Posts

Showing posts from 2024

शिवजयंती २०२४व मूळपीठभवानी

 *शिव जयंती २०२४*  यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला साडेतीनशे (३५० ) वर्षे पूर्ण होऊन गेलेली आहेत . तर 1659 च्या घटनेला 365 वर्ष पूर्ण झालेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने बारा मावळ आणि अठरापगड प्रोत्साहित झाले होते .16 59 च्या अफुजलखानचा स्वराज्याचा आक्रमणाचे फार मोठे संकट ,या मोठ्या संकटामध्ये प्रजाजनही धीरोदात्तपणे सामोरे गेले , त्यातील एक इतिहास प्रसिद्ध कथा म्हणजे - *सन १६५९_ श्री मूळपीठ भवानी यमाई मंदिराचा गुरव लोकांकडून बचाव* श्री यमाई देवी मूळपीठ औंध हे अनेक लोकांचे आराध्य .अनेकांची कुलस्वामिनी ,शैव परंपरेतील अनेक मंदिर गुरव समाजाकडे असून परकीय आक्रमणामध्ये  गुरव समाजाने अनेक मंदिरांचे रक्षण केलेले आहे. यवन आक्रमणापासून मंदिर वाचवली  आहेत ... श्री यमाई देवी औंध संदर्भाने चालुक्य काळापासून देऊळ निर्मितीपासून १५०० वर्षात  ज्या अनेक  ऐतिहासिक घटना झाल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची घटना _ *सन १६५९.*. शिवरायांना ' जिंदा या ;मुर्दा पकडण्याची ' प्रतिज्ञा घेऊन विजापूरहून बलाढय अफजलखान बाहेर पडला. सपाट भागावर युद्ध झालेस ते आपले पथ्यावर पडेल , म्हण...