Posts

शिवजयंती २०२४व मूळपीठभवानी

 *शिव जयंती २०२४*  यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला साडेतीनशे (३५० ) वर्षे पूर्ण होऊन गेलेली आहेत . तर 1659 च्या घटनेला 365 वर्ष पूर्ण झालेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने बारा मावळ आणि अठरापगड प्रोत्साहित झाले होते .16 59 च्या अफुजलखानचा स्वराज्याचा आक्रमणाचे फार मोठे संकट ,या मोठ्या संकटामध्ये प्रजाजनही धीरोदात्तपणे सामोरे गेले , त्यातील एक इतिहास प्रसिद्ध कथा म्हणजे - *सन १६५९_ श्री मूळपीठ भवानी यमाई मंदिराचा गुरव लोकांकडून बचाव* श्री यमाई देवी मूळपीठ औंध हे अनेक लोकांचे आराध्य .अनेकांची कुलस्वामिनी ,शैव परंपरेतील अनेक मंदिर गुरव समाजाकडे असून परकीय आक्रमणामध्ये  गुरव समाजाने अनेक मंदिरांचे रक्षण केलेले आहे. यवन आक्रमणापासून मंदिर वाचवली  आहेत ... श्री यमाई देवी औंध संदर्भाने चालुक्य काळापासून देऊळ निर्मितीपासून १५०० वर्षात  ज्या अनेक  ऐतिहासिक घटना झाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची घटना _ *सन १६५९.*. शिवरायांना ' जिंदा या ;मुर्दा पकडण्याची ' प्रतिज्ञा घेऊन विजापूरहून बलाढय अफजलखान बाहेर पडला. सपाट भागावर युद्ध झालेस ते आपले पथ्यावर पडेल , म्हण...

 ॐ

म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 1

 म गांधी: आधुनिक भारताचा सर्वमान्य नेता 🌸🍃☘🍂🌺🌸 गांधीजींच्या कामाने सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला होता.  चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा येथील त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली लढे यशस्वी झाली होते. गांधींजी भारतातील विविध भागात, आडवळणी गावात, लाखों लोकापर्यंत आणि विविध विचारसरणीचे नेत्यांपर्यंत पोहचले होते.  1920 पर्यंत गांधीजींचे सामाजिक व राजकीय अभिसरण वाढले होते त्यांच्या भोवती लोकप्रियतेचे एक आगळेच वलय होते. जनमानसात, ब्रिटीश सरकारात आणि काँग्रेसमध्येही त्यांच्या शब्दाला मान होता .गांधीजीनी या राष्ट्रीय संघटनेच्या घडणीत, स्वरूपात व उद्दिष्टात अनेक बदल घडवून आणले. ही संघटना सर्वसामान्यांसाठी कशी काम करेल? यावर गांधींचा जोर होता .काही ठराविक लोकांप्रती आणि काही शहरांमध्ये असलेली ही संघटना गांधीजींनी गावोगावी आणि बहुजन समाजापर्यंत पोहोचली .गांधीजीं आपल्या कार्याने अनेक लोक जोडले होते .अनेक महत्त्वपूर्ण नेतेही गांधींना येऊन मिळाले आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ही राष्ट्रीय संघटना  बनली. आता तिची कार्यमर्यादा काही शिक्षित लोकांपर्यंत न राहता ती सर्वसामान्य, गरीब लोकांच्या प...

गुरुद्वादशी व भगवान शिव

 *वसु बारस_2 यादिवशी गुरुद्वादशी  साजरी केली जाते*  आपल्या संस्कृती मधील महान गुरू परंपरांचे या दिवशी स्मरण केले जाते. भगवान महादेव हे आदीगुरु ,आदिनाथ, योगेश्वर ,योगीनाथ म्हणून संपूर्ण भारतामध्ये पूजले जातात आणि वैभवशाली समृद्ध गुरुपरंपरा भगवान शिवापासून सुरू झालेल्या आहेत. भगवान शिव हे नटराज असून अनेक कलांची उद्गाते आहेत. त्यांच्यापासूनच अनेक कलांची निर्मिती झाली आहे.विविध  कला परंपरेने शिकवणारी गुरु-शिष्य परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. अनेक आध्यात्मिक पंथ शंकराच्या विचारधारा घेऊन आपल्या संस्कृतीचं भरण-पोषण करीत आलेले आहेत. गुरु परंपरा ही त्यातील उत्तम परंपरा आहे . (ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तिनाथ हे नाथपंथीय होते. तर ज्ञानेश्वर स्वतःची ओळख सांगताना ,*आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा* आदिनाथ महादेवांच्या सन्मान करताना गुरुपरंपरेचे महत्त्वही विशद करतात. )  आयुर्वेद शास्त्र यासंबंधीही भगवान महादेव यांचे योगदान आहे म्हणून त्यांना वैद्यनाथ असेही संबोधले जाते. बेलाचे पान रुद्राक्ष हे अत्यंत औषधी गुणकारी आहे.हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे.  बेलाचे पान हे त्र...

नवरात्र अष्टमी* 2021

 *नवरात्र अष्टमी* नवरात्र अष्टमी महाष्टमी म्हणूनही ओळखले जाते. सर्वसाधारण भक्तासाठी अष्टमी अत्यंत महत्त्वाची आहे .तसेच ती साधकांसाठी, साधू संत, शैवपंथीय नाथपंथीय इत्यादी योगीलोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज दिवसभर शक्तीची साधना केली जाते.  देवीने महिषासुरादी अनेक  राक्षस आज मारले अशा प्रकारच्या कथा भागा भागात प्रचलित आहेत.  ज्यांना नवरात्राचे नऊ दिवस उपवास काही कारणाने जमत नाहीत ते लोक आज् अहोरात्र उपवास करून नवमीला  घट उठल्यानंतर उपवास  सोडतात.  श्री यमाई देवी मूळपीठ  औंध आज अष्टमी निमित्त दुपारी देवीचा छबिना असतो.अलंकृत पूजा करून उत्सवमूर्ती पालखीत आरूढ होते आणि मंदिराला पाच प्रदक्षिणा घालते.

मरत असतील तुझ्यावर !

 मरत असतील लाखो तुझ्यावर आणि मी जगत आहे तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी मरत असतील  तुझ्यावर लाखो  तुझीया प्राप्तीसाठी आणि मी जगत आहे सजग  तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी..........॥

भ्रमित

 ती काय वाटतं तुला मला पाहिल्यावर ? तो (मनातच... ) भानं कोणतं राहतं शब्दबंबाळ दारुड्यागत