Posts

Showing posts from October, 2020

काही कविता

 [19/09, 1:51 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: हे असे तुझे मागणे  बरे नाही झुरणे,मरणे,मागे फिरणे बरे नाही ॥ जे तुज मिळाले त्यात संतुष्ट होणे बरे ( ते शक्य नाही,असे बरळणे बरे नाही ) सावर स्वतःला आता,तो क्षण मोहाचा आवर स्वतःला,घसरणे बरे नाही ॥ होते पहा जीवनाची सहज राखरांगोळी मग आपुलीच अफवा उसवणे बरे नाही [20/09, 5:11 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: आता चेहरा न्याहाळतानाही आडवा येतो नीत (च ) चष्मा वाढला नंबर कितादा हा तो दाखवी सदा करी१मा | आता थांबायाचे कोठे ? कळत नाही शतदा : ते वाहवांचे वळण सरळ भासते कितीदा ! मुलायम रेशमी ज्वर जाणवे झिंग स्पर्शाला नवा झाज न मढवू पुन्हा त्या हर्षाला ॥ कुंतल रेशमी बटा ना राहिल्या बादल घटा काळ्याकुट्ट अंधारीही चाचपडी जणू जटा ॥ आता चालणे होत असे पचवीत कित्येक आचके अदा आमुच्याही आता  यारों जरा हटके  .. !                     राजेंद्र गुरव यमाई औंध                    ९५६११५४१४० [20/09, 6:28 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: सूर जुळला सूर जुळला प्रिये तुझ्य...

Kahi kavita

 [02/10, 10:22 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: स्थिती : गुलामगिरीची जणू भारता परंपरा बद्ध कित्येकदा परतंत्राने धरा  जळूनी मेली  मुर्दाड मती परशक्ती पुढे कोणाची छाती ॥ विविध भाग,भिन्न संस्कृती ५५० संस्थानी तुकडे भाषा,भूषा ,विविध गती त्यास एकात्मतेचे साकडे ॥ आपल्याच नादी सामान्यांचे जगणे सत्ताधीश कोण ? ना देणे घेणे बेडकांचे जणू डबके विहरणे जगणे असे जणू शतदा मरणे ॥ म गांधी : हे राष्ट्र आपले आहे सर्वांस दिली स्वःची जाणीव दया उधळूनी गुलामगिरी.. मनामनातील जागवी नेणीव ॥ एकटा काय करू ? ना बाळगू खंत ठाम करू जरी सुरवात संत  मग ब्रिटीश सत्तेचा करूया अंत रूजविला प्रयत्ने मंत्र जनमानसात ॥ प्रश्नांच्या मूळाशी जाणे निर्भयतेने त्याला भिडणे उत्तरासाठी सदैव झगडणे माणसांचे मग आतून घडणे ॥ माणूस माणूस हृदय जोडले एक भारतीयत्व सद्कार्ये घडले अनेक त्यागी जीवन सांडले काळाशी स्वातंत्र्यसमर मांडले ॥ राष्ट्र जोडणी पेरुणी ममता अखंड एकसंघ सांधली जनता नेताजी जाणे आपुला राष्ट्रपिता जग वंदीते उत्तुंग महात्मा ॥ @राजेंद्र गुरव [04/10, 10:56 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: *सांजवेळी* निष्पर्ण वृक्षाखाली पडला...