Posts

Showing posts from July, 2018

Think positive सकारात्मक विचार

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* १२                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *THINK POSITIVE* *जीवनात सकारात्मक विचारांचे खूप महत्व आहे.जीवन एक आव्हान असेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक विचार ही ऊर्जा आहे.* *आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे* मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं. *ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते. सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज ...

तोची संत जाणावा The Real Saint

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* १९                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥ तोची संत जाणावा ॥ जगाच्या कलाण्या संताच्या विभूती I देह कष्टविती उपकारे ॥ आपले विचार, आचार, हर कर्म परोकारार्थ वाहतात - ते संत ! संशोधनात मग्न होऊन लग्नाची वेळ विसरणारे.. आणि पुढे सगळे आयुष्य देशाला वाहणारे - अे.पी.जे. अब्दुल कलाम,  स्वतःचे शरीरावर प्रयोग करणारे - शारीरिक हानी सोसणारे लुई पाश्चर, एडवीन जेन्नर, अहोरात्र प्रयोगात बुडालेला एडिसन,  ही नावे आपल्या किती लक्षात राहतात.... नट,नट्या, क्रिकेटपटू हेच आपले हिरो.. आदर्श ! शास्त्रज्ञ आपले मनात औषधापुरतेच ! *डाॅ. शंकर आबाजी भिसे* या महान भारतीय शास्त्रज्ञांची २९ एप्रिल ला जयंती झाली . किती जणांचे लक्षात  आली ? *४० पेटंट्स घेणारे आणि २०० शोध नावावर असणारे वैज्ञानिक, भारताचे एडिसन* असणाऱ्या या महर्षीचे काम खरं तर चिरस्मरणीय व्हायला हवे ! डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबई ला २९ एप्रिल १८६७ला झाला .हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जात...

Gulmohar गुलमोहोर

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २१                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *औंधसह १६ गावांना शेतीसाठी पाणी मिळालच पाहिजे* *गुलमोहोर* *गुलमोहोर फुलून येई ,मात उन्हाच्या झळावर* *जणू लढे जवान , घेवूनी जखमा अंगभर* ॥ लिहावयास बसावे अनं विषय चारी बाजूनी चाल करूनी यावे, असे होते कित्येकदा ! काय करावे ? काय लिहावे ... मग येथे स्तब्धता ! १मे- महाराष्ट्र दिन , जागतिक कामगार दिन, गुलमोहोर दिन ! याच दिवशी औंध मध्ये १६ गावाचे पाणी प्रश्नी आंदोलन सुरू झाले. श्री. दत्ताभाऊ जगदाळे या प्रश्नी उपोषणास बसले आहेत... सामान्य जनता, शेतकरी यांचे उपस्थितीत आंदोलन चालू आहे... गेली कित्येक वर्ष  शेतीसाठी पाणी हा प्रश्न लोबंकळत आहे. खटाव - माणच्या कपाळी दुष्काळी शिक्का अजुनही आहे ! कित्येक आंदोलन झाली, जनता रस्त्यावर आली.... शेतकऱ्यांचे मूकमोर्चे, बैलगाडी मोर्चे झाले... नेते, अधिकारी, पदाधिकारी औंधला आले. आंदोलनकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांचेबरोबर चर्चेची आवर्तने झाली ! दत्ताभाऊंनी आपली  अभ्यासपूर्ण भूमिका मांडली ! उरमोडीचे पा...

लक्ष्मणरेषा limitations

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २२                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *लक्ष्मण रेषा*    प्रत्येकाची जशी शक्तीस्थाने असतात तशा असतात उणिवा..., असतात मर्यादाही !  माणसाने एखादे क्षेत्रात खूप  मेहनत घेतलेलेली असते. ते  क्षेत्र त्याचे बलस्थान ठरलेल. तसे प्रत्येकाची एक मर्यादा आहे.आपल्या बुद्धीची,देहाच्या बलाची, सामर्थ्याची, विचारांची एक मर्यादा आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी तशी प्रत्येकाची मर्यादा वेगवेगऴी आहे.  व्यक्ती तितक्या प्रकृती ' जगात आढऴतात आणि त्या त्या मर्यादांवरून माणसाचे कार्यक्षेत्र ठरत असते.  एखादा शेती करेल, एखादा समाजकारणात  जाईल,एखादा उद्योग करेल,एखादा नोकरी करेल,तर एखादा हमाली करेल. म्हणून कोणतेही कार्य करताना माणसाने आपल्या बुद्धीच्या,सामर्थ्याच्या,, मर्यादेचा विचार केलाच पाहिजे. क्षमता नसताना एखादे कार्य हे प्रचंड कष्ट, मनस्ताप, वेळेचा अपव्यय देण्याची शक्यता जास्त ! एखादे रबर किती ताणावे ?... त्याची मर्यादा पाहून ... नाहीतर तुटून जाईल ते !.  माणस...

संगत relationship

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* 23                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥ *संगत* ॥ माणसाची किंमत त्याचे संगतीवरून होते अशी लोकम्हण रुढ आहे. संत तुकाराम सारखे संत पुरुष उत्तम संगतीसाठी परमेश्वर चरणी धावा करतात सुसंगती सदा घडो... ही मागणीच संगतीचे महत्व सांगणारी आहे. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो.  संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्याशी आपण संगत करावी, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात  तर संगतीने काही गुण नष्ट होतात. *कर्पूरासी झाला दिपाचा शेजार , काय त्याचा गुण राहिला सार ?* दीव्याच्या संगतीनं शुभ्र कापूर नष्टच होतो. एक उदा.घ्या - काही लोकांनी इथे यायचे ठरविले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसर्‍याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल; म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. संगती...

Mother's day मातृदिन

👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २४                  यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ *मातृदिन* मातृदेवो भव !.. असे सांगणारी आपली संस्कृती... परंपरा ! आपले राष्ट्र ही आपणास भारतमातेच्या रूपात आणि स्नेहार्द्र देव, संत माऊलीच्या रुपात दिसू लागतात... आमची विठू माऊली म्हणत जनमाणस तल्लीन होऊन जाते ! अनं आपली भाषा ही मातृभाषा ! परस्त्री मातेसमान मानायचा वारसा छ्त्रपतींनी दिलेला.. अर्थात त्या मातृत्वही बावणकशी होतं  हिरकणीच्या दर्जाचं ! आईच्या दूधावर संस्कृती पोसते असे म्हणतात... निसर्ग रचनेनुसार हर अर्भक आईच्या सहवासात वाढत... भरण, पोषण, संवर्धन.... सर्व बाजूनी मोठं होणं... या सर्वांची सुरुवात आईच्या स्नेहार्द्र नजरेतून, स्पर्शातून ..सहवासातून ! म.गांधी, साने गुरुजी इ. महापुरुषांनी आईचे महात्म्य जाणले. आणि गायलेलेहीी. म.गांधीच्या प्रत्येक लढयातील स्त्रियांचा व्यापक व परिणामकारक सहभाग स्वातंत्र्य लढयाच्या एका पिढीवर एक वेगळाचं परिणाम घडवून गेला ! महात्माने मातृत्वाची ताकद जाणली होती. मे चा दुसरा रविवार जगभर आईदिन म्हणून पाळल...