काव्य व छाया

 [30/04, 8:27 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव : काव्य - कॅमेऱ्याची  जुगलबंदी चाले दृश्य आणि शब्दाची  जणू दिवाळी फुले ॥ [30/04, 8:36 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव:  (हे मात्र बरं आहे...? . ) कॅमेरा तुमचा, शब्द तुमचे जागा आम्हां नाही, हे मात्र बरं नाही ! दृश्य तुम्ही टिपणार, शब्दमाला ही गुंफणार सहवास आमचा नाही  हे मात्र बरं नाही ! साद तुम्ही घालणार, प्रतिसाद तुम्हीच देणार प्रतिक्रिया आमची ना घेणार, हे मात्र बरं नाही ! छाया तुमची, रचना ही तुमची माया ही आमची नाही हे मात्र बर नाही        _😃😃😃    राजेंद्र [30/04, 9:30 AM] Udhav Nikam:  शब्द आमचे ,चित्र आमचे प्रेरणा मात्र तुमचीच बरं का! साधा मी ,सहज तुम्ही शोधतो तुमची पदचिन्हे मी वाटसरू मी, माईलस्टोन तुम्ही महामार्ग तुम्ही ,टाकतो पाऊले मी शोधतो मलाच मी,गूगल मॅप तुम्ही पोहचण्या चरणापाशी, उत्सुक मी

छांदीष्टय : कमी ना भारी

 [30/04, 10:41 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव:  छांदीष्टयांच्या दुनियेतील सहप्रवासी कुणी ना कमी, कुणी ना भारी 🙏🙏 शब्द चित्र काष्ठ शिल्प उधळावे जीवनी...     जे मिळाले अल्प ज्ञानसागरी विखुरले मोती संतुष्टी दाटावी, घेऊनी स्वल्प !        मैत्र जीवाचे आपण सारे       नटराजाचे द्वारी देतो पहारे        जोडले गेलो कलेच्या द्वारे        जीवनी वाहे चैतण्याचे वारे ! कला साधकांनों !  आपल्या देण्याचा मी आभारी छाया पाहून काव्य घेई उभारी कला सादर नटराजाच्या दारी कुणी ना कमी, कुणी ना भारी ! 🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏 -     राजेंद्र

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

 👁️🌴👁️ *वाचावे आनंदे*               यमाई औंध,राजेंद्र गुरव 🇮🇳 *महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या अनेक शुभेच्छा!*  महाराष्ट्राला स्वतःचा वैभवशाली इतिहास आहे... आणि वैशिष्ट्यपूर्ण भूगोल ही !  वैभवशाली महाराष्ट्र  भारताभू एक गौरवशाली भाग आहे ! चालुक्य ,वाकाटक, शिलाहार ,यादव, छ. शिवराय अशा उत्तुंग राजवटी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत.  महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर स्वतःची अशी संस्कृती हजारो वर्ष निपजत असलेली, प्रवाहीत होत असलेली दिसून येते.  आजही महाराष्ट्र म्हणजे भारत देशाचे चैतन्य आहे. अनेक आर्थिक वाहिन्या महाराष्ट्रातून वाहतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मजबूत भारताचा महाराष्ट्र म्हणजे कणा आहे. *महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो!*  *दिनदिन महाराष्ट्र चमकत राहो !* उन्नत घडत, पोषित होऊ दे,  दहा दिशांनी विकसित होऊ दे ! महाराष्ट्र माथा उन्नत पाहो किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥ *संतांची ,योग्यांची ही भूमी*  *शुरविरांची, कर्मवंतीची भूमी* *देश विकासा हातभार  लागो*  *किर्तीचा ध्...