Posts

Showing posts from January, 2021

तो दिस पहिला..

 तो दिस पहिला गोड होता ! अवचित भेटणे आणि... ते डोळ्यांचे मिळणे मिसळूनी जाणे, एक होणे त्या किमयेस जोड नव्हता तो दिस पहिला गोड होता !  ते शब्दांचे कातरणे मनही दडपून जाणे भावांची गर्दी होणे चुकांतही अल्लड गोडवा होता तो दिस पहिला गोड होता ! स्पर्शाचे ओझरते देणे क्षणांचे झाले जणू लेणे आता दुनियेशी देणे न घेणे गोड अनुभूतींचा मारवा होता ॥ तो दिस पहिला गोड होता ! थेंबाने धूंद होणे एकतारी गीत गाणे ते क्षणांचे देणे घेणे क्षण विश्वरूप वाटला होता तो दिस पहिला गोड होता ! आपुले आपल्याशी बोलणे इतर संवेदना बोथट होणे मनाचे पुनः पुन्हा मिसळणे त्या आठवणींचा गारवा होता तो दिस पहिला गोड होता !               यमाई औंध,राजेंद्र गुरव                 ( कृष्णनंदन )                   ९५६११५४१४०

नेताजी सुभाषचंद्र बोस काय म्हणाले !

 काय म्हणाले नेताजी... मा. कस्तुरबा बद्दल    त्या त्यागावरती उभी आज स्वातंत्र्य मंदिरे ! 🌸🍁🍀☘🌿🌸 कस्तुरबा गांधी आता आपल्यात नाहीत. 74 वर्षांच्या असताना इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुण्याच्या कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. कस्तुरबा यांच्या मृत्यूमुळे देशातल्या अडतीस कोटी ऐंशी लाख आणि परदेशात राहणाऱ्या देशवासीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांचा मृत्यू दु:खद परिस्थितीत झाला असला तरी गुलामगिरीत असलेल्या देशात असा मृत्यू गौरवशाली आणि सन्मानजनक आहे. *हे भारताचं वैयक्तिक नुकसान आहे*. दीड वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधीना पुण्याच्या कारागृहात डांबलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा दुसरा मृत्यू आहे. आधी महादेव देसाईंचा मृत्यू झाला आहे. देसाईंनी गांधींबरोबर आयुष्यभर काम केलं. ते गांधींचे खासगी सचिव होते. आता या कारावासादरम्यान हा दुसरा धक्का गांधींना सहन करावा लागला आहे. कस्तुरबा एक हुतात्मा. कस्तुरबा म्हणजे संपूर्ण देशाला आईसारख्या होत्या. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीणसमयी मी गांधीजींचं सांत्वन करतो. कस्तुरबांबरोबर माझा अनेकदा संपर्क व्हायचा, य...

माझ्या अत्यांच्या पावलांनी

 माझ्या अत्यांच्या पावलांनी अत्यांच्या पावलांनी गतकाळ घरी येतो स्मृतींचे बोट धरुनीं माहेरी विसावतो ॥ अत्यांच्या आठवासंगे आम्ही चिंब नाहतो तिच्या शब्दचित्रासह स्मृती सरितेत वाहतो ॥ अत्यांच्या आठवणी चहुबाजूंनी उतू जातात डोळ्यांसमोर क्षणांच्या मैफिली रंगवितात ॥ बाप जरी गेला काही वर्षापूर्वी आत्यांच्या पाठी दिसते त्याची सावली खरी ॥ माझा बाप असता तर कशी असती पाठवण ? कसा वागला बोलला स्मरते पार्श्वभूमी आठवण ॥ असे प्रश्न सदा भोवती  गुंज करतात माझ्या मनांतरी प्रश्नचिन्हं उमटतात ! अत्यांच्या असण्याने बापाचे जीवंत होणे तिच्या वागण्या बोलण्यात बापाचे अस्तीत्व प्रकटणे ॥ आत्याच्या चेहऱ्यावर भूतकाळाची स्मरणे तिच्याच्या शब्दात काळाचे सहज विरणे ॥ माझ्या अत्यांच्या येण्यात स्मृतींची सुगंधी पर्वणी  तिच्या सहवासात  जीवन गाण्या गवसणी ॥             यमाई औंध,राजेंद्र गुरव                  ९५६११५४१४०

सृजन

 👁️🌴👁️   🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘                         *सृजन*                 यमाई औंध,राजेंद्र गुरव ____________________________________________  * मानवी मन  स्पंजसारखे असते.  जीवन पथावर  मनाला जे भावते,  ते ते शोषून घेत ते पुढे चालत रहाते.  जीवन विविध अंगाने सामोरे येते.कधी सुखावते, कधी बोचते ... कधी खरचटते, कधी आत रुतून बसते, कधी आरपार निघून जाते.जीवनाचा आस्वाद  वेगवेगळ्या अनुभूती देतात. वेगवेगळ्या अनुभूती विचारांना गती देत असतात. अनुभूतींचा परिणाम संवेदनावर होत राहतो. संवेदन मनावर उमटत राहतात. कधी निःशब्द तर कधी व्यक्त होतात. यामधूनच विविध कला व्यक्त होतात. त्यांचे प्रकार उदयाला येतात.* उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यात कुणाला चैतन्य दिसतं, भिरभिरणाऱ्या वाऱ्यात कुणाला गाणं ऐकू येत, उगवणाऱ्या सूर्यात कोणाला आशेचे किरण दिसतात, विशिष्ट जागच्या नेहमीच्या दगडात कोणाला आसरा सापडतो अनं सवयींच्या मानसात निवारा... '  *माणसाच्या भावभावनांच्या खेळातू...